मुख्य सामग्रीवर वगळा

बापजन्म..!

या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!

या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!

शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे
घर भरलेल्या हाकांनी मधून लागे पिसे...!

भिंतींना या जुन्या खडुचा रंग अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!

कशी पुसावी दिवसांवरली जुनी जुनीशी धुळ
पांघरतो मग रोज नव्याने हवीहवीशी झुल...!

हुंदक्यात या दाटून येते...!

हुंदक्यात या दाटून येते खंत अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!

काही गाणी,काही क्षण,काही समोर घडत असलेल्या गोष्टी बघितल्या की आपसुकच माझं बालपण मला आठवतं.फार नाही एक दहा-बारा वर्षांपूर्वीचे,अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब,आदर्श कुटुंब जसं असावं तसे आमचं,ते आजही आहे...
जेव्हा आज,वेळी,अवेळी कधीतरी सांजसमयी अस्ताला जाणाऱ्या सुर्याबरोबर,कधी फार क्वचित वेळी सूर्योदय होताना,कधीतरी रात्रीच्या कातरवेळी मन विचारांवर हबी झालं की हे गाणं ऐकत असतो....

का कुणास ठावूक माहित नाही या गाण्याशी माझं कुठलं नातं आहे,की जे मला माझा भूतकाळ दाखवते.जे क्षण मी आता पुन्हा कधीच अनुभवू शकत नाही,ते अनुभवलेले क्षण या गाण्याने पुन्हा एकदा मी मनात ते सर्व आठवत जगत असतो.खरंतर आपल्या व्यक्तींसाठी आपल्याला काहीच लिहता येत नाही,व्यक्त होता येत नाही याची वेळोवेळी खंत वाटते...

माझं व्यक्त होणं कुठेतरी या गाण्यातून मलाच दिसून येतं....

एकूण काय तर छान असतात ते दिवस ज्यांना नवीन फुलणाऱ्या नात्यांचा सुगंध असतो.आई,बाबा,दादा,ताई अन् मी,या सर्वांचा मिळणारा तो एकत्रित सहवास.अन् आता अलीकडे जसजशी जबाबदारीची जाणीव होत गेली,कर्तव्याची जाणीव होत गेली तसतसे घरट्यातून पिलं उडून जावे तसं आपलं या विश्वात मुक्तपणे सैर करणं.

एक मात्र खरं आहे,व्यवहार कुणाला चुकत नाही,तो इथेही आड येतो...
व्यवहार,आर्थिक हे शब्द हल्ली नकोसे वाटतात पण माणसाच्या आयुष्याचे कोडे उलगडायचे असेल तर असे अवघड शब्द जवळ करावे लागतात...
या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!

काय बोलावं या दोन ओळींच्या बाबतीत संपूर्ण जीवनप्रवास भेटतो मला माझा या दोन ओळीत....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...