मुख्य सामग्रीवर वगळा

घाट एक जीवन

एकटा फीरत असलो की येऊन जातो चालत चालत रस्त्यानं घाटात,चालत राहतो मनातील विचारही माझ्या सोबत चालत राहतात....

समोर दिसतो तो विस्तारलेला खुप मोठा रानपसारा,रस्त्याने जाणारी येणारी मोठ्ठाली वाहनं  त्यात ट्रका घाटात मोसम कटू नये म्हणुन फुल स्पीडने रेस होत असतात लोड खुप असल्यामुळे...

कधीतरी असे वाटत असते की,त्या तश्याच मागे आल्या तर एकदाचा माझा हा भटकणारा जीव तरी घेऊन जाईल.निपचित पडुन राहील मी त्यावेळी नाही वल्गना करणार तांब्याभर पाण्यासाठी सुद्धा कोणाची,पण नाहीना येत त्या ट्रक मागे त्यांनीपण ठरवले आहे की काय कोणास ठाऊक पुढेच जायचं अन् मला अजुन या मूर्ख जीवनात जगत ठेवायचं....

तोंडावर धूर सोडुन निघून जातात माझ्या साल्या पण कधीतरी पुढच्या वळणावर जेव्हा अशीच एक ट्रक पलटी होऊन जीवन मरणाच्या शेवटच्या थरारक क्षणांना जेव्हा तो जगत असतो,तेव्हा माझा हात साला एक तांब्याभर पाणी सुद्धा देऊ शकत नसतो....

तेव्हा असं वाटतं कलंक करून टाकावा या हाताचा,इतकं कसं निष्टुर असतो आपण.इतके कसे त्यावेळी भावनांच्या आहारी गेलेलो असतो समजत नाही,जेव्हा रक्ताचा ओघळ भर रस्त्यात वाहताना दिसतो एक मिनट सुद्धा ही जिंदगी थांबत नाही लोकांची....

तो मात्र विव्हळत क्षणाक्षणाला मरत असतो,हे सगळ वाईट आहे.तेव्हाच मात्र तो म्हातारा तळतळ करत असतो गेलाय कधीच एक जीव निघून,आपण झालो होतो काही वेळासाठी जिंदे मुर्दे इथे....

तो गेला होता जीवंत जिंदगीच्या या रंगमंचावर एक घाट मरणाचा चढुन,आपण मात्र इथेच जीवनमरणाचा रोज रोज तो पडणारा फालतू प्रश्न घेऊन जगणार आहोत....नाही काम येत कोणी कोणाला अचूक आहे हे मी वेधतो अन् चालत राहतो वेड्यासारखं सोबतीला विचार घेऊन....

घाटात काही नसत सोबत पण अनेक दृश्य दिसतात,ती वाळून चाललेली वनसंपदा सुखलेली ती सागाची मोहाची झाडं,कुठं तरी मध्येच फुलणारा तो गुलमोहर याची मला ओळख नाहीये‌‌. तो म्हातारा करून देत असतो भेटत असतो कधीतरी....

भर दुपारच्या उन्हात रस्त्याने घाटात चालताना दिसतो तो कधीतरी,खुप वाढलेले केस रट झालेली दाढी अन् अनवाणी असतो.जेव्हापासून बघतो तो पायात काहीच घालत नाही आज भेटला होता....

चेहर्यावर अनेक प्रश्न घेऊन फिरत असतो काय करतो कसा राहतो माहित नाही,खांद्यावर लटकलेल्या दोन कळकट झालेल्या पिशव्या अन् शोधत असतो काहीतरी या घाटात असलेल्या वनात.आज जेव्हा न राहून विचारले तर बोलला की,आज इथे आहे उद्या तिथे आहे जीवन जगण्याचे हेच माझे न उमगलेले कोडे आहे....

#हरवलेल्या_लोकांच्या_दुनियेतला_मी_एक_खुळा....

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ