मुख्य सामग्रीवर वगळा

Mindset..!

Mindset..!

गेले काही दिवस एक अनामिक हुरहूर लागून असते,आयुष्याच्या किंवा वयाच्या या टप्प्यावर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत असेल असेही वाटून जाते आहे.इथून पुढे मी जे काही पोस्टमध्ये लिहणार आहे,त्या बाबतीत अलीकडे मी खूप विचार केला अन् आज नकळत अस्वस्थाच्या दाटलेल्या वेळी हे लिहायला घेतले..!

आयुष्यात आपल्याला काय हवं आहे..? आणि काय नको आहे..? याची वजाबाकी,बेरीज आपण आयुष्यभर जगत असताना करत असतो.आपलं संपूर्ण आयुष्य भटकंती करत,आपल्याला अपेक्षित जे काही क्षण आहे ते मिळवण्यासठी आयुष्यभर आपण वणवण करत असतो.जन्म ते मृत्यू या रोलर कॉस्टरमधील अदभुत अनुभव देणाऱ्या प्रवासातील अनेक वळणांच्या या रस्त्यावर हे सर्व क्षण आपल्याला अनुभवता येत असतं..!

या प्रवासात अनेक वळणं येतात,अनेकदा आपण कोलमडून जातो तर अनेकदा आपण इतक्या एका उंचीच्या ठिकाणी जावून पोहचतो की,काहीही करायचे असते अश्यावेळी तो इतरांचे काय हा इतरवेळी पहिले येणारा विचार आपल्या मनात अश्यावेळी येत नाही.तो आपण करायला सोडून देतो (माझ्याबाबतीत असं होवू शकत नाही)...

तर गेली दोन वर्ष आयुष्यातील अस्वस्थतेचा काळ अनुभवतो आहे,म्हणजे यातील तिसरी अवस्था अनुभवतो आहे.ज्यात माणसांची अवस्था ही पूर्णपणे घड्याळातील दोलकाप्रमाणे  झालेली असते.
तारुण्य,तारुण्यातील या प्रवासात सर करायला हवे आहे असे काही माईल स्टोन प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.यातील अनेक सर केलेले आहेत आणि अनेक खूप टफ आहेत सर करण्यासाठी,अलिकडच्या काळात ते सर करतांना होणारी माझी वाईट अवस्था बघितली की माझी वेळोवेळी होणारी,झालेली अवस्था असते ती खूप वाईट आहे..!

मान्य आहे वेळ थांबली आहे..!
होय वेळ कुणासाठी थांबत नाही परंतु गेले दोन वर्ष माझ्यासाठी ती थांबली आहे..!
आयुष्याचं गणित जुळवता जुळवता आयुष्याची बसलेली घडी विस्कटायला नको इतपत अलिकडे मनाची अस्वस्थता वाढली आहे,इतपत आयुष्यात वेळ थांबली आहे...!

अस्वस्थतेेचे हे बोल अनेकदा अनेकांना बोलायला नको वाटतात पण माझ्यासाठी (कारण,हा प्रवास माझा आहे.) क्षण बोलण्यातून,लेखणीतून ते व्यक्त करणं हे मला या काळात नॉर्मल राहण्यासाठी मदत करते,म्हणून वेळोवळी हे असं लेखणीतून मोकळं होत असतो..!

अलिकडे आवड म्हणून काही गोष्टी जवळ केल्या अन् त्यात आलेलं यश आयुष्याच्या या टप्प्यावर सर करायला हवे असणारे जे माईलस्टोन आहे,त्यांना अलिकडे हुलकावण्या देत आहे असे वाटून जात आहे.

इथे या माझ्या दुसऱ्या विश्वात,अलिकडे मला खूप सेफ वाटते आहे.कारण इथे कुणाशी तशी स्पर्धा नाही किंवा "स्पर्धा" हा शब्दच या दुनियेत नाही.त्यामुळं इथे अलिकडे मन रमायला लागलं आहे येथील माणसांचा सहवास हवाहवासा वाटू लागला आहे..!

अनेक क्षेत्रांमध्ये आपलं नाव असलेली उंचीचे व्यक्तिमत्व इथे जोडल्या गेली,त्यांचा वेळोवेळी संवादातून त्यांच्या लेखणीतून मैत्रीची ही बाग दिवसेंदिवस फुलत गेली,वाढत गेली.त्यांच्याकडून खऱ्याखुर्या माझ्या रोलरकॉस्टरच्या वळणावळणाच्या प्रवासात खूप मार्गदर्शन मिळत गेलं,जे खूप हवेहवेसे वाटले.त्यांचा सहवास हवहवासा वाटला..!

मी ज्या वाटेवरून यापूर्वी चाललो त्या वाटेवरून या वाटेवर येतानाच अन् आता काही सुखद क्षण देऊन जाणारे अनुभव गाठीला येऊ लागले आहे,तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकतंय,काहीतरी राहून जातंय याची जाणीव होते अन् ती अलिकडे अस्वस्थ करायला लागली आहे मला..!
 
त्यामुळे हा प्रवास थोडा गांभीर्याने घेतो आहे,म्हणजे होतं असं की मला या आयुष्यात आलेल्या व्यक्तींना गमवायचे नाहीये.कारण नंतर मग सर्व मिळवूनही ते नसतील तर उभी हयात जाईल पण त्या व्यक्ती पुन्हा भेटणार नाही अन् भेटल्या तर एक ती अढी त्यांच्या मनात काय माझ्याविषय त्यांच्या मनात राहून जाईल...

म्हणून थोडे सावरत हा प्रवास करतोय,अलिकडे या गणिताला अजून सोप्पं करून टाकलं आहे की स्पर्धेच्या युगात आपल्याला जे माईलस्टोन गाठायचे आहे त्यांना वेळ असताच लवकर गाठण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे..!

"आयुष्यात सर्व बाबतीत सेट होणे" या थांब्यावर काही दिवस आपला प्रवास थांबवायचा पण या दोन्हींमध्ये जे अंतर आहे त्यात मी टिकतो कितपत हे खूप महत्त्वाचं आहे अन् अलिकडे त्यात स्पर्धा,माझ्या या विश्वातील माणसांना सोबत घेऊन चालणे हे थोडं अवघड होवू लागलं आहे..!

बघू काय होतं,उद्देश प्रामाणिक आहे पण काय होईल ते सांगता येत नाहीये...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...