मुख्य सामग्रीवर वगळा

घाट एक जीवन

एकटा फीरत असलो की येऊन जातो चालत चालत रस्त्यानं घाटात,चालत राहतो मनातील विचारही माझ्या सोबत चालत राहतात....

समोर दिसतो तो विस्तारलेला खुप मोठा रानपसारा,रस्त्याने जाणारी येणारी मोठ्ठाली वाहनं  त्यात ट्रका घाटात मोसम कटू नये म्हणुन फुल स्पीडने रेस होत असतात लोड खुप असल्यामुळे...

कधीतरी असे वाटत असते की,त्या तश्याच मागे आल्या तर एकदाचा माझा हा भटकणारा जीव तरी घेऊन जाईल.निपचित पडुन राहील मी त्यावेळी नाही वल्गना करणार तांब्याभर पाण्यासाठी सुद्धा कोणाची,पण नाहीना येत त्या ट्रक मागे त्यांनीपण ठरवले आहे की काय कोणास ठाऊक पुढेच जायचं अन् मला अजुन या मूर्ख जीवनात जगत ठेवायचं....

तोंडावर धूर सोडुन निघून जातात माझ्या साल्या पण कधीतरी पुढच्या वळणावर जेव्हा अशीच एक ट्रक पलटी होऊन जीवन मरणाच्या शेवटच्या थरारक क्षणांना जेव्हा तो जगत असतो,तेव्हा माझा हात साला एक तांब्याभर पाणी सुद्धा देऊ शकत नसतो....

तेव्हा असं वाटतं कलंक करून टाकावा या हाताचा,इतकं कसं निष्टुर असतो आपण.इतके कसे त्यावेळी भावनांच्या आहारी गेलेलो असतो समजत नाही,जेव्हा रक्ताचा ओघळ भर रस्त्यात वाहताना दिसतो एक मिनट सुद्धा ही जिंदगी थांबत नाही लोकांची....

तो मात्र विव्हळत क्षणाक्षणाला मरत असतो,हे सगळ वाईट आहे.तेव्हाच मात्र तो म्हातारा तळतळ करत असतो गेलाय कधीच एक जीव निघून,आपण झालो होतो काही वेळासाठी जिंदे मुर्दे इथे....

तो गेला होता जीवंत जिंदगीच्या या रंगमंचावर एक घाट मरणाचा चढुन,आपण मात्र इथेच जीवनमरणाचा रोज रोज तो पडणारा फालतू प्रश्न घेऊन जगणार आहोत....नाही काम येत कोणी कोणाला अचूक आहे हे मी वेधतो अन् चालत राहतो वेड्यासारखं सोबतीला विचार घेऊन....

घाटात काही नसत सोबत पण अनेक दृश्य दिसतात,ती वाळून चाललेली वनसंपदा सुखलेली ती सागाची मोहाची झाडं,कुठं तरी मध्येच फुलणारा तो गुलमोहर याची मला ओळख नाहीये‌‌. तो म्हातारा करून देत असतो भेटत असतो कधीतरी....

भर दुपारच्या उन्हात रस्त्याने घाटात चालताना दिसतो तो कधीतरी,खुप वाढलेले केस रट झालेली दाढी अन् अनवाणी असतो.जेव्हापासून बघतो तो पायात काहीच घालत नाही आज भेटला होता....

चेहर्यावर अनेक प्रश्न घेऊन फिरत असतो काय करतो कसा राहतो माहित नाही,खांद्यावर लटकलेल्या दोन कळकट झालेल्या पिशव्या अन् शोधत असतो काहीतरी या घाटात असलेल्या वनात.आज जेव्हा न राहून विचारले तर बोलला की,आज इथे आहे उद्या तिथे आहे जीवन जगण्याचे हेच माझे न उमगलेले कोडे आहे....

#हरवलेल्या_लोकांच्या_दुनियेतला_मी_एक_खुळा....

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...