मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक साथी एैसा भी था..!

एक  साथी ऐसा भी था..,! भर मध्यरात्रीची ती वेळ रस्त्याच्या मधोमध भरधाव वेगाने चालणारी आमची ट्रक,दोन्ही बाजूने दूरदूर एकही गाडी नाही एखादी जवळून गेली की नकळत अंगाला थंडगार वाऱ्याच्या झुळकेतून येणारे काटे,कॅबिनमध्ये मध्यस्थी असलेल्या आरश्याच्या फितीत गुंतवलेला रातराणीच्या फुलांचा गजरा अन् हिंदी,उर्दू गझल प्रिय असलेला आवडता मित्र ड्रायव्हर.... हा प्रवास आयुष्यभर संपावा वाटणार नाही असा होता,मोजून संपूर्ण एक दिवस अन् दोन रात्रींचा हा प्रवास आजही जवळ जवळ चार वर्षांपूर्वीचा हा प्रवास मला आठवतो.तो फक्त या प्रवासात ऐकलेल्या गाण्यांमुळे असो किंवा त्या रातराणीच्या फुलांच्या गजर्यामुळे आजही तो सुगंध मी अनुभवतो त्या आठवणींमधून... रात्रीचा सोबतीला अधून मधून बरसणारा पाऊस झोप यायला लागली की,रस्त्याच्याकडेला ट्रक लावून वाफाळत्या चहाला रात्रीच्या कुठल्याही वेळेला अनुभवणे.वाफाळत्या चहाच्या वाफेत बघत ही रात्र मी जगत होतो,जी आजवर आता फक्त कल्पनेत जगत आलो आहे. आयुष्यात इतकी सुंदर रात्र तरी आजवर नाही जगलो... खूप लहान वयात खुप मोठ्या जबाबदाऱ्या मला माझ्या नशिबाने भेटत गेल्या त्यातीलच ही एक जबाबदारी

आठवणींचा पसारा..!

आठवणींचा पसारा..! हिचकियों में वफ़ा ढूंढ रहा था कमबख्त  गुम हो गई दो घूँट पानी से..! - गुलजार...   जसजशी रात्र सरू लागते तसतसे माझे संवेदनशील मन,मनाचे असंख्य ठोकताळे,बदलणारे विचार अन् मनाचे असंख्य असलेले कप्पे उघडून बघू लागतं.जशी रात्र हळुवार होते,तसे माझे विचार करणे कल्पनेच्या विश्वात आधिकच समरस होवून मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागते ते प्रगल्भ असं काहीतरी भासते दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या अंधारातच... जसजशी रात्र सरत जाते तसतसा मला इतिहास खूप जवळचा वाटायला लागतो.कारण इतिहास हा नेहमीच माझा खूप आवडता आहे फक्त हल्ली त्याचे नाव बदलून आठवण झाले आहे,होय आठवण... जुन्या गोष्टीत हल्ली मी जास्त रमतो,आपण म्हणत नाही का अडगळीच्या खोलीत असलेल्या काही जुन्या गोष्टी जसजश्या जुन्या होत जातात तश्या त्या धुळीच्या त्या वातावरणात हरवत जातात आपल्यासाठी विरळ होवू लागतात पण सोबतच त्यांच्या बाबतीत असलेल्या आठवणी कायम धूसर होण्यापेक्षा आधीकच दिवसेंदिस खुलत जाणाऱ्या वाटतात मला हल्ली... जसं मी काही चार अक्षरं लिहायला लागलो तेव्हापासून एक गोष्ट मला उमगली आहे की माणूस जे काही दिवसा लिहितो

आठवणींचा गुलमोहर..!

आठवणींचा गुलमोहर..! भूतकाळात मन रमायला लागलं की आपसूकच आठवणींचा पसारा वाढत जातो.जसा गुलमोहर त्या फुलांच्या बहरातून निखळून जमिनीवर चहूकडे पसरला जातो,अगदीच तसचं आठवणींचे असते.त्यांनाही गुलमोहराच्या फुलांप्रमाणे सुगंध असतो,पिवळसर तांबूस त्या फुलांना असलेलं पुंकेसर कदाचितच कुणी या गुलमोहराच्या फुलाचे बघितले असेल,हो कदाचितच.कारण गुलमोहर हा अनेकांना फक्त हिरवा असेस्तोवर अनुभवयाला,बघायला आवडतो.... कधीतरी त्या भर उन्हाच्या झळांना सोसताना बघावं,उन्हाच्या वाहत्या झळा आणि आपल्या अस्तित्वाच्या शेवटच्या खुणा मोजणारे ते गुलमोहराचे फुलं,आपलं बहरणे सोडून जेव्हा ते अस्तित्वाच्या शेवटच्या खुणा मोजत असते तेव्हा त्या गुलमोहराच्या सर्वांगावर त्या पिवळसर,तांबूस फुलांची आरास चादर बनून झाडाला सोखावत असते काही घटकांसाठी.... पानगळ सुरू झाली की,सुरू होतो या फुलांचा वाहण्याचा हा प्रवास,सोबतीला असतो आपल्याला त्या वाळलेल्या फुलांचा हवाहवासा सुगंध आणि सोबतच एखादी सर पावसाची यावेळी येऊन जावी हीच एक कोरडी पडलेली अपेक्षा... आठवणींच काही वेगळं नसतं फरक इतकाच की,त्यांना न कधी पानगळ सोसण्याची भिती असते किंवा क

एक आगळी वेगळी आवड..!

एक आगळी वेगळी आवड..! अगदी नकळत्या वयात आपल्याला ज्या गोष्टीचं कुतूहल वाटायला लागतं पुढे तोच विषय आपला आवडीचा होवून जातो अन् नकळत आपण त्या विषयाशी जोडून असलेली माहिती,आपले निरीक्षण करणे वाढवत असतो... मग नेमकं कुतूहल वाटणे म्हणजे काय तर त्या विषयात आपल्याला रुची असणं,त्याबद्दल आपल्याला आधिकाआधीक जाणून घ्यायला नेहमीच आवडणं,मलाही अश्याच एका गोष्टीच्या बाबतीत खूप लहानपणापासून कुतूहल आहे.शक्यतो या गोष्टीचा फार विचार कुणी करत नाही,जरी केलाच तर ते फक्त वडीलधारी माणसेच करतात.माझ्या वयाच्या तरुण पिढीला क्वचितच हा विषय जवळचा वाटतो,कारण तो काही विशेष नाही किंवा आपल्या रोजच्या जीवनात त्याचा आपल्याला काही उपयोग आहे,असतो असेही नाही... परंतु मी वर जसे म्हंटले की,अगदी नकळत्या वयात आपल्याला ज्या गोष्टीचं कुतूहल वाटायला लागतं पुढे तोच विषय आपला आवडीचा होवून जातो,बस अगदी माझा बाबतीत हेच आहे... विषय जरा आगळा-वेगळा आहे अन् बऱ्याच जणांना तो आवडतही नसेल,मला ते सर्व न्याहळण्याची आवड कदाचित पिढीदर पिढी संस्कार म्हणून जे घरातील व्यक्ती आपल्याला त्या कामात मदत अन् पुढची पिढीसुद्धा या सर्व गोष्टींना शि

गाव अन् गावची लोकं..!

गाव अन् गावची लोकं भरर दुपारची वेळ होती उन्हं डोक्यावर आलेली,घामाचे ओघळ घरंगळत पाठीच्या लवणातून मोहम्मदचाच्या शरीराला चिटकलेल्या सदर्याला समीप होवून एखाद्या वाऱ्याच्या झोकाने सुकून सदर्यावर पांढऱ्या बुंदक्यातून ओघळणाऱ्या ओघळासारखे दिसून येत होते... नदी ओलांडून मोहम्मदचाच्या आपल्या बकर्या घेऊन नदीच्या थडीथडीने,तापलेल्या वाळूत टाचावर वाळूत आपले पाय रोवत,एका हाताने उपरण्याने चेहऱ्यावरील घाम पुसत चालला होता.... मी पांदीच्या रस्त्यानं असलेल्या लक्ष्मीआईच्या देऊळात बसलो होतो,दूरवर स्मशानात तुळसाआईचं जळतं मडं जळत होतं.उंच उंच आकाशात जाळाचे लोळ दिसत होते,नदीच्या कडेला तुळसाआईचे वापरलेले नववार लुगडे अन् जरीच्या खणाच्या शिवलेल्या चोळीचे गाठुडे तिच्या नातवाने पाण्यात सोडायच्या हिशोबान ठेवले होते,तुळसाआईचा जावयाने त्याला ते गाठुडे पाण्यात टाकण्यास नकार देऊन काठावर ते ठेवायला सांगितले.वस्तीवरचे कुणी गरीब घटकाभरच्या वख्तानं येईल अन् ते गाठुडं घेऊन जाईल हे तुळसाआईच्या जावयाला ठाव होतं... आकाशात उंच उंच आसमंतांशी एकरूप होणारे आगीचे लोळ अन् त्या आगीच्या पल्याड दिसणारा मोहम्मदचाच्या बकर्या ह

बोलायचे टाळत राहिलो मी...! कविता..

बोलायचे टाळत मी राहिलो..! बोलायचे टाळत मी राहिलो, चेहऱ्यावरचे भाव मी उगाच मग माझे सावरत राहिलो..! अन् मी काय बोलू जिंदगीशी, रोजच आज-उद्या जगण्यासाठीचा करार तिच्यासोबत मी करत राहिलो..! झाल्या हृदयावर खुणा कित्येक विश्वासघाताच्या, सवय झाली आता घात सहण्याची वेळी वेळोवेळी मला मीच आता सावरत राहिलो...! नाही हितगुज करत मी जिंदगीशी,भविष्यातील स्वप्नांशी, मीच मला प्रत्येकदा नव्याने आता  भूतकाळातील अंधारात पहात राहिलो..! घे तू आता सावरायला या हातून सुटलेल्या क्षणांना, वर्तमान काळाकडून भविष्यासाठी,भूतकाळात बघितलेली स्वप्न आयुष्याकडे मी मागत राहिलो..! झाली भेट कधी जर पुन्हा एकदा आयुष्याच्या या पटावर,फीरण्या फासे माझ्या आयुष्याचे बिजगिरीसम मग वाटच मी बघत राहिलो..! गोळा वजाबाकी,बेरीज,गुणाकार झाला आयुष्यातील क्षणांचा, जेव्हा उत्तर शून्य आले तेव्हा मात्र मी फक्त आयुष्याकडे कोरड्या झालेल्या डोळ्यांसाठी आसवे मागत राहिलो..! मी फक्त आयुष्याकडे आसवे मागत राहिलो...! Written by, ©®Bharat Sonwane.

Morning Vibes..!

Morning Vibes..! पहाटच्या साखर झोपेतच भर मध्यरात्रीपासून चालू असलेली पावसाची झड सकाळी उठेस्तोवर चालू होती,पाऊस म्हंटले की मग थंडी,गोधडी त्यात संपूर्ण अंग एकटवून झोपून राहणं,कल्पनेत बाहेरचा परिसर अनुभवत राहणं होतं... फारफार तर विंडोग्रीलच्या पडद्याआडून बाहेर उसंत घेत असणारी गॅलरीतून पडत असलेली पावसाची थेंब बघत बसायची माझी सवय आहे,पाऊस मला पूर्वी कधीच आवडला नाही,त्याला कारणे अनेक होती. परंतु आपल्या आवडल्या न आवडल्याने काही होत नसते अन् ते मला नकोही होते,कारण संपूर्ण सृष्टीचक्र त्यावर चालते.... पहाटेच्या फिरण्यासाठी तयार झालो. ट्रॅकसूट,शूज घातले अन् निघालो आज नियमित फिरायला जाणाऱ्या रस्त्याकडे जायची मुळीच इच्छा नव्हती,तिकडे सकाळी फिरायला येणाऱ्या माणसाची फार गर्दी असते,कधीकधी ही गर्दी मला नकोशी वाटते.असेही मला आसपास माणसे नकोसे वाटतात,एकांताचा सानिध्यात मला माझं आयुष्य जगायला आवडते.त्यामुळे शक्य होईल तितकी मी गर्दी टाळतो,शक्य होईल तितके गर्दीकडे घेऊन जाणारे मार्ग टाळतो.... ठरल्याप्रमाणे निघालो, घरापर्यंत आता सिमेंटचे रोड झाले आहे पण त्यांना सोडून मी लालमातीच्या पायवाटांशी लगट

बहाणे..!

बहाणे..! बंद खिडकीच्या अलिकडे असलेल्या जगास काय मी बोलतो काय सांगायचे, बहाणे ते रोजचे तिच्याशी बोलायचे मनास आता किती वेळ मी माझ्या समजावयाचे... बहाणे करून बोलणे,नजरेला लपवत खिडकीआड असे किती आता बघायचे, डोळ्यांनी नजरेला सावरत कितीवेळ आता तुझ्या  डोळ्यांना फक्त नजरेनीच अनुभवायचे... कितीवेळ असावे नियंत्रण माझे आता श्वासावर असे कितीसे फक्त क्षणभरच्या प्रेम लहरींवर जगायचे, नजर रोखून अशी रोज मला प्रश्न करते, का रे मना असे किती दिवस तुझे हे छुपे प्रेम चालायचे... किती दिवस फक्त असे खिडकी आडूनच  मी फक्त तुला न्याहाळयचे, कल्पनेतच तुझ्यासंग असे कितिदिवस, तुझ्या प्रेमात अजून मी वाहायचे...! Written by, Bharat sonwane

#LionelMessi..❤️

#LionelMessi...❤️ फुटबॉल म्हंटले की माझ्यासह जगातील असंख्य चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनलेला लिओनेल मेस्सी हा खेळाडू आठवतो,फुटबॉल म्हंटले की आपसूकच फुटबॉल=मेस्सी हे समीकरण जुळून येते. गेल्या आठवड्यात फुटबॉल विश्वात मेस्सीसोबत काही घडामोडी घडल्या,ज्या खुद्द मेस्सीलासुद्धा लवकर कळून चुकल्या नाही... जेव्हा हे त्याला कळले तेव्हा अवघ्या जगातील मेस्सीचा चाहता वर्ग हळहळला,सोबत मेस्सीही.कारण बार्सिलोनाकडून खेळताना आपला त्यांच्यासाठी खेळण्याचा असा शेवट होईल हे त्यालाही वाटले नव्हते,की त्याच्या चाहत्या वर्गालासुद्धा,परंतु हे सर्वकाही गेले काही दिवसात घडून आले... अर्जेंटीनाचा स्टार फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पेनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाला काही दिवसांपूर्वी अलविदा केले आहे.मेस्सीने १७ वर्ष खेळत असलेला बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय ज्या क्षणी घेतला त्यावेळी मेस्सीसह अवघे फुटबॉल विश्व हळहळले.कारण संपूर्ण १७ वर्ष बार्सिलोना टीमसाठी त्याने दिलेलं योगदान,असंख्य बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या चाहत्या वर्गाचा गळ्यातले ताईत बनलेला मेस्सी होता.मेस्सीच्या क्लबसोबत शेवटच्या पत्रकार परिषदेत बोलतान

सैर पर्यटनाची माझ्या सोबत भाग - ३.

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..! भाग - तीन. मागील भागात आपण कन्नड शहर आणि जवळपास असलेल्या छोट्या काही गावांची माहिती घेतली.सोबतच जगप्रसिद्ध पितलखोरा लेणी,पाटणादेवी मंदिर अन् जवळ असलेल्या डोंगररांगांची माहित घेतली.आता या भागात आपण सोयगाव,सिल्लोड तालुक्यातील काही लेणी,किल्ले अन् मंदिरांची माहिती घेणार आहोत.ही सर्व भ्रमंती करतांना आपल्याला हे सर्व स्थान कसे बघायचे,याची माहिती या लेखाच्या माध्यमातून मी देणार आहे... कन्नड वरून गौताळा अभयारण्यात गेले की,गौताळा अभयारण्य बघितल्यावर आपल्याला याच परिसरात असलेला अन् आपण बघत असलेल्या स्थानपैकी दुसरा किल्ला बघायला भेटतो. जो किल्ला कन्नडसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे,कन्नड शहरातील पर्यटन स्थळांची भेट घेत असताना प्रथमस्थानी हा किल्ला आहे.ज्याचे नाव "किल्ले अंतुर" असे आहे किल्ले अंतुर विषयी माझ्या ब्लॉगमध्ये सविस्तर लेखन केले असल्यामुळे येथे फार असे लिहणार नाही... "किल्ले अंतुर" बघून आपण जेव्हा आपण भटकंती करत त्या परिसरात फिरत असतो,त्यावेळी आपल्याला या ठिकाणी "कोकणी आदिवासी" लोकांची

Amazing Aurangabad..!

Amazing Aurangabad..! #aurangabad  शहराची नव्यानं होणारी ओळख अन् शहराचे वाटणारे आकर्षण,गेले काही वर्ष हा माझा नियमित आवडणारा विषय मग ते शहर कुठलेही असो. प्रत्येकवेळी एका नव्या नजरेतून शहर बघायला मला नेहमीच आवडते का माहित नाही औरंगाबाद शहर गेली कित्येक वर्ष बघत असुनही अजूनही मला ते मी पूर्ण बघितल्याची जाणीव माझ्या मनात निर्माण होत नाही... ती जाणीव अपूर्ण का आहे..? हे जवळ -जवळ प्रत्येक औरंगाबादकर आपल्याला सांगेल,एकीकडे रोज नव्याने वाढणारे हे शहर आणि एकीकडे साधारण काही वर्षांपूर्वी लहान बाळाप्रमाणे बाळसे धरणारे हे शहर यात खूप फरक आहे. आज चहूबाजूंनी औरंगाबाद शहर झपाट्याने वाढत आहे,तसे या शहराचा विकास माझ्या मते तरी १९९६-९७  सालापासून सुरु झाला असेल.कारण मला जसे कळू लागले तसे या शहरात माझे येणे जाणे आहे तसे औरंगाबाद शहराचा व्याप अन् विकासाचा आलेख नेहमीच वाढता आहे,साहजिक आहे या आधुनिक युगात कुठल्या शहराचा व्याप वाढणार नाही.पण हा व्याप वाढूनही एक भावनिक बंध जो असतो जसा मुंबईकरांचा मुंबईशी आहे,पुणेकरांचा पुणेशी आहे अन् त्यानंतर मला दुसरे नाव सुचतच नाही Absolutely औरंगाबादकर आणि औरं

भोकाड वस्ती जगण्याला आधार..!

भोकाड वस्ती जगण्याला आधार..! भोकाड वस्ती जगण्याला आधार झाल्या अन् त्यांच्याबद्दल आपसूकच मनात आपलेपणाचा भाव निर्माण झाला. आयुष्यात का..? कश्याला..? या गोष्टींना कधीच महत्त्व नव्हतं. जिथे,ज्या गोष्टींच्या सानिध्यात मला आपलेपण,आपुलकी वाटत होती तिथे माझे सुत जुळले. बाकी क्षणभरचा विसावा देणाऱ्या वस्ती असो किंवा माणसे आयुष्यात खूप आली,गेली त्यांनी,त्यांच्याशी माझं जपून ठेवलेलं आपलेपण कायम आहे. भोकाड वस्ती अनेकांना नकोशी वाटते पण मला माझ्यातला मी तिथं नव्यानं भेटत असतो.आयुष्यात काय हवं आहे,काय नको आहे हे प्रश्न जेव्हा सुटत नाही त्यावेळी आपसूकच पावलं इकडे वळतात अन् काहीतरी निर्णय घ्यायला मी समर्थ ठरतो... निर्णय कितपत योग्य ठरणार आहे किंवा कितपत योग्य आहे,याला उत्तरंही नाही अन् त्याचा विचारही नाही... भोकाड वस्तीत काळाबरोबर राहिलेली माणसे कायम सोबत असतात,त्यांचे आयुष्यातील अनुभव अन् जगण्याची रीत मला आयुष्यात जगायला शिकवते... फार काही हाती लागणार नाहीये माहीत असूनही,मी कधी विचार केला नाही की आपला फायदा कितपत आहे.आयुष्याची काही गणितं आपण सोडवायची नसतात,वेळेनुसार ती आपोआप सुटतात फक्त आप

आठवणी अन् मित्र..!

आठवणी अन् मित्र..! काही मित्रांचं आपल्या आयुष्यात असणं आपल्याला आपल्या आयुष्याला अर्थ देणारं असतं.एक स्वप्न दोघांनी बघितलेले असावं,आपलं नाही पण त्याचं ते पूर्ण झालेलं असावं.आपलं का पूर्ण होवू शकत नाही..? किंवा आजवर का पूर्ण झालं नाही..? याला काही कारणे असतात अन् ती कारणेसुद्धा त्या आपल्या मित्राला माहीत असावी.... आपल्या या अश्या वाईट वेळेत जेव्हा तो आपल्याला प्रत्येक वाक्यागणिक समजावत असतो,एक आशेचा किरण दाखवत असतो अन् सर्वात महत्त्वाची आजवर जशी साथ देत आला तशी इथून पुढेही देईल हे नकळत बोलण्यातून सांगत असतोना तेव्हा खरच तो रक्ताच्या नात्यापेक्षाही जे नाते जवळचे असेल ते त्याचे अन् आपले असते. आज अशीच खूप दिवसांनी त्याची भेट झाली अन् वरील प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय येत गेला.आजची सोनेरी किरणांची सांज,अधूनमधून बरसणाऱ्या पावसातही खूप सुंदर कधीही ही वेळ सरू नये अशी गेली.... Thank you Dost...! After long time भेटूनही आपण यापूर्वी त्याच बालपणीच्या रोज होणाऱ्या भेटीसारखे रोज भेटत होतो असे वाटले.... रनिंगट्रेकवरती झालेली आपली आजची भेट आज पुन्हा आपल्याला त्याच वळणावर घेऊन आली अन् स्वप्न

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..! भाग - २

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..! लेख क्रमांक:२. मागील लेखमध्ये मी तुम्हाला कन्नड,सोयगाव,चाळीसगाव,सिल्लोड या तालुक्यातील लेणी,किल्ले,धबधबे,अन् काही पुरातन मंदिरे यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला.आता नेमके या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर ती कशी व कुठून सुरुवात करायची ही मी माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही भ्रमंती करतांना आपल्याला चाळीसगाव तालुक्यात फार असे फिरावे लागत नाही,एक पाटण्या देवीचे पुरातन मंदिर सोडले तर आपल्याला फारसे त्या भागात जाण्याची आवश्यकता नाही.परंतु तुम्हाला फक्त चाळीसगाव तालुक्यातील अश्या स्थळांची भेट घ्यायची तर मात्र मग नक्कीच चाळीसगाव तालुक्याची भ्रमंती करा,कारण येथेही बऱ्यापैकी खूपकाही बघण्यासारखे आहे... तर चला आता आपण सुरुवात करुया अजिंठा डोंगररांगा,गौताळा अभयारण्य,औट्रम घाट आणि सातमाळ डोंगररांगेतील भ्रमंतीसाठी. सर्वप्रथम आपण सुरुवात करुया ती चाळीसगाव लगोलग असलेल्या  पाटणादेवी येथून.येथील पुरातन पाटणादेवी मंदिराचे दर्शन घेतलं की आपण डोंगरांगेतून पायवाटेने साधारण ४-५ किमी चालले की पितळखोरा येऊ शकतो.पाटणादेवी जवळच आपल्याल

काळदरी एक अनोखं गाव..!

काळदरी एक अनोखं गाव..! औरंगाबाद म्हंटले की आपल्याला नेहमीच औरंगाबाद शहर म्हणजे महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" किंवा "आॅटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" या दोन गोष्टीसाठी औरंगाबाद शहर डोळ्यासमोर येते... एव्हाना ती या शहराची ओळखच,जी औरंगाबाद शहराच्या वैभवशाली इतिहासामुळे औरंगाबादास भेटली.एकीकडे औरंगाबाद शहरात औद्योगिक वसाहतींची नव्याने निर्मिती,शहरात विकासाच्या दृष्टीने येणारे रोजमितीला नव नवीन प्रकल्प,यामुळं औरंगाबाद शहराची "आॅटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही नव्याने होत चाललेली ओळख... परंतु,या ही पुढे जावून औरंगाबाद शहराचा असो किंवा जिल्ह्याचा भौगलिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर विविध चकित करणाऱ्या गोष्टी आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यात बघायला मिळतात...                                  त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला एक वेगळी  भौगोलिक ओळख प्राप्त होते तर आजच्या या लेखात अशीच एक अनोखी अन् वेगळी ओळख मी तुम्हाला सांगणार आहे.जी पुन्हा एकदा औरंगाबादला वेगळं आणि उजवे ठरवते... आपण महाराष्ट्राच्या भूगोलात बऱ्याचवेळा "काळदरी" नावाच्या गावाचा उल्लेख ऐ

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..! यापूर्वी माझे "गौताळा अभयारण्य" अन् सभोवतालचा निसर्गरम्य परिसर या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे,अनेक दैनिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली सोबतच माझ्या स्वताच्या ब्लॉगमाध्यमातून मी तुम्हाला नेहमीच "गौताळा अभयारण्य" अन् परिसर याब्बदल माहिती देत आलो आहेच... तर असेच काही दिवसांपूर्वी मी आपणास कन्नड तालुक्यातील "काळदरी" या गावाबद्दल थोडक्यात माहिती दिली. बऱ्याच मित्रांनी या गावास भेट देण्याची इच्छा दर्शविली. परंतु,काळदरी इतकं सुंदर अन् भौगोलिकदृष्ट्या आपले वेगळेपण सिद्ध करणारे गाव असेल तर आम्हाला कन्नड तालुका अन् शेजारील तालुक्यातील काही सुंदर,निसर्गसंपन्न,निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध ठिकाणांची माहिती माझ्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा बऱ्याच जणांनी व्यक्त केली... यामुळे मी "कन्नड,सोयगाव,सिल्लोड आणि चाळीसगाव" यांच्या सीमेवर असणाऱ्या "अजिंठा डोंगररांगा" आणि "गौताळा अभयारण्य" परिसरात असलेल्या काही विशेष ठिकाणांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे.या माहितीसाठी