मुख्य सामग्रीवर वगळा

वृत्तपत्र जगणं शिकवणारा एक दुवा...


पैसा माणसाला जगायला शिकवतो हे म्हणायला कितीही जरी चुकीचे वाटत असले तरी ते वास्तव सत्य आहे. याला जोडून अजुन एक गोष्ट अशी आहे जी नसली की माणसाला चैन पडत नाही,मग ती कुठलीही आपल्याला असलेली सवय ती चांगली असो कींवा वाईट....


गेले दोन महिने झाले सकाळी चहा बरोबर हवे असणारे वृत्तपत्र हल्ली घरोघर उपलब्ध होत नाहीये. ज्याची काही जणांना इतकी सवय झाली असते की,सकाळ झाली की आपसूक आपले पाय ज्या जागी पेपर टाकलेला असतो त्या जागेला भेटून येतात...पण अलीकडे वृत्तपत्र येत नाहीये गेले काही दिवस म्हणुन सतत अस्वस्थ वाटत आहे...

काहीजण म्हणतात पेपर नाही आला तरी आम्हाला काही वाईट वाटत नाही. कारण ऑनलाईन तो फुकट उपलब्ध होतो,सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणारी माहिती भेटतच असते...मान्य आहे हे सर्व खरे आहे अलीकडे या गोष्टीचा परिणाम वृत्तपत्र निर्माता,विक्रेता,पत्रकार या सर्वांवर झाला आहे कुठेतरी ती अस्वस्थता जाणवतही असते...

हे सर्व कितीही खरे असले तरी ज्याप्रमाणे पत्र जसे अजूनही या आधुनिक युगात तग धरून कायम उभे आहे त्याच्या चाहत्यासाठी आजही,कुठलीही खंत न बाळगता...त्याच्याशी जोडून असलेले माणसे सेवा देत आहे,काळाच्या ओघात थोडा बदल झाला आहे अन् तो त्यांनी स्वीकारला आहे व आजही सर्व छान चालू आहे... 

वृत्तपत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याचा प्रवास हा कायम अनोखा,माझ्यासाठी तरी हवाहवासा आहे...पत्रकाराचे ते बातम्या शोधण्याचे कार्य त्यासाठी असलेला प्रामाणिकपणा,हो अलीकडे जेव्हा माझे काही लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागले तसे या वर्गाशी माझी बऱ्यापैकी ओळख झाली. माझा त्यांच्या बाबतीत असलेला अनुभव आजवर खूप चांगला आहे,सतत कामाशी प्रामाणिक असतात ही माणसं...

त्यानंतर निर्माता,एडिटर,वृत्तपत्र प्रेस हा सर्व प्रवास
आणि रात्री बारा-एक वाजेच्या सुमारास आपल्या ठरल्या ठिकाणी जाण्याचा तो वृत्तपत्राचा प्रवास अप्रतिम असेल.हो असेल... कारण हा सर्व प्रवास आजवर मी अनुभवलेला नाही,पण इथून पुढे त्यांचा होणारा सर्व प्रवास मी अनुभवला आहे. म्हणूनच कदाचित त्या बाबतीत एक आकर्षण आणि जाणीव कायम मनात राहिलेली आहे....

सकाळी जेव्हा बसस्टँडवर सर्व पेपरचे पार्सल येतात तेव्हा सुरू होतो,घरोघरी ठरलेला पेपर ठरलेल्या व्यक्तीने टाकायचा प्रवास. हे काम मी पाच वर्ष केले आहे,यात अनेक वृत्तपत्र वाचक चाहत्यांची भेट झाली... पेपर कसा वाचायचा अन् ती वाचण्याची त्यांची सवय तो आनंद खरच फक्त एक पेपर टाकणारा मुलगाच अनुभवू शकतो...

सकाळी ५:३०ला सुरू होणारे हे काम ७-८ वाजता संपून जायचे,महिन्याला त्यावेळी भेटणारे ४५०रुपये कमी नव्हते त्या वयात पैशाची गरज,व्यवहारीपण शिकण्यासाठी असलेलं ते एक काम होते...
गेले दोन महिने वृत्तपत्र येत नसल्यामुळे या वर्गाचा विचार करवत नाही,आणि रोज चहासोबत झालेली वृत्तपत्राची सवय हल्ली वृत्तपत्राशिवाय झालेली सकाळ काहीतरी चुकत असल्याचा भास करून देत असते कायम...प्रसंगी चिडचिडही होत असेल कारण वृत्तपत्र वाचणारा बहुतांशी वाचक वर्ग हा जाणता,वृत्तपत्राचा चाहता वर्ग आहे.ज्यांना त्यांच्या सवयीशी झालेला हा बदल गेल्या कित्येक वर्षात झालेला हा एकमेव बदल अवघडता वाटत असल...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...