काय तो रोग आलाया म्हणे करुणा...कोरोणा म्हण ओ हौशे... आपल्याला कसला हुतो आहे बाई रोग अन् राग.... आपल्याकडे बघून आपल्याला होणार बी नाय त्यो....आपल्याच पोटाची खळगी भराया काम नाय इथं कुठं सफरचंद आणायला पैसा घालू रोग बोलून लक्षे.... बोलणं ऐकून मी थांबलो,तालुक्याच्या गावाला माझं राहणीमान माझ्या डोळ्यासमोरून गेलं.इथे हे काय चालू आहे हा प्रश्न पडला.... चालत चालत शिवनामायच्या किनारी येऊन थांबलो,गावात पाऊस येवो म्हणुन जसं महादेवाच्य मंदिरात पाणी भरून,मंदिर बंद करून ठेवता तसे कडी कुलूप लावून सर्व मंदिर बंद करून,देवाला राखण एक पोलिस ठेवला होता.... चालत चालत नदी पुलावर गेलो,माझ्या वयातल्या दोन-तीन तरण्या नवीन लग्न झालेल्या सूना धूने धोपटीत माहेरच्या गोष्टी करत होत्या... मी थांबलो अन् त्यांच्या जवळ जाऊन गप्पा ऐकत बसलो,"काय वो दिर साहेब कुठं फीरायले इकडं ?"वहिनीचा आवाज कानी आला,कुणी येतंय का काय भेटायला माझ्या दिराला असं बोलून त्या हसायला लागल्या... नाय वो वहिनी बघायलो,गावचे हाल-हवाल आमच्या सारख्या शहरी माणसाला कोण यतंया भेटायला इथं,मग भटकायलो एकटा एकटा... बरं हायसा जास्त फिरु नका दु
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!