मुख्य सामग्रीवर वगळा

Early Morning...


साधारण साडेपाचची ठरलेली वेळ नेहमीप्रमाणे ऊन असो,पाऊस असो, वारा,थंडी असो पण ही वेळ कधी चुकायची नाही वृत्तपत्र विक्रेत्याला ती कधी चुकतही नाहीच.मुळात या वृत्तपत्र मीडियाशी जोडून असलेले सर्वच निवांत झोप फार कमी घेतात प्रेसवाले सर्व मान्यवर,मित्र परिवार रात्रभर पेपर छापून त्या गरमा गरम पेपरच्या पार्सलला सर्व जिल्ह्यात वितरित करतो हे,वितरित करण्याचं काम अवघ्या चार ते पाच तासात पूर्ण जिल्ह्यात होत असते... 

तिथून पुढे जबाबदारी असते ती मग घरोघरी सायकलवर,गाडीवर,स्टॉलवर पेपर विकणाऱ्याची आपल्या वाचकाच्या हातात सकाळच्या गरम-गरम चहासोबत वृत्तपत्र त्याला कसे मिळेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेऊन पहाटेचे हे काम सुरू होते...
साडेपाचची वेळ स्वेटर,शूज घालून सायकलला टांग मारायची दोन किलोमीटर नाक्यावर पेपरची काळी-पिवळी गाडी पार्सल घेऊन पावणे सहाच्या दरम्यान येते.माझ्यासारखी अजून पाच-सहा पोरं,आमचा मालक सकाळी सकाळी कुठलाही दांगुडा न करता गाडीमधुन पार्सल काढायचे,व्यवस्थित रचायचे बारा वर्षापूर्वी आठवते जेव्हा सकाळ पेपर एक रुपयाला होता तेव्हा कन्नड शहरात सत्ताविसशे पेपर आम्ही रोज तीन तासात वाटत असायचो पूर्ण सायकलवर...

ते दिवस काही औरच होते,डिजिटल मीडिया,सोशल मीडिया आली आणि वृत्तपत्र वाचकाचे प्रमाण दिवसंदिवस कमी होत गेले.जो आलेख आजही उतरता आहे पण जे खरे वाचक आहे,ज्यांची पहाट अजूनही पेपर शिवाय होत नाही असेही वृत्तपत्र चाहते खूप आहे जे सकाळीच या कुडकुडत असलेल्या थंडीत पेपरवाला कधी येईल अन् कधी तो त्याचा
"पेपर मावशी,काका पेपर..."
हा आवाज कानी पडेल याची वाट बघत असतात...

आठवणीचे हे दिवस जेव्हा लिहायला घेतो तेव्हा,थंडीच्या या दिवसात नाक्यावर असलेल्या बस थांब्याच्या ठिकाणी चौकातील स्ट्रीट लाईटच्या उजेडात एका विशिष्ट शैलीने पेपरचे पार्सल फोडले जायचे.मग त्यांना व्यवस्थित रचून तीन भागात ठेऊन एक पूर्ण पेपर तयार केला जात असत. तो सर्वात वर मुख्य पेपर,मग तालुक्याची पुरवणी,त्याच्या आता दररोज वेगवेगळी प्रकाशित होणारी पुरवणी हे सर्व व्यवस्थित जोडून झाले की स्थानिक ठिकाणावरून कुणी जाहिरात करायची म्हणून पोंपलेट घेऊन आले की ठराविक शेकडा किंमतीत आम्ही ती टाकून देत असायचो,ज्या दिवशी ही पोंपलेट असायची त्या दिवशी एक-एक चहाचा ग्लास चहा सर्व पेपर वाटप करणाऱ्या मुलांना भेटत असायचा...

या कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटे सहाच्या सुमारास नाक्यावर भिंतीच्या आडोश्याला बसून चहा पित पेपर वाचायचं जे सुख भेटायचं ते आज नाही अनुभवता येत,मग तो पेपरचा भला मोठ्ठा गठ्ठा सायकलला बांधायचा अन् साऱ्या शहरात ठरवल्या ठिकाणी पेपर पेपर करत पेपर टाकत सुटायचे...

विशेष काही नव्हते यात,सामान्य गरीब पोरं जे करायची ते मी करायचो छान वाटायचं,हाताला दोन पैशे लागायचे अन् या रोजच्या पेपर टाकण्यातून व्यवहारी जगात सर्वत्र कसं जगायचं हे ही ज्ञान मिळत गेलं इतकंच...

आयुष्यभर जगण्याला व्यवहारीपणाची जोड देऊन बघण्याची सवय हे जगलेले बालपण लावून गेले याची कधीतरी खंत वाटते तर कधी आपलचं लवकरच शहाणं झाल्याचं मनात येऊन जाते मग आनंदही होतो...
पहाटेच्या दोन-तीन तासात उभे आयुष्यभर पुरेल इतकं काही हे दिवस देऊन गेले,देऊन जायचे...
आज पूर्वीचे दिवस आठवले की,आपसुक मनात येऊन जातं की इतकं प्रामाणिक होवून पुन्हा एकदा आयुष्य जगता यावं कायमचं....

Written by,
Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड