मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींचा पसारा..!

आठवणींचा पसारा..!


हिचकियों में वफ़ा ढूंढ रहा था कमबख्त 
गुम हो गई दो घूँट पानी से..!
- गुलजार...
 
जसजशी रात्र सरू लागते तसतसे माझे संवेदनशील मन,मनाचे असंख्य ठोकताळे,बदलणारे विचार अन् मनाचे असंख्य असलेले कप्पे उघडून बघू लागतं.जशी रात्र हळुवार होते,तसे माझे विचार करणे कल्पनेच्या विश्वात आधिकच समरस होवून मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागते ते प्रगल्भ असं काहीतरी भासते दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या अंधारातच...

जसजशी रात्र सरत जाते तसतसा मला इतिहास खूप जवळचा वाटायला लागतो.कारण इतिहास हा नेहमीच माझा खूप आवडता आहे फक्त हल्ली त्याचे नाव बदलून आठवण झाले आहे,होय आठवण...
जुन्या गोष्टीत हल्ली मी जास्त रमतो,आपण म्हणत नाही का अडगळीच्या खोलीत असलेल्या काही जुन्या गोष्टी जसजश्या जुन्या होत जातात तश्या त्या धुळीच्या त्या वातावरणात हरवत जातात आपल्यासाठी विरळ होवू लागतात पण सोबतच त्यांच्या बाबतीत असलेल्या आठवणी कायम धूसर होण्यापेक्षा आधीकच दिवसेंदिस खुलत जाणाऱ्या वाटतात मला हल्ली...

जसं मी काही चार अक्षरं लिहायला लागलो तेव्हापासून एक गोष्ट मला उमगली आहे की माणूस जे काही दिवसा लिहितो ते बहुतेक सर्वच कल्पनेच्या विश्वात रममाण होवून लिहत असतो.
जेव्हा रात्र सरू लागते,काळोख ओळखीचा वाटू लागतो,भिंतीच्या एका आडोश्याला ठेवलेली चिमणी जेव्हा मिनमिन करू लागते त्यावेळी मनात येणारे विचार जेव्हा आपण सादळलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात पडलेल्या डायरी कम वहीत आपण लिहू लागतो...

अन् जेव्हा आपल्याच लिहत्या हाताच्या सावलीचा लिखाणावेळी आपल्याला अडसर होतो तेव्हा जे मनात येतं अन् जे आपोआप कागदावर अक्षरांचा अंदाज घेऊन लिहल्या जातं तेच खरं लिखाण.उगाच नाही ती आयुष्याची गणितं लावता सांजेची हातात घेतलेली मोरपीस शाईच्या दौत पात्रात बुडून राहिली अन् झोप लागून गेली पूर्वजांना...

काळोखाच्या राती जागून जे काही लिहल्या गेलं ते मनातून आलेलं होतं,जो विचार लिहताना केला होता तो एकांताचा सानिध्यात जसं काळोखात अनुभवलेल्या विहिरीत बुडल्यावर जसं जिवाचं गुदमरून जाणे होईल इतकं खोलवर विचार करून टिपलेले असतं.यातलं बहुत कल्पनेतले नसून घडलेलं असेल कारण बहुतकरून रात्रीस कल्पनेस थारा आपलं मन घालत नसते....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...