मुख्य सामग्रीवर वगळा

फकिरा

"फकिरा"
लेखक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ओळख मराठी साहित्यात सर्व प्रथम झाली ती "स्मशानातील सोनं" या कथेमुळे झाली आजही ही कथा कथेतील पात्र भीमा मनात इतके घर करून आहे की कित्येकदा वाचूनही वाचत राहावी अशी ही कथा आज तिला साजेशी "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांची "फकिरा" ही कादंबरी वाचली...

"फकिरा" "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे"  लिखित ही कादंबरी,१९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार फकिरा या कादंबरीला मिळाला.या कांदबरीत "फकिरा" नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा "फकिरा" आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे....

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहल्या,ज्यात जगण्यासाठी असलेला संघर्ष हा आहेच,कादंबरीला वि.स.खांडेकरांची यांनी दिलेली प्रस्तावना खुप सुंदर अन् पुस्तकाला बोलके करणारी आहे.प्रस्तावनेत ते म्हणतात,अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे.शोषणाविरुद्ध बंड करणारे आण्णाभाऊ साठे.या कादंबरीच्या प्रस्तावनेत ते सांगतात,ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही.प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल,तर प्रतिभा,अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत,असा माझा अनुभव आहे.सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. 

अण्णाभाऊंच्या या "फकीरा" कादंबरी मध्ये नैतिकतेचे अनेक उदाहरणे आपल्याला वाचायला भेटतात,मग ते गावासाठी जत्रा भरावी म्हणुन पिढीदर पिढी,साल दर साल चालत असलेल्या भर जत्रेतून आपल्या पराक्रमाने आपल्या गावात जत्रा भरावी म्हणुन खोबऱ्याची वाटी घेऊन येताना मरण आलेल्या बापाचा बदला घेणे असो की,मित्राच्या संरक्षासाठी काळरात्रीला शत्रूवर तुटून पडणे,आपल्या माणसाला दरोडेखोर म्हणुन इंग्रज शासनाने डांबून ठेवल्यावर त्याला सोडवून आणणे असे अनेक उदाहरणे आपल्याला "फकिरा" कादंबरीत पाहायला  मिळते...
 
गोरगरिबांचा नायक नजरेसमोर ठेवणारी 'फकिरा' कादंबरी मराठी साहित्यात विश्वात खुप मोलाची अन् महत्त्वाची समजली जाते अन् ती आहे सुद्धा.कादंबरीच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत.भारतीय भाषांसह अनेक इतर अनेक देशांच्या भाषेत फकिरा अनुवादित झाली आहे.

समाजात बदल,विचारांची क्रांती घडवुन आणणारी कादंबरी म्हणून 'फकिरा' कायम वाचणाऱ्यांचा मनात घर करून बसली आहे.'फकिरा' वंचित समाजातील अंधश्रद्धा,अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर भाष्य करू बघत आहे अन् यामुळे बऱ्याच अंशी समाजात परिवर्तन झालेही आहे. 

Written by,
Bharat Sonwane ....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...