मुख्य सामग्रीवर वगळा

Amazing Aurangabad..!

Amazing Aurangabad..!


#aurangabad 

शहराची नव्यानं होणारी ओळख अन् शहराचे वाटणारे आकर्षण,गेले काही वर्ष हा माझा नियमित आवडणारा विषय मग ते शहर कुठलेही असो. प्रत्येकवेळी एका नव्या नजरेतून शहर बघायला मला नेहमीच आवडते का माहित नाही औरंगाबाद शहर गेली कित्येक वर्ष बघत असुनही अजूनही मला ते मी पूर्ण बघितल्याची जाणीव माझ्या मनात निर्माण होत नाही...

ती जाणीव अपूर्ण का आहे..?

हे जवळ -जवळ प्रत्येक औरंगाबादकर आपल्याला सांगेल,एकीकडे रोज नव्याने वाढणारे हे शहर आणि एकीकडे साधारण काही वर्षांपूर्वी लहान बाळाप्रमाणे बाळसे धरणारे हे शहर यात खूप फरक आहे.

आज चहूबाजूंनी औरंगाबाद शहर झपाट्याने वाढत आहे,तसे या शहराचा विकास माझ्या मते तरी १९९६-९७  सालापासून सुरु झाला असेल.कारण मला जसे कळू लागले तसे या शहरात माझे येणे जाणे आहे तसे औरंगाबाद शहराचा व्याप अन् विकासाचा आलेख नेहमीच वाढता आहे,साहजिक आहे या आधुनिक युगात कुठल्या शहराचा व्याप वाढणार नाही.पण हा व्याप वाढूनही एक भावनिक बंध जो असतो जसा मुंबईकरांचा मुंबईशी आहे,पुणेकरांचा पुणेशी आहे अन् त्यानंतर मला दुसरे नाव सुचतच नाही Absolutely औरंगाबादकर आणि औरंगाबाद औरंगाबादकर म्हणण्यात जी फिलिंग आहेना ती काही औरच....

तुम्ही म्हणाल भावनिक बंध कसे आहे तुझे औरंगाबादशी..? कारण तू फार काळ तिथे नसतो आणि तरीही तुला इतके जवळचे का वाटते औरंगाबाद..?

भावनिक बंध यासाठी आहे की या शहराशी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी नाळ जन्म झाल्यापासून जुळली आहे अन् ती आजतागायत कायम.विमानतळ जेव्हा इतक्या जवळून बघितले,तेव्हा अनेकदा वाटायचं उतरते विमान उतरत्यावेळी कसे दिसत असेल..? त्यावेळी विमानतळवर वातावरण कसे राहत असेल..? आणि असे अनेक प्रश्न असायचे...

त्यामुळे विमानतळवर असलेल्या गेटपाशी असलेल्या चौथऱ्यावर बसून आम्ही तासनतास त्याची वाट बघत बसायचो,कित्येकदा ते पूर्णपणे दिसणार नाही माहित असूनही ते बघणं आणि ते कुतूहल आजही कायम आहे.आजही जेव्हा अवघ्या शहरावरून येणारं विमान दिसलं की,आपसूक काही क्षण ते नजरेआड जाइस्तोवर मी बघत असतो.शेंद्रा औद्योगिक वसाहतीत हवेत दिसणारे विमान बघून मला खाली नव्याने उभी होत असणारी शेंद्रा औद्योगिक वसाहत कल्पनेतच माझ्या डोळ्यांना विमानातून दिसत असते....

शहरातील वातावरण असो किंवा तेथील नागरिक प्रत्येकजण खूप जवळचा आपलासा वाटणारा मला भासत असतो.अजून एक जिव्हाळ्याचा विषय माझ्यासाठी या शहराशी आहे तो म्हणजे शहराच्या आजूबाजूने शहराच्या विकासात प्रामुख्याने येणाऱ्या विविध कंपन्याशी.जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा मी या औद्योगिक वसाहतीमध्ये पायी फिरत,प्रत्येक कंपनीतील घडघड धडधड जवळून ऐकत असतो. जवळजवळ संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्या मी बघितल्या आहे,कुठे काय काम चालते हे सर्व मला बऱ्यापैकी माहित आहे.काही दिवस येथे काम केले असल्याने अगदीच खूप जवळचे वाटते हे सर्व...

अश्या अनेक बाबी आहे ज्या या शहराशी मला जुळवून ठेवतात...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...