मुख्य सामग्रीवर वगळा

Book's..!!! जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन..!

Book's..!!!
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन..!
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो.वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर आहे.युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात,लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले.
हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला....

काल जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन होवुन गेला,विविध माध्यमातून,सोशल मीडिया अन् इतर प्ल्याटफॉर्मवरती अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहले गेले,वाचल्या गेले.मुळात पुस्तक दिन साजरा करणे हे मला न रुचणारे किंवा न पटणारे आहे...

कारण पुस्तकाला कुठलाही एक दिवस नसावा,पुस्तकांसाठी आपला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा असावा असे मला वाटत.पुस्तके ही प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची असतात. कारण पुस्तके ही ज्ञानाचा समुद्र आहेत जी आपल्याला ज्ञान देतात.
वरील कारण बघता ते ही योग्य वाटतं,अगदीच की लेखकांचा सन्मान व्हावा कारण की तो फक्त एक पुस्तक लिहत नसतो तर कधीतरी खुप अभ्यास करून किंवा कल्पनेच्या सहायाने तो आपल्या मनातलं,जगातलं भुत,भविष्य,वर्तमान लिखाणात तो कैद करत असतो. ज्यामुळे की एक पिढी घडत असते,सोबतीला एक पुस्तक तयार होत असते जे की पुढील अनेक पिढ्यांना आयुष्याचे संदर्भ लावण्यासाठी,त्या पिढीला घडवण्यासाठी महत्वाचे ठरते...

जागतिक पुस्तक दिनी पुस्तकाच्या,वाचनाच्या अनेक व्याख्या केल्या जातील,जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपल्या आयुष्यात आपण पुस्तकाला कुठे स्थान देतो हे स्पष्ट करेल,लिखाणात कैद करेल.

आज विचार केला तर लेखन संस्कृती (कदाचित "लेखन संस्कृती" हा शब्द इथे फोल ठरेल.) ही आपल्याला जगाचा इतिहास दर्शवते,जसजसा माणूस आपल्या बुद्धीने श्रीमंत होत गेला तसतसा लिखाणाचे विषय बदलत गेले,माध्यमे बदलत गेले अन् पुस्तक लिखाण हे नोंदीचे एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरले.

भविष्यासाठी वर्तमानकाळात आपलं आयुष्य कसं सुखकर होईल आयुष्याशी कोणत्या विचारांची लगट आपल्याला करावी लागेलं यासाठी अनेक पुस्तकं संपूर्ण जगात भूतकाळात लिहल्या गेली जी काही शतकांपूर्वी आताच्याही शतको पुढील वर्तमान काळातील वर्षांचा,स्थितीचा विचार करून लिहल्या गेली,आजही ती लिहल्या जात आहेत....

हे लेखन सर्व गुंतागुंतीच वाटत असेल पण माझ्या लेखी "पुस्तक" या शब्दाची व्याख्या ही आहे की
 "वर्तमान काळातील जीवन सुखकर करण्यासाठी आणि भविष्य काळातील कल्पनेतील जगण्यासाठी इतिहासाने उपयोगी ठरेल अश्या भूतकाळातील नोंदी ठेवण्याचं हे एक माध्यम"
कदाचित माझा कल हा इतिहास विषयाकडे जास्त असल्यामुळे मला तसे वाटत असावं त्यामुळे वर विचारानुसार ही व्याख्या बदलत जाते...

आज घडीला अनेक पुस्तके,ग्रंथ हे आपल्याला जगण्यासाठी समृद्ध करत आहेत.आपला वैभवशाली इतिहास आपल्या समोर ठेवत आहे इतिहासात अनेक लेखक होवुन गेले ज्यांनी आपल्या विचारधारा लिखाणातून व्यक्त करत जगाला एक समृद्ध जीवन कसे जगायचे याचा संदेश दिला....

भारताचा इतिहास लिहणारे अनेक लेखक होऊन गेले,ज्यांनी अनेक पुस्तके,ग्रंथ आपल्या देशाच्या संस्कृतीशी, इतिहासाशी निगडीत लिहले.
आज पुस्तक दिनी त्यांना या लेखात लिहावेसे वाटते....

जेम्स मिल- History of Birtish India. (खंड ३)
माल्कम- Political History of India.
व्हॅलेंटाईन चिरोल-Father of indian unrest.
राॅबट आर्म- Historical Frugments.
राधाकुमुध मुखर्ची-Ancient India, Ancient india Education,Gupta Empire, Hindu Civilization Nationalism in Hindu culture, Local Self Govt.in Ancient india.
के.पी.जैस्वाल -History of India.
सर जदुनाथ हरकार-Fall of Mughal Empire (खंड ४),Shivaji &His Time.
दादाभाई नौरोजी-Poverty of Birtish Rule in India.
जेम्स टाॅड- Annals and Antiquities of Rajasthan.
ऐ.एस.अळतेकर-The Position of women in Hindu Civilization.
एडवर्ड सैद-Orientalism.
लिओपोल्ड वाॅन रेंके- Princes of people of Southern Europe.
हेगेल- Philosophy of Dialectic.(तत्त्वज्ञान)
डॉ.के.एन.चिटणीस- Research Methodology in History.
(वरील लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही)
Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...