मुख्य सामग्रीवर वगळा

हृदयात वाजे Something..!

हृदयात वाजे Something..!
सारे जग वाटे Happening..!


कदाचित पुढील पंधरा मिनिटांच्या आत जोरदार पाऊस येईल असं वाटत आहे.मी खिडकीत बसून काचेच्या पलीकडं असलेलं हे मनमोहक दृश्य न्याहाळत बसलो आहे...
इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून मी हे सर्व बघत असतांना दूरवरून येणाऱ्या पावसाच्या सरी क्षणाक्षणाला जवळ येत असल्याचा भास होतो आहे. 

काही वेळापूर्वी हिरवाईने नटलेला शहराच्या चहूबाजूंनी असलेला डोंगररांगेचा परिसर आता मात्र जिथवर नजर जाईल तिथवर पावसाने न्हाऊन निघाला आहे.इमारतीच्या खाली असलेली माणसे त्यांची कामे आवरती घेत आपलं बाडबिस्तर झाकूनपाकून ठेवत आहे.

सिक्युरिटी गार्ड सोसायटीच्या आवारात अस्तव्यस्त गाड्यांना पार्कींगमध्ये नीट लावायला सांगतो आहे.इतक्या उंचावरून तो हातवारे करत जे काही लोकांना सांगत आहे,त्यावरून तो रोजच या  माणसांना सांगून कंटाळला असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर जसे दिसत असतील तसे माझे नजरेसमोर येऊन गेले आहेत.

हॉलीबाॅल खेळणारी मुलं खेळाच्या मैदानावरून घराच्या दिशेने सायकली घेऊन निघाली आहे.त्यातील एकाच्या सायकलची कदाचित चैन उतरली असावी,त्यामुळं तो सायकल बळजबरी ओढत ओढत घेऊन निघाला आहे.हे सर्व बघून त्याचे मित्र त्याला हसत आहे ; पण त्याच्या मदतीला कुणी येत नाहीये,तो भांबावलेल्या अवस्थेत ती सायकल ओढत आहे.

मी लहानपणी ऐन पाऊस येण्याच्या वेळी पेपर वाटत असतांना,माझी सायकल पंक्चर झाली की माझी होणारी अवस्था अन् भर पावसात एखाद्या घराच्या आश्रयाला माझं थांबणं हे सर्वच त्या मुलाच्या फजितीमुळे माझ्या नजरेसमोर येऊन गेलं.
आपसूक डोळे पाणावले अन् आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारे मन अजुन काही काळ त्या आठवणीत रममान झाले.

हायवे वर वडील माणसांची,आईंची गर्दी जमली आहे.कधी एकदा शाळेची बस येते अन् कधी एकदा आपापले मुलं घेऊन पाऊस येण्याच्या आधीच आपण आपल्या फ्लॅटमध्ये पोहचू असं सगळ्यांना झालं असावं,एखाद दोन मुलांच्या आईंनी तर लहान मुलांचे रेनकोट पण सोबत आणले आहे.काही मुलांचे बाबा मोबाईल बघण्यात गुंग आहे.

सिक्युरिटी गार्ड अंकल आता स्ट्रीट लाईटच्या स्विचवर काहीतरी झाकायला हवं ; म्हणून एक जुनी तेलाची कॅन कापून ती त्या स्वीचवर कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे.

सोसायटीच्या आवारात असलेल्या भाजीपाला विकणाऱ्या माझ्या आईच्या वयाच्या मावशी पावसाचं कुणी गिऱ्हाहीक येईल म्हणून चार चार वेळेस दुकानातील भाजीपाला झाकून उघडा करत आहे.त्यांच्या नजरेत असलेले भाव मी बसल्या ठिकाणी हेरले आहे अन् त्यांच्या मनात चालू असलेले विचार काय असतील हे ही सहज हेरले आहे.

सोसायटी सोडून काही दूर असलेल्या प्रेस करणाऱ्या काकांची कोळश्यावर चालणारी इस्तरी पावसाळ्याच्या दिवसांत कोळशे भिजल्यामुळे विस्तव धरेनाशी झाली आहे.काल सायंकाळी त्यांच्याजवळ मित्रांच्या समवेत बसलो असतांना सुहास बोलून गेला की,"काका तुम्ही किती दिवस ही इस्तरी वापरणार जमाना बदलला आहे तुम्हीपण बदला"..!

काकांना त्याच्या या बोलण्याचे खूप वाईट वाटले असावं,असं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून मला वाटलं.पुढे काकांनी सुहासच्या हातात त्याच्या पप्पांच्या इस्तरी केलेल्या कपड्यांची पिशवी दिली अन् सुहास निघून गेला.

मग काका आम्हाला पुढे कितीवेळ समजवत राहिले की इलेक्ट्रिक इस्तरीपेक्षा या कोळशाच्या इस्तरीने कशी कडक इस्तरी होते अन् महिन्याला एक लाख पगार कमावणाऱ्या सुहासच्या पप्पांना ही कडक इस्तरी केलेले कपडे कसे आवडता घरच्या इलेक्ट्रिक इस्तरीपेक्षा.
आता पाऊस आला होता काकांनी दुकानाचे शेटल ओढून घेतले,माऊशी भाजीपाला झाकून चहा पीत खुर्चीवर बसून राहिल्या होत्या.

सिक्युरिटी गार्ड अंकल त्यांच्या कॅबीनमध्ये आजचे कुरियरचे आलेले पार्सल बघून ज्यांचे ते पार्सल होते त्यांना शिव्या घालीत होता.फावला वेळ भेटला म्हणून पार्सल ज्यांचे आहे त्यांना फोन करत होता.

स्कूल बस आली होती मुलांचे आई वडील बरेच ओले झाले होते.शांततेत घरी जायचं सोडून ते बसवाल्याला बोल लावत होते,बस ड्रायव्हर यूपीचा असल्यानं तो विनवण्या करीत होता..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड