मुख्य सामग्रीवर वगळा

समांतर- सुहास शिरवळकर.

समांतर...
लेखक - सुहास शिरवळकर.

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते....

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांची "समांतर" ही कादंबरी काल वाचली.एकूण 197 पानांची असलेली ही कादंबरी आपल्याला अनेक वळणांवर फिरून आणते,कधीतरी ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाते तर कधी आपले जीवन भविष्य काळात किती सुखकर यासाठी वर्तमान काळात आपल्याला आपल्या विचारांशी तडजोड करायला लावते....
"सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेली खूप उंचीची ही कादंबरी आहे जी की प्रत्येकाने वाचायला हवी...

मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती.इथंच काय,या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो.वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली...
'त्याचं मन मोडायचं नाही,म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही..! "सुहास शिरवळकर" यांची ही आणखी एक समांतर कादंबरी आपल्याला एका वेगळ्या जगात नेऊन सोडते...
 
भविष्य पाहण्यात विशेष रस नसणारा पण मित्राच्या हट्टापोटी कादंबरीचा नायक कुमार महाजन एक साधु बाबाकडे जातो,त्या चाळेची असलेली अवस्था मरगाईला आलेली ती शेवटची घटका मोजनारी चाळ.पावलांना सावरत कुमार व त्यांच्या मित्राचे तिथं जाणे,दरवाज्याच्या समोर बसलेली वृध्द बाई जी आंबा खाते आहे. साधुबाबाने कुमार यांचा हात बघणे,हातावर असलेल्या भविष्य दर्शिविनाऱ्या रेषा पूर्वाश्रमीच्या एका व्यक्तीशी जुळून येणे त्याचे भविष्य जाणून असल्याने साधू बाबांचे कुमार यांचे नशीब न बघणे...

परिस्थितीपुढे हतबल असलेला कुमार त्रागा करून तिथून निघणार इतक्यात ज्योतिषी त्याला २५-३० वर्षांपूर्वी कोणी चक्रपाणी व्यक्तीचा हात कसा कुमारच्या हाताशी तंतोतंत मिळता सांगतो. 
तिथून चक्रपाणी चा शोध हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून कुमार कामाला लागतो. बऱ्याच संकटाना तोंड देत एकदाचं चक्रपाणी ची भेट होते. दोघांच्या भूतकाळातील गोष्टींमधे किती साधर्म्य आहे हे जाणताच दोघे चाट पडतात. 
चक्रपाणीचा भूतकाळ हे कुमारच भविष्य आहे. 

खूप फिरल्यानंतर चक्रपाणी कुमारला भेटणे,त्यासाठी त्याला करायला लागणारा प्रवास विचारपूस हे थक्क करणारे आहे.पुढे काय होणार,उद्या काय होणार,परवा काय होणार,शेवटी काय होणार अशी उत्कंठा लागते; पण शेवट मात्र अधांतरीच असतो.कारण या कादंबरीतील पात्रे समांतर आयुष्य जगत असतात.समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय अधिच्याला मुक्ती मिळत नाही.शेवटी चक्रपाणीची होणारी सुटका अन् चक्रपाणी ज्या ठिकाणी वास्तव्यास असतो तिथे कुमारचे जाणे...
हे नेमकं काय आहे, यासाठी कादंबरी वाचायला हवी....

Written by
Bharat Laxman Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...