मुख्य सामग्रीवर वगळा

गौताळा अभयारण्य...



गौताळा अभयारण्य...

गौताळा अभयारण्यबद्दल यापूर्वी माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे,ट्रेकर्स सज्ज झाले आहे...खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा विषय घेऊन चर्चा होत आहेत तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून माझा हा तुमच्यासाठी माहितीपर लेख लिहण्याचा एक प्रयत्न...
त्यानिमित्ताने माझ्या माध्यमातून गौताळा अभयारण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख होईल...

तर मित्र/मैत्रणींनो गौताळा अभायरण्य हे मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे अभयारण्य आहे.थोडक्यात या ठिकाणी आल्यावर तुमची कुठलीही निराशा होणार नाही कारण एकाच तालुक्यात तुम्हाला  ट्रेकिंग करण्यासाठी खूप मोठे अभयारण्य आहे,अनेक व्हिव पॉइंट,विविधतेने नटलेली वृक्ष,वेली संपदा, धबधबे,धरणे,किल्ले,लेणी अन् विविध दर्शनीय मंदिर हे आपल्याला काही 40 ते 50 किलोमीटर आतील अंतरात बघण्यास मिळेल...

येणार कसे -
रेल्वेने आलात तर - चाळीसगाव रेल्वस्थानकापासून पुढे बसेसने 20 कि.मी.
विमानाने आलात तर -औरंगाबाद येथून 65 कि.मी. पुढे बसेस उपलब्ध आहेत.
बसेस ने आलात तर - कन्नड येथून पुढे 10 कि.मी.अंतरावर गौताळा अभयारण्य...

सिता न्हाणी


थोडक्यात गौताळा अभयारण्यबद्दल:

औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्यादृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. विविध प्रजातींची वृक्ष,वेली प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत केले...
अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचे 19706 हेक्टर तर जळगावचे 6355 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.
गौताळा ओट्रम घाट अभयारण्य कन्नड गावापासून 15 कि.मी अंतरावर आहे तर चाळीसगाव पासून 20 कि.मी अंतरावर. औरंगाबादपासून कन्नड 65 कि.मी अंतरावर आहे,हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो.कन्नडहून 2 कि.मी पुढे गेल्यानंतर एक  हिवरखेडा फाटा आहे. या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचतो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू,पळस,रानपिंपळ,रानशेवगा,कडुनिंब,साग, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पणडुब्बी,पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो.तेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवग्याची झाडं, प्राणी,पक्षी पाहू शकतो.अभयारण्यात बिबट्या,लांडगे,चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर,यासह इतर 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.
या ठिकाणी पुरातन काळातील मंदिर अन् दर्गाह सुद्धा आहे तसेच  विविध छोटेमोठे धबधबे लक्ष वेधून घेतात,धवल तीर्थ धबधबा,चंदन नाला,सितान्हाणी,प्रसिद्ध गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कुटी,पुरातन मंदिरे,लेणी,महादेव मंदिर,हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर,केदारकूंड अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते..

धवलतीर्थ धबधबा

गौताळा अभयारण्य बघून झाले की जवळपास अनेक स्थळं ही बघण्यासारखे आहेत जसे की,अंतुरचा कील्ला,सातमाळ डोंगररांगा,अंबाडी प्रकल्प,कालीमठ कालिकामाता मंदिर,शुन्याचा शोध ज्या ठिकाणी लागला ती पितळखोरा लेणी, पाटणादेवी,विविध ठिकाण हे बघण्यासारखे व आनंद,माहिती देणारे आहेत...

पितळखोरा लेणी

या ठिकाणांना भेट दिल्यावर जवळपास अनेक जगप्रसिद्ध ठीकाणंही बघण्यासारखे आहेत...
औरंगाबाद शहर याची ओळखच ऐतिहासिक शहर असल्याने ते पुर्ण शहर बघण्यासारखे आहे,वेरुळची लेणी, कैलास आश्रम,बदलला मारुती,थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ,देवगिरी किल्ला हे सर्व ठिकाण बघण्यासारखे आहे...
Written by,
Bharat Laxman Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ