मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींचा पसारा..!

आठवणींचा पसारा..!


हिचकियों में वफ़ा ढूंढ रहा था कमबख्त 
गुम हो गई दो घूँट पानी से..!
- गुलजार...
 
जसजशी रात्र सरू लागते तसतसे माझे संवेदनशील मन,मनाचे असंख्य ठोकताळे,बदलणारे विचार अन् मनाचे असंख्य असलेले कप्पे उघडून बघू लागतं.जशी रात्र हळुवार होते,तसे माझे विचार करणे कल्पनेच्या विश्वात आधिकच समरस होवून मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागते ते प्रगल्भ असं काहीतरी भासते दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या अंधारातच...

जसजशी रात्र सरत जाते तसतसा मला इतिहास खूप जवळचा वाटायला लागतो.कारण इतिहास हा नेहमीच माझा खूप आवडता आहे फक्त हल्ली त्याचे नाव बदलून आठवण झाले आहे,होय आठवण...
जुन्या गोष्टीत हल्ली मी जास्त रमतो,आपण म्हणत नाही का अडगळीच्या खोलीत असलेल्या काही जुन्या गोष्टी जसजश्या जुन्या होत जातात तश्या त्या धुळीच्या त्या वातावरणात हरवत जातात आपल्यासाठी विरळ होवू लागतात पण सोबतच त्यांच्या बाबतीत असलेल्या आठवणी कायम धूसर होण्यापेक्षा आधीकच दिवसेंदिस खुलत जाणाऱ्या वाटतात मला हल्ली...

जसं मी काही चार अक्षरं लिहायला लागलो तेव्हापासून एक गोष्ट मला उमगली आहे की माणूस जे काही दिवसा लिहितो ते बहुतेक सर्वच कल्पनेच्या विश्वात रममाण होवून लिहत असतो.
जेव्हा रात्र सरू लागते,काळोख ओळखीचा वाटू लागतो,भिंतीच्या एका आडोश्याला ठेवलेली चिमणी जेव्हा मिनमिन करू लागते त्यावेळी मनात येणारे विचार जेव्हा आपण सादळलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात पडलेल्या डायरी कम वहीत आपण लिहू लागतो...

अन् जेव्हा आपल्याच लिहत्या हाताच्या सावलीचा लिखाणावेळी आपल्याला अडसर होतो तेव्हा जे मनात येतं अन् जे आपोआप कागदावर अक्षरांचा अंदाज घेऊन लिहल्या जातं तेच खरं लिखाण.उगाच नाही ती आयुष्याची गणितं लावता सांजेची हातात घेतलेली मोरपीस शाईच्या दौत पात्रात बुडून राहिली अन् झोप लागून गेली पूर्वजांना...

काळोखाच्या राती जागून जे काही लिहल्या गेलं ते मनातून आलेलं होतं,जो विचार लिहताना केला होता तो एकांताचा सानिध्यात जसं काळोखात अनुभवलेल्या विहिरीत बुडल्यावर जसं जिवाचं गुदमरून जाणे होईल इतकं खोलवर विचार करून टिपलेले असतं.यातलं बहुत कल्पनेतले नसून घडलेलं असेल कारण बहुतकरून रात्रीस कल्पनेस थारा आपलं मन घालत नसते....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...