मुख्य सामग्रीवर वगळा

समांतर- सुहास शिरवळकर.

समांतर...
लेखक - सुहास शिरवळकर.

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते....

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांची "समांतर" ही कादंबरी काल वाचली.एकूण 197 पानांची असलेली ही कादंबरी आपल्याला अनेक वळणांवर फिरून आणते,कधीतरी ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाते तर कधी आपले जीवन भविष्य काळात किती सुखकर यासाठी वर्तमान काळात आपल्याला आपल्या विचारांशी तडजोड करायला लावते....
"सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेली खूप उंचीची ही कादंबरी आहे जी की प्रत्येकाने वाचायला हवी...

मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती.इथंच काय,या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो.वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली...
'त्याचं मन मोडायचं नाही,म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही..! "सुहास शिरवळकर" यांची ही आणखी एक समांतर कादंबरी आपल्याला एका वेगळ्या जगात नेऊन सोडते...
 
भविष्य पाहण्यात विशेष रस नसणारा पण मित्राच्या हट्टापोटी कादंबरीचा नायक कुमार महाजन एक साधु बाबाकडे जातो,त्या चाळेची असलेली अवस्था मरगाईला आलेली ती शेवटची घटका मोजनारी चाळ.पावलांना सावरत कुमार व त्यांच्या मित्राचे तिथं जाणे,दरवाज्याच्या समोर बसलेली वृध्द बाई जी आंबा खाते आहे. साधुबाबाने कुमार यांचा हात बघणे,हातावर असलेल्या भविष्य दर्शिविनाऱ्या रेषा पूर्वाश्रमीच्या एका व्यक्तीशी जुळून येणे त्याचे भविष्य जाणून असल्याने साधू बाबांचे कुमार यांचे नशीब न बघणे...

परिस्थितीपुढे हतबल असलेला कुमार त्रागा करून तिथून निघणार इतक्यात ज्योतिषी त्याला २५-३० वर्षांपूर्वी कोणी चक्रपाणी व्यक्तीचा हात कसा कुमारच्या हाताशी तंतोतंत मिळता सांगतो. 
तिथून चक्रपाणी चा शोध हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून कुमार कामाला लागतो. बऱ्याच संकटाना तोंड देत एकदाचं चक्रपाणी ची भेट होते. दोघांच्या भूतकाळातील गोष्टींमधे किती साधर्म्य आहे हे जाणताच दोघे चाट पडतात. 
चक्रपाणीचा भूतकाळ हे कुमारच भविष्य आहे. 

खूप फिरल्यानंतर चक्रपाणी कुमारला भेटणे,त्यासाठी त्याला करायला लागणारा प्रवास विचारपूस हे थक्क करणारे आहे.पुढे काय होणार,उद्या काय होणार,परवा काय होणार,शेवटी काय होणार अशी उत्कंठा लागते; पण शेवट मात्र अधांतरीच असतो.कारण या कादंबरीतील पात्रे समांतर आयुष्य जगत असतात.समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय अधिच्याला मुक्ती मिळत नाही.शेवटी चक्रपाणीची होणारी सुटका अन् चक्रपाणी ज्या ठिकाणी वास्तव्यास असतो तिथे कुमारचे जाणे...
हे नेमकं काय आहे, यासाठी कादंबरी वाचायला हवी....

Written by
Bharat Laxman Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...