मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हाट्याचं पोर...!

कोल्हाट्याचं पोरं...!


"किशोर शांताबाई काळे" यांचे आत्मचरित्र 'कोल्हाट्याचं पोर' आज एका दिवसात वाचुन पूर्ण केले...

नृत्य ही कला बाईच्या जीवनातील अडथळे कसे दुर करते,सोबतच वेळोवेळी हीच कला तिच्या जीवनाची कशी फरफट करते हे दुःखद वास्तव 'कोल्हाट्याचं पोर' या आत्मचरित्रातून कोल्हाट्याचं पोर "किशोर शांताबाई काळे"
यांनी आपल्या लेखणीतून पुस्तक रुपात लिहले आहे...

शाळेत असतांना हजेरीत लावायला बापाचं नाव नाही म्हणून तिथं किशोर आपल्या आईचं नाव लावतो,त्याच मायेचा दुसरा लेक,दीपक आजोबाचं नाव बापाच्या जागी लिहितो..! का तर वंश चालावा अन् आपला वडिलोपार्जित व्यवसाय या नावानं ओळखला जावा म्हणुन...

येथे पुरुषमंडळी आयतं बसून खातात-पितात आणि त्यांच्या मायबहिणी त्यांची हौसमौज-खाणंपिणं भागवण्यासाठी नाचगाणं करतात,मन विदीर्ण करून सोडील अशी मायलेकराची करूण कहाणी....

कोल्हाटी समाजातील ती माय जी समजदार असती,तिच्या जीवनाची भविष्यात होणारी आबळ तिला दिसते अन् ती निघून जाते एका सावकारा संगतीनं,मोठ्या मुश्कीलीनं ती या जित्यापणी मरणाला मुकली जाते खरी,परंतु मानलेल्या नवर्‍याकडे ती राहते तरीही ती एक नाच,गाणं करणारी स्त्री आहे अन् ती वाईट आहे,म्हणून समाजात होणारी तिच्या सार्‍या जीवनाची ससेहोलपट...

तिकडे किशोरची आईशिवाय होणारी वाईट अवस्था,आज्याचं दारूच्या नशेत त्याच्याकडून पडेल ते कामे करून घेणं,जिजीचे किशोरला पोटच्या पोरासारखं जपणं...किशोरच्या नशिबी आलेलं उभे आयुष्याचं दुखणं जे न सरणारे आहे,या अश्या वाईट परिस्थितीतही प्राथमिक शिक्षण पूर्ण करणं अन् उभे आयुष्य जगण्यासाठी चालू असलेला त्याचा संघर्ष...

खुप सुंदर आणि प्रेरणा देणारे पुस्तक हे आहे...

अतिशय वाईट परिस्थितीत किशोर शांताबाई काळे 'एम बी बी एस' चे ध्येय पूर्ण करतो अन् कोल्हाट्याचं पोर गावातले पहीलं डॉक्टर होतं....आयुष्यातला बराच काळ आईशिवाय राहवून पोरके होणं यासर्व अवस्थेतून आईसाठी वाटणारी नितांत माया,सोबतच आईसम असलेल्या मावश्यांची नाच,गाण्यातुन होणारी वाईट अवस्था अन् यासर्व जाच्यातून यांना कायमचं बाहेर काढण्यासाठी किशोरचा तो खडतर जीवन प्रवास...

तो भविष्यात येणाऱ्या सुगीच्या दिवसांना कल्पनेत अनुभवत अन् त्यासाठी अपार कष्ट सोसत असतो,किशोरचा खडतर जीवन प्रवास,कोल्हाटी समाजातील स्त्रीयांचे होणारे हाल,कलेचा वारसा जपण्यासाठी होणारी कोल्हाटी समाजातील स्त्रीयाची धरपकड सुन्न करणारी आहे...

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...