मुख्य सामग्रीवर वगळा

वृत्तपत्र जगणं शिकवणारा एक दुवा...


पैसा माणसाला जगायला शिकवतो हे म्हणायला कितीही जरी चुकीचे वाटत असले तरी ते वास्तव सत्य आहे. याला जोडून अजुन एक गोष्ट अशी आहे जी नसली की माणसाला चैन पडत नाही,मग ती कुठलीही आपल्याला असलेली सवय ती चांगली असो कींवा वाईट....


गेले दोन महिने झाले सकाळी चहा बरोबर हवे असणारे वृत्तपत्र हल्ली घरोघर उपलब्ध होत नाहीये. ज्याची काही जणांना इतकी सवय झाली असते की,सकाळ झाली की आपसूक आपले पाय ज्या जागी पेपर टाकलेला असतो त्या जागेला भेटून येतात...पण अलीकडे वृत्तपत्र येत नाहीये गेले काही दिवस म्हणुन सतत अस्वस्थ वाटत आहे...

काहीजण म्हणतात पेपर नाही आला तरी आम्हाला काही वाईट वाटत नाही. कारण ऑनलाईन तो फुकट उपलब्ध होतो,सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणारी माहिती भेटतच असते...मान्य आहे हे सर्व खरे आहे अलीकडे या गोष्टीचा परिणाम वृत्तपत्र निर्माता,विक्रेता,पत्रकार या सर्वांवर झाला आहे कुठेतरी ती अस्वस्थता जाणवतही असते...

हे सर्व कितीही खरे असले तरी ज्याप्रमाणे पत्र जसे अजूनही या आधुनिक युगात तग धरून कायम उभे आहे त्याच्या चाहत्यासाठी आजही,कुठलीही खंत न बाळगता...त्याच्याशी जोडून असलेले माणसे सेवा देत आहे,काळाच्या ओघात थोडा बदल झाला आहे अन् तो त्यांनी स्वीकारला आहे व आजही सर्व छान चालू आहे... 

वृत्तपत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याचा प्रवास हा कायम अनोखा,माझ्यासाठी तरी हवाहवासा आहे...पत्रकाराचे ते बातम्या शोधण्याचे कार्य त्यासाठी असलेला प्रामाणिकपणा,हो अलीकडे जेव्हा माझे काही लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागले तसे या वर्गाशी माझी बऱ्यापैकी ओळख झाली. माझा त्यांच्या बाबतीत असलेला अनुभव आजवर खूप चांगला आहे,सतत कामाशी प्रामाणिक असतात ही माणसं...

त्यानंतर निर्माता,एडिटर,वृत्तपत्र प्रेस हा सर्व प्रवास
आणि रात्री बारा-एक वाजेच्या सुमारास आपल्या ठरल्या ठिकाणी जाण्याचा तो वृत्तपत्राचा प्रवास अप्रतिम असेल.हो असेल... कारण हा सर्व प्रवास आजवर मी अनुभवलेला नाही,पण इथून पुढे त्यांचा होणारा सर्व प्रवास मी अनुभवला आहे. म्हणूनच कदाचित त्या बाबतीत एक आकर्षण आणि जाणीव कायम मनात राहिलेली आहे....

सकाळी जेव्हा बसस्टँडवर सर्व पेपरचे पार्सल येतात तेव्हा सुरू होतो,घरोघरी ठरलेला पेपर ठरलेल्या व्यक्तीने टाकायचा प्रवास. हे काम मी पाच वर्ष केले आहे,यात अनेक वृत्तपत्र वाचक चाहत्यांची भेट झाली... पेपर कसा वाचायचा अन् ती वाचण्याची त्यांची सवय तो आनंद खरच फक्त एक पेपर टाकणारा मुलगाच अनुभवू शकतो...

सकाळी ५:३०ला सुरू होणारे हे काम ७-८ वाजता संपून जायचे,महिन्याला त्यावेळी भेटणारे ४५०रुपये कमी नव्हते त्या वयात पैशाची गरज,व्यवहारीपण शिकण्यासाठी असलेलं ते एक काम होते...
गेले दोन महिने वृत्तपत्र येत नसल्यामुळे या वर्गाचा विचार करवत नाही,आणि रोज चहासोबत झालेली वृत्तपत्राची सवय हल्ली वृत्तपत्राशिवाय झालेली सकाळ काहीतरी चुकत असल्याचा भास करून देत असते कायम...प्रसंगी चिडचिडही होत असेल कारण वृत्तपत्र वाचणारा बहुतांशी वाचक वर्ग हा जाणता,वृत्तपत्राचा चाहता वर्ग आहे.ज्यांना त्यांच्या सवयीशी झालेला हा बदल गेल्या कित्येक वर्षात झालेला हा एकमेव बदल अवघडता वाटत असल...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ