मुख्य सामग्रीवर वगळा

बनगरवाडी

बनगरवाडी.
-व्यंकटेश माडगूळकर.

लाल मातीचे फुफाट्याचे रान,हिवाळा सरला की भर उन्हाळ्यात पडणाऱ्या जमिनीला भेगा,बोडक्या रानासोबत बोडखी झालेली बाभूळ,बकऱ्या,बकऱ्या वळणारा गुराखी,मेंढ्या,मेंढ्या वळणारा मेंढपाळ, गाव रहाटीचं जगणं हे अनुभव सर्व माझ्या खूप जवळचे...
जरी त्यांच्या सानिध्यात जीवनातला कुठलाही क्षण जगत नसलो तरी अनुभवलेल्या क्षणांतून त्याच्या जीवनाचं वर्णन करणे हा माझा आवडता विषय,हे आजवर तुम्हाला माझ्या लिखाणातून कळाले असेलच...

तर हे वरील सर्व वर्णन करण्यास कारण की,आज या सर्व गोष्टींशी मिळतीजुळती "व्यंकटेश माडगुळकर" यांची "बनगरवाडी" ही कादंबरी वाचली.खूप सुंदर अशीही कादंबरी,'धनगर' समाजाच्या जीवन जगण्याची पद्धत व त्यांचा सहवास यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी...

वाचण्यासा खूप सोप्पी लिखाणात ग्रामीण बाज असलेली मराठी भाषा,त्यामुळे अजुनच आपल्याला आपलीशी वाटणारी ही कादंबरी.फार मोठीही नाही अवघ्या १३२ पानांची आहे.आज सकाळी फक्त तीन तासात वाचून पूर्ण झाली,दिवसभर ते विचार,बनगरवाडीच्या लोकांचे रोजचे जीवन माझ्या सभोवताली पिंगा घालत राहिले...

लहानपणी किंवा आताही भर हिवाळ्याच्या दिवसाला आमच्या इकडे मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन सुगीचे दिवस येण्यापूर्वी काहिदिवस पाल बांधुन वास्तव्य करतात.त्यामुळे त्यांच जीवन,राहणीमान हे बऱ्यापैकी जवळून अनुभवलेले आहे पण हे अनुभवलेले त्यांचे जीवन फिरस्तीवर असल्यावरचे.
त्यांचा गाव अन् त्यांचे त्या गावातील वास्तव्य हे कसे असेल हे आजवर मलाही माहित नव्हतं.हे सर्व आज "बनगरवाडी" च्या माध्यमातून वाचण्यात आले आणि सुखद जीवन सोबतच त्याला संघर्षाची जोड असलेलं जीवन कसे असते याचं जिवंत वर्णन या कादंबरीच्या माध्यमातून "व्यंकटेश माडगुळकर" यांनी केले आहे...

हो पण यातही फक्त इतपर्यंतच विषयाला धरून हे लेखन नाहीये,तर एक नव्याने नोकरीवरती रुजू झालेल्या शिक्षकाचे जीवन कसे असेल,पुन्हा खेड्यागावात शिक्षणाची गंगा वाहती करण्यासाठी त्याला किती अडचणींना तोंड द्यावे लागते,याचेही वर्णन या ठीकाणी कादंबरीत केलेलं आहे...

शिक्षकाला गावातील नागरिकांना आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणायचे हे समजून सांगणे,यासाठी त्याची नोकरी ही फक्त शाळेच्या वेळेपूर्ती मर्यादित न राहता गावातील एक प्रमुख नागरिक म्हणुन विविध भूमिका पार पाडाव्या लागणे.वेळोवेळी कधीतरी त्याला गावातील भांडणे सोडण्यासाठी वकील,पोलीस,बँकवाला,प्रमुख अधिकारी अश्या अनेक विविध भूमिका शिक्षकाला निभाव्या लागतात."बनगरवाडी" च्या नागरिकांसोबत विविध भूमिकेतील शिक्षकाचे नाते अनुभवण्यासाठी नक्कीच एकदा हे पुस्तक वाचायला हवं....

"बनगरवाडी"  मास्तर, कारभारी,आयबु, रामा,दादू बालट्या,शेकू,आनंदा रामोशी,बाळा बनगर,सता,अंजी,धुळा,काकूंबा,मेंढरं,मेंढके,मावल्याई देवी व यात्रा,गाडीवाट,वाटेवरचा धुरळा,मास्तरांची गावाविषयीची तळमळ आणि आपुलकी व गावाचा मास्तरांविषयीचा आदर,आणि शेवटी दुष्काळ,शाळा पण बंद,मास्तरांची बदली,राहिले फक्त काकूबा त्याची दोन मेंढरे आणि सून व धूळ चढलेली घरे, छपरे,आंगणे,तालीम आणि शाळा. शेवटी डोळे ओले झाले आणि ही सर्व माणसे आपलीच आणि आपण इथे त्यांच्याबरोबर जगल्याची भावना निर्माण झाली....

खुप सुंदर अशी ही कादंबरी...

Written by,
©®Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...