मुख्य सामग्रीवर वगळा

पेपर जगणं शिकवणारा एक दुवा....

सकाळी सकाळी फिरायला गेले की पावले आपोआप नाक्याकडे वळतात,मग तिथे एक-दोन पेपर विकत घेतले जातात.....

पेपर हे माझा आयुष्यातला खुप महत्वाचा भाग आहे,म्हणजे माझा वाईट काळात ते माझे पैसे कमविण्याचे साधन होते,फुकटचे ज्ञान मिळवण्याची पण साधन होते.....

माझी सकाळ व पेपर घेण्याचे ते ठिकाण,
सकाळ सकाळी बरेचसे लोक फिरून येताना पेपर,दुधाचे पाकीट,ब्रेड,इत्यादी घेऊन येत असतात.....

यातलाच मी पण एक सकाळी नाक्याकडे फिरत फिरत गेलो की आपसूक पावले तिथे येऊन थांबतात.बरेच शाळा,कॉलेज चे विद्यार्थी खेड्यातून गावावरून बसणे या थांब्यावर उतरतात....

माझा सारखे फिरायला आलेलेही त्यांची उपस्थिती रोजची दर्शवत असतात,कुणी दूध, कुणी पेपर,कुणी भाजी-पाला,कुणी खारी टोस्ट विकत असते, सर्व व्यस्त असतात ज्याच्यात्याच्या कामात.....

यात मला त्यांचा एक वर्ग खुप आवडतो जो फक्त पेपर वाचायला अन् घ्यायला आलेला असतो. माझा सारखी तरुण मुलं रोज आज आपल्या नशिबात नोकरी असेल म्हणून पेपर घ्यायला येतात....

कुणी नोकरी विशेष पेपर घेते,कुणी वाचनाची आवड असेल तर ज्या पेपरला चांगल्या पुरवण्या असेल तो घेता,कुणी ठराविक पेपर रोज वाचतो तर ते तो घेता, इथे ज्याची त्याची आवड समजत असते.....

खुप वेगवेळे पेपर आलेले असतात,मी इथे काम केले आहे म्हणून मला सर्व पेपर माहीत आहे.जसे सकाळ,लोकमत,पुण्यनगरी,पुढारी,आनंद नगरी,मुंबई चौफेर,गावकरी अग्रोवन,सम्राट,दिव्य मराठी,दैनिक भास्कर,देशोन्नती,सामना,लोकमत टाइम्स,नोकरी विशेष,इंडियन टाइम्स,इंडियन एक्स्प्रेस, क्राईम नामा,काली गंगा,पोलिस टाइम्स टाइम्स,अनेक दिवाळी अंक, शेती व्यवसाय विशेष अंक,आंबट शौकीन लोकांसाठी सुद्धा खुप मासिक उपलब्ध असतात.....

एकूण काय पूर्ण जग आपल्याला या टेबलवर उपलब्ध झालेले असते.आजही मी कधी कधी आवर्जून पेपर विकणाऱ्या मुलाला काही काम असले की अर्धा पाऊण तास त्याला मदत म्हणून नाक्यावर पेपर विकत बसतो.....

छान वाटत असते पुन्हा ते बालपण आठवते, अनेक माणसे,अनेक विचार करणारे कोण कसे इथे सगळे समजते.एक खंत मात्र मनात कायम साठी राहून गेली आहे या पेपर विकणाऱ्यांसाठी, जे आपल्या देशाचे,भावी पिढीचे देणे लागतात त्यांना कुठीली सुविधा उपलब्ध नाही.....

आजही मी बऱ्याच वर्ष पासून पाहतो त्यांचे काऊंटर बदलेले नाही आहे, त्यांना पावसापासून सुरक्षा म्हणून अजूनही जागा उपलब्ध नाही आहे. एकूण वाईट आहे सर्व पण ते याचा फार विचार करत नाही.....

सकाळी उठून पूर्ण शहराला हातात चहासोबत पेपर कसा मिळेल याची ते पुरेपूर काळजी घेत असतात,यामुळे नेहमीच यांचे अप्रूप वाटत असते. एकच इच्छा कायम असेल,वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे  त्यांना एक हक्काची जागा उपलब्ध व्हावी. ही सुविधा परदेशात उपलब्ध आहे कुठेतरी अभाव फक्त आपल्या देशात आहे.....

#पेपरजगणंशिकवणाराएकदुवा.....
लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औंरगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ