मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हाट्याचं पोर...!

कोल्हाट्याचं पोरं...!


"किशोर शांताबाई काळे" यांचे आत्मचरित्र 'कोल्हाट्याचं पोर' आज एका दिवसात वाचुन पूर्ण केले...

नृत्य ही कला बाईच्या जीवनातील अडथळे कसे दुर करते,सोबतच वेळोवेळी हीच कला तिच्या जीवनाची कशी फरफट करते हे दुःखद वास्तव 'कोल्हाट्याचं पोर' या आत्मचरित्रातून कोल्हाट्याचं पोर "किशोर शांताबाई काळे"
यांनी आपल्या लेखणीतून पुस्तक रुपात लिहले आहे...

शाळेत असतांना हजेरीत लावायला बापाचं नाव नाही म्हणून तिथं किशोर आपल्या आईचं नाव लावतो,त्याच मायेचा दुसरा लेक,दीपक आजोबाचं नाव बापाच्या जागी लिहितो..! का तर वंश चालावा अन् आपला वडिलोपार्जित व्यवसाय या नावानं ओळखला जावा म्हणुन...

येथे पुरुषमंडळी आयतं बसून खातात-पितात आणि त्यांच्या मायबहिणी त्यांची हौसमौज-खाणंपिणं भागवण्यासाठी नाचगाणं करतात,मन विदीर्ण करून सोडील अशी मायलेकराची करूण कहाणी....

कोल्हाटी समाजातील ती माय जी समजदार असती,तिच्या जीवनाची भविष्यात होणारी आबळ तिला दिसते अन् ती निघून जाते एका सावकारा संगतीनं,मोठ्या मुश्कीलीनं ती या जित्यापणी मरणाला मुकली जाते खरी,परंतु मानलेल्या नवर्‍याकडे ती राहते तरीही ती एक नाच,गाणं करणारी स्त्री आहे अन् ती वाईट आहे,म्हणून समाजात होणारी तिच्या सार्‍या जीवनाची ससेहोलपट...

तिकडे किशोरची आईशिवाय होणारी वाईट अवस्था,आज्याचं दारूच्या नशेत त्याच्याकडून पडेल ते कामे करून घेणं,जिजीचे किशोरला पोटच्या पोरासारखं जपणं...किशोरच्या नशिबी आलेलं उभे आयुष्याचं दुखणं जे न सरणारे आहे,या अश्या वाईट परिस्थितीतही प्राथमिक शिक्षण पूर्ण करणं अन् उभे आयुष्य जगण्यासाठी चालू असलेला त्याचा संघर्ष...

खुप सुंदर आणि प्रेरणा देणारे पुस्तक हे आहे...

अतिशय वाईट परिस्थितीत किशोर शांताबाई काळे 'एम बी बी एस' चे ध्येय पूर्ण करतो अन् कोल्हाट्याचं पोर गावातले पहीलं डॉक्टर होतं....आयुष्यातला बराच काळ आईशिवाय राहवून पोरके होणं यासर्व अवस्थेतून आईसाठी वाटणारी नितांत माया,सोबतच आईसम असलेल्या मावश्यांची नाच,गाण्यातुन होणारी वाईट अवस्था अन् यासर्व जाच्यातून यांना कायमचं बाहेर काढण्यासाठी किशोरचा तो खडतर जीवन प्रवास...

तो भविष्यात येणाऱ्या सुगीच्या दिवसांना कल्पनेत अनुभवत अन् त्यासाठी अपार कष्ट सोसत असतो,किशोरचा खडतर जीवन प्रवास,कोल्हाटी समाजातील स्त्रीयांचे होणारे हाल,कलेचा वारसा जपण्यासाठी होणारी कोल्हाटी समाजातील स्त्रीयाची धरपकड सुन्न करणारी आहे...

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड