मुख्य सामग्रीवर वगळा

Mother's Day...♥️

#Happy_Mothers_Day...♥️

"आकाशाचा केला कागद,समुद्राची केली शाई तरी आईवर निबंध पूर्ण होणार नाही." असा लहानपणी सुविचार आपण म्हणायचो हे किती खरे होते माहित नाही पण आता...


आता...नाही व्यक्त होता येत आईसाठी मला तरी शब्दांतून,शब्द आणी भावना वळीवाच्या पावसा सारख्या असतात...कधी कधी मनातुन खूप काही व्यक्त करून जातात पण जेव्हा याच भावनांना शब्दरूपात कागदावर उतरवयाची वेळ येतेना नाही जमत व्यक्त होयला आणी ते लिखित रुपात मांडायला...


काय असेल याचे कारण माहित नाही,पण खूप काही व्यक्त करायचं असते मनातले,खूप काही कैद करायचं असत त्या लिखाणात जे फक्त लिखनाशीच शेअर करता येतं...पण हक्काच्या माणसांसाठी इथेही शब्दांना,भावनांना वाहणेच हाती येते,कदाचित माझं हळवं मन इथं त्याची जागा घेत असेल... 

आईबद्दल काय बोलायचं,फार फारतर आठवणी शेअर करू शकतो तिच्या बद्दलच्या शब्दरुपात.तिलाच शब्दात व्यक्त करायचं म्हंटले की नाहीच येत,कधी कधी वाटते की लहानपण छान असते....

आईबद्दल असलेल्या भावनांना व्यक्त करता येतं आईशी,परंतु जेव्हा आपलेच पाऊल तारुण्यात पडायला लागते तसे तसे यावर मर्यादा यायला लागतात तिची काळजी असेल की आपलं विचारांच आकाशात मुक्तपणे स्वैर करणं वाढलेलं असेल...

लहानपणी जी आई आपल्या सोबतीच्या प्रत्येक पहिल्या क्षणासाठी हळवी होत असते,आनंदाचे अश्रू गाळत असते...ती आई नाही अनुभवता येत आपल्याला आपल्या तारुण्यात कदाचित तिचं आपल्या नजरेत बाळ होणं सुरू झालेलं असतं...

आपल्या तारुण्यात ती मनाने झालेली लहान,आणी तितकीच पहिल्या सारखी हळवी असते.तिची आपल्या प्रतिची काळजी असो कींवा तिच्या या वयात तिच्यातले आपलं बालपण आपल्यालाच परत देणारी ती,तिची काळजी,वेळोवेळी येणारी तिची आठवण हे सवयीचं होत असतं...

म्हणजे कसं असतं नाही का,ती तिच्या स्वतःसाठी मुलांकडून काहीच घेत नाही अगदी त्या मुलाच्या बाबतीत अनुभवलेले बालपण सुद्धा ती त्याला भेट देऊन टाकते...

आईचं आयुष्यातलं स्थान म्हणजे,उगवत्या सूर्याप्रमाणे अढळ आहे ते आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तसेच असते...कारण त्याला अस्त नसतो,त्याचा अस्त होणे म्हणजेच आपल्या जीवनाचा शेवट होणे हे असते....

अलीकडे आईचं माझ्यासाठी हळवे होणं अनुभवत असतो,माझ्यातले लहान बाळ तसेच आहे का माहित नाही.पण माझ्यातले लहानपण तिच्यात उतरले आहे...तिच्यात हल्ली एक बाळ दिसतं जे माझ्यासारखेच खूप हट्टी आहे....

बस तिच्या या हट्टाला (माझ्या प्रत्येक स्वप्नाला) पूर्णत्वास न्यायचे आहे आता,माहीत नाही ते कितपत जमेल पण तिचं बालपण माझ्या नजरेतून अनुभवायचा आहे आता अन् ते तिलाही पुरेपूर जगुन द्यायचं आहे....

बाकी काय तिच्या इतके सरस प्रामाणिक मला या जीवनाशी तडजोड करत जगता येईल का माहीत नाही पण तिला एक स्थिर सुख द्यायचा प्रयत्न कायम असेल जीवनातल्या शेवटच्या अस्त पर्यंत...


#आईसाठी_शब्द_हळवे_होताना...


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ