मुख्य सामग्रीवर वगळा

परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

शनिवारच्या संच्याला शहरातून परीक्षा देऊन गावाला आलो,रैवारची सुट्टी असल्यामुळे अन् शतात बरचसं काम करायचं बाकी असल्यामुळे घरच्याला आलो....

अंगात ताव आला होता,सततचा झालेला प्रवास सकाळच्याला अंगाला झोंबणारा वारा,फकस्त नाकातून रगत येण्याचं बाकी ठेवत हुता,अंगात हुडहुडी भरली हुती....

आलो तस पलंगावर जाऊन पडलो,तेच सकाळच्याला उठलो.पारावर जाऊन यरंडाणा दात घासले,मग कुठं जीवाला शांतता मिळाली....

गरम बकरीचा दुधाचा गिल्लासभर चहा त्यात दोन बटर कोंबून चमच्याने खाता झालो,मायना चुलीवर मेथीची भाजी अन् भाकर केली. पेंडक्यात गुंडाळून,कडीच्या डब्ब्यात भाजी घेऊन मी अन् माय फावड घेऊन,वावरात जायला बिगी बीगी निघालो....

सकाळची लहीन आली हुती मोटार चालू करून, गव्हाला पाणी भरत बसलो हुतो.माय बांधावरल गवत खुरपत बसली हुती....

जसजसं ओला हुत हुतो,तसतसा अंगात ताव यत हूता,पाय जड पडत हुते,पोटर्या गरम हूत हुत्या, अन् डोक्याला धस्का घ्यावा वाटत हुतं. दुपारच्याला भाकर खाऊन,पाणी भरल अन् सानच्याला जरा लवकरच घरला आलो.....

मातीच्या कोरड्या पायाला घेऊनच फरशीवर लोळत पडलो हूतो,मग मायना गरम पाणी हातपाय द्युयाला काढून दिलं,हातपाय धुतले.चुली जवळ जाऊन बसलो शखा समोर जरा आराम वाटत हुतं,सांच्याला बेसन भाकर खाले....

उपरण्यानाने डोक्याला बांधून,नाकाला.छातीला झंडू बाम लाऊन अंगावर गोधडी घेऊन जे झोपलो तेच सकाळच्याला उठलो.माय थकली असल्यामुळे चुलीवर पाणी ठून,दात घासत बसलो,अंघोळ करून तयार झालो.....

बापानं आयुष्भर पाईपाई जमा करून घेऊन दिलेल्या गाडीला पुसल,बूट सोक्स,कॉलेजचं दप्तर,हेल्मेट घेऊन मायला सांगून,मोरच कावड लाऊन पुन्हा शहराला गेलो.....

आज शेवटचा प्पेपर दय्याएला आलो हुतो,नव्हतं कुठल गाईड,नव्हतं कूठल काही.भर रस्त्याने विचार करत होतो काय लिहावं पेपरात? काय यनार पेपरात?

पेपर हुता IT FOR MANAGER चा,आयुष्याचा मॅनेजर रोजच काहीतरी नवीन शिकवत हूता,मग  काय गरज या कागदाची,पण माणसं पेक्षा या कागदाला हल्ली ज्यादा महत्त्व द्यायला लागला होता माणूस आता....

#परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

लिखित: भारत सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औंरगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ