मुख्य सामग्रीवर वगळा

Education आणि बरच काही..!

Education आणि बरच काही..!

कॉलेजवयीन मुलांची होणारी मनाची द्विधा मनस्थिती,सोबतच वाढणारा मानसिक तणाव अन् बरच काही जे समोर जरी सर्व नॉर्मल दिसत असलं तरी आतल्या आत मनाला त्रास देणारं आहे.मुलांना नैराश्येच्या गर्तेत झोकवणारे आहे.
आज हा एक नवीन विषय घेऊन लिहण्याचा प्रयत्न करतो आहे,Actually या विषयावर आता लिहायला लागतंय हेच खुप काळजी घेणारं अन् विचार करायला भाग पाडणारे आहे...

त्याला कारण कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असणारा प्रार्दुभाव किंवा इतर बरेचसे कारणे,बंद-चालु होणारी कॉलेजेस,ऑनलाईन लेक्चर चालू असले तरी बऱ्याच गोष्टी न समजता डोक्यावरून जात आहेत.आपण ज्या Stream मध्ये शिकतो आहे त्यात कुठलाही अभ्यास नसतांना फक्त अन् फक्त ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून पास होवुन पुढील वर्गात झालेली आपली बढती.ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे...

परंतु आता पुढे काय,जेव्हा कुठल्याही interview साठी आपण जाणार आहोत,तिथे काय होणार तिथे विचारली जाणारी प्रश्न अन् मग आपल्याला उत्तरे न येत असल्यामुळे होणारी आपली वाईट अवस्था.साहजिक आहे यात कोणाचीच चुक नाहीये पण कुठेही नोकरी करण्यासाठी आपण तितपत पात्र ठरायला हवे आहेना,सोबतच सर्व होत असताना इथेच आपण आपला Interview Fail गेल्यामुळे नैराश्येच्या गर्तेत जातो...
 
मग यासाठी पर्याय काय..?

त्यामुळेच कॉलेजमध्ये प्रवेश घेताना आपण कुठल्या Stream मध्ये तो घेतोय हे खुप महत्त्वाचं या ठिकाणी वाटतं (कारण Interview मध्ये होणारी वाईट अवस्था बऱ्यापैकी या एकाच गोष्टीवर अवलंबून असते, तुम्ही जे शिकत आहात त्यात कितपत ज्ञान तुम्हाला आहे...) कॉलेजेमध्ये मिळणारे Practical knowledge असो किंवा Theory knowledge कळायला हवं आहे,आता कॉलेज चालू नसल्यामुळे यापैकी काहीही होत नाहीये परंतु आपण चांगल्या ग्रेडने पास तर होत आहोत...

यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आपण ज्या Stream मध्ये शिकत आहोत त्याची आपल्याला आवड असणे,त्या शिक्षणाचे Basic knowledge असणे.

तर Basic knowledge म्हणजे काय तर आपण जे काही शिकतो आहे त्याबद्दल कॉलेजमध्ये शिकवले जाणारे सोडून आपल्याला त्या शिक्षणाशी निगडित असलेल्या क्षेत्राची माहीत असलेली सर्व Information.

Example घ्यायचं तर सर्वांना परिचित असणारे Agri हे क्षेत्र यात कसे आपल्याला शिक्षणा व्यतिरिक्त किंवा शिक्षणाशिवायही बऱ्याच गोष्टी माहीत असतात,तसेच विविध Streamसाठी हे Basic knowledge आपल्याला हवं आहे.

Written by
©®Bharat.L.Sonawane.
MBA-Production and Operations.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड