मुख्य सामग्रीवर वगळा

भोकाड वस्ती जगण्याला आधार..!

भोकाड वस्ती जगण्याला आधार..!


भोकाड वस्ती जगण्याला आधार झाल्या अन् त्यांच्याबद्दल आपसूकच मनात आपलेपणाचा भाव निर्माण झाला.
आयुष्यात का..? कश्याला..? या गोष्टींना कधीच महत्त्व नव्हतं.

जिथे,ज्या गोष्टींच्या सानिध्यात मला आपलेपण,आपुलकी वाटत होती तिथे माझे सुत जुळले. बाकी क्षणभरचा विसावा देणाऱ्या वस्ती असो किंवा माणसे आयुष्यात खूप आली,गेली त्यांनी,त्यांच्याशी माझं जपून ठेवलेलं आपलेपण कायम आहे.

भोकाड वस्ती अनेकांना नकोशी वाटते पण मला माझ्यातला मी तिथं नव्यानं भेटत असतो.आयुष्यात काय हवं आहे,काय नको आहे हे प्रश्न जेव्हा सुटत नाही त्यावेळी आपसूकच पावलं इकडे वळतात अन् काहीतरी निर्णय घ्यायला मी समर्थ ठरतो...

निर्णय कितपत योग्य ठरणार आहे किंवा कितपत योग्य आहे,याला उत्तरंही नाही अन् त्याचा विचारही नाही...

भोकाड वस्तीत काळाबरोबर राहिलेली माणसे कायम सोबत असतात,त्यांचे आयुष्यातील अनुभव अन् जगण्याची रीत मला आयुष्यात जगायला शिकवते...
फार काही हाती लागणार नाहीये माहीत असूनही,मी कधी विचार केला नाही की आपला फायदा कितपत आहे.आयुष्याची काही गणितं आपण सोडवायची नसतात,वेळेनुसार ती आपोआप सुटतात फक्त आपण कारण ठरत असतो,जसं थोरोला त्याचं आयुष्य जगण्याचे सूत्र कळले तसे आपल्याला सुद्धा कळेल...

परंतु फक्त कळून चुकनार नाहीये,आयुष्यात त्या कळण्याप्रमाणे आपण कितीपत Move on करतो हे महत्त्वाचे ठरते...
आता नेमकी तीच वेळ आहे की,आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टीत आपल्याला सुख मिळत आहे अन् ते कळूनही आपण ते नाकारत फक्त आयुष्य जगायला काही गोष्टींची आवश्यकता असते म्हणून आपण त्या गोष्टीमागे धावत असतो हे विचार करायला लावणारं आहे.
अन् अन् मग इथेच सर्व गफलत होवून बसते मग आयुष्यभर न जगण्याचं गणित जुळते ना आपलं आयुष्य आपल्यासाठी जगण्याचे गणित जुळते...

असो काही गोष्टी हातच्या नसतील इतपत खरं आहे,पण काही हातचे असूनही आपण नाही करू शकत हेही तितकच खरं आहे..!

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...