मुख्य सामग्रीवर वगळा

Love She He

Love She He ..!

सायंकाळचे एक पान डायरीतले विस्कळीत झालेले..!

सायंकाळची वेळ अलीकडे फारच व्यस्थतेच्या अन् मनाला मनाशी काही गोष्टींची ठरवून जी खूनगाठ बांधली आहे ती आधिक घट्ट व्हावी म्हणून त्या संबंधी विचार करण्यात निघून जाते.

निसर्गाने निर्माण केलेली शिशिराची पानगळ बऱ्याच दिवसांपूर्वी थांबली आहे.परंतु सायंकाळी फिरायला ज्या मैदानावर जातो,तिथं मात्र मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली पानगळ दिसून येते.मग आयुष्याला घेऊन असलेला वाईट भूतकाळ आठवतो..!

लवकरच मान्सून वारे पाऊसाला घेऊन आपल्या प्रदेशात येतील अन् मग हा काही क्षणांचा मनात असलेला,आयुष्यात असलेला दुष्काळ संपेल..!

असो..!
सायंकाळ हल्ली माणसांच्या गर्दीतही शांत-शांत हवी-हवीशी वाटते.अलीकडे १६०० मीटरची प्रॅक्टिस करतांना जीवाची खूपच दमछाक होते.मोजल्या ७ मिनिटात ते पूर्ण होत आहे,पण अजुन आयुष्यात अन् करीयरच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं हे ७ मिनिटांच अंतर वजा कसे होईल यासाठी विचार करत असतो..!

ट्रॅकवर पळत असतांना पहिला राऊंड सहज पूर्ण होतो,दुसराही थोडीफार दमछाक करत पूर्ण होवून जातो पण तिसऱ्या राऊंडला मात्र हातपाय जड पडतात,पाय जमिनीवरून वर व्हायला नकोसे म्हणतात पण आयुष्याला सुख हवं आहे.
म्हणून तो ही राऊंड पूर्ण होवून चौथा राऊंडही पूर्ण केला जातो..!

एरवी चेहऱ्यावरून घाम निथळत असतो,टीशर्ट घामाने चिंब भिजलेला असतो.रात्रंदिवस ही मेहनत असणार आहे,नशिबात असेल तर क्षितिज गवसेल.नाहीतर नकार,पात्र न ठरणे या गोष्टींची शरीराला अन् मनालाही सवय झालीच आहेच.हे सर्व आता इतकं अंगवळणी पडलं आहे की,आता दुःख होत नाही पण पुन्हा तितक्याच ताकदीने उभा राहतो पहिल्यापेक्षा..!

ट्रॅकवर जेव्हा थकवा संपुष्टात येण्यासाठी चालत असतो,तेव्हा जवळपास सगळीच माणसे न्याहाळत असतो.कुणाचं ध्येय काय तर कुणाचं काय,कुणाच्या मनात काय चालू आहे हे इथ खूप सहज कळून जातं.माझ्या मनात काय चालू आहे,याचं गणित मात्र सुटत नाही..!

कालच शहरातील नव्यानं पीएसआय झालेला ज्येष्ठ मित्र भेटला,पहिले तर काय बोलावं कळत नव्हतं. १६०० मीटर मारत असतांना हा विचार मनात चालूच होता,एरवी तो ही थकून पायी चालत राऊंड मारत होता.१२व्या मिनिटाला त्याच्याशी बोलून छान वाटले,मिनिटाभराच्या या बोलण्याने छान वाटले.

आता रोज भेट होत राहील पण या मिनिटाभराच्या भेटीचे अप्रूप त्या रोजच्या भेटीला राहणार नाही.एकीकडे स्वप्न सत्यात उतरले आहे अन् एकीकडे त्यासाठी मेहनत घेणं चालू आहे..!

प्रॅक्टिस झाली अन् सायंकाळचा गार वारा अनुभवत झाडांच्या मध्यस्थी असलेल्या बाकड्यावर बसून काही प्रश्न उत्तरे सोडवत बसलो.सोळाव्या मिनिटाला आठवण आली,ठरल्याप्रमाणे डायरेक्ट कॉल केला. 

माझे दुःख तिचे अन् तिचे दुःख माझे त्यामुळे दोघांत शेअरिंग अन् एकमेकांची काळजी घेणं होतं.दहा मिनिटांच्या बोलण्यानं दोघांना एकमेकांचा आधार वाटतो अन् मग फोन ठेवला जातो पुढे कित्येक दिवस न बोलण्यासाठी..!

त्यामुळं नेहमीच असं वाटत आलं आहे की काही गोष्टी आपल्या सोबत आयुष्यभर असायला हव्या,ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात एक आधार असल्याची जाणीव वेळोवेळी होत असते.आपला परिवार तर नेहमी सोबत असतोच..!

निसर्ग,मित्र,त्याच्या जगण्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल असा मार्गदर्शक अन् नशीब जोरावर असलेच तर आपली दुःख जीला तिची वाटावी अशी मैत्रीण सोबतीला असावी.भविष्यात जेव्हा आपलं पुस्तक येईल तेव्हा पहिली प्रत मी विकत घेईल म्हणणारी मैत्रीण आपल्या स्वतःपेक्षा जास्त ती आपल्याला ओळखत असते हे खरं..!

हे सर्व भेटलं की आयुष्य सुंदर आहे,फक्त या सर्वांना घेऊन वेळेचे गणितं आपल्याला जुळवता आली पाहिजे बस इतकंच..!

Written by,
Bharat Sonwane.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड