मुख्य सामग्रीवर वगळा

काळदरी एक अनोखं गाव..!

काळदरी एक अनोखं गाव..!

औरंगाबाद म्हंटले की आपल्याला नेहमीच औरंगाबाद शहर म्हणजे महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" किंवा "आॅटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" या दोन गोष्टीसाठी औरंगाबाद शहर डोळ्यासमोर येते...

एव्हाना ती या शहराची ओळखच,जी औरंगाबाद शहराच्या वैभवशाली इतिहासामुळे औरंगाबादास भेटली.एकीकडे औरंगाबाद शहरात औद्योगिक वसाहतींची नव्याने निर्मिती,शहरात विकासाच्या दृष्टीने येणारे रोजमितीला नव नवीन प्रकल्प,यामुळं औरंगाबाद शहराची "आॅटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही नव्याने होत चाललेली ओळख...

परंतु,या ही पुढे जावून औरंगाबाद शहराचा असो किंवा जिल्ह्याचा भौगलिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर विविध चकित करणाऱ्या गोष्टी आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यात बघायला मिळतात... 

                               

त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला एक वेगळी  भौगोलिक ओळख प्राप्त होते तर आजच्या या लेखात अशीच एक अनोखी अन् वेगळी ओळख मी तुम्हाला सांगणार आहे.जी पुन्हा एकदा औरंगाबादला वेगळं आणि उजवे ठरवते...

आपण महाराष्ट्राच्या भूगोलात बऱ्याचवेळा "काळदरी" नावाच्या गावाचा उल्लेख ऐकला,वाचला असेलच.हे गाव का इतकं महत्वपूर्ण आहे..? किंवा का या गावामुळे औरंगाबाद जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण होते..? ते यासाठी की औरंगाबाद जिल्ह्याचे 'कोकण' म्हणून या गावाच्या परिसराला ओळखले 
जाते.कारण कोकणाप्रमाणे इथेही काही अंशी भाताची शेती केली जाते...

जाणून घेऊया औरंगाबाद जिल्ह्यातील ' सोयगाव ' तालुक्यातील काळदरी,वेताळवाडी या दोन्ही गावांची भौगोलिक स्थिती.
सोयगाव तालुक्यातील काळदरी,वेताळवाडी हे दोन्ही तांडे अजिंठ्याच्या डोंगरकुशीत साधारणपणे पूर्ण वसले आहेत.दोन्ही तांड्यांच्या तिन्ही बाजूंनी उंच अशी डोंगरे अन् यांच्या मधोमध असलेले काळदरी,वेताळवाडी हे दोन्ही तांडे आहेत. लागून उंच उंच डोंगर असल्यामुळे कधीही डोंगराची दरड कोसळण्याची भिती असते,पावसाळ्यात ही भिती जास्तीची असते.सोबतच डोंगरात असलेलं घनदाट जंगल आणि डोंगराच्या उतराने पावसाळ्यात तिन्ही बाजूंनी येणारं पाणी,यामुळे पावसाळ्यात पुर येण्याचा धोका खूप असतो,सुदैवाने आजपर्यंत येथे दुर्घटना घडली नाही...

मात्र,अजिंठ्याच्या घाटात अधूनमधून दरड कोसळत असते,सोयगाव पासून ६० किलोमीटरवर काळदरीचा हा सोयगाव व कन्नडच्या सीमेवर वसलेला निसर्गरम्य परिसर आहे... 

'काळदरी' नावाप्रमाणेच या गावात प्रकाशापेक्षा अंधार जास्त वेळ असतो आणि याच गावाची एक खासियत,वेगळेपण आहे जे या गावात गेले की आपल्याला अनुभवयाला भेटते.ही काळदरी तिन्ही बाजूंनी भल्यामोठ्या डोंगराने वेढली आहे,पूर्व,पश्चिम व दक्षिण बाजूंनी डोंगर व हवा येण्यास उत्तर बाजूचे मोकळे रान.काळदरी गावात सूर्योदय होतो सकाळी ८ वाजता आणि सूर्यास्त होतो संध्याकाळी ४ दरम्यान,हेच या गावाचं वेगळपण आणि यामुळे येथील दैनंदीन जीवनसुद्धा हळुवार अन् वेगळे आहे...

काळदरी गावाबद्दल काही विशेष माहिती...

गावातील लोकसंख्या: एकूण १८९ पुरुष:१०३ , स्त्रिया:८७.
एकूण कुटुंब:३४.
काळदरी पासून सोयगाव तालुक्याचे अंतर: ७५ किमी.
काळदरी पासून जिल्ह्याचे अंतर: १४० किमी.
काळदरी गावचे क्षेत्रफळ: ७२६.०० हेक्टर.
काळदरी गावाला: महामार्ग,जिल्हामार्ग,राज्यमार्ग नाहीये.
बँक नाही,पोस्ट ऑफिस नाही,पिनकोड नाही,दळणवळण करण्यासाठी एसटी बसची सोय नाही.
दैनिक बाजार नाही,आठवडे बाजार नाही.
सर्वात महत्त्वाचे गावात वाचनालय नाही,वर्तमान पत्र नाही.
कुठल्याही सुख सोयी नसलेले हे गाव जगापासून अलिप्त आहे,आठ तास दिवस अन् सोळा तास रात्र असलेलं हे वेगळेपण दर्शवणारे गाव...
(काळदरी गाव जसे या जगापासून विलुप्त असल्यासारखे आहे,त्याचप्रमाणे या गावाची माहितीही अशीच विलुप्त प्रकारात मोडते.
त्यामुळे बरेच लेख वाचून,इंटरनेट माध्यमातून माहिती मिळवून या गावाची ही भौगोलिक स्थिती आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे...)

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड