मुख्य सामग्रीवर वगळा

Morning Walk With Gautala Wildlife Sanctuary..!

Morning Walk With Gautala Wildlife Sanctuary..! 



आज पहाटे पाचला उठलो तेव्हा घराच्या बाहेर येऊन वातावरणाचा अंदाज घेतला तर सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझीम पाऊस पडत होता.पावसात काही फारसा जोर नसल्यानं मी माझी तयारी करून नेहमीच्याप्रमाणे पहाटे फिरायला निघालो..!

रिमझीम पाऊस सतत चालू होता,रस्त्याने माझ्या खेरीज एखाद दुसरा माझ्यासारखा हौशी सोडला तर फिरायला आज कुणीही आलेलं दिसत नव्हते.ठरल्या प्रमाणे 4 की.मी रनिंग चालू झाली अन् तसे काही एक दीड की.मीच्या अंतराने पाऊसाचा ओघही वाढला..!

मी राहतो किंवा फिरायला ज्या ठिकाणी जातो तो भाग "गौताळा अभयारण्य" परिसरात येत असल्यानं पहाटे फिरायला येणं म्हणजे निसर्गाचा नयनरम्य सोहळा बघायला भेटणंही भेटणं होतं.त्यामुळेच हा हट्टहास असतो की पहाटे इकडे फिरायला येऊन जायचं..!

बरोबर सहा वाजता गौताळा अभयारण्य चौकी जवळ येऊन मी थांबलो,रिमझीम पावसात मी पूर्णपणे ओला झालो होतो अन् भिजण्यातही शरीरारतून घाम निथळत होता काहीवेळ पायी चालत चालत स्वतःला रीलेक्स केलं अन् रोजचे काही ठराविक व्यायाम थोडेफार करून अभयारण्यात पडत असलेल्या पावसाचा नजरा अनुभवत बसलो..!

गेल्या काही दिवसांच्या पावसाने गौताळा अभयारण्य पूर्णपणे हिरवाईने नटलेले आहे.पहाटे गौताळा अभयारण्याला लागून असलेल्या रस्त्यानं धावत असले की विविध पक्षी,प्राण्यांचे आवाज आपल्या कानावर पडत असतात.नशिबात असेल तर मोर,ससा,इतर अनेक पक्षांचे दर्शनही घडते..!

हा सगळा सुंदर नजारा अनुभवत,चौकी जवळ आलं की गौताळा अभयारण्यात वनरक्षक असलेल्या मित्रांशी आपुलकीच्या काहीवेळ गप्पा मारायच्या त्यात कुणी नाईट शिफ्ट संपवून घरी जाण्याची तयारी करत असतो तर कुणी फर्स्ट शिफ्टमध्ये येऊन आपली जिमेदारी पार पाडत असतो,त्यांच्याकडून अभयारण्य बद्दल रोजचा घटनाक्रम ऐकला की मग आपल्या परतीच्या वाटेला लागायचं..!

एरवी मी रोज एकटाच असतो आजही एकटाच होतो पण आज सोबतीला पाऊस होता मग काय पावसाचा पूर्णपणे फायदा घेऊन भिजत भिजत निसर्ग न्याहाळत आपलं चालणं चालू असतं,चार की.मी. धावल्या नंतर जे क्षण अनुभवायला येतात त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही इतकं छान त्या नंतर वाटतं.मग आपल्याच या विश्वात रममाण होवून चालत राहायचं..!

इच्छा असली तर जवळच एक शिखर आहे ते चढून आमच्या शहराचा नजारा न्याहाळून काहीवेळ मेडीटेशन करून मी तिथून निघत असतो पण आज पाऊस असल्यामुळे अन् शिखरावर जाणारी वाट घसरती झाली असल्यानं तो प्रवास टाळत सरळ घराच्या मार्गाने टेकड्या,नाले पार करून छोट्या छोट्या पाऊलवाटेनं घराकडे निघालो..!

घराच्या जवळचा परिसर अजुन बऱ्यापैकी मोकळा असल्यानं अजूनही घरापासुन गौताळा अभयारण्य थेट दिसते.अन् घरा जवळचा परिसरसुद्धा हिरवाईने नटलेला असल्यानं खूप छान वाटत राहते..!

काही वेळापूर्वी येऊन ओले झालेले कपडे बदलून,चहा बिस्कीट खावून मस्त काळोख असलेल्या उबदार खोलीत खाटेवर अंगावर गोधडी घेत झोपून हे सर्व टाईप करत बसलो आहे..!

कदाचित आज निवांत झोपून राहत आणि पुस्तक वाचत आजची दुपार सरून जाईल,अंघोळ करायची आता इच्छा नाहीये..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड