मुख्य सामग्रीवर वगळा

बनगरवाडी

बनगरवाडी.
-व्यंकटेश माडगूळकर.

लाल मातीचे फुफाट्याचे रान,हिवाळा सरला की भर उन्हाळ्यात पडणाऱ्या जमिनीला भेगा,बोडक्या रानासोबत बोडखी झालेली बाभूळ,बकऱ्या,बकऱ्या वळणारा गुराखी,मेंढ्या,मेंढ्या वळणारा मेंढपाळ, गाव रहाटीचं जगणं हे अनुभव सर्व माझ्या खूप जवळचे...
जरी त्यांच्या सानिध्यात जीवनातला कुठलाही क्षण जगत नसलो तरी अनुभवलेल्या क्षणांतून त्याच्या जीवनाचं वर्णन करणे हा माझा आवडता विषय,हे आजवर तुम्हाला माझ्या लिखाणातून कळाले असेलच...

तर हे वरील सर्व वर्णन करण्यास कारण की,आज या सर्व गोष्टींशी मिळतीजुळती "व्यंकटेश माडगुळकर" यांची "बनगरवाडी" ही कादंबरी वाचली.खूप सुंदर अशीही कादंबरी,'धनगर' समाजाच्या जीवन जगण्याची पद्धत व त्यांचा सहवास यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी...

वाचण्यासा खूप सोप्पी लिखाणात ग्रामीण बाज असलेली मराठी भाषा,त्यामुळे अजुनच आपल्याला आपलीशी वाटणारी ही कादंबरी.फार मोठीही नाही अवघ्या १३२ पानांची आहे.आज सकाळी फक्त तीन तासात वाचून पूर्ण झाली,दिवसभर ते विचार,बनगरवाडीच्या लोकांचे रोजचे जीवन माझ्या सभोवताली पिंगा घालत राहिले...

लहानपणी किंवा आताही भर हिवाळ्याच्या दिवसाला आमच्या इकडे मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन सुगीचे दिवस येण्यापूर्वी काहिदिवस पाल बांधुन वास्तव्य करतात.त्यामुळे त्यांच जीवन,राहणीमान हे बऱ्यापैकी जवळून अनुभवलेले आहे पण हे अनुभवलेले त्यांचे जीवन फिरस्तीवर असल्यावरचे.
त्यांचा गाव अन् त्यांचे त्या गावातील वास्तव्य हे कसे असेल हे आजवर मलाही माहित नव्हतं.हे सर्व आज "बनगरवाडी" च्या माध्यमातून वाचण्यात आले आणि सुखद जीवन सोबतच त्याला संघर्षाची जोड असलेलं जीवन कसे असते याचं जिवंत वर्णन या कादंबरीच्या माध्यमातून "व्यंकटेश माडगुळकर" यांनी केले आहे...

हो पण यातही फक्त इतपर्यंतच विषयाला धरून हे लेखन नाहीये,तर एक नव्याने नोकरीवरती रुजू झालेल्या शिक्षकाचे जीवन कसे असेल,पुन्हा खेड्यागावात शिक्षणाची गंगा वाहती करण्यासाठी त्याला किती अडचणींना तोंड द्यावे लागते,याचेही वर्णन या ठीकाणी कादंबरीत केलेलं आहे...

शिक्षकाला गावातील नागरिकांना आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणायचे हे समजून सांगणे,यासाठी त्याची नोकरी ही फक्त शाळेच्या वेळेपूर्ती मर्यादित न राहता गावातील एक प्रमुख नागरिक म्हणुन विविध भूमिका पार पाडाव्या लागणे.वेळोवेळी कधीतरी त्याला गावातील भांडणे सोडण्यासाठी वकील,पोलीस,बँकवाला,प्रमुख अधिकारी अश्या अनेक विविध भूमिका शिक्षकाला निभाव्या लागतात."बनगरवाडी" च्या नागरिकांसोबत विविध भूमिकेतील शिक्षकाचे नाते अनुभवण्यासाठी नक्कीच एकदा हे पुस्तक वाचायला हवं....

"बनगरवाडी"  मास्तर, कारभारी,आयबु, रामा,दादू बालट्या,शेकू,आनंदा रामोशी,बाळा बनगर,सता,अंजी,धुळा,काकूंबा,मेंढरं,मेंढके,मावल्याई देवी व यात्रा,गाडीवाट,वाटेवरचा धुरळा,मास्तरांची गावाविषयीची तळमळ आणि आपुलकी व गावाचा मास्तरांविषयीचा आदर,आणि शेवटी दुष्काळ,शाळा पण बंद,मास्तरांची बदली,राहिले फक्त काकूबा त्याची दोन मेंढरे आणि सून व धूळ चढलेली घरे, छपरे,आंगणे,तालीम आणि शाळा. शेवटी डोळे ओले झाले आणि ही सर्व माणसे आपलीच आणि आपण इथे त्यांच्याबरोबर जगल्याची भावना निर्माण झाली....

खुप सुंदर अशी ही कादंबरी...

Written by,
©®Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...