मुख्य सामग्रीवर वगळा

Mother's Day...♥️

#Happy_Mothers_Day...♥️

"आकाशाचा केला कागद,समुद्राची केली शाई तरी आईवर निबंध पूर्ण होणार नाही." असा लहानपणी सुविचार आपण म्हणायचो हे किती खरे होते माहित नाही पण आता...


आता...नाही व्यक्त होता येत आईसाठी मला तरी शब्दांतून,शब्द आणी भावना वळीवाच्या पावसा सारख्या असतात...कधी कधी मनातुन खूप काही व्यक्त करून जातात पण जेव्हा याच भावनांना शब्दरूपात कागदावर उतरवयाची वेळ येतेना नाही जमत व्यक्त होयला आणी ते लिखित रुपात मांडायला...


काय असेल याचे कारण माहित नाही,पण खूप काही व्यक्त करायचं असते मनातले,खूप काही कैद करायचं असत त्या लिखाणात जे फक्त लिखनाशीच शेअर करता येतं...पण हक्काच्या माणसांसाठी इथेही शब्दांना,भावनांना वाहणेच हाती येते,कदाचित माझं हळवं मन इथं त्याची जागा घेत असेल... 

आईबद्दल काय बोलायचं,फार फारतर आठवणी शेअर करू शकतो तिच्या बद्दलच्या शब्दरुपात.तिलाच शब्दात व्यक्त करायचं म्हंटले की नाहीच येत,कधी कधी वाटते की लहानपण छान असते....

आईबद्दल असलेल्या भावनांना व्यक्त करता येतं आईशी,परंतु जेव्हा आपलेच पाऊल तारुण्यात पडायला लागते तसे तसे यावर मर्यादा यायला लागतात तिची काळजी असेल की आपलं विचारांच आकाशात मुक्तपणे स्वैर करणं वाढलेलं असेल...

लहानपणी जी आई आपल्या सोबतीच्या प्रत्येक पहिल्या क्षणासाठी हळवी होत असते,आनंदाचे अश्रू गाळत असते...ती आई नाही अनुभवता येत आपल्याला आपल्या तारुण्यात कदाचित तिचं आपल्या नजरेत बाळ होणं सुरू झालेलं असतं...

आपल्या तारुण्यात ती मनाने झालेली लहान,आणी तितकीच पहिल्या सारखी हळवी असते.तिची आपल्या प्रतिची काळजी असो कींवा तिच्या या वयात तिच्यातले आपलं बालपण आपल्यालाच परत देणारी ती,तिची काळजी,वेळोवेळी येणारी तिची आठवण हे सवयीचं होत असतं...

म्हणजे कसं असतं नाही का,ती तिच्या स्वतःसाठी मुलांकडून काहीच घेत नाही अगदी त्या मुलाच्या बाबतीत अनुभवलेले बालपण सुद्धा ती त्याला भेट देऊन टाकते...

आईचं आयुष्यातलं स्थान म्हणजे,उगवत्या सूर्याप्रमाणे अढळ आहे ते आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तसेच असते...कारण त्याला अस्त नसतो,त्याचा अस्त होणे म्हणजेच आपल्या जीवनाचा शेवट होणे हे असते....

अलीकडे आईचं माझ्यासाठी हळवे होणं अनुभवत असतो,माझ्यातले लहान बाळ तसेच आहे का माहित नाही.पण माझ्यातले लहानपण तिच्यात उतरले आहे...तिच्यात हल्ली एक बाळ दिसतं जे माझ्यासारखेच खूप हट्टी आहे....

बस तिच्या या हट्टाला (माझ्या प्रत्येक स्वप्नाला) पूर्णत्वास न्यायचे आहे आता,माहीत नाही ते कितपत जमेल पण तिचं बालपण माझ्या नजरेतून अनुभवायचा आहे आता अन् ते तिलाही पुरेपूर जगुन द्यायचं आहे....

बाकी काय तिच्या इतके सरस प्रामाणिक मला या जीवनाशी तडजोड करत जगता येईल का माहीत नाही पण तिला एक स्थिर सुख द्यायचा प्रयत्न कायम असेल जीवनातल्या शेवटच्या अस्त पर्यंत...


#आईसाठी_शब्द_हळवे_होताना...


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...