मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डुंब्य्रावाडीचा दुष्काळ...

#डुंब्य्रावाडीचादुष्काळ.... भर दुपारची वेळ हाताला काम नसल्यामुळे परसदारच्या चौकटीतून नदीपल्याड दिसणाऱ्या दगडी पुलावर मी बसून होतो.चहूकडे कोरड्या वाऱ्याच्या सोसट्यात लाल मातीची धूळ आसमंताला भिडत होती,लाल मातीच्या उडण्याने अंगावर आलेल्या घामाला बकरीच्या मुत्रट मातीचा झोंबलेला वास येत होता.डोक्याला लावायला तेल नसल्यामुळे डोक्यातील केस पार जट झाल्यागत रुक्ष आणि वाऱ्यातून येणाऱ्या मुत्रट वासाच्या मातीने माखले होते. डोक्यातून येणारा घामाचा ओघळ कबरेच्या लवणातून खाली घरंगळत जाताना अंगाला जाणवत होता,घामाचा ओघळांनी सारा सदरा मळकट अन् सद्र्यावर कुत्रं मुतल्यागत झाला होता.हाताला नसलेलं काम अन् डोक्याला नसलेला ताण म्हणून मी येणारी जाणारी एखाद दुसरी गाडी न्याहाळत पुलावर बसलो होतो... गावाला यंदाच्या सालचा पडलेला दुष्काळ त्यामुळं माझ्यासगट सारा गाव रिकामाच होता.गाव,गावातील गडी माणूस रिकामा असून रिकामा नव्हता, कुणी चुल्हीला जळतंन आणायला भर पहाटच्याला बोडक्या झालेल्या टेकडीच्या वाटानं सरपण आणाया गेलं होतं.बायका काम नसल्यानं गप्पा झोडीत बसल्या होत्या तर कुणी शेवटच्या घटका मोजणाऱ्या हापशीवरून

बापजन्म..!

या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...! या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...! शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे घर भरलेल्या हाकांनी मधून लागे पिसे...! भिंतींना या जुन्या खडुचा रंग अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...! कशी पुसावी दिवसांवरली जुनी जुनीशी धुळ पांघरतो मग रोज नव्याने हवीहवीशी झुल...! हुंदक्यात या दाटून येते...! हुंदक्यात या दाटून येते खंत अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...! काही गाणी,काही क्षण,काही समोर घडत असलेल्या गोष्टी बघितल्या की आपसुकच माझं बालपण मला आठवतं.फार नाही एक दहा-बारा वर्षांपूर्वीचे,अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब,आदर्श कुटुंब जसं असावं तसे आमचं,ते आजही आहे... जेव्हा आज,वेळी,अवेळी कधीतरी सांजसमयी अस्ताला जाणाऱ्या सुर्याबरोबर,कधी फार क्वचित वेळी सूर्योदय होताना,कधीतरी रात्रीच्या कातरवेळी मन विचारांवर हबी झालं की हे गाणं ऐकत असतो.... का कुणास ठावूक माहित नाही या गाण्याशी माझं कुठलं नातं आहे,की जे मला माझा भूतकाळ दाखवते.जे क्षण मी आता पुन्हा कधीच अनुभवू शकत नाही,ते अनुभवलेले क्षण या गाण्याने पुन्

Gautala wildlife sanctuary... Part-3

Gautala wildlife sanctuary... काल परवा रौद्ररूप धारण केलेल्या वादळांसोबत संपूर्ण महाराष्ट्रभर कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या आणि आता पावसाळा फार दूर नाही याची चिन्ह दिसू लागली.पावसाळा म्हंटले की चहूकडे निसर्गाने आपल्या सौंदर्यावर पांघरलेली हिरवी जरीची शाल,जिथवर नजरेला नजरेने न्याहाळता येईल तिथवर सुंदर निसर्ग,दवाच्या पडण्याने खुललेले तनाचे सौदर्य,वाऱ्याच्या झुळकेमुळे चहुकडे पडलेली फुलांची आरास हे सर्व खूप सुंदर आहे... तेव्हा आज हेच क्षण अनुभवायला मी भरत सोनवणे आपल्याला अश्याच एका अभयारण्यला भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहे.आपण महाराष्ट्राची इतिहासिक राजधानी म्हणुन ओळखले जाणारे शहर म्हणजेच औरंगाबाद येथील गौताळा अभयारण्याला भेट देणार आहोत,तर चला आज मी तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य भटकंतीसाठी घेऊन जातो... खूप दिवस झाले lockdown मुळं घरात बसून कंटाळा आला आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे आणि ट्रेकर्सही सज्ज झाले आहे.खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी प

जहं जहं चरन परे गौतम के...! लेखक - तिक न्यात हन्ह.

जहं जहं चरन परे गौतम के. लेखक - तिक न्यात हन्ह. पुस्तकाचे नाव - जहं जहं चरन परे गौतम के. लेखक - तिक न्यात हन्ह. एकुण पृष्ठ - 576. अभिप्राय - जहं जहं चरन परे गौतम के. भाग- पहिला.(पृष्ठ क्र १ ते २०१) हे पुस्तक महात्मा भगवान बुद्ध यांचे जीवन जे त्यांनी पंचशील तत्वांना स्विकारत जगले आहे,मानवानं एक यशस्वी जीवन कसं जगावं ते भगवान बुद्ध कसे जगले,हे जीवन जगतांना त्यांच्या आयुष्यात किती कठीण काळ त्यांनी व्यथित केला अन् याचे फळ म्हणुन त्यांना जीवन जगण्याच्या साधनेतुन मिळालेला मार्ग.या सर्व तत्वांना आयुष्यात स्विकारुन त्यांनी स्विकारलेले जीवन,संपूर्ण जीवनयात्रा यावर लेखकानं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाने या जीवन जगण्याच्या भगवान बुद्धांच्या तत्त्व आणि जीवनक्रमाचा स्विकार करून,अथक परिश्रम करून हे पुस्तक लिहिले आहे.ज्या ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध गेले,लोकांना यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग ज्या ज्या ठिकाणी त्यांनी लोकांना दिला,त्या त्या सर्व ठिकाणांना लेखकाने भेट दिली तिथं त्यांनी वास्तव्यही केलं आहे... थोडक्यात लेखकाबद्दल "तिक न्यात हन्ह"  हे व्हियतनाम येथील प्रसिद्ध असे

पालघर भ्रमंती लेख क्र - २

पालघर भ्रमंती.... लेख क्र-२ सूर्योदयाला आपण पालघरच्या वळणावळणाच्या रस्त्यांनी आपली भटकंती करत राहावं.सर्वदूर दिसणारी हिरवळ,अधूनमधून वाऱ्याच्या सोबतीने येणारी अलवार पावसाची सर.... वळणावळणाच्या रस्त्यावर जिथं मनाला वाटेल की इथे निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण थांबायचं,ठरले की थांबायचेच.मग रस्त्याच्या  एक साईडला गाडी उभी करून द्यायची,पाऊलवाटा जिकडे घेऊन जाईल तिकडे मनसोख्त भटकंती करत रहायचं. डोंगराच्या कुशीत शिरून नजरेनी निसर्ग अनुभवयाचा,सोबतच दूरवर असलेली मानवी वस्ती डोळ्यात साठवून घेत विचार करत राहायचं. कश्याला विदेशात फिरायला जायचं,आपल्या मायभूमीत काय कमी आहे आपल्याला जे निसर्गानं दिलं ते ओंजळभर इतर देशांच्या तुलनेत जास्तच आहे.... पावसाच्या संथ सरी,ओलेचिंब झालेले केस त्यांना क्लिपमध्ये सावरत गुडघ्या इतक्या गवतात रानोमाळ,डोंगर कपारी भटकंती करत राहायची.कुणीच नको सोबतीला,अगदी नजरेला आपल्या जवळची सुद्धा व्यक्ती नको की नको कॅमेरा,मोबाईल हे सुद्धा काहीच नको फक्त मी आणि निसर्ग आणि डोळ्यांनी या निसर्गाला जितकं अनुभवता येईल तितकं अनुभवणे. तुम्ही म्हणाल सुटलेले क्षण कॅमे

एक उमदे नेतृत्व...

एक उमदे नेतृत्व..! आज अनेकांना माझी ही पोस्ट बघुन जरा आश्चर्य वाटेल.कारण साहित्याच्या पलिकडे माझ्या वॉलवरती इतर विषयावरील पोस्ट या जवळजवळ नसतातच.पण काहीवेळा हे आपलेपण डावलून काहीतरी वेगळं लिहावं लागतं आणि ते आज या कारणासाठी लिहावं लागते आहे याचे दुःख वाटते. तसा राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेला मी जेव्हा हे लिहतो तेव्हा लिहायला थोडं जड जात असल्यासारखे वाटत आहे. कारण राजीवजी सातव यांच्या सारख्या अभ्यासू,सुसंस्कृत, उमदे व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला सोडून जाणं हे खुप दुःखद आहे. राजीवजी सातव हे काँग्रेसचा आश्वासक चेहरा होते.तरुणांचे लाडके नेते होते,तरुणांची योग्य नस,ओढ,कल ओळखलेले ते एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व.राजकारण अन् त्या पलिकडची एक सामान्य व्यक्ती कशी असावी तर ती राजीवजी सातव यांच्यासारखी. देशाच्या राजकारणात युवा पिढी जेव्हा उतरते आहे, जिची निकटच्या काळात फार आवश्यकता आहे आणि हे जाणून राहुल गांधी काँग्रेस पक्षाची विस्कटलेली घडी युवा नेत्यांना सोबत घेऊन व्यवस्थित पुन्हा बसवू बघत आहेत.या सर्वा जडणघडणीत त्यांना राजीवजी यांची कायमची साथ होती,त्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायच

खिडकी पलिकडे खूप काही...

खिडकी पलिकडे खूप काही ... संध्याकाळचे ओस पडलेले प्रश्न आणि शहर... माणसांचे विचार करणे असो किंवा विचार करून निर्णय घेणं असो अलिकडे हे सर्वच मला गुंतागुंतीचे वाटायला लागले आहे.शहरे ओस पडली व वाहते रस्ते संथ झाले,बंद खिडकीची तावदाने पुसल्या गेली,रेलिंगचा पडदा ओढल्या गेला.... कित्येकदा कुणी अनोळखी पुरुष,स्त्री समोरून जात असेल व कित्येकदा मी तो ओढून घेत असेल.कारण एकच होतं की,माझ्या घरा आतले जग मला कुणाला दाखवायचं नव्हते,मग तोच पडदा त्याच्या नजरेत आपली खिडकी असतांना आपून ओढावा. काय वाटलं असेल त्या माणसाला काही क्षण...? मनात इतकचं उत्तर येतं की तो परका,अनोळखी आहे.म्हणून आपण पडदा ओढून घेतला,ग्रील पुढे सरकवली.झालं इतकचं आपण आपल्या कृतीतून व्यक्त केलं आणि एक व्यक्तीचा आपल्यासाठी गैरसमज झाला.म्हणुनच मला विचार करणे अन् विचार करून निर्णय घेणं हल्ली गुंतागुंतीचे वाटते,विचार केला की असे गैरसमज होतात अन् मग उगाच मनाला पडणारे असंख्य प्रश्न येणारे विचार etc,etc.... सांगत होतो की, खिडकीची तावदाने पुसल्या गेली,रेलिंगचा पडदा ओढल्या गेला आणि आता माझी नजर शांत झालेल्या रस्त्याकडे लागलेली असते.कुण

समांतर- सुहास शिरवळकर.

समांतर... लेखक - सुहास शिरवळकर. मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते.... मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांची "समांतर" ही कादंबरी काल वाचली.एकूण 197 पानांची असलेली ही कादंबरी आपल्याला अनेक वळणांवर फिरून आणते,कधीतरी ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाते तर कधी आपले जीवन भविष्य काळात किती सुखकर यासाठी वर्तमान काळात आपल्याला आपल्या विचारांशी तडजोड करायला लावते.... "सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेली खूप उंचीची ही कादंबरी आहे जी की प्रत्येकाने वाचायला हवी... मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती.इथंच काय,या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो.वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली... 'त्याचं मन मोडायचं नाही,म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुक

घर माझे कौलारू..!

घर माझे कौलारू..! घर माझे कौलारूचे गणित आयुष्याचे, चौकटीच्या आत दडले जीवन माझे, फासे फिरले मिळण्या उत्तर आयुष्याला बंद खिडकीचे..! नभी दाटून आल्या दर्शन तारकांचे, सांजप्रहरी अस्ताला जावे भास्कराने, झाल्या रानवाटा मोकळ्या रस्ते जवळ झाले घराचे..! भासे मज आयुष्य बिजागिरी सम, खुलले दरवाजे आयुष्याचे दडले जीवन घरात माझे,  उघडझाप करण्या हिशोब तो जिंदगीचा,झाले बंद पुन्हा दरवाजे..! काय सांगावे गणित बोडक्या बाभळीस, जीवन उलगडले,झाले सोहळे अंगणी गुलमोहराचे, बंद खिडकीतून दुनियेस त्या पहाणे, बिथरले जीवन खिडकीतून बाहेरच्या जगास मग मात्र ते न्याहाळणे... घर माझे कौलारूचे गणित आयुष्याचे, चौकटीच्या आत दडले जीवन माझे, फासे फिरले मिळण्या उत्तर आयुष्याला बंद खिडकीचे..! Written by, Bharat Sonwane .

बनगरवाडी

बनगरवाडी. -व्यंकटेश माडगूळकर. लाल मातीचे फुफाट्याचे रान,हिवाळा सरला की भर उन्हाळ्यात पडणाऱ्या जमिनीला भेगा,बोडक्या रानासोबत बोडखी झालेली बाभूळ,बकऱ्या,बकऱ्या वळणारा गुराखी,मेंढ्या,मेंढ्या वळणारा मेंढपाळ, गाव रहाटीचं जगणं हे अनुभव सर्व माझ्या खूप जवळचे... जरी त्यांच्या सानिध्यात जीवनातला कुठलाही क्षण जगत नसलो तरी अनुभवलेल्या क्षणांतून त्याच्या जीवनाचं वर्णन करणे हा माझा आवडता विषय,हे आजवर तुम्हाला माझ्या लिखाणातून कळाले असेलच... तर हे वरील सर्व वर्णन करण्यास कारण की,आज या सर्व गोष्टींशी मिळतीजुळती "व्यंकटेश माडगुळकर" यांची "बनगरवाडी" ही कादंबरी वाचली.खूप सुंदर अशीही कादंबरी,'धनगर' समाजाच्या जीवन जगण्याची पद्धत व त्यांचा सहवास यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी... वाचण्यासा खूप सोप्पी लिखाणात ग्रामीण बाज असलेली मराठी भाषा,त्यामुळे अजुनच आपल्याला आपलीशी वाटणारी ही कादंबरी.फार मोठीही नाही अवघ्या १३२ पानांची आहे.आज सकाळी फक्त तीन तासात वाचून पूर्ण झाली,दिवसभर ते विचार,बनगरवाडीच्या लोकांचे रोजचे जीवन माझ्या सभोवताली पिंगा घालत राहिले... लहानपणी किंवा आताही

केवडी..!

केव डी..! नभ डोंगरांगाच्या कुशीत उतरू लागले होते,सायंकाळची वेळ अस्ताला जाणारा सूर्य ढगा आड लपून प्रकाशाला भुलवित मावळतिला आला होता.लाल,तांबूस रंगाच्या प्रकाश झोतात वाळलेले गवत सोनेरी सोनेरी रंगाची शाल लेवून माळरानात चहूकडे आपल्या अस्तित्वाच्या पुसटश्या खुणा सोडुन पावसाची वाट बघत विसावले होते,त्याची काही दिवसांची सोबत आता मग पुन्हा माळरान जावळं काढलेल्या लहानग्या पोऱ्याप्रमाणे भासू लागणार.... दूरवर रामू गुराख्याच्या राखणीला म्हणून ठेवलेल्या बकऱ्या चरू लागल्या होत्या,गुराखी त्यांना नजरेसमोर ठेवून बाभळीच्या पडसावलीत विसावला होता.दूरवरून शिवा मोहरच्या गावातून येणारी वराटे-पाटे विकणारी सुली नजरेला दिसू लागली,उन्हाच्या काहिलीत कधीतरी ती झळईत स्पष्ट,अस्पष्ट दिसत होती... दूरवर असलेल्या धरणात पाणी नसल्याने धोंडू धनगर आपल्या मेंढ्यांच्या कळपाला घेऊन रहात होता,शंभर एक मेंढरं अन् पाच सहा कंबरा एव्हढे कुत्रे त्यानं पाळले होते.पावसाचा अंदाज बघून त्यानं मेंढर राखणीला केलेल्या जागेत कळपात बांधली,राणाई चुल्हीवर भाकरी बडवित होती भाकरी बडविण्याचा आवाज माझ्या पहतुर धरणाच्या पाळी पहूर येत होता.... शांत असल

बलुतं- दया पवार

बलुतं. लेखक  - दया पवार. पु. ल. देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे खरोखर "बलुतं" वाचल्याने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या श्रद्धा गळून पडतात... 'बलुतं' दया पवार यांचे प्रचंड गाजलेलं व जातिव्यवस्थेवर भाष्य करणारं हे पुस्तक,जे खुप चर्चेत राहिले,आजही आहे.हे पुस्तक मराठी भाषेतील,साहित्यातील पहिले दलित आत्मचरित्र म्हणून याकडे पाहिलं जातं.धगधगत समाजवास्तव्य त्यातील दाहकता उपेक्षित,वंचित,शोषित अशा सर्वहारा माणसाचं जगणं आणि जाणीव या पुस्तकाने मांडली. जात,वर्ग,लिंगभेदाच्या वर्तुळात अडकलेल्या भारतीय समाज आणि भांडवलशाहीने घोटलेला गळा अशा गुदमरलेल्या अवस्थेतंल जमीनेचे दुःख आकाशाला टांगण्याचे काम या 'बलुतं' ने केले.देशात बऱ्यापैकी स्वातंत्र्याचे वारे चौफेर वाहू लागले होते.देश स्वतंत्र झाला पण देशाचा नागरिक मात्र जाती व्यवस्था,धर्म,परंपरागत चालत असलेल्या रुढी परंपरा यात बरबटलेला.समाज मात्र स्वतंत्र मिळवूनही जातीव्यवस्था,धर्म यांना धरून असलेले रुढीजात विचार यामुळे स्वातंत्र्यातही पारतंत्र्य अनुभवत होता. जातिवादाशी तो लढा देत होता,यासर्वात परिवर्तन व्हावं म्हण

अमृतवेल- वि.स.खांडेकर.

अमृतवेल  - वि.स.खांडेकर. वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात. वि.स.खांडेकर यांच्या लिखाणाशी ओळख झाली ती "ययाती" च्या माध्यमातून परंतु कदाचित "ययाती" न कळत्या वयात वाचायला धजावू नये असे मला वाटतं.कारण खूप लहान वयात ही वाचायला घेतली,ज्यावेळी की माझी साहित्याशी कुठलीही ओळख नव्हती.मग तिचं ओझरते वाचन,अलंकारिक वाक्यरचना हे सर्व कळेनासे झाले.... आज कित्येक दिवसांनी जेव्हा साहित्यातील "स" या शब्दाची मला ओळख होते आहे,तेव्हा आज "वि.स.खांडेकर" यांची "अमृतवेल" ही कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.तित काही प्रमाणात असलेली अलंकारिक शब्दांची वाक्यरचना माझ्याशी हितगुज करू लागली..."अमृतवेल" या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं..!" याचा प्रत्यय कादंबरीच्या उत्तरार्धात जातांना वाक्यागनिक आपल्याला येऊ लागतो. "अमृतवेल" कादंबरीतील प्रत्येक पात्र हे "वि.स.खांडेकरांनी" खूप सुंदररित्या आपल्या लेखणीतून उतरवले आहे,जे सर्व आपल्याला जवळची वाटतात.ज्यांच्य

Chadar the ice Trail..!

Chadar the ice Trail..! बऱ्याचवेळा काही आवडी निवडी या आपल्याला अनुभवायचा असतात पण ते साहस आपल्यात नसते किंवा ते सर्व इतिहासात जमा झालेले असते त्यामुळे हे सर्व आपल्याला अनुभवायला भेटत नाही किंवा आपल्या स्वभवताली ती परिस्थिती नसल्याने ते सर्व आपल्याला अनुभवता येत नाही.... लहानपणी आपल्या घरात टीव्ही आला परिस्थितीच्या मानाने तो सर्वांच्या घरी उशीरा आला त्यामुळे आपल्या नाईंटीजच्या मित्रांना टीव्ही बघण्याचे सुख काय असते अन् त्यासाठी मित्रांच्या घराचे झिजवलेले उंबरठे हे सर्व आपल्याला बऱ्यापैकी ज्ञात आहेत मुळात तो लिखाणाचा उद्देश नाहीच पण आजच्या टीव्ही बघण्यात अन् त्यावेळच्या टीव्ही बघण्यात झालेला बदल हा खूप वेगळा आहे,आवडीनुसार टीव्हीवरील चॅनल बदलण्यासाठी रिमोटचे बटन आपण दाबत असतो कुणाला न्यूज,कुणाला सिरियल, कुणाला Discovery,Net geo, कुणाला काय तर कुणाला काय कारण आता हे सर्व पर्याय उपलब्ध झाले आधुनिक युगाच्या चढत्या आलेखला ज्या वर्षांपासून सुरुवात झालेली ती वर्षांचे आपले जन्म म्हणून कदाचित हे सर्व आपण जवळून अनुभवले.... त्यावेळी एकच टीव्ही चॅनल मग त्यात वार,वेळ यांची सांगड घालून दूर

माझी जन्मठेप..!

माझी जन्मठेप..! लेखक-वि.दा.सावरकर. तीन दिवस वेळ मिळेल तेव्हा वाचन करत काल रात्रीस अखेर "वि.दा.सावरकर" लिखित "माझी जन्मठेप" हे ३६८ पानांच आत्मचरित्रपर पुस्तक संपले. मी आपसूकच नकळत डोळ्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगताना सावरकर बंधूंना माझ्या नजरेत सामावुन घेऊ शकलो.त्यांचा तेथील जगण्यात असलेला संघर्ष,देशाप्रती,देशसेवेसाठी त्यांचे असलेले समर्पण हे या शब्दरूपी "जन्मठेपेतून" अनुभवास आले... मनापासून सांगायचं झालं तर,इतरांचे या आत्मचरित्रपर पुस्तकाप्रती असलेले मत ऐकून आपण ते पुस्तक वाचत नसाल तर आपण खुप काही गमावतो आहे हे समजून घ्यावं... "माझी जन्मठेप" हे स्वातंत्र्यवीर "विनायक दामोदर सावरकर" यांनी अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली.... तेथील त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती,त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा विजय झाला. सावरक

फकिरा

"फकिरा" लेखक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ओळख मराठी साहित्यात सर्व प्रथम झाली ती "स्मशानातील सोनं" या कथेमुळे झाली आजही ही कथा कथेतील पात्र भीमा मनात इतके घर करून आहे की कित्येकदा वाचूनही वाचत राहावी अशी ही कथा आज तिला साजेशी "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांची "फकिरा" ही कादंबरी वाचली... "फकिरा" "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे"  लिखित ही कादंबरी,१९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार फकिरा या कादंबरीला मिळाला.या कांदबरीत "फकिरा" नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा "फकिरा" आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे.... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहल्या,ज्यात जगण्यासाठी असलेला संघर्ष हा आहेच,कादंबरीला वि.स.खांडेकरांची यांनी दिलेली प्रस्तावना खुप सुंदर अन् पुस्तकाला बोलके करणारी आहे.प्रस्तावनेत ते म्हणतात,अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे.शोषणाविरुद्ध बंड करणारे आण्णाभाऊ साठे.या कादंबरीच्या प्रस्ता