मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे स्वगत..!

 मनाचे स्वगत..!

 
दुपार सरून संध्याकाळ येते सूर्याला अस्ताला जातांना बघणे होते, रस्त्यावरची माणसेकम वाहनांची वर्दळही डोळ्यात साठवत राहतो.सध्या खिडकीच्या आत असलेल्या विश्वातील जग अन् खिडकी बाहेर दिसणारं विश्व यातील तफावत जाणवू लागली आहे...

पक्षांच ऊंच आकाशात मुक्तपणे सैर करणं आता अंगावर यायला लागलंय,होय अंगावर यायला लागलंय.कारण आता सर्वच खुप वेगळ्या पध्दतीनं नजरेसमोर दिसु लागलंय,ऐरवी आकाशात मुक्तपणे सैर करणारे पाखरं आपण पिंजय्रात कैद करून ठेवत होतो.पण काळ बदलला अन नियतीनं,निसर्गानं माणसाला त्याची जागा दाखवुन दिली.माणुस चार भिंतीच्या आत स्वत:हुन बंदिस्त झाला अन मानवाने पिंजय्रात ठेवलेली पाखरं मात्र आसमंतात मुक्तपणे सैर करू लागले...

दिवसभर काय करावं..? हा एकच प्रश्न सतावत असतो घरात जे काही आहे ते सर्व वाचुन झालंय,बय्राच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या त्या शिकुन झाल्या आहेत.दिवसभर नजर रस्त्याला लागुन असते,येणारा जाणारा एक अर्धा ओळखीचा की अनोळखीचा मनाच्या प्रश्नाला उत्तरं देऊन मनही आता थकलं आहे...

गेलेली वेळ पुन्हा येत नसते हे मनाला कळते आहे,तरी हतबल होवुन मनाच्या विरोधात निर्णय घेऊन शांत अन शांत बसून राहतोय.बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत,ज्या तारुण्यात आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या असतात पण त्याही वेळी मला Move on करायला जमलं नाहीये...
अन् कदाचित अजूनतरी काही महिने ही परिस्थिती बदलणार नाही,हे ही कळून चुकलंय...

सध्या इतकंच करू शकतो आपण स्वतःची काळजी स्वतः घेणं सोबतच आपल्या माणसांची,एकांताशी मैत्री करून मनाला सामोऱ्या परिस्थितीशी दोन हात करायला जमलं की खूप काही जमलं आहे.
गेलेली वेळ ज्याप्रमाणे पुन्हा येणार नाहीये,त्याचप्रमाणे या वाईट काळात आपण आपल्याला जपलं तर भविष्य,भविष्यातील स्वप्न आता आपण वर्तमान काळात बघू शकतो.
पण त्यासाठी आपल्याला तितकेच स्वतःला जपायचे आहे...

हे असं लिहायला हात धजावत नाही पण मनातलं ओठांवर आल्याशिवायही रहाते कुठे...

Written by,
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड