मुख्य सामग्रीवर वगळा

भोकाड वस्ती जगण्याला आधार..!

भोकाड वस्ती जगण्याला आधार..!


भोकाड वस्ती जगण्याला आधार झाल्या अन् त्यांच्याबद्दल आपसूकच मनात आपलेपणाचा भाव निर्माण झाला.
आयुष्यात का..? कश्याला..? या गोष्टींना कधीच महत्त्व नव्हतं.

जिथे,ज्या गोष्टींच्या सानिध्यात मला आपलेपण,आपुलकी वाटत होती तिथे माझे सुत जुळले. बाकी क्षणभरचा विसावा देणाऱ्या वस्ती असो किंवा माणसे आयुष्यात खूप आली,गेली त्यांनी,त्यांच्याशी माझं जपून ठेवलेलं आपलेपण कायम आहे.

भोकाड वस्ती अनेकांना नकोशी वाटते पण मला माझ्यातला मी तिथं नव्यानं भेटत असतो.आयुष्यात काय हवं आहे,काय नको आहे हे प्रश्न जेव्हा सुटत नाही त्यावेळी आपसूकच पावलं इकडे वळतात अन् काहीतरी निर्णय घ्यायला मी समर्थ ठरतो...

निर्णय कितपत योग्य ठरणार आहे किंवा कितपत योग्य आहे,याला उत्तरंही नाही अन् त्याचा विचारही नाही...

भोकाड वस्तीत काळाबरोबर राहिलेली माणसे कायम सोबत असतात,त्यांचे आयुष्यातील अनुभव अन् जगण्याची रीत मला आयुष्यात जगायला शिकवते...
फार काही हाती लागणार नाहीये माहीत असूनही,मी कधी विचार केला नाही की आपला फायदा कितपत आहे.आयुष्याची काही गणितं आपण सोडवायची नसतात,वेळेनुसार ती आपोआप सुटतात फक्त आपण कारण ठरत असतो,जसं थोरोला त्याचं आयुष्य जगण्याचे सूत्र कळले तसे आपल्याला सुद्धा कळेल...

परंतु फक्त कळून चुकनार नाहीये,आयुष्यात त्या कळण्याप्रमाणे आपण कितीपत Move on करतो हे महत्त्वाचे ठरते...
आता नेमकी तीच वेळ आहे की,आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टीत आपल्याला सुख मिळत आहे अन् ते कळूनही आपण ते नाकारत फक्त आयुष्य जगायला काही गोष्टींची आवश्यकता असते म्हणून आपण त्या गोष्टीमागे धावत असतो हे विचार करायला लावणारं आहे.
अन् अन् मग इथेच सर्व गफलत होवून बसते मग आयुष्यभर न जगण्याचं गणित जुळते ना आपलं आयुष्य आपल्यासाठी जगण्याचे गणित जुळते...

असो काही गोष्टी हातच्या नसतील इतपत खरं आहे,पण काही हातचे असूनही आपण नाही करू शकत हेही तितकच खरं आहे..!

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...