मुख्य सामग्रीवर वगळा

गावाकडचा कोरॉना

काय तो रोग आलाया म्हणे करुणा...कोरोणा म्हण ओ हौशे...
आपल्याला कसला हुतो आहे बाई रोग अन् राग....
आपल्याकडे बघून आपल्याला होणार बी नाय त्यो....आपल्याच पोटाची खळगी भराया काम नाय इथं कुठं सफरचंद आणायला पैसा घालू रोग बोलून लक्षे....

बोलणं ऐकून मी थांबलो,तालुक्याच्या गावाला माझं राहणीमान माझ्या डोळ्यासमोरून गेलं.इथे हे काय चालू आहे हा प्रश्न पडला....

चालत चालत शिवनामायच्या किनारी येऊन थांबलो,गावात पाऊस येवो म्हणुन जसं महादेवाच्य मंदिरात पाणी भरून,मंदिर बंद करून ठेवता तसे कडी कुलूप लावून सर्व मंदिर बंद करून,देवाला राखण एक पोलिस ठेवला होता....

चालत चालत नदी पुलावर गेलो,माझ्या वयातल्या दोन-तीन तरण्या नवीन लग्न झालेल्या सूना धूने धोपटीत माहेरच्या गोष्टी करत होत्या...
मी थांबलो अन् त्यांच्या जवळ जाऊन गप्पा ऐकत बसलो,"काय वो दिर साहेब कुठं फीरायले इकडं ?"वहिनीचा आवाज कानी आला,कुणी येतंय का काय भेटायला माझ्या दिराला असं बोलून त्या हसायला लागल्या...

नाय वो वहिनी बघायलो,गावचे हाल-हवाल आमच्या सारख्या शहरी माणसाला कोण यतंया भेटायला इथं,मग भटकायलो एकटा एकटा... बरं हायसा जास्त फिरु नका दुपारच्याला घरला या जेवायला वहिनी बोलती झाली....

अन् मी निघालो माझ्या आवडत्या जागेकडे जायला,रस्त्यानं सर्व हिरवेगार झाडे झुडपे दिसत होती.नदीच्या काठावर असलेले बेसरमं बेसुमार वाढली आहे,शिवनामायीचे संथ वाहणारे पाणी काळजाचा ठाव घेत होते...

हिरवीगार वनराई संपली अन् बोडक्या झाडांची वाट सुरू झाली,लाल मती हवेत उडून डोळ्यांना स्पर्श करायची अन् डोळे चुर चुर करत मी चालत होतो.दूरवर असलेलं धरण मला खुणावू लागलं, बोलावू लागलं खुप दिवस झाले त्या धरण पाळेवर विसावा घेतला नव्हता....

पाऊले त्याच दिशेने चालत होती अन् नकळत आज अनपेक्षित त्या बकऱ्या चारणाऱ्या रामा बाबांचे दर्शन झाले.त्याच्या त्या चार-पाच बकऱ्या अन् तो फिरत होते कोरड्या झालेल्या धरणात हिरव गवत बकर्या चरत होत्या.तो अधून मधून शिळ घालत त्यांना आवाज देत त्यांच्या रेडूवर चालणाऱ्या गाण्याशी ठेका धरत होता....

आता मी धरण पाळेवर येऊन बसलो अन् रामा बाबा जवळ जवळ येत होते.तसं धरणात अजून दोन वर्ष पुरल इतकं पाणी आहे,पण माणसंच जगली नाहीतर या पाण्याचा असून काय फायदा ? एक प्रश्न पडून गेला या पाण्यात जर तो विषाणू आला अन् पाण्यामार्फत साऱ्या शहरा,गावात तो पसरला मग काय होईल ?

तितक्यात रामा बाबांनी आवाज दिला काय सरकार आज कुठं वाट चुकला....मी माझ्यातल्या शास्त्रज्ञाला सावरत बोलो,काय नाय आलो तुम्हाला भेटायला. तुम्हाला नाय का एकवीस दिवस सुट्टी रामा बाबा मी बोलो,रामा बाबा बोलता झाला....

अरे आम्हाला कसली सुट्टी,या बकऱ्या आहेत तोवर नाही सुट्टी.अशे किती रोग आले अन् गेले काय नाय झालं आम्हाला,हो रं बाबा सगळ खरं आहे तुझं पण तरी घरी थांबायचं बाबा...

नायरे जमत मी थांबलो तर माझ्या या विठू अन् माऊलीला कोण चारा देईल,त्यांची पोट नाही भरली तर माझं कसं पोट भरल.... हे ऐकताच मी अवाक झालो अन् खरच हे सर्व शक्य आहे का ? असे मनात येऊन गेलं...

तितक्यात रामा बाबा बोलला हे बघ लेका,जितकं माझ्या कडून होतं ते मी करतो,काल तालुक्याच्या गावाला गेलो तिकडून हा रुमाल आणला आहे....तोंडाला बांधून घेत असतो अन् उपरनं डोक्याला ऊन लागत नाय मग मला.

मी म्हणलो रामा बाबा तू हुशार आहे यार....तू इतकं तरी करतो,आमच्या शहरात लोकांना सुट्ट्या देऊन लोकं रस्त्यांन उघड्या तोंडानं हिंडायली.... रामा बाबा बोलता झाला शहरातली लोक बाबा ती,मोठी लोक त्यांना कसला होतो रोग अन् कसला काय अन् तो रेडूवर गाणे ऐकत पुढे निघून गेला....

मी ही विचार करत करत न्याहाळत बसलो त्या विस्तीर्ण धरणाला व त्या दोन माणसांना एक शहरी अन् एक माझा लाडका माझा गावातल्या माझ्या माणसाला....

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ