मुख्य सामग्रीवर वगळा

वृत्तपत्र जगणं शिकवणारा एक दुवा...


पैसा माणसाला जगायला शिकवतो हे म्हणायला कितीही जरी चुकीचे वाटत असले तरी ते वास्तव सत्य आहे. याला जोडून अजुन एक गोष्ट अशी आहे जी नसली की माणसाला चैन पडत नाही,मग ती कुठलीही आपल्याला असलेली सवय ती चांगली असो कींवा वाईट....


गेले दोन महिने झाले सकाळी चहा बरोबर हवे असणारे वृत्तपत्र हल्ली घरोघर उपलब्ध होत नाहीये. ज्याची काही जणांना इतकी सवय झाली असते की,सकाळ झाली की आपसूक आपले पाय ज्या जागी पेपर टाकलेला असतो त्या जागेला भेटून येतात...पण अलीकडे वृत्तपत्र येत नाहीये गेले काही दिवस म्हणुन सतत अस्वस्थ वाटत आहे...

काहीजण म्हणतात पेपर नाही आला तरी आम्हाला काही वाईट वाटत नाही. कारण ऑनलाईन तो फुकट उपलब्ध होतो,सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणारी माहिती भेटतच असते...मान्य आहे हे सर्व खरे आहे अलीकडे या गोष्टीचा परिणाम वृत्तपत्र निर्माता,विक्रेता,पत्रकार या सर्वांवर झाला आहे कुठेतरी ती अस्वस्थता जाणवतही असते...

हे सर्व कितीही खरे असले तरी ज्याप्रमाणे पत्र जसे अजूनही या आधुनिक युगात तग धरून कायम उभे आहे त्याच्या चाहत्यासाठी आजही,कुठलीही खंत न बाळगता...त्याच्याशी जोडून असलेले माणसे सेवा देत आहे,काळाच्या ओघात थोडा बदल झाला आहे अन् तो त्यांनी स्वीकारला आहे व आजही सर्व छान चालू आहे... 

वृत्तपत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याचा प्रवास हा कायम अनोखा,माझ्यासाठी तरी हवाहवासा आहे...पत्रकाराचे ते बातम्या शोधण्याचे कार्य त्यासाठी असलेला प्रामाणिकपणा,हो अलीकडे जेव्हा माझे काही लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागले तसे या वर्गाशी माझी बऱ्यापैकी ओळख झाली. माझा त्यांच्या बाबतीत असलेला अनुभव आजवर खूप चांगला आहे,सतत कामाशी प्रामाणिक असतात ही माणसं...

त्यानंतर निर्माता,एडिटर,वृत्तपत्र प्रेस हा सर्व प्रवास
आणि रात्री बारा-एक वाजेच्या सुमारास आपल्या ठरल्या ठिकाणी जाण्याचा तो वृत्तपत्राचा प्रवास अप्रतिम असेल.हो असेल... कारण हा सर्व प्रवास आजवर मी अनुभवलेला नाही,पण इथून पुढे त्यांचा होणारा सर्व प्रवास मी अनुभवला आहे. म्हणूनच कदाचित त्या बाबतीत एक आकर्षण आणि जाणीव कायम मनात राहिलेली आहे....

सकाळी जेव्हा बसस्टँडवर सर्व पेपरचे पार्सल येतात तेव्हा सुरू होतो,घरोघरी ठरलेला पेपर ठरलेल्या व्यक्तीने टाकायचा प्रवास. हे काम मी पाच वर्ष केले आहे,यात अनेक वृत्तपत्र वाचक चाहत्यांची भेट झाली... पेपर कसा वाचायचा अन् ती वाचण्याची त्यांची सवय तो आनंद खरच फक्त एक पेपर टाकणारा मुलगाच अनुभवू शकतो...

सकाळी ५:३०ला सुरू होणारे हे काम ७-८ वाजता संपून जायचे,महिन्याला त्यावेळी भेटणारे ४५०रुपये कमी नव्हते त्या वयात पैशाची गरज,व्यवहारीपण शिकण्यासाठी असलेलं ते एक काम होते...
गेले दोन महिने वृत्तपत्र येत नसल्यामुळे या वर्गाचा विचार करवत नाही,आणि रोज चहासोबत झालेली वृत्तपत्राची सवय हल्ली वृत्तपत्राशिवाय झालेली सकाळ काहीतरी चुकत असल्याचा भास करून देत असते कायम...प्रसंगी चिडचिडही होत असेल कारण वृत्तपत्र वाचणारा बहुतांशी वाचक वर्ग हा जाणता,वृत्तपत्राचा चाहता वर्ग आहे.ज्यांना त्यांच्या सवयीशी झालेला हा बदल गेल्या कित्येक वर्षात झालेला हा एकमेव बदल अवघडता वाटत असल...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...