मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..! भाग - २

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..!
लेख क्रमांक:२.
मागील लेखमध्ये मी तुम्हाला कन्नड,सोयगाव,चाळीसगाव,सिल्लोड या तालुक्यातील लेणी,किल्ले,धबधबे,अन् काही पुरातन मंदिरे यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला.आता नेमके या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर ती कशी व कुठून सुरुवात करायची ही मी माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

ही भ्रमंती करतांना आपल्याला चाळीसगाव तालुक्यात फार असे फिरावे लागत नाही,एक पाटण्या देवीचे पुरातन मंदिर सोडले तर आपल्याला फारसे त्या भागात जाण्याची आवश्यकता नाही.परंतु तुम्हाला फक्त चाळीसगाव तालुक्यातील अश्या स्थळांची भेट घ्यायची तर मात्र मग नक्कीच चाळीसगाव तालुक्याची भ्रमंती करा,कारण येथेही बऱ्यापैकी खूपकाही बघण्यासारखे आहे...
तर चला आता आपण सुरुवात करुया अजिंठा डोंगररांगा,गौताळा अभयारण्य,औट्रम घाट आणि सातमाळ डोंगररांगेतील भ्रमंतीसाठी.
सर्वप्रथम आपण सुरुवात करुया ती चाळीसगाव लगोलग असलेल्या  पाटणादेवी येथून.येथील पुरातन पाटणादेवी मंदिराचे दर्शन घेतलं की आपण डोंगरांगेतून पायवाटेने साधारण ४-५ किमी चालले की पितळखोरा येऊ शकतो.पाटणादेवी जवळच आपल्याला कान्हेरगड बघायला मिळतो याच परिसरात पुरातन काळातील शिवमंदिर आहे,पाटणादेवी आणि पितळखोरा यामध्ये असलेल्या डोंगराच्या एक बाजूस चिंध्यादेवाचा डोंगर असे म्हंटले जाते तर दुसऱ्या बाजूस गायमुखचा डोंगर असे म्हंटले जाते.
आपल्याकडे गाड्या असेल तर मात्र आपल्याला चाळीसगाव महामार्ग (एन-एज २११) औट्रमघाटने कन्नड तालुक्यात येऊन कालिकामातेचे मंदिर असलेल्या कालिमट मार्गाने पितळखोरा लेणीकडे यावे लागेल.कालिकामातेचे कालिमाट मंदिरसुद्धा खूप महत्वपूर्ण आणि अनेक मंदिराच्या विशेष कामांच्या नमुण्यांसाठी प्रसिद्ध आहे...
 याच मार्ग पुढे ८ कि.मी गेले की आपल्याला पितळखोरा लेणी बघायला भेटते.जगातील सर्वाधिक जुनी लेणी म्हणून या लेणीला ओळखले जाते,या लेणीबद्दल मी अनेक अभ्यासपर लेख यापूर्वी ब्लॉग माध्यमातून दिलेले आहे.लेणी अभ्यासकांनी नक्कीच या लेणीला भेट द्यायला हवी अशी ही लेणी आहे,या परिसराबद्दल अजून महत्वपूर्ण घटना नोंदवली गेली आहे की भारतीय गणित तज्ञ यांचा जन्म या ठिकाणी झाला आहे,शून्याचा शोधही या ठिकाणी लागला आहे.
परंतु आजही ही माहिती बऱ्यापैकी जगापासून विलुप्त असलेल्या प्रकारात मोडते...
याच मार्ग आपण आपण लेणी बघून आलात की,आपल्याला सुरपळा डोंगररांगेचे दर्शन होते.साहसी ट्रेकरसाठी ही डोंगररांग खूप छान आहे,निसर्ग सौंदर्याने नटलेले ही डोंगरांग ट्रेकिंगसाठी कन्नड वासियांच्या पसंतीस उतरते.कन्नड शहराची मूळ ओळखच आहे की टेकड्या अन् डोंगर रांगानी वेढलेले शहर,कारण कन्नड शहराच्या जवळपास चहूबाजूंनी टेकड्या अन् डोंगरांगा आहेत.

कन्नड शहर परिसरात येतांना आपण "अंबाडी प्रकल्प"सुद्धा बघू शकतो,अंधानेर येथे असलेलं पुरातन काळातील "संगमेश्वर मंदिर" आपण बघू शकतो,ज्याचे आता नव्याने डागडूजीकरन झाले आहे.कन्नड शहराजवळ अजून एक महत्वपूर्ण गाव आहे ज्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहले जाते,ते म्हणजे "मक्रणपुर" कारण "जय भीम" हा नारा (घोषणा) हा सर्वप्रथम कुठे देण्यात आला तर तो या मक्रणपुर गावात.अजुन जवळच "रेल" येथे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले "भैरवनाथ मंदिर" या रेल गावी आहे...

क्रमशः

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...