मुख्य सामग्रीवर वगळा

पेपर जगणं शिकवणारा एक दुवा....

सकाळी सकाळी फिरायला गेले की पावले आपोआप नाक्याकडे वळतात,मग तिथे एक-दोन पेपर विकत घेतले जातात.....

पेपर हे माझा आयुष्यातला खुप महत्वाचा भाग आहे,म्हणजे माझा वाईट काळात ते माझे पैसे कमविण्याचे साधन होते,फुकटचे ज्ञान मिळवण्याची पण साधन होते.....

माझी सकाळ व पेपर घेण्याचे ते ठिकाण,
सकाळ सकाळी बरेचसे लोक फिरून येताना पेपर,दुधाचे पाकीट,ब्रेड,इत्यादी घेऊन येत असतात.....

यातलाच मी पण एक सकाळी नाक्याकडे फिरत फिरत गेलो की आपसूक पावले तिथे येऊन थांबतात.बरेच शाळा,कॉलेज चे विद्यार्थी खेड्यातून गावावरून बसणे या थांब्यावर उतरतात....

माझा सारखे फिरायला आलेलेही त्यांची उपस्थिती रोजची दर्शवत असतात,कुणी दूध, कुणी पेपर,कुणी भाजी-पाला,कुणी खारी टोस्ट विकत असते, सर्व व्यस्त असतात ज्याच्यात्याच्या कामात.....

यात मला त्यांचा एक वर्ग खुप आवडतो जो फक्त पेपर वाचायला अन् घ्यायला आलेला असतो. माझा सारखी तरुण मुलं रोज आज आपल्या नशिबात नोकरी असेल म्हणून पेपर घ्यायला येतात....

कुणी नोकरी विशेष पेपर घेते,कुणी वाचनाची आवड असेल तर ज्या पेपरला चांगल्या पुरवण्या असेल तो घेता,कुणी ठराविक पेपर रोज वाचतो तर ते तो घेता, इथे ज्याची त्याची आवड समजत असते.....

खुप वेगवेळे पेपर आलेले असतात,मी इथे काम केले आहे म्हणून मला सर्व पेपर माहीत आहे.जसे सकाळ,लोकमत,पुण्यनगरी,पुढारी,आनंद नगरी,मुंबई चौफेर,गावकरी अग्रोवन,सम्राट,दिव्य मराठी,दैनिक भास्कर,देशोन्नती,सामना,लोकमत टाइम्स,नोकरी विशेष,इंडियन टाइम्स,इंडियन एक्स्प्रेस, क्राईम नामा,काली गंगा,पोलिस टाइम्स टाइम्स,अनेक दिवाळी अंक, शेती व्यवसाय विशेष अंक,आंबट शौकीन लोकांसाठी सुद्धा खुप मासिक उपलब्ध असतात.....

एकूण काय पूर्ण जग आपल्याला या टेबलवर उपलब्ध झालेले असते.आजही मी कधी कधी आवर्जून पेपर विकणाऱ्या मुलाला काही काम असले की अर्धा पाऊण तास त्याला मदत म्हणून नाक्यावर पेपर विकत बसतो.....

छान वाटत असते पुन्हा ते बालपण आठवते, अनेक माणसे,अनेक विचार करणारे कोण कसे इथे सगळे समजते.एक खंत मात्र मनात कायम साठी राहून गेली आहे या पेपर विकणाऱ्यांसाठी, जे आपल्या देशाचे,भावी पिढीचे देणे लागतात त्यांना कुठीली सुविधा उपलब्ध नाही.....

आजही मी बऱ्याच वर्ष पासून पाहतो त्यांचे काऊंटर बदलेले नाही आहे, त्यांना पावसापासून सुरक्षा म्हणून अजूनही जागा उपलब्ध नाही आहे. एकूण वाईट आहे सर्व पण ते याचा फार विचार करत नाही.....

सकाळी उठून पूर्ण शहराला हातात चहासोबत पेपर कसा मिळेल याची ते पुरेपूर काळजी घेत असतात,यामुळे नेहमीच यांचे अप्रूप वाटत असते. एकच इच्छा कायम असेल,वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे  त्यांना एक हक्काची जागा उपलब्ध व्हावी. ही सुविधा परदेशात उपलब्ध आहे कुठेतरी अभाव फक्त आपल्या देशात आहे.....

#पेपरजगणंशिकवणाराएकदुवा.....
लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औंरगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...