मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे स्वगत..!

 मनाचे स्वगत..!

 
दुपार सरून संध्याकाळ येते सूर्याला अस्ताला जातांना बघणे होते, रस्त्यावरची माणसेकम वाहनांची वर्दळही डोळ्यात साठवत राहतो.सध्या खिडकीच्या आत असलेल्या विश्वातील जग अन् खिडकी बाहेर दिसणारं विश्व यातील तफावत जाणवू लागली आहे...

पक्षांच ऊंच आकाशात मुक्तपणे सैर करणं आता अंगावर यायला लागलंय,होय अंगावर यायला लागलंय.कारण आता सर्वच खुप वेगळ्या पध्दतीनं नजरेसमोर दिसु लागलंय,ऐरवी आकाशात मुक्तपणे सैर करणारे पाखरं आपण पिंजय्रात कैद करून ठेवत होतो.पण काळ बदलला अन नियतीनं,निसर्गानं माणसाला त्याची जागा दाखवुन दिली.माणुस चार भिंतीच्या आत स्वत:हुन बंदिस्त झाला अन मानवाने पिंजय्रात ठेवलेली पाखरं मात्र आसमंतात मुक्तपणे सैर करू लागले...

दिवसभर काय करावं..? हा एकच प्रश्न सतावत असतो घरात जे काही आहे ते सर्व वाचुन झालंय,बय्राच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या त्या शिकुन झाल्या आहेत.दिवसभर नजर रस्त्याला लागुन असते,येणारा जाणारा एक अर्धा ओळखीचा की अनोळखीचा मनाच्या प्रश्नाला उत्तरं देऊन मनही आता थकलं आहे...

गेलेली वेळ पुन्हा येत नसते हे मनाला कळते आहे,तरी हतबल होवुन मनाच्या विरोधात निर्णय घेऊन शांत अन शांत बसून राहतोय.बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत,ज्या तारुण्यात आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या असतात पण त्याही वेळी मला Move on करायला जमलं नाहीये...
अन् कदाचित अजूनतरी काही महिने ही परिस्थिती बदलणार नाही,हे ही कळून चुकलंय...

सध्या इतकंच करू शकतो आपण स्वतःची काळजी स्वतः घेणं सोबतच आपल्या माणसांची,एकांताशी मैत्री करून मनाला सामोऱ्या परिस्थितीशी दोन हात करायला जमलं की खूप काही जमलं आहे.
गेलेली वेळ ज्याप्रमाणे पुन्हा येणार नाहीये,त्याचप्रमाणे या वाईट काळात आपण आपल्याला जपलं तर भविष्य,भविष्यातील स्वप्न आता आपण वर्तमान काळात बघू शकतो.
पण त्यासाठी आपल्याला तितकेच स्वतःला जपायचे आहे...

हे असं लिहायला हात धजावत नाही पण मनातलं ओठांवर आल्याशिवायही रहाते कुठे...

Written by,
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...