मुख्य सामग्रीवर वगळा

अमृतवेल- वि.स.खांडेकर.


अमृतवेल  - वि.स.खांडेकर.


वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.
वि.स.खांडेकर यांच्या लिखाणाशी ओळख झाली ती "ययाती" च्या माध्यमातून परंतु कदाचित "ययाती" न कळत्या वयात वाचायला धजावू नये असे मला वाटतं.कारण खूप लहान वयात ही वाचायला घेतली,ज्यावेळी की माझी साहित्याशी कुठलीही ओळख नव्हती.मग तिचं ओझरते वाचन,अलंकारिक वाक्यरचना हे सर्व कळेनासे झाले....

आज कित्येक दिवसांनी जेव्हा साहित्यातील "स" या शब्दाची मला ओळख होते आहे,तेव्हा आज "वि.स.खांडेकर" यांची "अमृतवेल" ही कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.तित काही प्रमाणात असलेली अलंकारिक शब्दांची वाक्यरचना माझ्याशी हितगुज करू लागली..."अमृतवेल" या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं..!" याचा प्रत्यय कादंबरीच्या उत्तरार्धात जातांना वाक्यागनिक आपल्याला येऊ लागतो.

"अमृतवेल" कादंबरीतील प्रत्येक पात्र हे "वि.स.खांडेकरांनी" खूप सुंदररित्या आपल्या लेखणीतून उतरवले आहे,जे सर्व आपल्याला जवळची वाटतात.ज्यांच्या सोबत आपल्या आयुष्यातील हितगुज देवदत्तप्रमाणे आपण व्यक्त करावे किंवा एकाकी पडलेल्या वसुंधराप्रमाणे कुणाची सोबत हवी म्हणून अलकनंदा सारखी मैत्रीण आपल्याला मिळावी किंवा आभाळासारखी माया करणारी आई व प्रेम करणारे दादा हे सर्वस्वी खूप सुंदर आहे....

जेव्हा "अमृतवेल" शेवटच्या पानावर आपण वाचत असतो त्यावेळी,नक्कीच एक सुंदर पुस्तक वाचल्याचे समाधान आपल्या चेहऱ्यावर असते,ते सर्व आपल्या चेहऱ्यावर आलेला ग्लो स्पष्ट करत असतो,पण..पण.., इथेही मी म्हणेल साहित्याशी ज्यांची नाळ जोडली आहे किंवा पुढे आयुष्यात ज्यांनी त्याला जवळ केलं आहे त्यांनीच हे पुस्तक वाचावे.कारण उगाच चेहऱ्यावर खोटे भाव आणुन हे पुस्तक वाचणे शक्य नाही,ते कळणेही तितके सोप्पे नाही,त्यासाठी आपण तितकं पात्र असायला हवं,आपल्या विचारांनी तितकंच आपण प्रगल्भही असायला हवं....


थोडक्यात "अमृतवेल" बद्दल,

अलकनंदा एम.ए.शिकलेली हुशार,ध्येयवादी आणि गोड तरुणी.एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली,अाभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनीसारखं जपणारी माई,नंदा मावशी म्हणणारा तिच्या बहिणीचा मुलगा मिलिंद जो तिचा खूप लाडका आहे,हे छोटंसं तिचं विश्व...

दुसरीकडे आयुष्याची दोर विस्कटलेली आहे,सोबतच एक दुतर्फा दोन टोकांवर विसावलेला देवदत्त अन् वसुंधरा यांचा संसार,या संसाररुपी फुलावर उमलेले मधुरा नावाचं हळव्या जिवाचं फुल,या सगळ्यात त्यांच्या सोबत आपले माणसे 'पर्यायी' म्हणून राहणारे बापू व त्यांची बायको...
सोबतच देवदत्तची लायब्ररी,जीवापाड देवदत्त जिच्यावर प्रेम करतो ते गळ्यात गुंघराची माळ घातलेलं चंचल नावाचं हरिणीचं गोड पाडस या सर्वांभोवती फीरणारी ही विस्कटलेल्या संसाराची व संसार सुरु होण्यापुर्वी संपलेल्या अलकनंदाची गोष्ट....
वाचुन बघावी इतकी सुंदर कादंबरी..!

मी कांदबरीचे स्वरुप अगदी मोजक्या शब्दात लिहलं,का तर प्रत्येक क्षणाला कादंबरी वाचताना पुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटू लागते.हिच उत्सुकता,कथेचा संपूर्ण रसस्वाद घेण्याकरता यातील पात्र आणि घटना हळूहळू उलगडण्यातच खरी गंमत आहे.आणी तीच किमया खांडेकरांच्या लेखणीने केली आहे,यांत कांदबरीला साज येण्यासाठी विलासपूरचा वाडा, देवदत्ताची लायब्ररी,गड अश्या सर्वच वास्तू डोळ्यांसमोर येतात वाचकाला खिळवुन ठेवतात.

हेमिंग्वे-विवेकानंद,सावित्री-हॅम्लेटची आई अश्या या वैचारीक पात्रातुन कादंबरीला,कथेला या पात्राशी जोडु बघणे सर्वच संदर्भातून खांडेकरांची वैचारिक भूमिका मांडण्याची आगळीवेगळी पद्धत दिसून येते.नकळत मग कादंबरीच्या शेवटी एक सुंदर कादंबरी वाचल्याचं आपलं मन आपल्याला सांगु बघतं,चेहय्रावरचे भाव ते अधिकच स्पष्ट रुपाने व्यक्त करतात....

Written by,
Bharat.L.Sonawane.
(Aurangabad).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...