मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणी अन् मित्र..!

आठवणी अन् मित्र..!

काही मित्रांचं आपल्या आयुष्यात असणं आपल्याला आपल्या आयुष्याला अर्थ देणारं असतं.एक स्वप्न दोघांनी बघितलेले असावं,आपलं नाही पण त्याचं ते पूर्ण झालेलं असावं.आपलं का पूर्ण होवू शकत नाही..? किंवा आजवर का पूर्ण झालं नाही..? याला काही कारणे असतात अन् ती कारणेसुद्धा त्या आपल्या मित्राला माहीत असावी....

आपल्या या अश्या वाईट वेळेत जेव्हा तो आपल्याला प्रत्येक वाक्यागणिक समजावत असतो,एक आशेचा किरण दाखवत असतो अन् सर्वात महत्त्वाची आजवर जशी साथ देत आला तशी इथून पुढेही देईल हे नकळत बोलण्यातून सांगत असतोना तेव्हा खरच तो रक्ताच्या नात्यापेक्षाही जे नाते जवळचे असेल ते त्याचे अन् आपले असते.

आज अशीच खूप दिवसांनी त्याची भेट झाली अन् वरील प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय येत गेला.आजची सोनेरी किरणांची सांज,अधूनमधून बरसणाऱ्या पावसातही खूप सुंदर कधीही ही वेळ सरू नये अशी गेली....
Thank you Dost...!
After long time भेटूनही आपण यापूर्वी त्याच बालपणीच्या रोज होणाऱ्या भेटीसारखे रोज भेटत होतो असे वाटले....

रनिंगट्रेकवरती झालेली आपली आजची भेट आज पुन्हा आपल्याला त्याच वळणावर घेऊन आली अन् स्वप्न जेव्हा बघितले अन् काही दिवसांपूर्वी जेव्हा ते सत्यात उतरले तेव्हापासून आपली भेट नाही किंवा मी टाळत असेल पण नाही आज कितीही म्हंटले तरी आपल्यातले आपल्या मैत्रितले ते एक वर्तुळ पूर्ण झाले.मनात कुठेतरी एक वेगळीच रुखरुख लागून राहिली होती ती संपली,आता भेट होत राहील...

रनिंगट्रेकवरती दोघांची पावले वाक्यागानिक पडत होती,तू आदिसारखा हुड नाही राहिलास समजदार झालास याची प्रचिती येत गेली,जुन्या आठवणी कधी मी,कधी तू एकमेकांना सांगत होतो.सुखकर आयुष्याचे बघितलेले स्वप्न अन् आता ते सत्यात उतरल्यावर येणारे अनुभव तू सांगत होता मी ऐकत होतो,मी माझ्या जागी कितपत योग्य हे ही तू सांगत होता.बाकी आपल्या गप्पा या ठरलेल्या असतात त्याच काही ठराविक विषय सोडले तर फार आपले विषयसोडून बोलणे नाही...

एरवी रनिंगट्रेकवरती आपले पळणे कधी थांबेल असे आपल्याला वाटत राहायचं पण आज तुझ्यासोबत खूप दिवसांनी झालेल्या गप्पा आणि रनिंगट्रेकवरती आपले चालणे थांबुच नये असे वाटत होते.तुझ्यालेखी आपल्या आजच्या भेटीला किती महत्व होते मला माहित नाही पण माझ्यासाठी आजची भेट खूप काही देऊ करणारी होती,अजून खूप काही आहे पण ते नाही व्यक्त करता येत शब्दात...

Take care Dost...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...