मुख्य सामग्रीवर वगळा

Birthday Wishes अन् बरच काही..!

Birthday Wishes अन् बरच काही..!


पहाटेची रोजची साडेपाचची वेळ नेहमीसारखं फिरायला जाणं होतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली असलेली सावली बघत अंदाज घेत मी चालत राहतो.आज बर्थडे होता अन् पाय जरासे दुःखत असल्यानं दोन्ही वेळची रनिंग आज बंदच होती..!

हा तर मी काय म्हणत होतो की स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली पहाटे चालत असतो.एक एक करून बंद होणारी स्ट्रीट लाईटस् आता मला खुणावत असतात.जसं आयुष्यातील एक वर्ष जितकं सहज म्हणजे स्ट्रीट लाईटने चालू होवून बंद व्हावं तितकं सहज संपून गेलं आहे..!

आयुष्याच्या या वळणावर आहे की जिथे आता वय खुणावते आहे.आता जगण्याला कारण शोधत असतो नेहमीच अन् छोट्या छोट्या गोष्टीत जे समाधान मिळते त्यातून ही कारणे सहज मिळून जातात.आयुष्याला घेऊन बरीच स्वप्नं बघितली होती,जवळ जवळ सर्व पूर्ण झाली आहे.काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तर काही खूप परीक्षा घेत आहे,होईल सर्व ठीक लवकरच अन् ती स्वप्नसुद्धा पूर्णत्वास येतील..!

बाकी पाऊस पडून गेला आहे.निसर्गात सर्वदूर हिरव्या गवताची तृण पहाटे दवात अभिषेक करून आपलं सौदर्य जपवत सौंदर्य प्रदर्शन करत असतात.
फिरायला जातो त्या टेकड्या असलेल्या डोंगराळ रानात दरवर्षी येणारी मेंढपाळ बांधव यावर्षीसद्धा आले आहे..!

काल-परवा त्यांनी पाल लावला कित्येक पिल्लं नुकतीच दोन-तीन दिवसांपूर्वी जन्मली असावी अशी वाटली अन् मला माझ्या जन्माची कहाणी आठवली..!

मान्सूनचा अवकाळी पहिला पाऊस पडून गेला अन् या पाऊसात डोंगरात असलेली करवंदाची जाळी भिजून गेल्यानं करवंद भिजली.आयुष्यात पहिल्यांदा या वर्षीच्या पहिल्या पडत्या पावसात ती करवंद तोडली..!

एरवी विकत करवंद माहीत होती पण आज हाताने तोडून सागाच्या हत्तीच्या सुपासारख्या असलेल्या कानाएव्हढ्या पानात आईला ती करवंद तीन मैलावरून डवणे करून घेऊन आलो.
काय कारण असावं माहीत नाही पण एक वाटून गेलं की,जी बंजारा समाजाची याडी (आई) वर्षानुवर्ष आमच्यासाठी विकतची करवंद घेऊन येत होती तिच्या हाताला माझ्यामुळे विसावा मिळाला असावा दहा पाच मिनिटांचा.
हे असं छोट्या छोट्या गोष्टीत मला हल्ली समाधान मिळतं अन् हे गेल्या एक वर्षात स्वतःसाठी करवून घेतलेला स्वतःमधील बदल आहे..!

बाकी निसर्ग खूप जवळचा वाटतो आहे.अलीकडे माणसांच्या गर्दीपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायला लागले आहे,त्यामुळे हल्ली निसर्गात राहण्याचा माझा अवधी सुद्धा वाढत चालला आहे.खरं आहे एक दिवस निसर्गाचाच व्हायचं आहे,त्यामुळं हे भान ठेवून हे असं त्याच्या समीप येणं योग्य वाटतं..!

बाकी आज खूप शुभेच्छा अन् खूप प्रेम भेटलं तुमच्याकडून त्यासाठी Thank you..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...