मुख्य सामग्रीवर वगळा

अमृतवेल- वि.स.खांडेकर.


अमृतवेल  - वि.स.खांडेकर.


वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.
वि.स.खांडेकर यांच्या लिखाणाशी ओळख झाली ती "ययाती" च्या माध्यमातून परंतु कदाचित "ययाती" न कळत्या वयात वाचायला धजावू नये असे मला वाटतं.कारण खूप लहान वयात ही वाचायला घेतली,ज्यावेळी की माझी साहित्याशी कुठलीही ओळख नव्हती.मग तिचं ओझरते वाचन,अलंकारिक वाक्यरचना हे सर्व कळेनासे झाले....

आज कित्येक दिवसांनी जेव्हा साहित्यातील "स" या शब्दाची मला ओळख होते आहे,तेव्हा आज "वि.स.खांडेकर" यांची "अमृतवेल" ही कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.तित काही प्रमाणात असलेली अलंकारिक शब्दांची वाक्यरचना माझ्याशी हितगुज करू लागली..."अमृतवेल" या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं..!" याचा प्रत्यय कादंबरीच्या उत्तरार्धात जातांना वाक्यागनिक आपल्याला येऊ लागतो.

"अमृतवेल" कादंबरीतील प्रत्येक पात्र हे "वि.स.खांडेकरांनी" खूप सुंदररित्या आपल्या लेखणीतून उतरवले आहे,जे सर्व आपल्याला जवळची वाटतात.ज्यांच्या सोबत आपल्या आयुष्यातील हितगुज देवदत्तप्रमाणे आपण व्यक्त करावे किंवा एकाकी पडलेल्या वसुंधराप्रमाणे कुणाची सोबत हवी म्हणून अलकनंदा सारखी मैत्रीण आपल्याला मिळावी किंवा आभाळासारखी माया करणारी आई व प्रेम करणारे दादा हे सर्वस्वी खूप सुंदर आहे....

जेव्हा "अमृतवेल" शेवटच्या पानावर आपण वाचत असतो त्यावेळी,नक्कीच एक सुंदर पुस्तक वाचल्याचे समाधान आपल्या चेहऱ्यावर असते,ते सर्व आपल्या चेहऱ्यावर आलेला ग्लो स्पष्ट करत असतो,पण..पण.., इथेही मी म्हणेल साहित्याशी ज्यांची नाळ जोडली आहे किंवा पुढे आयुष्यात ज्यांनी त्याला जवळ केलं आहे त्यांनीच हे पुस्तक वाचावे.कारण उगाच चेहऱ्यावर खोटे भाव आणुन हे पुस्तक वाचणे शक्य नाही,ते कळणेही तितके सोप्पे नाही,त्यासाठी आपण तितकं पात्र असायला हवं,आपल्या विचारांनी तितकंच आपण प्रगल्भही असायला हवं....


थोडक्यात "अमृतवेल" बद्दल,

अलकनंदा एम.ए.शिकलेली हुशार,ध्येयवादी आणि गोड तरुणी.एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली,अाभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनीसारखं जपणारी माई,नंदा मावशी म्हणणारा तिच्या बहिणीचा मुलगा मिलिंद जो तिचा खूप लाडका आहे,हे छोटंसं तिचं विश्व...

दुसरीकडे आयुष्याची दोर विस्कटलेली आहे,सोबतच एक दुतर्फा दोन टोकांवर विसावलेला देवदत्त अन् वसुंधरा यांचा संसार,या संसाररुपी फुलावर उमलेले मधुरा नावाचं हळव्या जिवाचं फुल,या सगळ्यात त्यांच्या सोबत आपले माणसे 'पर्यायी' म्हणून राहणारे बापू व त्यांची बायको...
सोबतच देवदत्तची लायब्ररी,जीवापाड देवदत्त जिच्यावर प्रेम करतो ते गळ्यात गुंघराची माळ घातलेलं चंचल नावाचं हरिणीचं गोड पाडस या सर्वांभोवती फीरणारी ही विस्कटलेल्या संसाराची व संसार सुरु होण्यापुर्वी संपलेल्या अलकनंदाची गोष्ट....
वाचुन बघावी इतकी सुंदर कादंबरी..!

मी कांदबरीचे स्वरुप अगदी मोजक्या शब्दात लिहलं,का तर प्रत्येक क्षणाला कादंबरी वाचताना पुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटू लागते.हिच उत्सुकता,कथेचा संपूर्ण रसस्वाद घेण्याकरता यातील पात्र आणि घटना हळूहळू उलगडण्यातच खरी गंमत आहे.आणी तीच किमया खांडेकरांच्या लेखणीने केली आहे,यांत कांदबरीला साज येण्यासाठी विलासपूरचा वाडा, देवदत्ताची लायब्ररी,गड अश्या सर्वच वास्तू डोळ्यांसमोर येतात वाचकाला खिळवुन ठेवतात.

हेमिंग्वे-विवेकानंद,सावित्री-हॅम्लेटची आई अश्या या वैचारीक पात्रातुन कादंबरीला,कथेला या पात्राशी जोडु बघणे सर्वच संदर्भातून खांडेकरांची वैचारिक भूमिका मांडण्याची आगळीवेगळी पद्धत दिसून येते.नकळत मग कादंबरीच्या शेवटी एक सुंदर कादंबरी वाचल्याचं आपलं मन आपल्याला सांगु बघतं,चेहय्रावरचे भाव ते अधिकच स्पष्ट रुपाने व्यक्त करतात....

Written by,
Bharat.L.Sonawane.
(Aurangabad).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...