मुख्य सामग्रीवर वगळा

केवडी..!

केवडी..!

नभ डोंगरांगाच्या कुशीत उतरू लागले होते,सायंकाळची वेळ अस्ताला जाणारा सूर्य ढगा आड लपून प्रकाशाला भुलवित मावळतिला आला होता.लाल,तांबूस रंगाच्या प्रकाश झोतात वाळलेले गवत सोनेरी सोनेरी रंगाची शाल लेवून माळरानात चहूकडे आपल्या अस्तित्वाच्या पुसटश्या खुणा सोडुन पावसाची वाट बघत विसावले होते,त्याची काही दिवसांची सोबत आता मग पुन्हा माळरान जावळं काढलेल्या लहानग्या पोऱ्याप्रमाणे भासू लागणार....

दूरवर रामू गुराख्याच्या राखणीला म्हणून ठेवलेल्या बकऱ्या चरू लागल्या होत्या,गुराखी त्यांना नजरेसमोर ठेवून बाभळीच्या पडसावलीत विसावला होता.दूरवरून शिवा मोहरच्या गावातून येणारी वराटे-पाटे विकणारी सुली नजरेला दिसू लागली,उन्हाच्या काहिलीत कधीतरी ती झळईत स्पष्ट,अस्पष्ट दिसत होती...

दूरवर असलेल्या धरणात पाणी नसल्याने धोंडू धनगर आपल्या मेंढ्यांच्या कळपाला घेऊन रहात होता,शंभर एक मेंढरं अन् पाच सहा कंबरा एव्हढे कुत्रे त्यानं पाळले होते.पावसाचा अंदाज बघून त्यानं मेंढर राखणीला केलेल्या जागेत कळपात बांधली,राणाई चुल्हीवर भाकरी बडवित होती भाकरी बडविण्याचा आवाज माझ्या पहतुर धरणाच्या पाळी पहूर येत होता....

शांत असलेला वारा एकाकी सुरू झाला वावठळ उठली,तसा रामू गुराखी टोपी सावरत उठला अन्  दूरवर गेलेल्या बकऱ्यांना शिळ घालुन बोलवू लागला...
अय केवढी चाल चाल...
च्यायची केवढे चाल की....

भर वाऱ्यात सूली गावचा रस्ता जवळ करत होती,बहुतेक ती शिवा महुर असलेल्या पारावर काहीवेळ विसावा घेईल,वावधन जावू देईल असं मनचे मनाला वाटत होते.धोंडू धनगरानी मेंढ्या मध्ये घेतल्या अन् वाऱ्याचा वेग पाहून कुत्रे पिसाळल्यागत कुणाची मौत पडल्यागत उंच आवाजात भू..... असं इवळत होती

Written by,
Bharat Sonwane ....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड