मुख्य सामग्रीवर वगळा

परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

शनिवारच्या संच्याला शहरातून परीक्षा देऊन गावाला आलो,रैवारची सुट्टी असल्यामुळे अन् शतात बरचसं काम करायचं बाकी असल्यामुळे घरच्याला आलो....

अंगात ताव आला होता,सततचा झालेला प्रवास सकाळच्याला अंगाला झोंबणारा वारा,फकस्त नाकातून रगत येण्याचं बाकी ठेवत हुता,अंगात हुडहुडी भरली हुती....

आलो तस पलंगावर जाऊन पडलो,तेच सकाळच्याला उठलो.पारावर जाऊन यरंडाणा दात घासले,मग कुठं जीवाला शांतता मिळाली....

गरम बकरीचा दुधाचा गिल्लासभर चहा त्यात दोन बटर कोंबून चमच्याने खाता झालो,मायना चुलीवर मेथीची भाजी अन् भाकर केली. पेंडक्यात गुंडाळून,कडीच्या डब्ब्यात भाजी घेऊन मी अन् माय फावड घेऊन,वावरात जायला बिगी बीगी निघालो....

सकाळची लहीन आली हुती मोटार चालू करून, गव्हाला पाणी भरत बसलो हुतो.माय बांधावरल गवत खुरपत बसली हुती....

जसजसं ओला हुत हुतो,तसतसा अंगात ताव यत हूता,पाय जड पडत हुते,पोटर्या गरम हूत हुत्या, अन् डोक्याला धस्का घ्यावा वाटत हुतं. दुपारच्याला भाकर खाऊन,पाणी भरल अन् सानच्याला जरा लवकरच घरला आलो.....

मातीच्या कोरड्या पायाला घेऊनच फरशीवर लोळत पडलो हूतो,मग मायना गरम पाणी हातपाय द्युयाला काढून दिलं,हातपाय धुतले.चुली जवळ जाऊन बसलो शखा समोर जरा आराम वाटत हुतं,सांच्याला बेसन भाकर खाले....

उपरण्यानाने डोक्याला बांधून,नाकाला.छातीला झंडू बाम लाऊन अंगावर गोधडी घेऊन जे झोपलो तेच सकाळच्याला उठलो.माय थकली असल्यामुळे चुलीवर पाणी ठून,दात घासत बसलो,अंघोळ करून तयार झालो.....

बापानं आयुष्भर पाईपाई जमा करून घेऊन दिलेल्या गाडीला पुसल,बूट सोक्स,कॉलेजचं दप्तर,हेल्मेट घेऊन मायला सांगून,मोरच कावड लाऊन पुन्हा शहराला गेलो.....

आज शेवटचा प्पेपर दय्याएला आलो हुतो,नव्हतं कुठल गाईड,नव्हतं कूठल काही.भर रस्त्याने विचार करत होतो काय लिहावं पेपरात? काय यनार पेपरात?

पेपर हुता IT FOR MANAGER चा,आयुष्याचा मॅनेजर रोजच काहीतरी नवीन शिकवत हूता,मग  काय गरज या कागदाची,पण माणसं पेक्षा या कागदाला हल्ली ज्यादा महत्त्व द्यायला लागला होता माणूस आता....

#परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

लिखित: भारत सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औंरगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...