मुख्य सामग्रीवर वगळा

Love She He

Love She He ..!

सायंकाळचे एक पान डायरीतले विस्कळीत झालेले..!

सायंकाळची वेळ अलीकडे फारच व्यस्थतेच्या अन् मनाला मनाशी काही गोष्टींची ठरवून जी खूनगाठ बांधली आहे ती आधिक घट्ट व्हावी म्हणून त्या संबंधी विचार करण्यात निघून जाते.

निसर्गाने निर्माण केलेली शिशिराची पानगळ बऱ्याच दिवसांपूर्वी थांबली आहे.परंतु सायंकाळी फिरायला ज्या मैदानावर जातो,तिथं मात्र मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली पानगळ दिसून येते.मग आयुष्याला घेऊन असलेला वाईट भूतकाळ आठवतो..!

लवकरच मान्सून वारे पाऊसाला घेऊन आपल्या प्रदेशात येतील अन् मग हा काही क्षणांचा मनात असलेला,आयुष्यात असलेला दुष्काळ संपेल..!

असो..!
सायंकाळ हल्ली माणसांच्या गर्दीतही शांत-शांत हवी-हवीशी वाटते.अलीकडे १६०० मीटरची प्रॅक्टिस करतांना जीवाची खूपच दमछाक होते.मोजल्या ७ मिनिटात ते पूर्ण होत आहे,पण अजुन आयुष्यात अन् करीयरच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं हे ७ मिनिटांच अंतर वजा कसे होईल यासाठी विचार करत असतो..!

ट्रॅकवर पळत असतांना पहिला राऊंड सहज पूर्ण होतो,दुसराही थोडीफार दमछाक करत पूर्ण होवून जातो पण तिसऱ्या राऊंडला मात्र हातपाय जड पडतात,पाय जमिनीवरून वर व्हायला नकोसे म्हणतात पण आयुष्याला सुख हवं आहे.
म्हणून तो ही राऊंड पूर्ण होवून चौथा राऊंडही पूर्ण केला जातो..!

एरवी चेहऱ्यावरून घाम निथळत असतो,टीशर्ट घामाने चिंब भिजलेला असतो.रात्रंदिवस ही मेहनत असणार आहे,नशिबात असेल तर क्षितिज गवसेल.नाहीतर नकार,पात्र न ठरणे या गोष्टींची शरीराला अन् मनालाही सवय झालीच आहेच.हे सर्व आता इतकं अंगवळणी पडलं आहे की,आता दुःख होत नाही पण पुन्हा तितक्याच ताकदीने उभा राहतो पहिल्यापेक्षा..!

ट्रॅकवर जेव्हा थकवा संपुष्टात येण्यासाठी चालत असतो,तेव्हा जवळपास सगळीच माणसे न्याहाळत असतो.कुणाचं ध्येय काय तर कुणाचं काय,कुणाच्या मनात काय चालू आहे हे इथ खूप सहज कळून जातं.माझ्या मनात काय चालू आहे,याचं गणित मात्र सुटत नाही..!

कालच शहरातील नव्यानं पीएसआय झालेला ज्येष्ठ मित्र भेटला,पहिले तर काय बोलावं कळत नव्हतं. १६०० मीटर मारत असतांना हा विचार मनात चालूच होता,एरवी तो ही थकून पायी चालत राऊंड मारत होता.१२व्या मिनिटाला त्याच्याशी बोलून छान वाटले,मिनिटाभराच्या या बोलण्याने छान वाटले.

आता रोज भेट होत राहील पण या मिनिटाभराच्या भेटीचे अप्रूप त्या रोजच्या भेटीला राहणार नाही.एकीकडे स्वप्न सत्यात उतरले आहे अन् एकीकडे त्यासाठी मेहनत घेणं चालू आहे..!

प्रॅक्टिस झाली अन् सायंकाळचा गार वारा अनुभवत झाडांच्या मध्यस्थी असलेल्या बाकड्यावर बसून काही प्रश्न उत्तरे सोडवत बसलो.सोळाव्या मिनिटाला आठवण आली,ठरल्याप्रमाणे डायरेक्ट कॉल केला. 

माझे दुःख तिचे अन् तिचे दुःख माझे त्यामुळे दोघांत शेअरिंग अन् एकमेकांची काळजी घेणं होतं.दहा मिनिटांच्या बोलण्यानं दोघांना एकमेकांचा आधार वाटतो अन् मग फोन ठेवला जातो पुढे कित्येक दिवस न बोलण्यासाठी..!

त्यामुळं नेहमीच असं वाटत आलं आहे की काही गोष्टी आपल्या सोबत आयुष्यभर असायला हव्या,ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात एक आधार असल्याची जाणीव वेळोवेळी होत असते.आपला परिवार तर नेहमी सोबत असतोच..!

निसर्ग,मित्र,त्याच्या जगण्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल असा मार्गदर्शक अन् नशीब जोरावर असलेच तर आपली दुःख जीला तिची वाटावी अशी मैत्रीण सोबतीला असावी.भविष्यात जेव्हा आपलं पुस्तक येईल तेव्हा पहिली प्रत मी विकत घेईल म्हणणारी मैत्रीण आपल्या स्वतःपेक्षा जास्त ती आपल्याला ओळखत असते हे खरं..!

हे सर्व भेटलं की आयुष्य सुंदर आहे,फक्त या सर्वांना घेऊन वेळेचे गणितं आपल्याला जुळवता आली पाहिजे बस इतकंच..!

Written by,
Bharat Sonwane.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...