मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींचा पसारा..!

आठवणींचा पसारा..!


हिचकियों में वफ़ा ढूंढ रहा था कमबख्त 
गुम हो गई दो घूँट पानी से..!
- गुलजार...
 
जसजशी रात्र सरू लागते तसतसे माझे संवेदनशील मन,मनाचे असंख्य ठोकताळे,बदलणारे विचार अन् मनाचे असंख्य असलेले कप्पे उघडून बघू लागतं.जशी रात्र हळुवार होते,तसे माझे विचार करणे कल्पनेच्या विश्वात आधिकच समरस होवून मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागते ते प्रगल्भ असं काहीतरी भासते दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या अंधारातच...

जसजशी रात्र सरत जाते तसतसा मला इतिहास खूप जवळचा वाटायला लागतो.कारण इतिहास हा नेहमीच माझा खूप आवडता आहे फक्त हल्ली त्याचे नाव बदलून आठवण झाले आहे,होय आठवण...
जुन्या गोष्टीत हल्ली मी जास्त रमतो,आपण म्हणत नाही का अडगळीच्या खोलीत असलेल्या काही जुन्या गोष्टी जसजश्या जुन्या होत जातात तश्या त्या धुळीच्या त्या वातावरणात हरवत जातात आपल्यासाठी विरळ होवू लागतात पण सोबतच त्यांच्या बाबतीत असलेल्या आठवणी कायम धूसर होण्यापेक्षा आधीकच दिवसेंदिस खुलत जाणाऱ्या वाटतात मला हल्ली...

जसं मी काही चार अक्षरं लिहायला लागलो तेव्हापासून एक गोष्ट मला उमगली आहे की माणूस जे काही दिवसा लिहितो ते बहुतेक सर्वच कल्पनेच्या विश्वात रममाण होवून लिहत असतो.
जेव्हा रात्र सरू लागते,काळोख ओळखीचा वाटू लागतो,भिंतीच्या एका आडोश्याला ठेवलेली चिमणी जेव्हा मिनमिन करू लागते त्यावेळी मनात येणारे विचार जेव्हा आपण सादळलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात पडलेल्या डायरी कम वहीत आपण लिहू लागतो...

अन् जेव्हा आपल्याच लिहत्या हाताच्या सावलीचा लिखाणावेळी आपल्याला अडसर होतो तेव्हा जे मनात येतं अन् जे आपोआप कागदावर अक्षरांचा अंदाज घेऊन लिहल्या जातं तेच खरं लिखाण.उगाच नाही ती आयुष्याची गणितं लावता सांजेची हातात घेतलेली मोरपीस शाईच्या दौत पात्रात बुडून राहिली अन् झोप लागून गेली पूर्वजांना...

काळोखाच्या राती जागून जे काही लिहल्या गेलं ते मनातून आलेलं होतं,जो विचार लिहताना केला होता तो एकांताचा सानिध्यात जसं काळोखात अनुभवलेल्या विहिरीत बुडल्यावर जसं जिवाचं गुदमरून जाणे होईल इतकं खोलवर विचार करून टिपलेले असतं.यातलं बहुत कल्पनेतले नसून घडलेलं असेल कारण बहुतकरून रात्रीस कल्पनेस थारा आपलं मन घालत नसते....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड