मुख्य सामग्रीवर वगळा

Birthday Wishes अन् बरच काही..!

Birthday Wishes अन् बरच काही..!


पहाटेची रोजची साडेपाचची वेळ नेहमीसारखं फिरायला जाणं होतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली असलेली सावली बघत अंदाज घेत मी चालत राहतो.आज बर्थडे होता अन् पाय जरासे दुःखत असल्यानं दोन्ही वेळची रनिंग आज बंदच होती..!

हा तर मी काय म्हणत होतो की स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली पहाटे चालत असतो.एक एक करून बंद होणारी स्ट्रीट लाईटस् आता मला खुणावत असतात.जसं आयुष्यातील एक वर्ष जितकं सहज म्हणजे स्ट्रीट लाईटने चालू होवून बंद व्हावं तितकं सहज संपून गेलं आहे..!

आयुष्याच्या या वळणावर आहे की जिथे आता वय खुणावते आहे.आता जगण्याला कारण शोधत असतो नेहमीच अन् छोट्या छोट्या गोष्टीत जे समाधान मिळते त्यातून ही कारणे सहज मिळून जातात.आयुष्याला घेऊन बरीच स्वप्नं बघितली होती,जवळ जवळ सर्व पूर्ण झाली आहे.काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तर काही खूप परीक्षा घेत आहे,होईल सर्व ठीक लवकरच अन् ती स्वप्नसुद्धा पूर्णत्वास येतील..!

बाकी पाऊस पडून गेला आहे.निसर्गात सर्वदूर हिरव्या गवताची तृण पहाटे दवात अभिषेक करून आपलं सौदर्य जपवत सौंदर्य प्रदर्शन करत असतात.
फिरायला जातो त्या टेकड्या असलेल्या डोंगराळ रानात दरवर्षी येणारी मेंढपाळ बांधव यावर्षीसद्धा आले आहे..!

काल-परवा त्यांनी पाल लावला कित्येक पिल्लं नुकतीच दोन-तीन दिवसांपूर्वी जन्मली असावी अशी वाटली अन् मला माझ्या जन्माची कहाणी आठवली..!

मान्सूनचा अवकाळी पहिला पाऊस पडून गेला अन् या पाऊसात डोंगरात असलेली करवंदाची जाळी भिजून गेल्यानं करवंद भिजली.आयुष्यात पहिल्यांदा या वर्षीच्या पहिल्या पडत्या पावसात ती करवंद तोडली..!

एरवी विकत करवंद माहीत होती पण आज हाताने तोडून सागाच्या हत्तीच्या सुपासारख्या असलेल्या कानाएव्हढ्या पानात आईला ती करवंद तीन मैलावरून डवणे करून घेऊन आलो.
काय कारण असावं माहीत नाही पण एक वाटून गेलं की,जी बंजारा समाजाची याडी (आई) वर्षानुवर्ष आमच्यासाठी विकतची करवंद घेऊन येत होती तिच्या हाताला माझ्यामुळे विसावा मिळाला असावा दहा पाच मिनिटांचा.
हे असं छोट्या छोट्या गोष्टीत मला हल्ली समाधान मिळतं अन् हे गेल्या एक वर्षात स्वतःसाठी करवून घेतलेला स्वतःमधील बदल आहे..!

बाकी निसर्ग खूप जवळचा वाटतो आहे.अलीकडे माणसांच्या गर्दीपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायला लागले आहे,त्यामुळे हल्ली निसर्गात राहण्याचा माझा अवधी सुद्धा वाढत चालला आहे.खरं आहे एक दिवस निसर्गाचाच व्हायचं आहे,त्यामुळं हे भान ठेवून हे असं त्याच्या समीप येणं योग्य वाटतं..!

बाकी आज खूप शुभेच्छा अन् खूप प्रेम भेटलं तुमच्याकडून त्यासाठी Thank you..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...