मुख्य सामग्रीवर वगळा

संवादावाचुन_अनुत्तरित_राहीलेली_भेट

कधी कधी मला काय होते कुणास ठाउक मी असं वेगळं काही दृश्य बघितले,की माझ्या आतला तो लेखक जागा होतो.....
त्याच क्षणाला असे वाटत असते की या क्षणाला टिपून टाकावं पानावर, म्हणजे ते लिखित स्वरूपात तरी माझ्याकडे आठवणीत राहतील. कधी कधी ती डायरीचे पान पलटी केली तर येईल ते पानही समोर अन् ती आठवणही.....
तर तो दिवस नेहमी सारखाच भासत होता,मी पण  आवरले अन् परिक्षा असलेल्या ठिकाणी वेळेच्या एक तास आधीच जाऊन तिथं उपस्थित होतो.....
म्हणजे माझी ही सवय आहे,की मी कुठंही ठरवून दिलेल्या वेळेच्या कमीत कमी ३०मिनिटे आधी जातो मग काम कोणतेही असो कुणाला भेटणे असो,केव्हा कामा निमित्त असो पण दिलेली वेळ पाळायला मला आवडते.....
नेहमीप्रमाणेच मी तिथे पोचलो,मग पुन्हा एकदा पाठांतर म्हणून मोबाईल मध्ये असलेली पीडीएफ फाईल मी वाचत बसलो होतो.परीक्षेचे टेन्शन होतेच,सवयी प्रमाणे परिसर न्याहाळत होतो.....
समोर इंजिनिअरिंगचे कॉलेज असल्यामुळे अनेक मुलं मुली ये-जा करत होत्या,परीक्षसाठी साठी येणारे मुलंही हळू हळू येत होती. मी झाडाला केलेल्या त्या छोटेखानी भिंती वर बसून वाचत होतो.....
कुणी हातात चहाचा कप घेऊन चाले होते,कुणी मोबाईल मध्ये काड्या करत चाले होते,कुणी चमच्याने पोहे खात चाले होते,कुणी चहा टोस्ट खात चाले होते,एकूण ही इंजिनिअरींगचे मुल- मुली फार व्यस्त भासत होते.....
माझेही माझा वाचनाकडे लक्ष होते,तितक्यात मला एक मुलगा मुलगी दिसले.त्यांना बघून वाटले लिहून टाकावे काही तरी यांच्या बद्दल डायरीत,म्हणजे त्यांच्या बद्दल मला प्रश्नच भरपूर पडले ज्यांना नेहमी प्रमाणे उत्तरे नव्हती.....
तर झाले असे की तो साधारण बाविशितला तरुण अन् ही साधारण वीस एकवीस वर्षाची तरुण मुलगी असेल.तो सुद्धा परीक्षेला आलेला होता असे मला वाटत होते,तो माझा आधी इथे येऊन बसला होता.....
काही वेळानी ती तरुण मुलगी आली त्याच्या जवळ बसली,हा साधारण गरीब साधा काहीतरी टेन्शन मध्ये भासत होता. तिनं सोबत आणलेल्या पिशवीतून प्लॅस्टिकचा डब्बा काढला ज्यात पोहे होते अन् एक चमचा होता,तिने तो डब्बा त्याला दिला अन् तो चमचा बाजूला ठेऊन,हातानेच एखाद्या खुप भुक लागलेल्या मुलासारखे त्या डब्यावर तुटून पडला.....
ती फक्त त्याला बघत राहिली तिच्या चेहऱ्यावर समाधान झाल्याचे भाव दिसत होते.ती या कॉलेजची वाटत नव्हती कारण ती आली तेव्हा  साधारण सिंपल नाईट ड्रेस अन पारोशी आलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते सुख बघण्यात जो आनंद होता तो शब्दात व्यक्त नाही करू शकत......
त्याने डब्बा संपवला अन् तो तिच्याशी साधारण पाच मिनिट काहीतरी गप्पा मारत बसला.तिच्या राहणीमाना वरून ती सुशिक्षित घरण्यातली वाटत होती, मग बोलणं झाल्यावर त्याने तिला सेल्फी फोटोसाठी विचारल तिने होकार दिला.दोघांनी सेल्फी घेतला मी बघत होतो यात ती मात्र खुश होती,मग अखेर याने तिचा निरोप घेतला,तिने डबा बॅग मध्ये ठेऊन त्याला बाय केला......
तो पुढे म्हणजे माझा दिशेने फार पुढे निघून गेला, पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त त्रास,काही तरी चुकल्याचे भाव दिसत होते.मागून तिने आवाजही दिला पण याने तिला हवा तसा रिप्लाय ही दिला नाही.ती मात्र याला नजेसमोरून जास्तोवर बघत राहिली,नंतर तो पण कुठे गेला समजले नाही.....
मग ती पण काही वेळ तिथे थांबून तेथून निघून गेली,आता मात्र तिचा चेहरा खुप काही गमावल्यारखा भासू लागला होता.ती कॅन्टीन जवळ आली काही वेळ तिथे थांबली,माझा मनात ही विचार येऊन गेला तिला विचारपूस करावी.....
पण विषय नव्हता अन् काय विचारणार हा प्रश्न होता,तिलाही हीच अपेक्षा होती की काय असे काही क्षण मला वाटले.कारण तिने मला त्यांच्याकडे बघताना खुप वेळा बघितले,पण तिने तो जोवर होता ते लक्षात येऊ दिले नाही,नंतर काही वेळ थांबून माझ्याकडे बघत ती कॉलेज बाहेर पडली......
पण जाताना मात्र तिची नजर पुन्हा त्याला शोधत होती,जो नंतर मलाही भेटला नाही.नंतर रोज त्याच वेळेला दोन दिवस या दोघांची वाट मी बघितली पण ते दोघंही मला नाही भेटले अनेक प्रश्न तसेच राहून गेले कायमचे......
#संवादावाचुन_अनुत्तरित_राहीलेली_भेट.....
लेखन: भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ