मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणी अन् मित्र..!

आठवणी अन् मित्र..!

काही मित्रांचं आपल्या आयुष्यात असणं आपल्याला आपल्या आयुष्याला अर्थ देणारं असतं.एक स्वप्न दोघांनी बघितलेले असावं,आपलं नाही पण त्याचं ते पूर्ण झालेलं असावं.आपलं का पूर्ण होवू शकत नाही..? किंवा आजवर का पूर्ण झालं नाही..? याला काही कारणे असतात अन् ती कारणेसुद्धा त्या आपल्या मित्राला माहीत असावी....

आपल्या या अश्या वाईट वेळेत जेव्हा तो आपल्याला प्रत्येक वाक्यागणिक समजावत असतो,एक आशेचा किरण दाखवत असतो अन् सर्वात महत्त्वाची आजवर जशी साथ देत आला तशी इथून पुढेही देईल हे नकळत बोलण्यातून सांगत असतोना तेव्हा खरच तो रक्ताच्या नात्यापेक्षाही जे नाते जवळचे असेल ते त्याचे अन् आपले असते.

आज अशीच खूप दिवसांनी त्याची भेट झाली अन् वरील प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय येत गेला.आजची सोनेरी किरणांची सांज,अधूनमधून बरसणाऱ्या पावसातही खूप सुंदर कधीही ही वेळ सरू नये अशी गेली....
Thank you Dost...!
After long time भेटूनही आपण यापूर्वी त्याच बालपणीच्या रोज होणाऱ्या भेटीसारखे रोज भेटत होतो असे वाटले....

रनिंगट्रेकवरती झालेली आपली आजची भेट आज पुन्हा आपल्याला त्याच वळणावर घेऊन आली अन् स्वप्न जेव्हा बघितले अन् काही दिवसांपूर्वी जेव्हा ते सत्यात उतरले तेव्हापासून आपली भेट नाही किंवा मी टाळत असेल पण नाही आज कितीही म्हंटले तरी आपल्यातले आपल्या मैत्रितले ते एक वर्तुळ पूर्ण झाले.मनात कुठेतरी एक वेगळीच रुखरुख लागून राहिली होती ती संपली,आता भेट होत राहील...

रनिंगट्रेकवरती दोघांची पावले वाक्यागानिक पडत होती,तू आदिसारखा हुड नाही राहिलास समजदार झालास याची प्रचिती येत गेली,जुन्या आठवणी कधी मी,कधी तू एकमेकांना सांगत होतो.सुखकर आयुष्याचे बघितलेले स्वप्न अन् आता ते सत्यात उतरल्यावर येणारे अनुभव तू सांगत होता मी ऐकत होतो,मी माझ्या जागी कितपत योग्य हे ही तू सांगत होता.बाकी आपल्या गप्पा या ठरलेल्या असतात त्याच काही ठराविक विषय सोडले तर फार आपले विषयसोडून बोलणे नाही...

एरवी रनिंगट्रेकवरती आपले पळणे कधी थांबेल असे आपल्याला वाटत राहायचं पण आज तुझ्यासोबत खूप दिवसांनी झालेल्या गप्पा आणि रनिंगट्रेकवरती आपले चालणे थांबुच नये असे वाटत होते.तुझ्यालेखी आपल्या आजच्या भेटीला किती महत्व होते मला माहित नाही पण माझ्यासाठी आजची भेट खूप काही देऊ करणारी होती,अजून खूप काही आहे पण ते नाही व्यक्त करता येत शब्दात...

Take care Dost...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड