मुख्य सामग्रीवर वगळा

Imran....


आज खुप वेळा वाटत आहे तुझ्यासाठी काहीतरी लिहावं,पण मला फारसं नाही व्यक्त होता येत आपल्या माणसांसाठी...
तुझं हे अकाली एक्झिट घेणं अजूनही मान्य होत नाहीये,सर्वच मनाला चटका लावुन जाणारं आहे....

माझं मन सिनेमा,मालिका यांमध्ये फारसे रमत नाही,परंतु या विश्वाततली तुझी जी थोडीफार ओळख आहे.ज्यात नेहमीच तू तुझ्या वेगळ्या भूमिकेने माझ्या आठवणीत आहेस...

आज तू कायमचा सोडून गेला आहेस,तरीही मी तुझा एकेरी उल्लेख करत आहे.हो अगदी,तो कायम एकेरीच करेल,कारण हे सर्व फक्त हक्काच्या माणसांसाठी आतून आलेले शब्द असतात...

काही दिवसांपूर्वी एका इंग्लिश पेपरमध्ये पूर्ण अर्ध्या पानावर तुझा तो ट्रॉफी हातात घेऊन फोटो बघितला.मला राहवलं नाही इंग्लिश मला फारसे समजत नाही,तरीही तो लेख पूर्ण वाचून काढला.यामध्ये बऱ्यापैकी खूप काही कळले,तू खूप उंचीचा स्टार झाला होतास,पण तू ते तुझ्या वागण्यातून कधी व्यक्त केलं नाहीस...

दोन वर्षापूर्वी तुला त्या दुर्धर आजारचं निदान झालं,हे जेव्हा कळलं तेव्हा मनात धडकी भरली...यात तु आतुन पुर्णपणे खचला होतास,पण तुझी आजाराशी चालु असलेली लढाई.कधीतरी तुझ्या पारड्यात सुख टाकत होती,तर कधी तुला दुख: देत होती...

पुढे चालुन तु बराही झाला पुन्हा सिनेसृष्टीत जोमाने कमबॅकही केलं.आता कुठंतरी वाटलं होतं सर्व ठीक होईल,पण तुझं ते पत्र मात्र आतल्या आत मनाला काचत होतं...कारण तुझं त्या पत्रात केलेलं ते वक्तव्य मान्य नव्हतं आम्हा सर्व चाहत्यांना....

पण ज्याप्रमाणे तु या रंगमंच्याच्या पडद्यावर तुझ्या भुमिकेत वेगळा,अव्वल ठरत होता.त्याचप्रमाणे इथंही तु अव्वल ठरला तुला तुझ्या मृत्युची जाणीव झाली होती,हे खुप त्रासदायक होतं.तुझ्या प्रत्येक चाहत्यासाठी पण हे तितकच कटु सत्यही होतं....

आज सकाळी मुंबईच्या कोकीलाबेन धीरुभाई अंबानीं हॉस्पिटलमध्ये तुला अॅडमिट केल्याचे वृत्त  ऐकले,व मनात विचारांची पाल चुकचुकली....

कारण लीलावती रुग्णालय,हिंदुजा हॉस्पिटल,कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल,फोर्टिस हाॅस्पिटल अश्या मुंबई मधल्या नामांकित हॉस्पिटलचे नावे तेव्हाच ऐकु येता आम्हाला,जेव्हा काहीतरी वाईट घडणार असते.कोणीतरी माणसातला आपला हक्काचा माणुस आपल्याला सोडून जाणार असतो...

आजही तेच झालं तु अकाली एक्झिट घेऊन सोडून गेलास...

इतकंच म्हणेल,खुप घाई केलीस हे वय नसतं जाण्याचं.आईवरचं तुझं हे प्रेम होतं की काय माहित नाही... काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला व आज त्यांना भेटायला तु स्वर्गलोकी निघून गेलास...

#कायम_आठवणीत_राहशील...

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...