मुख्य सामग्रीवर वगळा

Birthday Wishes अन् बरच काही..!

Birthday Wishes अन् बरच काही..!


पहाटेची रोजची साडेपाचची वेळ नेहमीसारखं फिरायला जाणं होतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली असलेली सावली बघत अंदाज घेत मी चालत राहतो.आज बर्थडे होता अन् पाय जरासे दुःखत असल्यानं दोन्ही वेळची रनिंग आज बंदच होती..!

हा तर मी काय म्हणत होतो की स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली पहाटे चालत असतो.एक एक करून बंद होणारी स्ट्रीट लाईटस् आता मला खुणावत असतात.जसं आयुष्यातील एक वर्ष जितकं सहज म्हणजे स्ट्रीट लाईटने चालू होवून बंद व्हावं तितकं सहज संपून गेलं आहे..!

आयुष्याच्या या वळणावर आहे की जिथे आता वय खुणावते आहे.आता जगण्याला कारण शोधत असतो नेहमीच अन् छोट्या छोट्या गोष्टीत जे समाधान मिळते त्यातून ही कारणे सहज मिळून जातात.आयुष्याला घेऊन बरीच स्वप्नं बघितली होती,जवळ जवळ सर्व पूर्ण झाली आहे.काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तर काही खूप परीक्षा घेत आहे,होईल सर्व ठीक लवकरच अन् ती स्वप्नसुद्धा पूर्णत्वास येतील..!

बाकी पाऊस पडून गेला आहे.निसर्गात सर्वदूर हिरव्या गवताची तृण पहाटे दवात अभिषेक करून आपलं सौदर्य जपवत सौंदर्य प्रदर्शन करत असतात.
फिरायला जातो त्या टेकड्या असलेल्या डोंगराळ रानात दरवर्षी येणारी मेंढपाळ बांधव यावर्षीसद्धा आले आहे..!

काल-परवा त्यांनी पाल लावला कित्येक पिल्लं नुकतीच दोन-तीन दिवसांपूर्वी जन्मली असावी अशी वाटली अन् मला माझ्या जन्माची कहाणी आठवली..!

मान्सूनचा अवकाळी पहिला पाऊस पडून गेला अन् या पाऊसात डोंगरात असलेली करवंदाची जाळी भिजून गेल्यानं करवंद भिजली.आयुष्यात पहिल्यांदा या वर्षीच्या पहिल्या पडत्या पावसात ती करवंद तोडली..!

एरवी विकत करवंद माहीत होती पण आज हाताने तोडून सागाच्या हत्तीच्या सुपासारख्या असलेल्या कानाएव्हढ्या पानात आईला ती करवंद तीन मैलावरून डवणे करून घेऊन आलो.
काय कारण असावं माहीत नाही पण एक वाटून गेलं की,जी बंजारा समाजाची याडी (आई) वर्षानुवर्ष आमच्यासाठी विकतची करवंद घेऊन येत होती तिच्या हाताला माझ्यामुळे विसावा मिळाला असावा दहा पाच मिनिटांचा.
हे असं छोट्या छोट्या गोष्टीत मला हल्ली समाधान मिळतं अन् हे गेल्या एक वर्षात स्वतःसाठी करवून घेतलेला स्वतःमधील बदल आहे..!

बाकी निसर्ग खूप जवळचा वाटतो आहे.अलीकडे माणसांच्या गर्दीपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायला लागले आहे,त्यामुळे हल्ली निसर्गात राहण्याचा माझा अवधी सुद्धा वाढत चालला आहे.खरं आहे एक दिवस निसर्गाचाच व्हायचं आहे,त्यामुळं हे भान ठेवून हे असं त्याच्या समीप येणं योग्य वाटतं..!

बाकी आज खूप शुभेच्छा अन् खूप प्रेम भेटलं तुमच्याकडून त्यासाठी Thank you..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड