मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्याची गणितं..!

आयुष्याची गणितं..! पहाटेच्या कुडकुडणाऱ्या थंडीचा प्रवास दुपारच्या सुमारास,साधारण बाराच्या ठोक्याला रांनवाटेला अनवाणी पायांना तापलेल्या मातीच्या फुफाट्यात सावलीच्या आधाराने पावलांना सावरत-सावरत चालत राहायचं... सावलीत पावलांना सावरणे असतेच,पण नशीबाला आलेला कडक उन्हाचा पारा काही आयुष्यभर सोबत न सोडणारा असतो.उपरण्याने जितकं होईल तितकं सावरत जिथवर उन्हाच्या झळाया डोळ्यांना दिसतात,तिथवर सीमा ठरवून चालतं व्हायचं,कश्यासाठी चालतो आहे माहीत नाही किंवा याला उत्तरही शोधायचं नसतं... एका अंगाला परतीच्या वाटेचा खापरीचा रस्ता दिसतो,अर्धवट वाहत्या पाण्याने भरलेला,गुळगुळीत झालेल्या दगड धोंड्यांचा  नितळ,पारदर्शी वाहत्या पाण्याचा चेहऱ्यावर ते थंडगार पाणी घेऊन बकर्याच्या खुरांनी रस्त्याची मोकळी झालेली मुतरट वासाची मातड,मातीचा फुफाटी चेहऱ्यावर अनुभवायला येते. ती खसाखसा हातानी घासून धुवून टाकायची नायतर,रात्रीची झोप ती येऊन देत नाय अन् सारे गाल टराटर उलून अंगाला झोंबायला लागते ... एकूण हिवाळ्याच्या दिवसात हा गाव रहाटीचा जगण्याचा तोरा काही अलगच आहे,असतो.साल दर साल परसाकडच्या मुंज्याला बोनं द्या

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..! खिडकी पल्ल्याड असलेल्या जगाला अलिकडे कित्येकदा निरखून बघत असतो.जसं मन अस्तित्वाच्या शोधार्थ भटकंती करायला लागलं आहे तसे हे खिडकी पल्ल्याड असलेलं जग खिडकीतून न्याहाळत असताना मला छान वाटायला लागलं आहे..! कुणाच्या आयुष्यात खूप सर्व उजेड असल्यानं त्याचं आयुष्य खूप सुखाचे क्षण देऊ करणारं किवा प्रकाशमान झालेलं मला भासू लागलं आहे. सोबतच अनेकांच्या आयुष्यात ठरलेला तो कायमचा अंधार आणि काळोखात माखलेले त्यांचे आयुष्य बघितलं की,आयुष्याला घेऊन आपण उगाच अनेक नको त्या अपेक्षा करत बसतो याची प्रचिती होते..! अलीकडे खिडकीत बसून अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकाग्र चित्ताने बसलं की आपोआपच सुटतात,त्यामुळं हे विंडोग्रीलच्या आधाराला बसून बाहेरचं जग न्याहाळणे आवडायला लागले आहे मला हल्ली..! खूपवेळा विंडोग्रीलच्या आधाराला बसून असले की,अश्या काळोखाच्या रात्री स्ट्रीटलाईटच्या उजेडाखाली आयुष्य जगणारी माणसं मला खूप आवडतात.ते त्यांचे जीवन एका स्वतंत्र आयुष्यात जगत असतात,स्वतंत्र म्हणजे असे एकाच वेळी दोन आयुष्य,एक दाखवण्याचं अन् एक त्यांच्या विचारात विचार करत आपल्याच कोशा

आयुष्य आणि क्युबिकल..!

आयुष्य आणि क्युबिकल..! पावसाच्या अधूनमधून रिमझीम सरी कोसळत आहे,शहरावर धुक्यांची शाल पांघरली गेली आहे,संपूर्ण शहर धुकमय झालं आहे,आकाशातील ढगांना हात लावून अनुभवता येतंय,सोबतीला गुलाबी थंडीचा गारवाही अनुभवतोय यातच माझ्या नशिबाने मला मिळालेलं आसपासच्या हाकेच्या अंतरावर मिळालेलं निसर्ग सौंदर्य जे डोळ्यात कित्येकवेळा साठवूनही माझी भूक क्षमली नाहीये..! कुणाला कसली भूक असते तर कुणाला कसली आमचा बाबतीत आम्हाला अश्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनसोक्त जगायला हवं असतं,बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा हे जग अनुभवलं..! मी नेहमीच म्हणत असतो,शहराच्या चकमकीच्या फ्लेक्सच्या दुनियेत, ऑफिसच्या क्युबिकल्समध्ये आपण आपलं जगणं बंदिस्त करून घेतलं आहे.खरच आपण निसर्गाशी संवाद साधायला अन् त्याच्याशी एकरूप व्हायला विसरलो आहे..! आपला प्रवास कधीचाच उलट्या दिशेने सुरू व्हायला हवा होता पण अजूनही कुणीतरी दुसरा तिसरा व्यक्ती शहर की और चलो..! चा नारा देतो आणि आपल्या गावाच्या प्रती,निसर्गाच्या प्रती जाग्या झालेल्या जाणिवा जाग्या होण्या आधीच मारून टाकतो आहे..! व्यवहार कुणाला चुकत नाही ते आपल्यालाही चुकणार ना

Mindset..!

Mindset..! गेले काही दिवस एक अनामिक हुरहूर लागून असते,आयुष्याच्या किंवा वयाच्या या टप्प्यावर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत असेल असेही वाटून जाते आहे.इथून पुढे मी जे काही पोस्टमध्ये लिहणार आहे,त्या बाबतीत अलीकडे मी खूप विचार केला अन् आज नकळत अस्वस्थाच्या दाटलेल्या वेळी हे लिहायला घेतले..! आयुष्यात आपल्याला काय हवं आहे..? आणि काय नको आहे..? याची वजाबाकी,बेरीज आपण आयुष्यभर जगत असताना करत असतो.आपलं संपूर्ण आयुष्य भटकंती करत,आपल्याला अपेक्षित जे काही क्षण आहे ते मिळवण्यासठी आयुष्यभर आपण वणवण करत असतो.जन्म ते मृत्यू या रोलर कॉस्टरमधील अदभुत अनुभव देणाऱ्या प्रवासातील अनेक वळणांच्या या रस्त्यावर हे सर्व क्षण आपल्याला अनुभवता येत असतं..! या प्रवासात अनेक वळणं येतात,अनेकदा आपण कोलमडून जातो तर अनेकदा आपण इतक्या एका उंचीच्या ठिकाणी जावून पोहचतो की,काहीही करायचे असते अश्यावेळी तो इतरांचे काय हा इतरवेळी पहिले येणारा विचार आपल्या मनात अश्यावेळी येत नाही.तो आपण करायला सोडून देतो (माझ्याबाबतीत असं होवू शकत नाही)... तर गेली दोन वर्ष आयुष्यातील अस्वस्थतेचा काळ अनुभवतो आहे,म्हणजे यातील तिसरी अवस्थ

एक अनोखं विश्व..!

एक अनोखं विश्व..! एक अनोखं विश्र्व..! जोवर ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होत नाही तोवर आपण ठरवून काहीही केलेलं ठीक होत नसते किंवा कुठल्याही त्या गोष्टीसाठी जी आपल्याला करायची असूनही,तूर्तच करायची नसते तरीही आपण करत असतो ती कधीतरी पूर्णत्वाकडे किंवा पूर्णही होते पण मनातून ती गोष्ट करायची नसते,तेव्हा त्या पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी आपल्याला कुठलही सोयरसुतक नसते..! आपण अनेकदा चालता बोलता म्हणून जातो की मनाच्या विरोधात जावून खूप काही आपण करू शकतो किंवा करायला हवं पण जेव्हा मनाच्या विरोधात जावून आपण काही गोष्टी करत असतो अन् त्यात जरी आपल्याला यश मिळत असेल,तरीही मनाला हवं असलेलं समाधान त्यातून आपल्याला भेटत नसते..! अगदी आपण ठरवूनही किंवा मनाला कित्येकवेळा मारून त्याच्या विरोधात जावून कुठल्याही गोष्टी केल्या ज्या आपल्याला किंवा आपल्या स्वभावाला योग्य वाटत असल्या तरीही मनाला त्या पटत नसेल तर मानसिक समाधान आपल्याला मिळत नाही.हळूहळू अश्या गोष्टींचा किंवा मनाला समाधान भेटणार आहे,अश्या गोष्टी नाही भेटल्या की आपण आपोआपच मानसिक तणावात जातो अन् मानसिक आजाराचे निदान आपल्याला होते.यासाठी आपल्य