मुख्य सामग्रीवर वगळा

अमृतवेल- वि.स.खांडेकर.


अमृतवेल  - वि.स.खांडेकर.


वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.
वि.स.खांडेकर यांच्या लिखाणाशी ओळख झाली ती "ययाती" च्या माध्यमातून परंतु कदाचित "ययाती" न कळत्या वयात वाचायला धजावू नये असे मला वाटतं.कारण खूप लहान वयात ही वाचायला घेतली,ज्यावेळी की माझी साहित्याशी कुठलीही ओळख नव्हती.मग तिचं ओझरते वाचन,अलंकारिक वाक्यरचना हे सर्व कळेनासे झाले....

आज कित्येक दिवसांनी जेव्हा साहित्यातील "स" या शब्दाची मला ओळख होते आहे,तेव्हा आज "वि.स.खांडेकर" यांची "अमृतवेल" ही कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.तित काही प्रमाणात असलेली अलंकारिक शब्दांची वाक्यरचना माझ्याशी हितगुज करू लागली..."अमृतवेल" या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं..!" याचा प्रत्यय कादंबरीच्या उत्तरार्धात जातांना वाक्यागनिक आपल्याला येऊ लागतो.

"अमृतवेल" कादंबरीतील प्रत्येक पात्र हे "वि.स.खांडेकरांनी" खूप सुंदररित्या आपल्या लेखणीतून उतरवले आहे,जे सर्व आपल्याला जवळची वाटतात.ज्यांच्या सोबत आपल्या आयुष्यातील हितगुज देवदत्तप्रमाणे आपण व्यक्त करावे किंवा एकाकी पडलेल्या वसुंधराप्रमाणे कुणाची सोबत हवी म्हणून अलकनंदा सारखी मैत्रीण आपल्याला मिळावी किंवा आभाळासारखी माया करणारी आई व प्रेम करणारे दादा हे सर्वस्वी खूप सुंदर आहे....

जेव्हा "अमृतवेल" शेवटच्या पानावर आपण वाचत असतो त्यावेळी,नक्कीच एक सुंदर पुस्तक वाचल्याचे समाधान आपल्या चेहऱ्यावर असते,ते सर्व आपल्या चेहऱ्यावर आलेला ग्लो स्पष्ट करत असतो,पण..पण.., इथेही मी म्हणेल साहित्याशी ज्यांची नाळ जोडली आहे किंवा पुढे आयुष्यात ज्यांनी त्याला जवळ केलं आहे त्यांनीच हे पुस्तक वाचावे.कारण उगाच चेहऱ्यावर खोटे भाव आणुन हे पुस्तक वाचणे शक्य नाही,ते कळणेही तितके सोप्पे नाही,त्यासाठी आपण तितकं पात्र असायला हवं,आपल्या विचारांनी तितकंच आपण प्रगल्भही असायला हवं....


थोडक्यात "अमृतवेल" बद्दल,

अलकनंदा एम.ए.शिकलेली हुशार,ध्येयवादी आणि गोड तरुणी.एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली,अाभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनीसारखं जपणारी माई,नंदा मावशी म्हणणारा तिच्या बहिणीचा मुलगा मिलिंद जो तिचा खूप लाडका आहे,हे छोटंसं तिचं विश्व...

दुसरीकडे आयुष्याची दोर विस्कटलेली आहे,सोबतच एक दुतर्फा दोन टोकांवर विसावलेला देवदत्त अन् वसुंधरा यांचा संसार,या संसाररुपी फुलावर उमलेले मधुरा नावाचं हळव्या जिवाचं फुल,या सगळ्यात त्यांच्या सोबत आपले माणसे 'पर्यायी' म्हणून राहणारे बापू व त्यांची बायको...
सोबतच देवदत्तची लायब्ररी,जीवापाड देवदत्त जिच्यावर प्रेम करतो ते गळ्यात गुंघराची माळ घातलेलं चंचल नावाचं हरिणीचं गोड पाडस या सर्वांभोवती फीरणारी ही विस्कटलेल्या संसाराची व संसार सुरु होण्यापुर्वी संपलेल्या अलकनंदाची गोष्ट....
वाचुन बघावी इतकी सुंदर कादंबरी..!

मी कांदबरीचे स्वरुप अगदी मोजक्या शब्दात लिहलं,का तर प्रत्येक क्षणाला कादंबरी वाचताना पुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटू लागते.हिच उत्सुकता,कथेचा संपूर्ण रसस्वाद घेण्याकरता यातील पात्र आणि घटना हळूहळू उलगडण्यातच खरी गंमत आहे.आणी तीच किमया खांडेकरांच्या लेखणीने केली आहे,यांत कांदबरीला साज येण्यासाठी विलासपूरचा वाडा, देवदत्ताची लायब्ररी,गड अश्या सर्वच वास्तू डोळ्यांसमोर येतात वाचकाला खिळवुन ठेवतात.

हेमिंग्वे-विवेकानंद,सावित्री-हॅम्लेटची आई अश्या या वैचारीक पात्रातुन कादंबरीला,कथेला या पात्राशी जोडु बघणे सर्वच संदर्भातून खांडेकरांची वैचारिक भूमिका मांडण्याची आगळीवेगळी पद्धत दिसून येते.नकळत मग कादंबरीच्या शेवटी एक सुंदर कादंबरी वाचल्याचं आपलं मन आपल्याला सांगु बघतं,चेहय्रावरचे भाव ते अधिकच स्पष्ट रुपाने व्यक्त करतात....

Written by,
Bharat.L.Sonawane.
(Aurangabad).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड