मुख्य सामग्रीवर वगळा

एक साथी और भी था..! ❤️

एक साथी और भी था..! ❤️

काल सायंकाळी सहज यूट्यूब स्क्रोल करत असताना शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (वय २०) याचा व्हिडिओ बघण्यात आला अन् कालची संपूर्ण रात्र विचार करण्यात खूप सहज निघून गेली..!

चौथीमध्ये असतांना संपूर्ण परभणी जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला येतो.पुढे १८ व्या वर्षी पालघर जिल्ह्यातून पोलिस भरतीला उतरतो,पहिल्याच भरतीत पहिल्याच प्रयत्नात तो तिथे सिलेक्ट होतो.

परंतु देशसेवेचं असलेलं वेड अन् देशाच्या सेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न.त्यासाठी रात्रंदिवस दिवस घेतलेली मेहनत,उर फुटेस्तोवर पळत राहणं,व्यायाम करणं..!

पुन्हा वयाच्या १९ व्या वर्षी नांदेड येथे पहिल्याच आर्मी भरतीसाठी उतरणं,तिथेही पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट होणं अन् देशसेवेचं आपलं स्वप्न साकार झालं,इंडियन आर्मीमध्ये आपल्याला नोकरी लागली म्हणून त्या आनंदात त्याच्या संपूर्ण गावाला गावजेवण देणं..!

आर्मी ट्रेनिंग नंतर "जम्मू काश्मीर" येथील "पुंछ" येथील "कृष्णा घाटी सेक्टर" मध्ये तो ड्युटीसाठी जॉईन होणं.काही दिवसांच्या सेवेनंतर पाकिस्तानी सैनिकांशी चकमक होणं,बॉर्डरच्या आत ३२ किमी जावून देशासाठी लढत राहणं..!

घरच्यांना फोन करून शेवटचं बोलणं,काय बोलावं वीस वर्षाच्या मुलाने ते वाक्य ऐकले अन् डोळ्यातून अश्रू ओघळले..! 
"तात्या मी इथून पुन्हा आलो तर तुमचा नाहीतर भारत मातेचा..!" 
अन् पुढच्या काही क्षणात तो आपल्या भारत मातेचा सेवेत आपल्या प्राणाची बाजी लावतो अन् शहीद होतो..!

काय बोलावं या देशभक्तीला,एकीकडे आपण विसाव्या वर्षी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसतो.तिथं हा शुभम इतका मोठा निर्णय घेऊन भारत मातेच्या सेवार्थ शहीद होतो,हे देशसेवेचं वेड आपसूक येत नाही..!

या वेडासाठी नेहमीच तू आठवणींत असशील..!
खूप काही लिहायचं होतं पण पुढे नाही लिहू शकलो..!

आज चार वर्षांनीसुद्धा तुझी आठवण तितकीच येते..! 

काही दिवसांपूर्वी IAS होण्यासाठी असलेला संघर्ष एका वेब सिरीजमधून बघितला एरवी तो जवळून अनुभवला आहेच.त्या वेब सिरीज मधले एक वाक्य पक्के डोक्यात बसले होते..!

हम बहोत बाद में रिलाईज करते हैं,
की हम देश के काम तो आ रहे हैं,
पर हम पर गर्व करनेवाला कोई नहीं हैं..!

असं कधीच होणार नाही कारण तुमचं कार्य खूप उंचीचं आहे,जिथं गर्व हा शब्द छोटा वाटतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...