सुरुवात करण्या आधीच काय लिहु ? व कोणत्या विषयवार लिहु ? याबद्दल काही सुचत नसल्यामुळे दोन-तीन शब्द टाइप करून पुन्हा डिलीट करतोय,पुन्हा लिहितोय,पण आज लिहायचे आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काहीतरी म्हणुन हा प्रयत्न... माझ्यासाठी २०१९ हे वर्ष शैक्षणिक,समाजिक,आर्थिक,नोकरी,लेखन,इत्यादींसाठी कसे होते ? हा प्रश्न पडला त्याला उत्तर म्हणुन हा एक प्रयत्न... हे वर्ष खरतर प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देणारे ठरले.जग झपाट्याने कसे बदलत आहे,माणसे कसे बदलत आहे,कोण चांगले कोण वाईट हे ओळखण्यासाठीचे काही प्रमाणात यावर्षी मला अनुभव आले.... प्रत्येक गोष्टींसाठी वाढलेली स्पर्धा,मेहनत घेण्याची आपल्यात असलेली कुवत व सर्वात महत्त्वाचे आपल्यातील अंतर्गत कौशल्य,राहणे,बोलणे,इतरांसमोर आपण स्वताला नकली मुखवटा न घालता कसे present करायचे हे ज्ञान यावर्षी भेटले.मग ते शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,कुठल्याही क्षेत्रातून असो.... शिक्षण:माझ्यासाठी शैक्षणिक बाबतीत सांगायचे झाले तर हे वर्ष माझ्यासाठी सर्वात यशस्वी वर्ष आता पर्यंतचे होते. CET देऊन मी MBA सारख्या शिक्षणासाठी मी प्रवेश मिळवला,जे की माझं स्वप
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!