मुख्य सामग्रीवर वगळा

एक साथी और भी था..! ❤️

एक साथी और भी था..! ❤️

काल सायंकाळी सहज यूट्यूब स्क्रोल करत असताना शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (वय २०) याचा व्हिडिओ बघण्यात आला अन् कालची संपूर्ण रात्र विचार करण्यात खूप सहज निघून गेली..!

चौथीमध्ये असतांना संपूर्ण परभणी जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला येतो.पुढे १८ व्या वर्षी पालघर जिल्ह्यातून पोलिस भरतीला उतरतो,पहिल्याच भरतीत पहिल्याच प्रयत्नात तो तिथे सिलेक्ट होतो.

परंतु देशसेवेचं असलेलं वेड अन् देशाच्या सेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न.त्यासाठी रात्रंदिवस दिवस घेतलेली मेहनत,उर फुटेस्तोवर पळत राहणं,व्यायाम करणं..!

पुन्हा वयाच्या १९ व्या वर्षी नांदेड येथे पहिल्याच आर्मी भरतीसाठी उतरणं,तिथेही पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट होणं अन् देशसेवेचं आपलं स्वप्न साकार झालं,इंडियन आर्मीमध्ये आपल्याला नोकरी लागली म्हणून त्या आनंदात त्याच्या संपूर्ण गावाला गावजेवण देणं..!

आर्मी ट्रेनिंग नंतर "जम्मू काश्मीर" येथील "पुंछ" येथील "कृष्णा घाटी सेक्टर" मध्ये तो ड्युटीसाठी जॉईन होणं.काही दिवसांच्या सेवेनंतर पाकिस्तानी सैनिकांशी चकमक होणं,बॉर्डरच्या आत ३२ किमी जावून देशासाठी लढत राहणं..!

घरच्यांना फोन करून शेवटचं बोलणं,काय बोलावं वीस वर्षाच्या मुलाने ते वाक्य ऐकले अन् डोळ्यातून अश्रू ओघळले..! 
"तात्या मी इथून पुन्हा आलो तर तुमचा नाहीतर भारत मातेचा..!" 
अन् पुढच्या काही क्षणात तो आपल्या भारत मातेचा सेवेत आपल्या प्राणाची बाजी लावतो अन् शहीद होतो..!

काय बोलावं या देशभक्तीला,एकीकडे आपण विसाव्या वर्षी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसतो.तिथं हा शुभम इतका मोठा निर्णय घेऊन भारत मातेच्या सेवार्थ शहीद होतो,हे देशसेवेचं वेड आपसूक येत नाही..!

या वेडासाठी नेहमीच तू आठवणींत असशील..!
खूप काही लिहायचं होतं पण पुढे नाही लिहू शकलो..!

आज चार वर्षांनीसुद्धा तुझी आठवण तितकीच येते..! 

काही दिवसांपूर्वी IAS होण्यासाठी असलेला संघर्ष एका वेब सिरीजमधून बघितला एरवी तो जवळून अनुभवला आहेच.त्या वेब सिरीज मधले एक वाक्य पक्के डोक्यात बसले होते..!

हम बहोत बाद में रिलाईज करते हैं,
की हम देश के काम तो आ रहे हैं,
पर हम पर गर्व करनेवाला कोई नहीं हैं..!

असं कधीच होणार नाही कारण तुमचं कार्य खूप उंचीचं आहे,जिथं गर्व हा शब्द छोटा वाटतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड