मुख्य सामग्रीवर वगळा

Education आणि बरच काही..!

Education आणि बरच काही..!

कॉलेजवयीन मुलांची होणारी मनाची द्विधा मनस्थिती,सोबतच वाढणारा मानसिक तणाव अन् बरच काही जे समोर जरी सर्व नॉर्मल दिसत असलं तरी आतल्या आत मनाला त्रास देणारं आहे.मुलांना नैराश्येच्या गर्तेत झोकवणारे आहे.
आज हा एक नवीन विषय घेऊन लिहण्याचा प्रयत्न करतो आहे,Actually या विषयावर आता लिहायला लागतंय हेच खुप काळजी घेणारं अन् विचार करायला भाग पाडणारे आहे...

त्याला कारण कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असणारा प्रार्दुभाव किंवा इतर बरेचसे कारणे,बंद-चालु होणारी कॉलेजेस,ऑनलाईन लेक्चर चालू असले तरी बऱ्याच गोष्टी न समजता डोक्यावरून जात आहेत.आपण ज्या Stream मध्ये शिकतो आहे त्यात कुठलाही अभ्यास नसतांना फक्त अन् फक्त ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून पास होवुन पुढील वर्गात झालेली आपली बढती.ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे...

परंतु आता पुढे काय,जेव्हा कुठल्याही interview साठी आपण जाणार आहोत,तिथे काय होणार तिथे विचारली जाणारी प्रश्न अन् मग आपल्याला उत्तरे न येत असल्यामुळे होणारी आपली वाईट अवस्था.साहजिक आहे यात कोणाचीच चुक नाहीये पण कुठेही नोकरी करण्यासाठी आपण तितपत पात्र ठरायला हवे आहेना,सोबतच सर्व होत असताना इथेच आपण आपला Interview Fail गेल्यामुळे नैराश्येच्या गर्तेत जातो...
 
मग यासाठी पर्याय काय..?

त्यामुळेच कॉलेजमध्ये प्रवेश घेताना आपण कुठल्या Stream मध्ये तो घेतोय हे खुप महत्त्वाचं या ठिकाणी वाटतं (कारण Interview मध्ये होणारी वाईट अवस्था बऱ्यापैकी या एकाच गोष्टीवर अवलंबून असते, तुम्ही जे शिकत आहात त्यात कितपत ज्ञान तुम्हाला आहे...) कॉलेजेमध्ये मिळणारे Practical knowledge असो किंवा Theory knowledge कळायला हवं आहे,आता कॉलेज चालू नसल्यामुळे यापैकी काहीही होत नाहीये परंतु आपण चांगल्या ग्रेडने पास तर होत आहोत...

यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आपण ज्या Stream मध्ये शिकत आहोत त्याची आपल्याला आवड असणे,त्या शिक्षणाचे Basic knowledge असणे.

तर Basic knowledge म्हणजे काय तर आपण जे काही शिकतो आहे त्याबद्दल कॉलेजमध्ये शिकवले जाणारे सोडून आपल्याला त्या शिक्षणाशी निगडित असलेल्या क्षेत्राची माहीत असलेली सर्व Information.

Example घ्यायचं तर सर्वांना परिचित असणारे Agri हे क्षेत्र यात कसे आपल्याला शिक्षणा व्यतिरिक्त किंवा शिक्षणाशिवायही बऱ्याच गोष्टी माहीत असतात,तसेच विविध Streamसाठी हे Basic knowledge आपल्याला हवं आहे.

Written by
©®Bharat.L.Sonawane.
MBA-Production and Operations.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...