मुख्य सामग्रीवर वगळा

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..!

मला उध्वस्त व्हायचंय..!

"मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी...

कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख. 
खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..?
हा ही एक प्रश्न मला पडला आहे... 

तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक चळवळीचा कर्ता म्हणुन आपण नामदेव ढसाळ यांच्याकडे ज्या नजरेनं बघतो ते संसारात मात्र तसेही असेल जसे त्यांनी या चरित्रातून समोर आणले आहेत,पण हे ही तितकं मनाला पटणारे नाही...

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पहाडी आवाज म्हणुन ओळखले जाणारे असे शाहीर अमर शेख (भाई) ह्यांच्या त्या कन्या.लहानपणापासून सतत कवी,विचारवंत,गायक,कलाकार यांचा राबता त्यामुळे मनावर तत्त्वनिष्ठ विचारांचे लहानपणापासूनच संस्कार झाले आहेत.जातीवाद,धर्म या बेगडीच्या विळख्यात न अडकलेल्या सुशिक्षत,यात नशीब म्हणावं की काही वेगळं तीन महीन्यांच्या असतानाच प्लूरसीचा आजार झाल्याने सतत आजारपण अन त्या आजारपणातून आलेला एकाकीपण घालवण्यासाठी कवितेचा घेतलेला आधार,अवघ्या सात वर्षांच्या असतानाच त्यांनी आपली पहीली कविता लिहली आहे.सर्व काही आलबेल असताना वडिलांचा होणारा अपघाती मृत्य,बहिणीचे जाती,धर्माच्या चौकटी लांगुन केलेले लग्न अन् मग पुढं जगलेले आयुष्य..

नामदेव ढसाळ आणि मल्लिका अमरशेख ह्या दोन वेगवेगळ्या विचारप्रवाहांची ही गाथा आहे.नुस्त प्रेमाने कवीता केल्याने पोट भरत नाही,त्यासाठी दोघांची विचारही जुळायला हवे अन् नेमकं यांच्या बाबतीत तेच घडलं मग सामोरी येणारी वस्तुस्थिती जी खुप वाईट आहे.अन् याच वस्तुस्थितीला स्वीकारत नाक दाबून हुंदके देण्यासारखी झालेली मल्लिका अमरशेख यांची अवस्था...

मग पुढं या सर्व स्थितीला संसार या शब्दाच्या पलिकडे जावून लिखाणातून व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न,अन् आशुच्या जन्माबरोबर जन्म घेणारे "मला उध्वस्त व्हायचय" हे पुस्तक.

समाजातल्या पुरुषी वर्चस्वाबद्दलचा हा लढा आहे,हे सर्व भेदून त्या पल्याडचे आयुष्य जगण्यासाठी लेखिकने कैद केलेले काही उध्वस्त क्षण...

Written by,
Bharat sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...