मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे स्वगत..!

 मनाचे स्वगत..!

 
दुपार सरून संध्याकाळ येते सूर्याला अस्ताला जातांना बघणे होते, रस्त्यावरची माणसेकम वाहनांची वर्दळही डोळ्यात साठवत राहतो.सध्या खिडकीच्या आत असलेल्या विश्वातील जग अन् खिडकी बाहेर दिसणारं विश्व यातील तफावत जाणवू लागली आहे...

पक्षांच ऊंच आकाशात मुक्तपणे सैर करणं आता अंगावर यायला लागलंय,होय अंगावर यायला लागलंय.कारण आता सर्वच खुप वेगळ्या पध्दतीनं नजरेसमोर दिसु लागलंय,ऐरवी आकाशात मुक्तपणे सैर करणारे पाखरं आपण पिंजय्रात कैद करून ठेवत होतो.पण काळ बदलला अन नियतीनं,निसर्गानं माणसाला त्याची जागा दाखवुन दिली.माणुस चार भिंतीच्या आत स्वत:हुन बंदिस्त झाला अन मानवाने पिंजय्रात ठेवलेली पाखरं मात्र आसमंतात मुक्तपणे सैर करू लागले...

दिवसभर काय करावं..? हा एकच प्रश्न सतावत असतो घरात जे काही आहे ते सर्व वाचुन झालंय,बय्राच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या त्या शिकुन झाल्या आहेत.दिवसभर नजर रस्त्याला लागुन असते,येणारा जाणारा एक अर्धा ओळखीचा की अनोळखीचा मनाच्या प्रश्नाला उत्तरं देऊन मनही आता थकलं आहे...

गेलेली वेळ पुन्हा येत नसते हे मनाला कळते आहे,तरी हतबल होवुन मनाच्या विरोधात निर्णय घेऊन शांत अन शांत बसून राहतोय.बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत,ज्या तारुण्यात आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या असतात पण त्याही वेळी मला Move on करायला जमलं नाहीये...
अन् कदाचित अजूनतरी काही महिने ही परिस्थिती बदलणार नाही,हे ही कळून चुकलंय...

सध्या इतकंच करू शकतो आपण स्वतःची काळजी स्वतः घेणं सोबतच आपल्या माणसांची,एकांताशी मैत्री करून मनाला सामोऱ्या परिस्थितीशी दोन हात करायला जमलं की खूप काही जमलं आहे.
गेलेली वेळ ज्याप्रमाणे पुन्हा येणार नाहीये,त्याचप्रमाणे या वाईट काळात आपण आपल्याला जपलं तर भविष्य,भविष्यातील स्वप्न आता आपण वर्तमान काळात बघू शकतो.
पण त्यासाठी आपल्याला तितकेच स्वतःला जपायचे आहे...

हे असं लिहायला हात धजावत नाही पण मनातलं ओठांवर आल्याशिवायही रहाते कुठे...

Written by,
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...