मुख्य सामग्रीवर वगळा

Amazing Aurangabad..!

Amazing Aurangabad..!


#aurangabad 

शहराची नव्यानं होणारी ओळख अन् शहराचे वाटणारे आकर्षण,गेले काही वर्ष हा माझा नियमित आवडणारा विषय मग ते शहर कुठलेही असो. प्रत्येकवेळी एका नव्या नजरेतून शहर बघायला मला नेहमीच आवडते का माहित नाही औरंगाबाद शहर गेली कित्येक वर्ष बघत असुनही अजूनही मला ते मी पूर्ण बघितल्याची जाणीव माझ्या मनात निर्माण होत नाही...

ती जाणीव अपूर्ण का आहे..?

हे जवळ -जवळ प्रत्येक औरंगाबादकर आपल्याला सांगेल,एकीकडे रोज नव्याने वाढणारे हे शहर आणि एकीकडे साधारण काही वर्षांपूर्वी लहान बाळाप्रमाणे बाळसे धरणारे हे शहर यात खूप फरक आहे.

आज चहूबाजूंनी औरंगाबाद शहर झपाट्याने वाढत आहे,तसे या शहराचा विकास माझ्या मते तरी १९९६-९७  सालापासून सुरु झाला असेल.कारण मला जसे कळू लागले तसे या शहरात माझे येणे जाणे आहे तसे औरंगाबाद शहराचा व्याप अन् विकासाचा आलेख नेहमीच वाढता आहे,साहजिक आहे या आधुनिक युगात कुठल्या शहराचा व्याप वाढणार नाही.पण हा व्याप वाढूनही एक भावनिक बंध जो असतो जसा मुंबईकरांचा मुंबईशी आहे,पुणेकरांचा पुणेशी आहे अन् त्यानंतर मला दुसरे नाव सुचतच नाही Absolutely औरंगाबादकर आणि औरंगाबाद औरंगाबादकर म्हणण्यात जी फिलिंग आहेना ती काही औरच....

तुम्ही म्हणाल भावनिक बंध कसे आहे तुझे औरंगाबादशी..? कारण तू फार काळ तिथे नसतो आणि तरीही तुला इतके जवळचे का वाटते औरंगाबाद..?

भावनिक बंध यासाठी आहे की या शहराशी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी नाळ जन्म झाल्यापासून जुळली आहे अन् ती आजतागायत कायम.विमानतळ जेव्हा इतक्या जवळून बघितले,तेव्हा अनेकदा वाटायचं उतरते विमान उतरत्यावेळी कसे दिसत असेल..? त्यावेळी विमानतळवर वातावरण कसे राहत असेल..? आणि असे अनेक प्रश्न असायचे...

त्यामुळे विमानतळवर असलेल्या गेटपाशी असलेल्या चौथऱ्यावर बसून आम्ही तासनतास त्याची वाट बघत बसायचो,कित्येकदा ते पूर्णपणे दिसणार नाही माहित असूनही ते बघणं आणि ते कुतूहल आजही कायम आहे.आजही जेव्हा अवघ्या शहरावरून येणारं विमान दिसलं की,आपसूक काही क्षण ते नजरेआड जाइस्तोवर मी बघत असतो.शेंद्रा औद्योगिक वसाहतीत हवेत दिसणारे विमान बघून मला खाली नव्याने उभी होत असणारी शेंद्रा औद्योगिक वसाहत कल्पनेतच माझ्या डोळ्यांना विमानातून दिसत असते....

शहरातील वातावरण असो किंवा तेथील नागरिक प्रत्येकजण खूप जवळचा आपलासा वाटणारा मला भासत असतो.अजून एक जिव्हाळ्याचा विषय माझ्यासाठी या शहराशी आहे तो म्हणजे शहराच्या आजूबाजूने शहराच्या विकासात प्रामुख्याने येणाऱ्या विविध कंपन्याशी.जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा मी या औद्योगिक वसाहतीमध्ये पायी फिरत,प्रत्येक कंपनीतील घडघड धडधड जवळून ऐकत असतो. जवळजवळ संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्या मी बघितल्या आहे,कुठे काय काम चालते हे सर्व मला बऱ्यापैकी माहित आहे.काही दिवस येथे काम केले असल्याने अगदीच खूप जवळचे वाटते हे सर्व...

अश्या अनेक बाबी आहे ज्या या शहराशी मला जुळवून ठेवतात...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड