मुख्य सामग्रीवर वगळा

Morning Walk With Gautala Wildlife Sanctuary..!

Morning Walk With Gautala Wildlife Sanctuary..! 



आज पहाटे पाचला उठलो तेव्हा घराच्या बाहेर येऊन वातावरणाचा अंदाज घेतला तर सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझीम पाऊस पडत होता.पावसात काही फारसा जोर नसल्यानं मी माझी तयारी करून नेहमीच्याप्रमाणे पहाटे फिरायला निघालो..!

रिमझीम पाऊस सतत चालू होता,रस्त्याने माझ्या खेरीज एखाद दुसरा माझ्यासारखा हौशी सोडला तर फिरायला आज कुणीही आलेलं दिसत नव्हते.ठरल्या प्रमाणे 4 की.मी रनिंग चालू झाली अन् तसे काही एक दीड की.मीच्या अंतराने पाऊसाचा ओघही वाढला..!

मी राहतो किंवा फिरायला ज्या ठिकाणी जातो तो भाग "गौताळा अभयारण्य" परिसरात येत असल्यानं पहाटे फिरायला येणं म्हणजे निसर्गाचा नयनरम्य सोहळा बघायला भेटणंही भेटणं होतं.त्यामुळेच हा हट्टहास असतो की पहाटे इकडे फिरायला येऊन जायचं..!

बरोबर सहा वाजता गौताळा अभयारण्य चौकी जवळ येऊन मी थांबलो,रिमझीम पावसात मी पूर्णपणे ओला झालो होतो अन् भिजण्यातही शरीरारतून घाम निथळत होता काहीवेळ पायी चालत चालत स्वतःला रीलेक्स केलं अन् रोजचे काही ठराविक व्यायाम थोडेफार करून अभयारण्यात पडत असलेल्या पावसाचा नजरा अनुभवत बसलो..!

गेल्या काही दिवसांच्या पावसाने गौताळा अभयारण्य पूर्णपणे हिरवाईने नटलेले आहे.पहाटे गौताळा अभयारण्याला लागून असलेल्या रस्त्यानं धावत असले की विविध पक्षी,प्राण्यांचे आवाज आपल्या कानावर पडत असतात.नशिबात असेल तर मोर,ससा,इतर अनेक पक्षांचे दर्शनही घडते..!

हा सगळा सुंदर नजारा अनुभवत,चौकी जवळ आलं की गौताळा अभयारण्यात वनरक्षक असलेल्या मित्रांशी आपुलकीच्या काहीवेळ गप्पा मारायच्या त्यात कुणी नाईट शिफ्ट संपवून घरी जाण्याची तयारी करत असतो तर कुणी फर्स्ट शिफ्टमध्ये येऊन आपली जिमेदारी पार पाडत असतो,त्यांच्याकडून अभयारण्य बद्दल रोजचा घटनाक्रम ऐकला की मग आपल्या परतीच्या वाटेला लागायचं..!

एरवी मी रोज एकटाच असतो आजही एकटाच होतो पण आज सोबतीला पाऊस होता मग काय पावसाचा पूर्णपणे फायदा घेऊन भिजत भिजत निसर्ग न्याहाळत आपलं चालणं चालू असतं,चार की.मी. धावल्या नंतर जे क्षण अनुभवायला येतात त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही इतकं छान त्या नंतर वाटतं.मग आपल्याच या विश्वात रममाण होवून चालत राहायचं..!

इच्छा असली तर जवळच एक शिखर आहे ते चढून आमच्या शहराचा नजारा न्याहाळून काहीवेळ मेडीटेशन करून मी तिथून निघत असतो पण आज पाऊस असल्यामुळे अन् शिखरावर जाणारी वाट घसरती झाली असल्यानं तो प्रवास टाळत सरळ घराच्या मार्गाने टेकड्या,नाले पार करून छोट्या छोट्या पाऊलवाटेनं घराकडे निघालो..!

घराच्या जवळचा परिसर अजुन बऱ्यापैकी मोकळा असल्यानं अजूनही घरापासुन गौताळा अभयारण्य थेट दिसते.अन् घरा जवळचा परिसरसुद्धा हिरवाईने नटलेला असल्यानं खूप छान वाटत राहते..!

काही वेळापूर्वी येऊन ओले झालेले कपडे बदलून,चहा बिस्कीट खावून मस्त काळोख असलेल्या उबदार खोलीत खाटेवर अंगावर गोधडी घेत झोपून हे सर्व टाईप करत बसलो आहे..!

कदाचित आज निवांत झोपून राहत आणि पुस्तक वाचत आजची दुपार सरून जाईल,अंघोळ करायची आता इच्छा नाहीये..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...