मुख्य सामग्रीवर वगळा

Imran....


आज खुप वेळा वाटत आहे तुझ्यासाठी काहीतरी लिहावं,पण मला फारसं नाही व्यक्त होता येत आपल्या माणसांसाठी...
तुझं हे अकाली एक्झिट घेणं अजूनही मान्य होत नाहीये,सर्वच मनाला चटका लावुन जाणारं आहे....

माझं मन सिनेमा,मालिका यांमध्ये फारसे रमत नाही,परंतु या विश्वाततली तुझी जी थोडीफार ओळख आहे.ज्यात नेहमीच तू तुझ्या वेगळ्या भूमिकेने माझ्या आठवणीत आहेस...

आज तू कायमचा सोडून गेला आहेस,तरीही मी तुझा एकेरी उल्लेख करत आहे.हो अगदी,तो कायम एकेरीच करेल,कारण हे सर्व फक्त हक्काच्या माणसांसाठी आतून आलेले शब्द असतात...

काही दिवसांपूर्वी एका इंग्लिश पेपरमध्ये पूर्ण अर्ध्या पानावर तुझा तो ट्रॉफी हातात घेऊन फोटो बघितला.मला राहवलं नाही इंग्लिश मला फारसे समजत नाही,तरीही तो लेख पूर्ण वाचून काढला.यामध्ये बऱ्यापैकी खूप काही कळले,तू खूप उंचीचा स्टार झाला होतास,पण तू ते तुझ्या वागण्यातून कधी व्यक्त केलं नाहीस...

दोन वर्षापूर्वी तुला त्या दुर्धर आजारचं निदान झालं,हे जेव्हा कळलं तेव्हा मनात धडकी भरली...यात तु आतुन पुर्णपणे खचला होतास,पण तुझी आजाराशी चालु असलेली लढाई.कधीतरी तुझ्या पारड्यात सुख टाकत होती,तर कधी तुला दुख: देत होती...

पुढे चालुन तु बराही झाला पुन्हा सिनेसृष्टीत जोमाने कमबॅकही केलं.आता कुठंतरी वाटलं होतं सर्व ठीक होईल,पण तुझं ते पत्र मात्र आतल्या आत मनाला काचत होतं...कारण तुझं त्या पत्रात केलेलं ते वक्तव्य मान्य नव्हतं आम्हा सर्व चाहत्यांना....

पण ज्याप्रमाणे तु या रंगमंच्याच्या पडद्यावर तुझ्या भुमिकेत वेगळा,अव्वल ठरत होता.त्याचप्रमाणे इथंही तु अव्वल ठरला तुला तुझ्या मृत्युची जाणीव झाली होती,हे खुप त्रासदायक होतं.तुझ्या प्रत्येक चाहत्यासाठी पण हे तितकच कटु सत्यही होतं....

आज सकाळी मुंबईच्या कोकीलाबेन धीरुभाई अंबानीं हॉस्पिटलमध्ये तुला अॅडमिट केल्याचे वृत्त  ऐकले,व मनात विचारांची पाल चुकचुकली....

कारण लीलावती रुग्णालय,हिंदुजा हॉस्पिटल,कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल,फोर्टिस हाॅस्पिटल अश्या मुंबई मधल्या नामांकित हॉस्पिटलचे नावे तेव्हाच ऐकु येता आम्हाला,जेव्हा काहीतरी वाईट घडणार असते.कोणीतरी माणसातला आपला हक्काचा माणुस आपल्याला सोडून जाणार असतो...

आजही तेच झालं तु अकाली एक्झिट घेऊन सोडून गेलास...

इतकंच म्हणेल,खुप घाई केलीस हे वय नसतं जाण्याचं.आईवरचं तुझं हे प्रेम होतं की काय माहित नाही... काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला व आज त्यांना भेटायला तु स्वर्गलोकी निघून गेलास...

#कायम_आठवणीत_राहशील...

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...