मुख्य सामग्रीवर वगळा

संवेदनशील मनाच्या व्यथा..!

संवेदनशील मनाच्या व्यथा..!

नुकतेच जेवण करून शतपावली करण्यासाठी घराच्या बाहेर पडलो.वातावरणात झालेला बदल शरीराला जाणवू लागला आहे,शरीराला गारवा अनुभवायला मिळतो आहे.

दिवसभर कामाच्या व्यापात दिवस कसा निघून जातो कळत नाही,जेवण झालं की शतपावली करण्याचा हा हक्काचा अर्धा तास.जो रोज हवाहावसा वाटतो,अलीकडे दुपारपासूनच यावेळेची आठवण यायला लागते अन् एकदा का ही वेळ आली की संपूच नये असं हल्ली खूपच वाटून जाते..!

तसेही लॉकडाऊनच्या काळात घरात बसून राहण्याची कॅपेसिटी अजूनच वाढली आहे.एरवी असेही मला फार मित्र किंवा कुणी इतर जवळच्या व्यक्ती लागत नाही,त्यामुळं मी अन् आपला एकांत आमचं मस्त चालू असतं..!

मला हल्ली माणसांच्या गप्पात रमण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात रमायला आवडतं,वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत भटकंती करायला आवडतं. त्यामुळे मित्र,जवळची माणसे यांना घेऊन माझं फार नडत नाही अन् या एकटेपणात जो आनंद मिळतो तो काही औरच आहे,जो मला खूप हवाहवासा वाटतो.यासाठी अनेक गोष्टी,मित्र पणाला लावले तो भाग वेगळा कधीतरी या गोष्टीचं नुकसानही होतं जे खूप भयंकर आहे की मी पूर्णपणे नैराश्यात जातो.
But हे सर्व छान आहे..!

असो माझ्या बाबतीत नेहमीच मी काहीतरी सांगत आलो आहे,त्यामुळे तेच तेच सांगण्यात काही हासिल होत नाही किंवा फायदा नाही.

शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलो की स्ट्रीट लाईटच्या उजेडात ओळखीच्या वाटा मी जवळ करतो.दुतर्फा झाडं असलेल्या सूनसान वाटेला मी चालू लागतो,दूरदूर कुणी नसतं शतपावली करण्यासाठी.इतकी भयाण वाट कुणी निवडावी पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला निसर्गात रमायला आवडतं म्हणून इकडं भटकणं होतं..!

उंच उंच निरगिलीचे झाडं अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह त्यांच्या फांद्यांचा येणारा आवाज,त्यांच्या फुलांचा येणारा सुगंधी सुवास.एकांगाला भयाण अंधाराची जाणीव करून देणाऱ्या बोडक्या बाभळी,निंभाऱ्याची झाडं,गुलमोहर,त्याच्या लाल फुलांचा पडलेला सडा,उंच उंच वाढलेलं बकान अन् रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असलेली मेहंदीच्या उग्र सुगंध देणाऱ्या झाडी,रातराणीचा सुगंध हे सर्व जवळचं अन् हवसं वाटणारं..!

स्ट्रीट लाईटच्या उजेडात दहा-पाच मिनिटाला जाणारी एखादी टू व्हीलरखेरीच दुसरं कुणी इकडं भटकत नाही.दूरवर विद्यालयाची ईमारत तिच्या मेन गेटवर वर्षभरापूर्वी सेक्युरिटी गार्ड म्हणून एक मित्र असायचा,तो आता तिथं नाही.नाहीतर फिरायला आलं की घंटाभर त्याच्याशी गप्पा ठरलेल्या.शाळेच्या स्टाफशी त्यामुळे झालेली ओळख,लेखक म्हणून मला त्यांचं आवंजावं घालून बोलणं..!

या पावसाळ्यात त्या मित्राची प्रकर्षानं आठवण येईल शतपावली करायला आल्यावर.कारण मागील दोन वर्षांच्या पावसाळ्यात कित्येक पावसाच्या राती मी फिरायला आलो अन् पाऊस आला की त्याच्या कॅबीनमध्ये बसून घालवल्या.त्या सर्व रात्री,अश्यावेळी प्रकर्षाने आठवतात..!

काही माणसं चांगली असतात पण वेळ त्यांना वाईट बनवते,त्याच्यासोबत तेच झालं असावं अन् त्यानं हे काम सोडून दिलं.त्याच्या कॅबीनमध्ये जळणारा पिवळा लाईट आजही जळतो आहे,नोंदणीचे रजिस्टर बदलले त्याची जागा दुसऱ्या रजिस्टरने घेतली,अर्जफाटे अधूरे तसेच पडून आहे..!

सहा बाय सहाच्या खोलीत पडत्या पावसाला घेऊन भविष्याची चिंता,अनेक स्वप्न त्यानी मी या कॅबीनमध्ये बघितली.पाऊस पडायचा थांबला की त्याला घरी जायची ओढ अन् मला वाहत्या पाण्यात वाटा शोधत रात्रभर भटकत राहण्याची लागलेली आस.त्यानं मला कित्येकदा वेड ठरवलं पण मी आज माझ्या जागी तसाच आहे जसा दोन वर्षांपूर्वी होतो..!

त्यानं आयुष्यात खूप स्थित्यंतर पाहिली अन् मी माणसांचा सहवास टाळत राहिलो अन् एकाकी पडून गेलो.आजही त्याच मार्गाला माझं शतपावली करणं होतं,त्याने त्याच्या आयुष्यात दोन वर्षात कित्येक मार्ग बदलले असतील.कदाचित त्याला या क्षणांचा विसरही पडला असेल पण मला मात्र हे सर्व कालपरवा घडल्यासारखं वाटतं..!

संवेदनशील मनाच्या गोष्टी काही वेगळ्याच असतात अन् संवेदनशील मनाची माणसं आयुष्यात फार भटकत नाही,हे ही या दोन वर्षात कळून चुकलं.असो अर्धा तास झाला आहे,परतीची वाट खुणावत आहे जायला हवं.
बाकी आता सवय झाली आहे,नाहीतर अधून मधून तो सोबत असायचा..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड