मुख्य सामग्रीवर वगळा

धोंड्याईचा गाव... (भाग -३)

धोंड्याईचा गाव... (भाग -३)


धोंड्याईनं दिलेली पिठल्याची ताटली घेऊन मी घराच्या वाटेनं निघालो होतो,तिच्या डोळ्यातुन येणाऱ्या आसवांना सावरत तिनं घरात पडलेला भांड्यांचा गराडा बाहेर अंगणात आणला.रांजणातून जगाने पाणी घेऊन,चुलीतल्या राखेनं भांडे घासुन,ती हिसळत राहीली.
तिच्या डोक्यात काय विचार चालू होता कळायला सीमा नव्हत्या,मनाशीच मनचे काहीतरी पुटपुटत तिचे भांडी घासणे चालू होते...

भांडे घासण्याचा आवाज ऐकुन शेजारची धुरपता काकु धोंड्याईच्या अंगणात येऊन बसली,अंगणात मोकळं असल्या कारणाने लिंबाच्या झाडांच्या फांद्यांचा अंगणात वाऱ्याच्या सोसाट्याने आवाज येत होता,जो अंगाला बोचनारा अन् काटे आणणारा होता...

धुरपता काकु नवार पातळ सावरत अंगणात बसली अन् धोंड्याईशी गप्पा झोडू लागली,धोंड्याईचां लेवुक गावाला जावून आठ दिवस सरले होते अन् आता तिला लेकाची आठवण येऊ लागली,हे तिच्या बोलण्यातून जाणवू लागलं होतं.
सांच्याला माझ्याशी नातवाच्या विषयी बोलणं झाल्यापासून धोंड्याईच्या काळजात ध्धस्स झालं होतं...

कधी एकदा तिचा लेवक घरी येतो असं तिला वाटत होतं,तिचं धुरपता काकुच्या बोलण्याकडे कम अन् गावच्या पल्याड असलेल्या स्मशानवाटेकडं चित्त लागलं,कारण गावला यायची ही एकच वाट हुती...

तितक्यात धुरपता काकुने उद्याच्याला संतु सोनाराच्या वावरात सरकी जमा करायले जायचं म्हणुन धोंड्याईला तिच्या अंगाला हात लावून खुणावलं अन् धोंड्याई एकदमच डचकत डोळ्यांतील आसवांना मोकळी वाट करून देत बोलू लागली...

धुरपे अय माझ्या लेकी धूरपे..!
आठ दिस झाले माझा नामा काय येईना झाला हाईसा..!
शहराले काम धुंडाया गेला अन् आजुन पहुर काय सांगावा नाय का,तो बी काही यायना झालाय..!
धुरपा काकू बोलती झाली:
अगं ए मायव येईल व तुझा लेवूक येईल,उद्या सांच्या पहुतर येईल नग अशी येड्या खुळ्यागत भरल्या घरात रडू नगं व माय..!
धोंड्याई बोलती झाली:
धुरपे तुझं सबुत खरं हाय गं..! 
माझा पोटचा गोळा हाय ग त्यो,इतक्या दिस कधी शहराला राहिला नाय अन् तिथं आपल्या सारख्या आठरा विश्व दारिद्र्य असलेल्या लोकासनी कोण घटकाभरचा निवारा ध्यु रायला,की आसराला एखादं छप्पर...

तितक्यात धुरपा काकुची सुनबाई मीरा आवाज देते:
व आत्याबाई..!
चाला की आता घरला कव्हा पथुर बसुन राहता,पार अंधारून आलया की आता आवरा आवरा माय लेकीच्या गप्पा,चला ओ आत्याबाई..!
धुरपा काकु बोलती झाली:
आली आली गं मिरे मामांजिस्नी ताट वाढाया घे तुवर..! 
मायव चल येतु गं मी तुझा मोठा लेवूक आला हायसा ढोसून त्याच्या सेवेत हजर व्हावं लागल नायतर त्यो कल्ला करतुया..!
धोंड्याई:
बरं बरं लेकी उद्याच्याला जावूया संतू सोनाराच्या वावरात,मला आरोळी देई हा जाता वख्त...

धोंड्याईने डोळ्यातील आसवं लुगड्याच्या पदरानं पुसत घासलेली भांडी आत घेतली अन् दारी टाकलेल्या खाटीवर गोधडी अंथरुन उशी घ्यायला आत घडुंची जवळ गेली.
घोंगडी,उशी घेऊन देव्हाऱ्यातला दिवा मालवत,घरात पिवळा धम्मक चमकणारा लाईट इजुन,दाराला कडी कोंडा घालुन खाटीवर पाठ लांब करून दिली...

लेवकाच्या चिंतेन चिंतातुर झालेली अन् कामाच्या व्यापानं धोंड्याई पार कमरात वाकली होती,एक अंगाला झोपून ती बघत बसली होती स्मशान वाटेनं येणाऱ्या जाणाऱ्या इस्मास...

तितक्यात महादेवाच्या देऊळात झोपणारा धोंड्याईच्या वयातला दगडु म्हातारा देऊळाच्या वाटेनं चालला होता त्यानं म्हातारीला हटकले...
अय धोंड्याई कशी हायसा..?
तुझा लेवुक आला का नाय शहरावरून..?

धोंड्याई बोलती झाली:
नाय व उद्या सांज पहुतर येईन असं वाटून राहिलं,पर का महीस येतु का तिकडच राहतुया..!
दगडु म्हातारा बोलता झाला:
ईल ईल.. काळजी नगं करू...
नायतर माझा लेवूक पराच्या दिशी जातुया शहराच्या गावाला तो हुडकून आणीन गावला तर,चल म्हातारे येतूया मी तु पण झोप रात सरायला हायसा...!

अन् म्हातारं इजारीच्या उजेडात स्मशान वाटेनं महादेवाच्या देऊळाला
जाया निघालं..!
धोंड्याई अंगावर लेवून डोक्यात सतरा ईच्यार घेऊन या उष्यावरून त्या उष्याला होत होती पण तिच्या डोळा काही झोप उत्रणा झाली हुती,अन् दोन्ही डोळ्यांच्या धारा काही खंडणा झाल्या होत्या...

Written by
©® Bharat Sonawane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड