मुख्य सामग्रीवर वगळा

एक साथी और भी था..! ❤️

एक साथी और भी था..! ❤️

काल सायंकाळी सहज यूट्यूब स्क्रोल करत असताना शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (वय २०) याचा व्हिडिओ बघण्यात आला अन् कालची संपूर्ण रात्र विचार करण्यात खूप सहज निघून गेली..!

चौथीमध्ये असतांना संपूर्ण परभणी जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला येतो.पुढे १८ व्या वर्षी पालघर जिल्ह्यातून पोलिस भरतीला उतरतो,पहिल्याच भरतीत पहिल्याच प्रयत्नात तो तिथे सिलेक्ट होतो.

परंतु देशसेवेचं असलेलं वेड अन् देशाच्या सेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न.त्यासाठी रात्रंदिवस दिवस घेतलेली मेहनत,उर फुटेस्तोवर पळत राहणं,व्यायाम करणं..!

पुन्हा वयाच्या १९ व्या वर्षी नांदेड येथे पहिल्याच आर्मी भरतीसाठी उतरणं,तिथेही पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट होणं अन् देशसेवेचं आपलं स्वप्न साकार झालं,इंडियन आर्मीमध्ये आपल्याला नोकरी लागली म्हणून त्या आनंदात त्याच्या संपूर्ण गावाला गावजेवण देणं..!

आर्मी ट्रेनिंग नंतर "जम्मू काश्मीर" येथील "पुंछ" येथील "कृष्णा घाटी सेक्टर" मध्ये तो ड्युटीसाठी जॉईन होणं.काही दिवसांच्या सेवेनंतर पाकिस्तानी सैनिकांशी चकमक होणं,बॉर्डरच्या आत ३२ किमी जावून देशासाठी लढत राहणं..!

घरच्यांना फोन करून शेवटचं बोलणं,काय बोलावं वीस वर्षाच्या मुलाने ते वाक्य ऐकले अन् डोळ्यातून अश्रू ओघळले..! 
"तात्या मी इथून पुन्हा आलो तर तुमचा नाहीतर भारत मातेचा..!" 
अन् पुढच्या काही क्षणात तो आपल्या भारत मातेचा सेवेत आपल्या प्राणाची बाजी लावतो अन् शहीद होतो..!

काय बोलावं या देशभक्तीला,एकीकडे आपण विसाव्या वर्षी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसतो.तिथं हा शुभम इतका मोठा निर्णय घेऊन भारत मातेच्या सेवार्थ शहीद होतो,हे देशसेवेचं वेड आपसूक येत नाही..!

या वेडासाठी नेहमीच तू आठवणींत असशील..!
खूप काही लिहायचं होतं पण पुढे नाही लिहू शकलो..!

आज चार वर्षांनीसुद्धा तुझी आठवण तितकीच येते..! 

काही दिवसांपूर्वी IAS होण्यासाठी असलेला संघर्ष एका वेब सिरीजमधून बघितला एरवी तो जवळून अनुभवला आहेच.त्या वेब सिरीज मधले एक वाक्य पक्के डोक्यात बसले होते..!

हम बहोत बाद में रिलाईज करते हैं,
की हम देश के काम तो आ रहे हैं,
पर हम पर गर्व करनेवाला कोई नहीं हैं..!

असं कधीच होणार नाही कारण तुमचं कार्य खूप उंचीचं आहे,जिथं गर्व हा शब्द छोटा वाटतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...