मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडी ..!

वाभळेवाडी ..!


भर सायंकाळची वेळ झाली,सूर्य अस्ताला जात होता.ढगांच्या आडून लपंडाव खेळणारा सूर्य कधी एकदा डोंगराच्या पल्ल्याड खालच्या अंगाला निघून जाईल अन् कधी एकदा सगळीकडे अंधार बुडुक होईल.या विचाराने एका हातात पांघरूण असलेलं गोणीचे पेंडकं,खांद्याला बंदाची लांबती पिशी अटकवून,डोक्यावर आफिस कामात कागदपत्र ठेवायला म्हणून असलेली सुटकेस घेऊन संतू आण्णा चालत होता..!

नव्यानं शिकावू तलाठी म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेला तिशितला संतू आण्णा मोठ्या साहेबानं ड्युटी दिलेल्या वाभळेवाडी या डोंगराआड असलेल्या गावात नोकरीला रुजू व्हायला म्हणून आधल्या दिवशी खुदच्या गावातून दोन घटकांचा महामंडळाच्या गाडीतून प्रवास करीत निघाला होता..!

वाभळेवाडी नजदीक गावालगत गाडी जात नसल्यानं,गावच्या सहा कोस दूर असलेल्या फाट्यावरुन डांबरी सडकीनं तो पायातल्या वाहना सरकीत सरकीत सांजेच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा कल घेत झपाझप पावलं टाकीत चालत होता..!

गावाकडे जाणारी डांबरी सडक मागे पडली अन् डोंगरा-खोंगरात हरवलेल्या पायवाटेनं संतू अण्णा चालू लागला.ऐरवी सूर्य अस्ताला गेला होता अन् दूरवर गावातले दिवे चमकतांना काजव्यासम लुकलुकतांना दिसत होते.

झाडंझुडपे असलेली रानाची वाट मागे पडली अन् लाल मातीच्या अन् चहूकडे बोडक्या असलेल्या बाभळीच्या रानात संतू आण्णा गावाचा अंदाज घेत चालू लागला..!

चहूकडे पसरलेला काळाकुट्ट अंधार,माळावर मोठ्या आवाजात इवळणारी कुत्रे,गावातल्या सावत्या माळ्याच्या मंदिरातून हरिपाठाचा येणारा आवाज अन् हरीपाठाची दर दुसरी ओळ म्हणत संतू आण्णा गावच्या येशीला आला होता..!

तितक्यात पस्तिशितला रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या बोडक्या बाभळीच्या रानातून आपल्या चड्ड्या सावरत लांब-लांब फलंगा टाकत वाटेनं टरमळे हलवीत हलवीत गप्पा हानित चालले होते..!

दूरवरून येणारा संतू आण्णा त्यांच्या नजरेस पडला अन् ते वेशीच्या अंगाला असलेल्या दगडी चबुतऱ्यावर उकीडवे बसून तंबाखू चोळीत चोळीत गप्पा झोडू लागले.इतक्या वेळात संतू आण्णा त्यांच्याजवळ येऊन त्यांना वाट पुसू लागला..!

तितक्यात पस्तिशितला रामा कुंडुर हातातली तंबाखू तोंडात टाकीत,एक कडक पीक हनीत बचकभर थुंकला अन् संतू आण्णाला बोलू लागला..!

कोण,कुठल्या गावचं म्हणावं पाहूनं..?
बराच वखत केलासा गावू जवळ कराया..!
संतू आण्णा हातातलं पेंडक चबुतऱ्यावर ठेवत सुटकेस सावरत त्याची कहाणी सांगू लागला..!

म्या "संतू आण्णा मावळजे" मौजे "ढोर पिंपळगांव"चा हायसा नव्यानं सरकारात तलाठी म्हणून रुजू झालो हायसा अन् पहिल्याच वख्ताला तुमच्या गावाला नव्यानं शिकावू तलाठी म्हणून वाभळेवाडीस रुजू झालू हायसा..!

हे ऐकल्यावर जगण्या त्याचं टमरेल रामा कुंडुरच्या हातात देत,संतू आण्णाने चबुतऱ्यावर ठेवलेलं पेंडकं खांद्यांवर उचलून घेत बोलू लागला,तलाठी आप्पा सरपंचास्नी सांगावा तरी धाडायचा की फाट्यावर कुणी घ्यायला आलं असता,उगाच जीवाची आबाळ केलीसा तुम्ही..!

तितक्यात संतू आण्णा बोलता झाला,
कसली आबाळ जगण्या दादा,नव्यानं नोकरीला रुजू झालु म्हंजी चालायचंच थोडं बहुत..!
असं म्हणत ते तिघे गावच्या वाटेनं वेशीच्या महुरे चालू लागले..!

तितक्यात रामा कुंडुर बोलू लागला,
तलाठी आप्पा तुमचं सबुत खरं हायसा पण तुम्ही आल्यात सरकारी जावई सरकारचे जावई तुमचा मान राखला गेला पाहिजे..!

जगण्या बोलू लागला: हे कसं बोलला बघ रामा तू मायचास्नी सरकारी नोकरी म्हणजे थाट अस्तूया तलाठी आप्पा..!
आपल्या गावचं पहिलं तलाठी लई बारा भोड्याचं हाय,सरकारी जावई असल्यानं हुकूम गाजीवतय बारबापं..!

क्रमशः

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड