मुख्य सामग्रीवर वगळा

फकिरा

"फकिरा"
लेखक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ओळख मराठी साहित्यात सर्व प्रथम झाली ती "स्मशानातील सोनं" या कथेमुळे झाली आजही ही कथा कथेतील पात्र भीमा मनात इतके घर करून आहे की कित्येकदा वाचूनही वाचत राहावी अशी ही कथा आज तिला साजेशी "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांची "फकिरा" ही कादंबरी वाचली...

"फकिरा" "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे"  लिखित ही कादंबरी,१९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार फकिरा या कादंबरीला मिळाला.या कांदबरीत "फकिरा" नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा "फकिरा" आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे....

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहल्या,ज्यात जगण्यासाठी असलेला संघर्ष हा आहेच,कादंबरीला वि.स.खांडेकरांची यांनी दिलेली प्रस्तावना खुप सुंदर अन् पुस्तकाला बोलके करणारी आहे.प्रस्तावनेत ते म्हणतात,अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे.शोषणाविरुद्ध बंड करणारे आण्णाभाऊ साठे.या कादंबरीच्या प्रस्तावनेत ते सांगतात,ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही.प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल,तर प्रतिभा,अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत,असा माझा अनुभव आहे.सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. 

अण्णाभाऊंच्या या "फकीरा" कादंबरी मध्ये नैतिकतेचे अनेक उदाहरणे आपल्याला वाचायला भेटतात,मग ते गावासाठी जत्रा भरावी म्हणुन पिढीदर पिढी,साल दर साल चालत असलेल्या भर जत्रेतून आपल्या पराक्रमाने आपल्या गावात जत्रा भरावी म्हणुन खोबऱ्याची वाटी घेऊन येताना मरण आलेल्या बापाचा बदला घेणे असो की,मित्राच्या संरक्षासाठी काळरात्रीला शत्रूवर तुटून पडणे,आपल्या माणसाला दरोडेखोर म्हणुन इंग्रज शासनाने डांबून ठेवल्यावर त्याला सोडवून आणणे असे अनेक उदाहरणे आपल्याला "फकिरा" कादंबरीत पाहायला  मिळते...
 
गोरगरिबांचा नायक नजरेसमोर ठेवणारी 'फकिरा' कादंबरी मराठी साहित्यात विश्वात खुप मोलाची अन् महत्त्वाची समजली जाते अन् ती आहे सुद्धा.कादंबरीच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत.भारतीय भाषांसह अनेक इतर अनेक देशांच्या भाषेत फकिरा अनुवादित झाली आहे.

समाजात बदल,विचारांची क्रांती घडवुन आणणारी कादंबरी म्हणून 'फकिरा' कायम वाचणाऱ्यांचा मनात घर करून बसली आहे.'फकिरा' वंचित समाजातील अंधश्रद्धा,अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर भाष्य करू बघत आहे अन् यामुळे बऱ्याच अंशी समाजात परिवर्तन झालेही आहे. 

Written by,
Bharat Sonwane ....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...