मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..! भाग - २

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..!
लेख क्रमांक:२.
मागील लेखमध्ये मी तुम्हाला कन्नड,सोयगाव,चाळीसगाव,सिल्लोड या तालुक्यातील लेणी,किल्ले,धबधबे,अन् काही पुरातन मंदिरे यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला.आता नेमके या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर ती कशी व कुठून सुरुवात करायची ही मी माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

ही भ्रमंती करतांना आपल्याला चाळीसगाव तालुक्यात फार असे फिरावे लागत नाही,एक पाटण्या देवीचे पुरातन मंदिर सोडले तर आपल्याला फारसे त्या भागात जाण्याची आवश्यकता नाही.परंतु तुम्हाला फक्त चाळीसगाव तालुक्यातील अश्या स्थळांची भेट घ्यायची तर मात्र मग नक्कीच चाळीसगाव तालुक्याची भ्रमंती करा,कारण येथेही बऱ्यापैकी खूपकाही बघण्यासारखे आहे...
तर चला आता आपण सुरुवात करुया अजिंठा डोंगररांगा,गौताळा अभयारण्य,औट्रम घाट आणि सातमाळ डोंगररांगेतील भ्रमंतीसाठी.
सर्वप्रथम आपण सुरुवात करुया ती चाळीसगाव लगोलग असलेल्या  पाटणादेवी येथून.येथील पुरातन पाटणादेवी मंदिराचे दर्शन घेतलं की आपण डोंगरांगेतून पायवाटेने साधारण ४-५ किमी चालले की पितळखोरा येऊ शकतो.पाटणादेवी जवळच आपल्याला कान्हेरगड बघायला मिळतो याच परिसरात पुरातन काळातील शिवमंदिर आहे,पाटणादेवी आणि पितळखोरा यामध्ये असलेल्या डोंगराच्या एक बाजूस चिंध्यादेवाचा डोंगर असे म्हंटले जाते तर दुसऱ्या बाजूस गायमुखचा डोंगर असे म्हंटले जाते.
आपल्याकडे गाड्या असेल तर मात्र आपल्याला चाळीसगाव महामार्ग (एन-एज २११) औट्रमघाटने कन्नड तालुक्यात येऊन कालिकामातेचे मंदिर असलेल्या कालिमट मार्गाने पितळखोरा लेणीकडे यावे लागेल.कालिकामातेचे कालिमाट मंदिरसुद्धा खूप महत्वपूर्ण आणि अनेक मंदिराच्या विशेष कामांच्या नमुण्यांसाठी प्रसिद्ध आहे...
 याच मार्ग पुढे ८ कि.मी गेले की आपल्याला पितळखोरा लेणी बघायला भेटते.जगातील सर्वाधिक जुनी लेणी म्हणून या लेणीला ओळखले जाते,या लेणीबद्दल मी अनेक अभ्यासपर लेख यापूर्वी ब्लॉग माध्यमातून दिलेले आहे.लेणी अभ्यासकांनी नक्कीच या लेणीला भेट द्यायला हवी अशी ही लेणी आहे,या परिसराबद्दल अजून महत्वपूर्ण घटना नोंदवली गेली आहे की भारतीय गणित तज्ञ यांचा जन्म या ठिकाणी झाला आहे,शून्याचा शोधही या ठिकाणी लागला आहे.
परंतु आजही ही माहिती बऱ्यापैकी जगापासून विलुप्त असलेल्या प्रकारात मोडते...
याच मार्ग आपण आपण लेणी बघून आलात की,आपल्याला सुरपळा डोंगररांगेचे दर्शन होते.साहसी ट्रेकरसाठी ही डोंगररांग खूप छान आहे,निसर्ग सौंदर्याने नटलेले ही डोंगरांग ट्रेकिंगसाठी कन्नड वासियांच्या पसंतीस उतरते.कन्नड शहराची मूळ ओळखच आहे की टेकड्या अन् डोंगर रांगानी वेढलेले शहर,कारण कन्नड शहराच्या जवळपास चहूबाजूंनी टेकड्या अन् डोंगरांगा आहेत.

कन्नड शहर परिसरात येतांना आपण "अंबाडी प्रकल्प"सुद्धा बघू शकतो,अंधानेर येथे असलेलं पुरातन काळातील "संगमेश्वर मंदिर" आपण बघू शकतो,ज्याचे आता नव्याने डागडूजीकरन झाले आहे.कन्नड शहराजवळ अजून एक महत्वपूर्ण गाव आहे ज्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहले जाते,ते म्हणजे "मक्रणपुर" कारण "जय भीम" हा नारा (घोषणा) हा सर्वप्रथम कुठे देण्यात आला तर तो या मक्रणपुर गावात.अजुन जवळच "रेल" येथे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले "भैरवनाथ मंदिर" या रेल गावी आहे...

क्रमशः

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड