मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गौताळा अभयारण्य,पितळखोरा लेणी भाग 2

आजच्या लेखमधून मी आपल्याला गौताळा अभयारण्य व जवळच असलेली पितळखोरा लेणी या दोन ठिकाणांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेल... #गौताळा_अभयारण्य... औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य.डोंगरदऱ्यांच्या कपारी खाणीतून वाट काढत,उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्या सारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो..आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आपण या ठिकाणी अनुभवाल,डोळ्यांचे पारणे फेडणारे असे विविधतेने नटलेले हे गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली.कन्नड तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो.कन्नडपासून अवघ्या 9 कि.मी. अंतरावरच अभयारण्य सुरु होते.तर चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर एक फाटा आहे.त्या

गौताळा अभयारण्य...

गौताळा अभयारण्य... गौताळा अभयारण्यबद्दल यापूर्वी माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे,ट्रेकर्स सज्ज झाले आहे...खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा विषय घेऊन चर्चा होत आहेत तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून माझा हा तुमच्यासाठी माहितीपर लेख लिहण्याचा एक प्रयत्न... त्यानिमित्ताने माझ्या माध्यमातून गौताळा अभयारण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख होईल... तर मित्र/मैत्रणींनो गौताळा अभायरण्य हे मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे अभयारण्य आहे.थोडक्यात या ठिकाणी आल्यावर तुमची कुठलीही निराशा होणार नाही कारण एकाच तालुक्यात तुम्हाला  ट्रेकिंग करण्यासाठी खूप मोठे अभयारण्य आहे,अनेक व्हिव पॉइंट,विविधतेने नटलेली वृक्ष,वेली संपदा, धबधबे,धरणे,किल्ले,लेणी अन् विविध दर्शनीय मंदिर हे आपल्याला काही 40 ते 50 किलोमीटर आतील अंतरात बघण्यास मिळेल... येणार कसे - रेल्वेने आलात तर - चाळीसगाव रेल्वस्थानकापासून पुढे बसेसने 20 कि.मी. विमानाने आलात तर

#TitanicinfoBLS.

The wreck of the Titanic is protected by UNESCO from 15 April 2012 onwards.... The UNESCO 2001 Convention on the Protection of the Underwater Cultural Heritage applies to all traces of human existence having a cultural, historical or archaeological character which have been under water for at least 100 years. Thus, 15 April 2012 marks the moment from which on the Titanic wreckage is protected under the Convention. RMS Titanic was a British passenger ship that sank in the North Atlantic Ocean on 15 April 1912 at 2.20 am after colliding with an iceberg. Its sinking caused the deaths of 1,514 people. Its wreckage was discovered on September 1, 1985, during a joint French/U.S. expedition lead by Jean-Luis Michel of the French Research Institution for the Exploration of the Seas (IFREMER) and Robert Ballard. It was found approximately 340 nautical miles off the coast of Newfoundland, Canada 3,800 meters beneath the surface. The Titanic disaster led to major improvements in m

हरवलेलं मन...

तुमच्या भटकण्यावर दोन-तीन कविता झाल्या,तिच्या आठवणीत दोन तीन लेख झाले,या सर्वांच्या विचारात माझी रात्रही ढळून गेली...दिवसही उगवून सकाळची दुपार झाली आहे,काय साध्य झालं ?  याचं उत्तर नाहीचे... फक्त इतकं आहे की,सद्या वेळ आहे ती कारणी  लागली आहे... वेळेचे गणित जर इतके सोप्पे झाले असेल तर खरच माझं भविष्य अंधारात दिसतंय व ते काही दूर नाहीये,बस इतकंच बाकी विचार करायचा नाहीचे सध्या... कारण विचारांना विचारांचे हात भेटले की त्यांना मोकळीक भेटत असते,मग ते या झळाया तुटणाऱ्या उन्हात आकाशात मुक्तपणे विहार करायला लागतात त्या काल्पनिक पंखांना शरीरास जोडते करून... काय हवे ? काय करतोय ?  याला उत्तरे नाहीचे सध्या ती शोधायची पण नाहीये... कारण कैफात मग,मन पुन्हा कल्पनेच्या जगात फिरून येतं मग मला भूतकाळ आठवतो... Written by, Bharat Sonwane...

हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...

हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर... सांजेच्या प्रहरी रामाबाबा आपली बैलगाडी अन् दुधाची क्याटली घेऊन वावरातून निघाला,रस्त्यात गुरांसाठी काढून ठेवलेला हिरवा घास,मक्काची बारीक केलेली कुट्टी घेऊन तो ती बैलगाडीत टाकून तो रस्त्याला लागला. रस्त्यात सुमनबाई,शैली अन् सुमनबाईची नवी सूनबाई त्याला दिसल्या त्यांनाही त्याने बैलगाडीत बसवुन घेतले... रस्त्यात चहूकडे बैलांच्या खुराने उडणारी धूळ,त्यात लालभडक दिसणारा मावळता सुर्य मी बघत होतो...पायी चालत असल्याने एरवी रामाबाबा माझ्यापुढे निघून गेला हुता. बोडक्या टेकडीवर भिलाबाबाच्या दावणीला असलेल्या बक्र्या म्या... म्या... करीत ओरडत होत्या,भिलाबाबा तांब्या घेऊन बकरीचं दूध काढत बसला होता,मला बघून त्यानं शीळ फुंकली अन् मला त्याच्याकडे यायला खुणावू लागला मी हातवारे करून सांगितले येतुया... मी ठोकरा खात कसातरी भिलाबाबाच्या झोपडी पर्यंत पोचलो,अंगणात उभी केलेली खाट त्याने आडवी केली व मला बसायला लावले,मी बसलो...त्याने त्याच्या लेकीला राणुबाईला बकरीच्या दुधाची तीन कप चहा ठेवायला सांगितली अन् तो बकऱ्या बांधू लागला व मला बोलूही लागला... मग काय छोटे सरकार आज

अनुत्तरित राहिलेले प्रश्न...

अनुत्तरित राहिलेले प्रश्न... अनुत्तरित आहे काही प्रश्न उत्तराविना अजूनही,प्रश्नच होते कुठे ते मागं सोडून दिलेल्या अडचणीच त्या...! प्रश्न उत्तरांचा खेळ जुळवून येतो बळजबरीचाच रोजचा, टीचभर पोटासाठी धंदा मांडलाय वेशीवर गरीबांच्या इज्जतीचा...! शब्दांना मुभा आहे फक्त जित्यापणी मागत्या हाताने मागण्याची,बाकी हात आमचे तेव्हाच कलंक झाले जेव्हा सत्याची ओढ त्यांना लागली...! प्रश्न उत्तरांच्या या खेळात रोज हरण्याशी मुक्काम आमचा,उत्तरे मिळालेल्या निःशब्द त्या भावनांना...! प्रश्र्नच किती ते आमचे उत्तरे शोधत  उत्तरांनाच तुम्ही प्रश्न निर्माण केली,त्या जीवाला आता नव्या पद्धतीने मागायची सवय वेगळी फक्त तुम्ही ती लावून दिली...! सावरा तुम्हीच आता प्रश्न आणि उत्तरांना,फक्त जगण्यासाठी लागणाऱ्या गरजेवर भागवुन घेऊ आम्ही नका बोलवू पुन्हा कधी आम्हा गरीबांना...! Written by, Bharat Sonawane...

आठवणीतले बालपण....

खिडकीतून वळवाच्या पावसाच्या सरी पडतांना दिसायच्या,अलीकडे त्यांना खिडकीतून टिपणे हे एकच काम मी करत असायचो... घराच्या बाजूला चहूकडे लाल मातीची जमीन जिथवर नजर जाईल तिथवर दिसायची,मध्येच कुठेतरी काळ्या खडकांचा समुह समुद्रात असणाय्रा एकाकी बेटांप्रमाणे भासायचा... पडता पाऊस या लाल मातीत शिंतोड्याच्या रुपात जाऊन उताराच्या दिशेनं वाहू लागायचा,वाहणारे सर्व पाणी परिसरात असलेल्या छोट्याश्या धरणरुपी तलावात जाऊन स्थिर होत असायचे. वळवाचाच पाऊस तो फार फार पंधरा वीस मिनिटे चालायचा अन् मग उघडुन जायचा मग उगवुन येणारं ते सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सर्व डोळ्यांचे पारणं फेडणारं असायचं... त्याला बघण्यासाठी आणि पावसाने ओल्या झालेल्या जमिनीतून येणाऱ्या सुगंधाला,खळखळ वाहणार्या पाण्याला अनुभवण्यासाठी आम्ही सर्व कॉलनीतील दहा-बारा मुलं घरा बाहेर निघायचो... घरातून हाफ चड्डी,फुल बाह्यांचा ड्रेस सावरत निघालो की,छोट्या छोट्या तयार झालेल्या नैसर्गिक नाल्यांमधून वाहणारे पाणी लाल चिखल,दगड,गोटे यांनी आडवत बसायचो...हे सर्व करतांना अनवाणी पायाला लागणारा मऊ चिखल खूप आनंद देऊन जायचा,भटकत भटकत धरणाच्या पाळेवरून जातांनी

वृत्तपत्र जगणं शिकवणारा एक दुवा...

पैसा माणसाला जगायला शिकवतो हे म्हणायला कितीही जरी चुकीचे वाटत असले तरी ते वास्तव सत्य आहे. याला जोडून अजुन एक गोष्ट अशी आहे जी नसली की माणसाला चैन पडत नाही,मग ती कुठलीही आपल्याला असलेली सवय ती चांगली असो कींवा वाईट.... गेले दोन महिने झाले सकाळी चहा बरोबर हवे असणारे वृत्तपत्र हल्ली घरोघर उपलब्ध होत नाहीये. ज्याची काही जणांना इतकी सवय झाली असते की,सकाळ झाली की आपसूक आपले पाय ज्या जागी पेपर टाकलेला असतो त्या जागेला भेटून येतात...पण अलीकडे वृत्तपत्र येत नाहीये गेले काही दिवस म्हणुन सतत अस्वस्थ वाटत आहे... काहीजण म्हणतात पेपर नाही आला तरी आम्हाला काही वाईट वाटत नाही. कारण ऑनलाईन तो फुकट उपलब्ध होतो,सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणारी माहिती भेटतच असते...मान्य आहे हे सर्व खरे आहे अलीकडे या गोष्टीचा परिणाम वृत्तपत्र निर्माता,विक्रेता,पत्रकार या सर्वांवर झाला आहे कुठेतरी ती अस्वस्थता जाणवतही असते... हे सर्व कितीही खरे असले तरी ज्याप्रमाणे पत्र जसे अजूनही या आधुनिक युगात तग धरून कायम उभे आहे त्याच्या चाहत्यासाठी आजही,कुठलीही खंत न बाळगता...त्याच्याशी जोडून असलेले माणसे सेवा

विचाराने दाटून आलेली सायंकाळ...

अलीकडे सांजवेळी जेव्हा सुर्य अस्ताला जात असतो...अन मी वेशीच्या पल्याड असलेल्या पिंपळाच्या झाडाला चहुबाजुंनी बांधलेल्या ओट्यावर बसलेलो,चहुकडं असलेली ती सर्व मोकळीक. दुपारची झोप अजुन डोळ्यात तरळत आहे,हातपाय धूवुन पारावर बसायला आलोय. डोळ्यांच्या पापण्यांची अन बुबुळांची झुकण्यासाठीची तडजोड जाणवत आहे... जसंजसं समोर सर्व दृश्य दिसतंय मन अस्वस्थ होत आहे,या अस्वस्थ होण्याला कारण माहीत नाही. कदाचित शांत असणारा परिसर,गरम झळ्यांतुन अलवार संथ वाहणाऱ्या वाऱ्याकडे होणारा वाऱ्याचाच प्रवास... पिंपळाची पानं स्वच्छ,हिरवीगार दिसताय. लाॅकडाऊनमुळे न झालेलं प्रदुषण आणी टवटवीत झालेली झाडं,वेली,पानं,फुल सुंदरच मांणसाच काय होईल माहिती नाही,पण निसर्गाला लाॅकडाऊन मानवला आहे. सर्व सुंदर वाटत आहे,स्वच्छ निर्मळ वाहणारे वारे झोके घेताय अन् मनाशीच आठवणींचे गुज गात आहे. पण...पण कितीही टाळले तरी डोळ्यांना दिसणारी अस्वस्थता टाळता येणारी नाहीये... मंदिराचे दरवाजे गेले दोन महीने बंदच आहे,कदाचित ती आता पुन्हा पाण्याचे संकट उभे राहिले की,मंदिरातील देव पाण्यात बुडविण्यासाठीच काही काळ उघडी केली जातील असे वाटत आहे.

झाले सुटे दोन शेर आठवणीत तुझ्या..!

झाले सुटे दोन शेर आठवणीत तुझ्या, साद गझलेला मला कधी घालता आली नाही..! चार कडव्यांची जीवन कविता माझी,ओंजळ प्राजक्ताने फुलेली गजरा कधी माळता आलाच नाही..! अव्यक्त भावनांना ओठांवर आणणे जमायचे कधीतरी,डोळ्यात मात्र प्रेमाचे भाव उतरवणे जमलेच नाही..! परडीत फुले असेल वेचलेली मोगर्याची,सुगंधात त्यांच्या हरविण्या मला कधीच उसंत नाही..! मी नुकताच तुझ्या विचाराने पांगळा झालो,मनात काहूर आपल्या उद्याचे पण आता जगण्याला वर्तमानच नाही..! रितेपण घेऊन सोबतीला जगणे आपल्याच नशिबी आता,अधुऱ्या कवितेस माझ्या आता शब्दच सुचत नाही..! झाले सुटे दोन शेर आठवणीत तुझ्या, साद गझलेला मला कधी घालता आली नाही..! Written by, Bharat Sonawnae...

नाटकाला जगवणारं नाटक सखाराम बाईंडर...

#सखाराम_बाईंडर... सध्याच्या या लाॅकडाऊनच्या काळात अनेक चित्रपट,नाटक बघत घेत आहे,ज्यांना इतरवेळी वेळे अभावी बघायला जमत नाही... नाटकं मला फार आवडत नाही,म्हणजे "लक्ष्मण देशपांडे" यांचे "वऱ्हाड चालले लंडनला" नाटका नंतर मी आजवर पूर्ण नाटक कुठलेच बघितले नाही...हे नाटक मात्र याला अपवाद ठरले "सखाराम बाईंडर" जे सुर्वाती पासूनच माणसाला बसलेल्या ठिकाणाशी खिळवून ठेवते... सखारामचा तो त्याच्या घरातील रुबाब,कणखर विचारांची चंपा आणि हळवी लक्ष्मी हे पात्र मनाला भिडतात. नक्कीच बघा... सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे.१९७२ मध्ये रंगभूमीवर सादर झालेलं हे नाटक.राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक पातळीवर प्रचंड विरोध,मोठमोठे वाद,बंदी आणि असं सगळं वादळ अनुभवलेल्या या नाटकाला आणि त्याच्याशी संबंधित लोकांना याच त्याच्या चाहत्या वर्गाकडून भरभरून प्रेमही मिळाले... हे प्रेम सखाराम बाइंडरचं होतं का? की मुक्तावरचं होतं? की नाटककार विजय तेंडुलकरांवरचं होतं? ते या सगळ्यांसकट मराठी नाटकावरचं होतं.आणि अगदी खरं सांगायचं तर ‘सखाराम

जगणे हरवलेली माणसे...

सांजवेळ दाटलेली, पैल पोहचला थवा..! जीर्ण आभाळास आता सुर्य का हवा नवा, मंत्र झालेल्या मैफिलीला चंद्र का हवा नवा...! कधीतरी काही दृश्य मनात पक्के खिळवून बसतात अन् कधीतरी नकळत अश्या काही ओळी कानावर पडल्या की,ते दृष्य डोळ्यासमोर येत जाते...मग तो क्षण विचारांमध्ये अनुभवण्यासाठी मनातच विचारांचे काहूर निर्माण होते... पुढे कितीवेळ मन त्या ओळींचा अर्थ शोधत गुंतवून घेतं स्वत:ला त्या दृश्यात... भर उन्हात कधीतरी अनुभवलेला तो क्षण असतो,अाठवून जातो अन् तेव्हाच या ओळींशी त्याचे साधर्म्य जुळवून येते.... भर दुपारी रस्त्याच्या कडेला कोरलेल्या डोंगरात कधीतरी दिसून जातो तो माणूस,काय करत असतो माहीत नाही.... विस्कटलेले केस,बहुतेक पांढरा सदरा घातलेला असतो त्याने,घामाच्या ओघळामुळे एक विचित्र आकृती त्याच्या पूर्ण अंगावर निर्माण झालेली असते,अनवाणी असतो भटकत डोंगरांनी खांद्यावर एक पिशवी घेऊन.काय असते माहीत नाही त्यात,पण तिला तो खूप जपवत असतो अगदी जिवापाड... या पिशवीत बघून त्याच्या निरागस चेहऱ्यावर येणारं ते क्षणिक हास्य त्याला व मलाही सुख देऊन जाते....त्याच्या या मला सुखात भागीदार व्हायचे न

Imran....

आज खुप वेळा वाटत आहे तुझ्यासाठी काहीतरी लिहावं,पण मला फारसं नाही व्यक्त होता येत आपल्या माणसांसाठी... तुझं हे अकाली एक्झिट घेणं अजूनही मान्य होत नाहीये,सर्वच मनाला चटका लावुन जाणारं आहे.... माझं मन सिनेमा,मालिका यांमध्ये फारसे रमत नाही,परंतु या विश्वाततली तुझी जी थोडीफार ओळख आहे.ज्यात नेहमीच तू तुझ्या वेगळ्या भूमिकेने माझ्या आठवणीत आहेस... आज तू कायमचा सोडून गेला आहेस,तरीही मी तुझा एकेरी उल्लेख करत आहे.हो अगदी,तो कायम एकेरीच करेल,कारण हे सर्व फक्त हक्काच्या माणसांसाठी आतून आलेले शब्द असतात... काही दिवसांपूर्वी एका इंग्लिश पेपरमध्ये पूर्ण अर्ध्या पानावर तुझा तो ट्रॉफी हातात घेऊन फोटो बघितला.मला राहवलं नाही इंग्लिश मला फारसे समजत नाही,तरीही तो लेख पूर्ण वाचून काढला.यामध्ये बऱ्यापैकी खूप काही कळले,तू खूप उंचीचा स्टार झाला होतास,पण तू ते तुझ्या वागण्यातून कधी व्यक्त केलं नाहीस... दोन वर्षापूर्वी तुला त्या दुर्धर आजारचं निदान झालं,हे जेव्हा कळलं तेव्हा मनात धडकी भरली...यात तु आतुन पुर्णपणे खचला होतास,पण तुझी आजाराशी चालु असलेली लढाई.कधीतरी तुझ्या पारड्यात सुख टाकत होती,तर कधी त

सच है... "मंटो"

"मंटो"... मरणाच्या एक वर्ष आधी त्यांनी आपल्या कबरीवरच्या शिलालेखावर लिहायचा मजकूर लिहून ठेवला होता तो असा, “यहाँ "सआदत हसन मंटो" को दफनाया गया है, जिनके हृदय में सभी रहस्यों और लघुकथा लेखन की कला प्रतिष्ठापित है। धरती के ढेर के नीचे दबे हुए,वह अब भी इस बात पर विचार कर रहे हैं कि क्या वह लघुकहानी के महत्तर लेखक या खुदा है !’’ सच है"मंटो"... पर आज भीं यह जमाना नाकाबिले-बर्दाश्त है... ओळख उर्दुशी झालेली- अलीकडे उर्दू भाषेप्रती मनात जवळीक,प्रेम निर्माण होत आहे,सतत तिला ऐकत राहावं वाटते...म्हणजे उर्दू भाषेत व्यक्त होण्याची जी शाब्दिक लकब आहे ती अलवार संथ वाहणार्या वाऱ्याप्रमाणे आहे असे भासते.... उर्दू भाषा प्रेम करायला शिकवते,या उर्दू भाषेतील रचनेत येणारी ती नजाकत तो रुतबा हे सर्व खूप अलवार,अप्रतिम आहे...हे सर्व समजायला थोडेसे अवघड परंतु रातराणीच्या सुगंधाप्रमाणे सुगंधित बहारदार फुललेलं वाटते ऐकतांना...... उर्दू भाषेत आजवर मी कुठलीही गझल ऐकली की,फक्त एकच मनात येते पुन्हा-पुन्हा ती ऐकत राहावी इतकंच वाटत असते... आदरतिथ्य,शब्दांवर प्रेम करायला

Mother's Day...♥️

#Happy_Mothers_Day...♥️ "आकाशाचा केला कागद,समुद्राची केली शाई तरी आईवर निबंध पूर्ण होणार नाही." असा लहानपणी सुविचार आपण म्हणायचो हे किती खरे होते माहित नाही पण आता... आता...नाही व्यक्त होता येत आईसाठी मला तरी शब्दांतून,शब्द आणी भावना वळीवाच्या पावसा सारख्या असतात...कधी कधी मनातुन खूप काही व्यक्त करून जातात पण जेव्हा याच भावनांना शब्दरूपात कागदावर उतरवयाची वेळ येतेना नाही जमत व्यक्त होयला आणी ते लिखित रुपात मांडायला... काय असेल याचे कारण माहित नाही,पण खूप काही व्यक्त करायचं असते मनातले,खूप काही कैद करायचं असत त्या लिखाणात जे फक्त लिखनाशीच शेअर करता येतं...पण हक्काच्या माणसांसाठी इथेही शब्दांना,भावनांना वाहणेच हाती येते,कदाचित माझं हळवं मन इथं त्याची जागा घेत असेल...  आईबद्दल काय बोलायचं,फार फारतर आठवणी शेअर करू शकतो तिच्या बद्दलच्या शब्दरुपात.तिलाच शब्दात व्यक्त करायचं म्हंटले की नाहीच येत,कधी कधी वाटते की लहानपण छान असते.... आईबद्दल असलेल्या भावनांना व्यक्त करता येतं आईशी,परंतु जेव्हा आपलेच पाऊल तारुण्यात पडायला लागते तसे तसे यावर मर्यादा यायला लागतात तिची काळज

ओसाड पडलेली शहरे,माणुसकी हरवलेली रस्ते....

हल्ली सून्न झालेल्या शहरांची भीती नाही वाटत मला की,नाही वाटत विशेष काही त्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या भोंग्यांचे.जे उभे आयुष्य वेळेवर चालायला शिकवत होते... का तर...आज त्यांनी सुद्धा वेळ सोडली आहे,ते ही बंद पडले आहे आठवत भूतकाळातील आठवणींना.भविष्यकाळातील भेसूर जगण्याला,वर्तमान काळातील जगतांनी मरण यातना सोसण्याच्या प्रवास बघत विचार मग्न होत... ज्या शहरांकडे बघून जगण्यासाठी ऐन उमेदीचे स्वप्न बघितले होते,आज तिथेच मरण दिसायला लागले.तेव्हाच कुठेतरी आपले शहर आपल्याला परके भासू लागले होते... शहरे सूंनसांन झाली एम.आय.डी.सी ची हेळणा सुरू झाली,आणी जगण्याला आशेचे पंख देणारे यंत्र माणसाच्या हव्यासापोटी मरणाच्या या शर्यतीत जगते राहण्यासाठी धडाधड बंद पडु लागलीत... आता सवय झाली ही शांत पडलेली शहर पुन्हा कधी चालू होतील माहीत नाही.पण आतली भूक स्वस्थ बसू देत नाहीना,तिचे काय तिच्यासाठी भटकावे लागते... थोडे थोडे मरण्यापेक्षा असे झटक्यात आलेले मरण सोपे वाटले की,मग नाही भासत कुठली भीती.भूक लागली की मग फक्त भाकर दिसते.... अन्न,वस्त्र,निवारा मूलभूत गरजा नावाला राहतात फक्त अन्न भेटलं की खूप होते,त्यास

कविता...

भटक्या लोकांची कुठे अवस्था मांडू येथे मी, जिथं माझीच सोय नाही,माझ्याच प्रश्नांना येथे माझीच उत्तरे नाही...! दारिद्र्य रेषेच्या सखोल चाचणीत आम्ही पास झालो आहे,बाकी सगळीकडे मात्र बळजबरीच नापास केलो आहे...! पसाभर धान्यासाठी चारदा खेट्या आमच्या राशनच्या दुकानाला आहे,तिथेही जातीनिहाय कलरच्या राशनकार्डचा आमच्यावर अन्याय आहे...! खळगीभर पोटासाठीचा प्रवास आमचा रोजचाच जगण्यासाठी होत आहे,खांद्यावरचा पधरही मग भाकरी मागण्यासाठी झुक्तो आहे...! अठराविश्र्व दारीद्र्यात जगणे आमचे,हुर हूर लागल्या जीवाला मरणे पसंत आहे,खर्या प्रश्नांना खोटी उत्तरे जीवनात आनंदात जगणे फक्त कल्पनेत आहे.... भाकरीची खोटी आश्या टिचभर पोटासाठी जिवंत ठेवत आहे,खोट्या आशेच्या निराशे पायी गळ्यात मंगळसूत्र फासाचेच आता शोभते आहे...! भटक्या लोकांची कुठे अवस्था मांडू येथे मी,जिथं माझीच सोय नाही,माझ्याच प्रश्नांना येथे माझीच उत्तरे नाही...! Written by, Bharat Sonwane...

Professional life

एकांताला सोबत घेऊन मनाशीच जेव्हा मनाचा संवाद चालू असतोना,तेव्हा आपण अनेक इच्छा, विचार मनाशी व्यक्त करून मोकळे होऊन जातो... काही दिवसांपूर्वी असेच एकदा विलुप्त झालेल्या त्या आठवणीं बद्दल मनात विचार येऊन गेला... कसे असते नाही...ती वेळ,तिचं त्याच्यावर अवलंबुन असणे,त्याचा तिच्यावर असलेला विश्वास पण अलीकडे या नात्याला मी व्यवहारीपणाची जोड दिली अन् सर्व कसे बदल्यासारखे वाटू लागले आहे.... कसे असते नाही का,आपण कधीच विचाराने परिपूर्ण नसतो मग ते प्रेमाच्या बाबतीतही तसेच असेल...हा विचार अलीकडे मला प्रत्येक गोष्टीला व्यवहारी पारड्यात मोजून बघण्याची सवय लावतोय अन् तीच सवय मलाही झाली आहे... यात मग सगळेच आलं प्रेम,पैसा,नाते,मित्र हे सर्वच कारण जेव्हा जेव्हा आयुष्य जगतांनी वाईट अनुभव येत गेले... त्यावेळी कुठेतरी कारण फक्त आपलं व्यवहारी नसणे हे होते... जगण्याच्या या चौकटीत उंबरा पार करतांना व्यवहारी राहणे अलीकडे काळाची गरज झालीये...व्यवहारीक असलं की जगणं सुखी होते की नाही हे माहीत नाही,मात्र एक Safe Life अनुभवण मिळतं अश्यावेळी.... #Professional_Life_तिच्याशी_जोडलेलं_जीवन.... Written by, Bhar