मुख्य सामग्रीवर वगळा

घाट एक जीवन

एकटा फीरत असलो की येऊन जातो चालत चालत रस्त्यानं घाटात,चालत राहतो मनातील विचारही माझ्या सोबत चालत राहतात....

समोर दिसतो तो विस्तारलेला खुप मोठा रानपसारा,रस्त्याने जाणारी येणारी मोठ्ठाली वाहनं  त्यात ट्रका घाटात मोसम कटू नये म्हणुन फुल स्पीडने रेस होत असतात लोड खुप असल्यामुळे...

कधीतरी असे वाटत असते की,त्या तश्याच मागे आल्या तर एकदाचा माझा हा भटकणारा जीव तरी घेऊन जाईल.निपचित पडुन राहील मी त्यावेळी नाही वल्गना करणार तांब्याभर पाण्यासाठी सुद्धा कोणाची,पण नाहीना येत त्या ट्रक मागे त्यांनीपण ठरवले आहे की काय कोणास ठाऊक पुढेच जायचं अन् मला अजुन या मूर्ख जीवनात जगत ठेवायचं....

तोंडावर धूर सोडुन निघून जातात माझ्या साल्या पण कधीतरी पुढच्या वळणावर जेव्हा अशीच एक ट्रक पलटी होऊन जीवन मरणाच्या शेवटच्या थरारक क्षणांना जेव्हा तो जगत असतो,तेव्हा माझा हात साला एक तांब्याभर पाणी सुद्धा देऊ शकत नसतो....

तेव्हा असं वाटतं कलंक करून टाकावा या हाताचा,इतकं कसं निष्टुर असतो आपण.इतके कसे त्यावेळी भावनांच्या आहारी गेलेलो असतो समजत नाही,जेव्हा रक्ताचा ओघळ भर रस्त्यात वाहताना दिसतो एक मिनट सुद्धा ही जिंदगी थांबत नाही लोकांची....

तो मात्र विव्हळत क्षणाक्षणाला मरत असतो,हे सगळ वाईट आहे.तेव्हाच मात्र तो म्हातारा तळतळ करत असतो गेलाय कधीच एक जीव निघून,आपण झालो होतो काही वेळासाठी जिंदे मुर्दे इथे....

तो गेला होता जीवंत जिंदगीच्या या रंगमंचावर एक घाट मरणाचा चढुन,आपण मात्र इथेच जीवनमरणाचा रोज रोज तो पडणारा फालतू प्रश्न घेऊन जगणार आहोत....नाही काम येत कोणी कोणाला अचूक आहे हे मी वेधतो अन् चालत राहतो वेड्यासारखं सोबतीला विचार घेऊन....

घाटात काही नसत सोबत पण अनेक दृश्य दिसतात,ती वाळून चाललेली वनसंपदा सुखलेली ती सागाची मोहाची झाडं,कुठं तरी मध्येच फुलणारा तो गुलमोहर याची मला ओळख नाहीये‌‌. तो म्हातारा करून देत असतो भेटत असतो कधीतरी....

भर दुपारच्या उन्हात रस्त्याने घाटात चालताना दिसतो तो कधीतरी,खुप वाढलेले केस रट झालेली दाढी अन् अनवाणी असतो.जेव्हापासून बघतो तो पायात काहीच घालत नाही आज भेटला होता....

चेहर्यावर अनेक प्रश्न घेऊन फिरत असतो काय करतो कसा राहतो माहित नाही,खांद्यावर लटकलेल्या दोन कळकट झालेल्या पिशव्या अन् शोधत असतो काहीतरी या घाटात असलेल्या वनात.आज जेव्हा न राहून विचारले तर बोलला की,आज इथे आहे उद्या तिथे आहे जीवन जगण्याचे हेच माझे न उमगलेले कोडे आहे....

#हरवलेल्या_लोकांच्या_दुनियेतला_मी_एक_खुळा....

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...