मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाटणादेवी भ्रमंती..!

पाटणादेवी भ्रमंती..! शुक्रवारी "भटका तांडा" समूहाचे प्रमुख "श्रीकांत उमरीकर" सर यांच्या समवेत पाटणादेवी येथे पाटणा भटकंती पूर्व नियोजन बैठकीस जाण्याचा योग आला अन् यामुळे "पाटणादेवी दर्शन" व तिथून जवळच असलेले "हेमाडपंथी महादेव मंदिर" बघण्याचा योगही आला..! पाटणादेवी कुलदैवत असल्यानं नेहमीच जाणे असते परंतु अलीकडे तीन चार वर्ष जाणे झालेले नव्हते.तो योग शुक्रवारी उमरीकर सर यांच्यामुळे जुळून आला.सध्या सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला असल्यामुळे पाटणादेवी सभोवतालचा सर्वच परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. महामार्ग एन.एज. २११ बऱ्यापैकी रुंदीकरण,चौपदरीकरण अन् नव्याने काम झाले असल्यामुळे "औरंगाबाद ते पाटणादेवी" हा जवळ जवळ १०० की.मी अंतराचा प्रवास सव्वा दोन तासात पूर्ण होतो.महामार्गावर तालुक्याच्या शहरांना लागून बायपास झालेला असल्याने वर्दळीचा प्रवास टाळत आपण सलग प्रवास करू शकतो. बऱ्यापैकी झालेला पाऊस त्यामुळे "कन्नड व चाळीसगांव" "मराठवाडा अन् खानदेश" विभागाला जोडणारा "औट्रम घाट" हा पूर्णपणे हिरवाईने नटलेला

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

स्वप्नांचा पाठलाग अन् खुप काही..!

स्वप्नांचा पाठलाग अन् खुप काही..! मला माणसांच्या सहवासात राहण्याचा कितीही कंटाळा असो परंतु एका त्या स्टेपला गेलो की असं वाटतं की आपण सभोवताली असलेल्या माणसांच्या सहवासात रहायला हवं.कारण निसर्ग खूप देतो आपल्याला त्याच्या सहवासात राहिलं की;पण कुठेतरी एकवेळ अशी येते की माणसांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटू लागतो..! आयुष्यात आलेली असंख्य वळणं अन् त्या वळणावर भेटलेली कित्येक माणसं कोण कसं,कोण कसं,कुणाच्या वागण्यातून कशी वागणूक मिळाली,कुणी कसं मैत्रीच्या पलिकडे जावून माझ्यावर त्यांचा जीव ओवाळून टाकला तर कुणी काय तर कुणी काय..! अनेक वाईट अनुभवसुद्धा येऊन गेले अन् मग साधं काही वेळच्या सहवास,मैत्रीसाठीसुद्धा मी माणसांना पारखून घेऊ लागलो.इतकं सर्व होवूनही माणसांचा सहवास तितकाच हवाहवासा होता..! मी शहरात बऱ्यापैकी जुना असल्यानं कित्येक मित्र झाले,कित्येक सोडून गेले,कित्येकांना मीच वेळीच सोडचिठ्ठी दिली तर कित्येकजण आपणहून माझ्या एकांगी,एकटं राहण्याच्या असलेल्या सवयीमुळे मला सोडून गेले.याचं मलाही कधीच सोयरसुतक नव्हतं,कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशी अनेक माणसं भेटत गेली,जिथं वेळ

वाभळेवाडी भाग-२

वाभळेवाडी  भाग-२ सांज केव्हाच सरली होती,सूर्य कधीच अस्ताला गेला होता ;अन् आता मावळतीच्या बरोबर एका अंगाला चंद्र आपलं दर्शन वाभळेवाडीच्या लोकांस्नी देऊ लागला होता. नदीच्या थडीला पाण्याचा जोर वाढला होता,नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज,नदी थडीला असलेल्या पिवळ्या बेंडक्यांचा आवाज रामा कुंडूर,जगण्या,तलाठी आण्णा यांच्या बसल्या लिंबाच्या पारा पहूरतक येत होता.नदीच्या अंगाला काळाकुट्ट अंधार माजला होता..! याला भरीस भर की काय म्हणून समशानातील कुत्री त्या काल गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचं आवाजात इवळू लागली होती.नदीच्या दुसऱ्या अंगाला झाडांवर काजवे चमकू लागली होती,व्होलगे मोठ्यानं आवाज करत ओरडू लागली होती,गावच्या जवळ असलेल्या डोंगर रानातून कोल्हे एक सुरात मोठ्यानं कोल्हेकुई हानीत बरतळल्यागत,इवळल्यागत ओरडत होती..! रातीचे दहा कधी सरले अन् सारा गाव बरसदीचे दिस असल्यानं कधी पहुडला हे लिंबाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या रामा कुंडूर,जगण्या अन् नव्यानं शिकावू तलाठी म्हणून आलेल्या संतू आण्णा तलाठी यांना कळलेच नाही..! संतू आण्णा पारावरच आपली कागदपत्रा

कविता काही टिपणे..! - प्रणव सखदेव.

अलीकडे एक सवय लागली आहे की मी गुगलवर कुठलेही एक मराठी वाक्य,पुस्तकाचे नाव,लेखकांचे नाव,ललित लेख,कथा लेखन,असं बरंच काहीतरी टाईप करतो अन् जे काही समोर येते ते वाचत बसतो..! बऱ्यापैकी अभ्यासपूर्ण लेखन इथे वाचनात येते,आज असच ललित लेखन टाईप केलं अन् हा ललित लेख वाचनात आला.गुगलवरती बरच मराठी,उर्दू,इंग्रजी,इत्यादी भाषेतील विविध प्रकारातील साहित्य उपलब्ध आहे फक्त ते शोधण्याची इच्छा असायला हवी..! कविता–काही टिपणे १. रात्र झालेली होती. घरी यायला उशीर झालेला होता. दमलो होतो. आल्या-आल्या थंड पाण्याने अंघोळ केली आणि पलंगावर पाठ टेकली. बाहेर अंधाराकडे डोळे गेले आणि मग छताकडे पाहिले. काही क्षणांत डोळे सरावले; तेव्हा मनात एक ओळ लहरत-ठिबकत-ओघळत-ओघळत पृष्ठभागावर आली – म्हणजे मला निदान सकाळ होईपर्यंत छताकडं तरी बघता येईल निवांतपणे कोलटकरच्या ‘ढग’ कवितेतल्या ही शेवटची ओळ..! सुरुवातच कशी मस्तय, एकदम अनौपचारिक सहजच म्हटल्यासारखं, बोलल्यासारखं. कोलटकरच्या कवितांचं हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या कविता बोलल्यासारख्या, सहज असतात. त्यामुळे त्या ‘कविता’ वाटतच नाहीत. त्यामुळेच त्या कधीकधी सटल व सूचक होतात..! प्रत्ये

आपण लेखक आहोत पण आपण नेमकं कोणत्या वाटेला जात आहोत..?

आपण लेखक आहोत पण आपण नेमकं कोणत्या वाटेला जात आहोत..? आज आपण सगळी भौतिक सुखे उपभोगत असलो तरी विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपल्याला काहीच पडलेली नाही. ज्यांना सृजनाची देणगी लाभली आहे अशा साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांकडून तरी ही अपेक्षा करणे गैर आहे का? पण तिथेही ‘मला काय त्याचे?’ हीच वृत्ती दिसून येते. आज भोवतालची मळभलेली परिस्थिती पाहता नाशकात या आठवडय़ात भरणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आपल्याला.. स्वतंत्रपणे विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच पडायला हवा. नाही का? कस्तुरीगंध : ‘टाकलेलं पोर’  आक्रमक वकिली युक्तिवाद तो एक श्रेष्ठ कलाकार. भोवतालच्या अन्याय, पिळवणूक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचं बिंब आपल्या कलाविष्कारात उतरवणं हे त्याच्या कलासाधनेचं एक अविभाज्य अंग तो मानतो. म्हणून वर्षांनुवर्ष मधुमेह आणि रक्तदाबाच्या विकारांनी तो ग्रस्त असला तरी शरीराची तमा न बाळगता स्वत:च्या देशातल्या हुकूमशाहीचं, अन्यायाचं चित्रण आपल्या कलाकृतींतून आणि स्फुटलेखनातून तो जगभर पोहोचवतो. त्यामुळे हुकूमशाहीच्या पाईक असलेल्या सर्व यंत्रणा

Love She He

Love She He ..! सायंकाळचे एक पान डायरीतले विस्कळीत झालेले..! सायंकाळची वेळ अलीकडे फारच व्यस्थतेच्या अन् मनाला मनाशी काही गोष्टींची ठरवून जी खूनगाठ बांधली आहे ती आधिक घट्ट व्हावी म्हणून त्या संबंधी विचार करण्यात निघून जाते. निसर्गाने निर्माण केलेली शिशिराची पानगळ बऱ्याच दिवसांपूर्वी थांबली आहे.परंतु सायंकाळी फिरायला ज्या मैदानावर जातो,तिथं मात्र मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली पानगळ दिसून येते.मग आयुष्याला घेऊन असलेला वाईट भूतकाळ आठवतो..! लवकरच मान्सून वारे पाऊसाला घेऊन आपल्या प्रदेशात येतील अन् मग हा काही क्षणांचा मनात असलेला,आयुष्यात असलेला दुष्काळ संपेल..! असो..! सायंकाळ हल्ली माणसांच्या गर्दीतही शांत-शांत हवी-हवीशी वाटते.अलीकडे १६०० मीटरची प्रॅक्टिस करतांना जीवाची खूपच दमछाक होते.मोजल्या ७ मिनिटात ते पूर्ण होत आहे,पण अजुन आयुष्यात अन् करीयरच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं हे ७ मिनिटांच अंतर वजा कसे होईल यासाठी विचार करत असतो..! ट्रॅकवर पळत असतांना पहिला राऊंड सहज पूर्ण होतो,दुसराही थोडीफार दमछाक करत पूर्ण होवून जातो पण तिसऱ्या राऊंडला मात्र हातपाय जड पडतात,पाय जमिनीव

Aurangabad - Industrial Hub

Aurangabad - Industrial Hub..! औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे..! औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी व तेथील कंपन्यांचा विचार केला असता,औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि आशिया खंडातील प्रमुख एमआयडीसी विश्वात ज्या एमआयडीसीचे नाव प्रामुख्याने उच्च स्थानावर घेतले जाते,ज्या ठिकाणी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्याचे प्रॉजेक्ट उभारले गेले आहेत अशी शेंद्रा एमआयडीसी..! सोबतच आता नव्याने स्थापन झालेली ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहे... महाराष्ट्राची &

वाभळेवाडी ..!

वाभळेवाडी ..! भर सायंकाळची वेळ झाली,सूर्य अस्ताला जात होता.ढगांच्या आडून लपंडाव खेळणारा सूर्य कधी एकदा डोंगराच्या पल्ल्याड खालच्या अंगाला निघून जाईल अन् कधी एकदा सगळीकडे अंधार बुडुक होईल.या विचाराने एका हातात पांघरूण असलेलं गोणीचे पेंडकं,खांद्याला बंदाची लांबती पिशी अटकवून,डोक्यावर आफिस कामात कागदपत्र ठेवायला म्हणून असलेली सुटकेस घेऊन संतू आण्णा चालत होता..! नव्यानं शिकावू तलाठी म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेला तिशितला संतू आण्णा मोठ्या साहेबानं ड्युटी दिलेल्या वाभळेवाडी या डोंगराआड असलेल्या गावात नोकरीला रुजू व्हायला म्हणून आधल्या दिवशी खुदच्या गावातून दोन घटकांचा महामंडळाच्या गाडीतून प्रवास करीत निघाला होता..! वाभळेवाडी नजदीक गावालगत गाडी जात नसल्यानं,गावच्या सहा कोस दूर असलेल्या फाट्यावरुन डांबरी सडकीनं तो पायातल्या वाहना सरकीत सरकीत सांजेच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा कल घेत झपाझप पावलं टाकीत चालत होता..! गावाकडे जाणारी डांबरी सडक मागे पडली अन् डोंगरा-खोंगरात हरवलेल्या पायवाटेनं संतू अण्णा चालू लागला.ऐरवी सूर्य अस्ताला गेला होता अन् दूरवर गावातले दिवे चमकतांना काजव्यासम

एक साथी और भी था..! ❤️

एक साथी और भी था..! ❤️ काल सायंकाळी सहज यूट्यूब स्क्रोल करत असताना शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (वय २०) याचा व्हिडिओ बघण्यात आला अन् कालची संपूर्ण रात्र विचार करण्यात खूप सहज निघून गेली..! चौथीमध्ये असतांना संपूर्ण परभणी जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला येतो.पुढे १८ व्या वर्षी पालघर जिल्ह्यातून पोलिस भरतीला उतरतो,पहिल्याच भरतीत पहिल्याच प्रयत्नात तो तिथे सिलेक्ट होतो. परंतु देशसेवेचं असलेलं वेड अन् देशाच्या सेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न.त्यासाठी रात्रंदिवस दिवस घेतलेली मेहनत,उर फुटेस्तोवर पळत राहणं,व्यायाम करणं..! पुन्हा वयाच्या १९ व्या वर्षी नांदेड येथे पहिल्याच आर्मी भरतीसाठी उतरणं,तिथेही पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट होणं अन् देशसेवेचं आपलं स्वप्न साकार झालं,इंडियन आर्मीमध्ये आपल्याला नोकरी लागली म्हणून त्या आनंदात त्याच्या संपूर्ण गावाला गावजेवण देणं..! आर्मी ट्रेनिंग नंतर "जम्मू काश्मीर" येथील "पुंछ" येथील "कृष्णा घाटी सेक्टर" मध्ये तो ड्युटीसाठी जॉईन होणं.काही दिवसांच्या सेवेनंतर पाकिस्तानी सैनिकांशी चकमक होणं,बॉर्डरच्या आत ३

Birthday Wishes अन् बरच काही..!

Birthday Wishes अन् बरच काही..! पहाटेची रोजची साडेपाचची वेळ नेहमीसारखं फिरायला जाणं होतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली असलेली सावली बघत अंदाज घेत मी चालत राहतो.आज बर्थडे होता अन् पाय जरासे दुःखत असल्यानं दोन्ही वेळची रनिंग आज बंदच होती..! हा तर मी काय म्हणत होतो की स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली पहाटे चालत असतो.एक एक करून बंद होणारी स्ट्रीट लाईटस् आता मला खुणावत असतात.जसं आयुष्यातील एक वर्ष जितकं सहज म्हणजे स्ट्रीट लाईटने चालू होवून बंद व्हावं तितकं सहज संपून गेलं आहे..! आयुष्याच्या या वळणावर आहे की जिथे आता वय खुणावते आहे.आता जगण्याला कारण शोधत असतो नेहमीच अन् छोट्या छोट्या गोष्टीत जे समाधान मिळते त्यातून ही कारणे सहज मिळून जातात.आयुष्याला घेऊन बरीच स्वप्नं बघितली होती,जवळ जवळ सर्व पूर्ण झाली आहे.काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तर काही खूप परीक्षा घेत आहे,होईल सर्व ठीक लवकरच अन् ती स्वप्नसुद्धा पूर्णत्वास येतील..! बाकी पाऊस पडून गेला आहे.निसर्गात सर्वदूर हिरव्या गवताची तृण पहाटे दवात अभिषेक करून आपलं सौदर्य जपवत सौंदर्य प्रदर्शन करत असतात. फिरायला जातो त्या टेकड्या असलेल्या डोंगर

Life-Fantasy..!

Life-Fantasy..! "माणसांच्या गर्दीत माणसांचं होवून जाणे ते भर माणसांच्या गर्दीत एकटं वाटत राहणे" ही अवस्था खूप भयाण अन् आपल्याला खूप वाईट तर कधीतरी खूप सेफ,एकांताचं आपल्याला व्यसन लागावं,त्या विचारांची सवय पाडायला लावणारी ही अवस्था आहे..! भर माणसांच्या गर्दीत जेव्हा आपण भटकायला जातो अन् जेव्हा एका त्या सेफ म्हणजे माणसांच्या सहवासापासून पण त्यांच्यात उपस्थित असल्याचं अंतर राखून कोपऱ्यात असलेला बाकडा जेव्हा रोज आपल्या बसण्याची जागा बनते ; तेव्हा आपण खरंच माणसांच्या गर्दीत एकटे पडलो आहो अन् ते ही आपल्यामुळेच..! दूरवर एकांतात बसून माणसांना न्याहाळत राहणं.त्यांच्याजवळ जेव्हा काही बोलण्याची वेळ येते तेव्हा आपले शब्द अडखळत राहणं,हे वाईट आहे.मनावर स्वार झालेला एकांत इथवर आपल्या मनावर राज्य करतो अन् मग आपले मन आपले राहत नाही.यात माणूस आयुष्यातून सुद्धा उठून जावू शकतो,नाहीतर कायमचा एकांताचा होवून जावू शकतो..! सध्या माहीत नाही यातील कुठल्या स्टेजला आहे.हल्ली एक गोष्ट खूप सातत्याने वाटते की,कुठल्याश्या एकांत ठिकाणी एकसंथपणे वाहणाऱ्या,खाचखळगे असलेल्या अन् पाण्याच्या प्रवाहाने ग

संवेदनशील मनाच्या व्यथा..!

संवेदनशील मनाच्या व्यथा..! नुकतेच जेवण करून शतपावली करण्यासाठी घराच्या बाहेर पडलो.वातावरणात झालेला बदल शरीराला जाणवू लागला आहे,शरीराला गारवा अनुभवायला मिळतो आहे. दिवसभर कामाच्या व्यापात दिवस कसा निघून जातो कळत नाही,जेवण झालं की शतपावली करण्याचा हा हक्काचा अर्धा तास.जो रोज हवाहावसा वाटतो,अलीकडे दुपारपासूनच यावेळेची आठवण यायला लागते अन् एकदा का ही वेळ आली की संपूच नये असं हल्ली खूपच वाटून जाते..! तसेही लॉकडाऊनच्या काळात घरात बसून राहण्याची कॅपेसिटी अजूनच वाढली आहे.एरवी असेही मला फार मित्र किंवा कुणी इतर जवळच्या व्यक्ती लागत नाही,त्यामुळं मी अन् आपला एकांत आमचं मस्त चालू असतं..! मला हल्ली माणसांच्या गप्पात रमण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात रमायला आवडतं,वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत भटकंती करायला आवडतं. त्यामुळे मित्र,जवळची माणसे यांना घेऊन माझं फार नडत नाही अन् या एकटेपणात जो आनंद मिळतो तो काही औरच आहे,जो मला खूप हवाहवासा वाटतो.यासाठी अनेक गोष्टी,मित्र पणाला लावले तो भाग वेगळा कधीतरी या गोष्टीचं नुकसानही होतं जे खूप भयंकर आहे की मी पूर्णपणे नैराश्यात जातो. But हे सर्व छान आहे..! असो माझ्

शाळेच्या आठवणी..!

शाळेच्या आठवणी..! ऐन पावसाळ्याचे दिवस भरात असायचे नदी,नाले,धरणं तुडुंब भरुन वाहत असत अन् घरा सभोवतालचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला असायचा.घराच्या जवळच छोटी-छोटी तीन धरणे,दोन खदानी असल्यामुळे पावसाळ्याच्या आठवणी आजवर तितक्याच ताज्यातवान आहे जितके ते दिवस होते..! इतकं सर्व निसर्ग सौंदर्य अनुभवायला असल्यानं कधीतरी अश्या भर पावसात शाळेत जायचं म्हणजे जीवावर यायचं.परंतू शाळेत जायच्या वाटेनं नाल्यातून अनेक कसरती करत एकमेकांचा हातात-हात घेऊन त्या पाण्यात घट्ट पाय रोवून चालण्यात जे थ्रील वाटायचं त्यासाठी का होईना शाळेची वाट आम्ही जवळ करायचो..! मोठ्या नाल्यातून वाहणारे पाणी,नाल्यात येणारं झऱ्याच्या रुपात डोंगर टेकड्या अन् परिसरातील पाणी,सतत चालू असलेला पाऊस त्यामुळं सटकत्या झालेल्या वाटा अन् त्यावरून अजून सटकत आपटत,पडत चालायचं..! नव्याने पाऊस सुरू झाला की तळ्याच्या कडेला दिसणारी,सतत ओरडत राहणारी पिवळी बेंडकं,दूरवरून पाण्याच्या प्रवाहात वाहून येणाऱ्या मासोळ्या,मांगुर मासा,खेकडा,छोटी छोटी साप बघायची म्हणून नदी नाले हुडकत फिरणं.अश्या असंख्य आठवणी,ज्याबद्दल कितीही लिहले तरी कमी पडेल..! पा