मुख्य सामग्रीवर वगळा

पेपर जगणं शिकवणारा एक दुवा....

सकाळी सकाळी फिरायला गेले की पावले आपोआप नाक्याकडे वळतात,मग तिथे एक-दोन पेपर विकत घेतले जातात.....

पेपर हे माझा आयुष्यातला खुप महत्वाचा भाग आहे,म्हणजे माझा वाईट काळात ते माझे पैसे कमविण्याचे साधन होते,फुकटचे ज्ञान मिळवण्याची पण साधन होते.....

माझी सकाळ व पेपर घेण्याचे ते ठिकाण,
सकाळ सकाळी बरेचसे लोक फिरून येताना पेपर,दुधाचे पाकीट,ब्रेड,इत्यादी घेऊन येत असतात.....

यातलाच मी पण एक सकाळी नाक्याकडे फिरत फिरत गेलो की आपसूक पावले तिथे येऊन थांबतात.बरेच शाळा,कॉलेज चे विद्यार्थी खेड्यातून गावावरून बसणे या थांब्यावर उतरतात....

माझा सारखे फिरायला आलेलेही त्यांची उपस्थिती रोजची दर्शवत असतात,कुणी दूध, कुणी पेपर,कुणी भाजी-पाला,कुणी खारी टोस्ट विकत असते, सर्व व्यस्त असतात ज्याच्यात्याच्या कामात.....

यात मला त्यांचा एक वर्ग खुप आवडतो जो फक्त पेपर वाचायला अन् घ्यायला आलेला असतो. माझा सारखी तरुण मुलं रोज आज आपल्या नशिबात नोकरी असेल म्हणून पेपर घ्यायला येतात....

कुणी नोकरी विशेष पेपर घेते,कुणी वाचनाची आवड असेल तर ज्या पेपरला चांगल्या पुरवण्या असेल तो घेता,कुणी ठराविक पेपर रोज वाचतो तर ते तो घेता, इथे ज्याची त्याची आवड समजत असते.....

खुप वेगवेळे पेपर आलेले असतात,मी इथे काम केले आहे म्हणून मला सर्व पेपर माहीत आहे.जसे सकाळ,लोकमत,पुण्यनगरी,पुढारी,आनंद नगरी,मुंबई चौफेर,गावकरी अग्रोवन,सम्राट,दिव्य मराठी,दैनिक भास्कर,देशोन्नती,सामना,लोकमत टाइम्स,नोकरी विशेष,इंडियन टाइम्स,इंडियन एक्स्प्रेस, क्राईम नामा,काली गंगा,पोलिस टाइम्स टाइम्स,अनेक दिवाळी अंक, शेती व्यवसाय विशेष अंक,आंबट शौकीन लोकांसाठी सुद्धा खुप मासिक उपलब्ध असतात.....

एकूण काय पूर्ण जग आपल्याला या टेबलवर उपलब्ध झालेले असते.आजही मी कधी कधी आवर्जून पेपर विकणाऱ्या मुलाला काही काम असले की अर्धा पाऊण तास त्याला मदत म्हणून नाक्यावर पेपर विकत बसतो.....

छान वाटत असते पुन्हा ते बालपण आठवते, अनेक माणसे,अनेक विचार करणारे कोण कसे इथे सगळे समजते.एक खंत मात्र मनात कायम साठी राहून गेली आहे या पेपर विकणाऱ्यांसाठी, जे आपल्या देशाचे,भावी पिढीचे देणे लागतात त्यांना कुठीली सुविधा उपलब्ध नाही.....

आजही मी बऱ्याच वर्ष पासून पाहतो त्यांचे काऊंटर बदलेले नाही आहे, त्यांना पावसापासून सुरक्षा म्हणून अजूनही जागा उपलब्ध नाही आहे. एकूण वाईट आहे सर्व पण ते याचा फार विचार करत नाही.....

सकाळी उठून पूर्ण शहराला हातात चहासोबत पेपर कसा मिळेल याची ते पुरेपूर काळजी घेत असतात,यामुळे नेहमीच यांचे अप्रूप वाटत असते. एकच इच्छा कायम असेल,वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे  त्यांना एक हक्काची जागा उपलब्ध व्हावी. ही सुविधा परदेशात उपलब्ध आहे कुठेतरी अभाव फक्त आपल्या देशात आहे.....

#पेपरजगणंशिकवणाराएकदुवा.....
लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औंरगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...