मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सांजेचा किनारा..!

सांजेचा किनारा..! उतरत्या दुपारच्या सोबतीने उगवत्या सांजेची सोनेरी किरणे डोळ्यात साठवत किनाऱ्याने कितीवेळ चालत राहणे.समुद्रातील खारटपणा वाऱ्याच्या अधून-मधून येणाऱ्या झोताने जाणवायचा तितकाच काही क्षणांपूर्ता अंगाशी आलेला चिडचिडेपणा,विचारांची मनाशी लागलेली तंद्री विभक्त होवुन कितीवेळ त्या सागराला न्याहाळत फक्त अन् फक्त चालत राहणं... हातात काही नाहीये आलेला क्षण अथांग पसरलेल्या किनाऱ्यावर समुद्रातल्या पाण्याने धडकत राहतो,कितीवेळ त्याला न्याहाळणे.परतीच्या पाण्यासोबत माझ्या विचारांचे पुन्हा एकदा समुद्रात निरंतर वाहून जाणे बस इतकेच... सांज ढळून येते,एरवी मनुष्य वस्तीपासून सागर किनाऱ्यावर बसायला एकांत कुठे भेटल शोधत शोधत खूप दूरवर येऊन पोचलेलो असतो,आता मनाचीच खोटी समज घालून एकांत व वाऱ्याचे निवांत वाहणाऱ्या झुळकेचे लोट अनुभवत किनाऱ्यावर मातीत पाय रोवून बसून घेणं. पुढे अथांग सागर आहे,एकांत आहे,वाऱ्याची झुळूक आहे आता मी एकांत शोधतोय.तो भेटल न भेटल पण सागरात कितीवेळ नजर लावून दूरवर नावड्यांचा चालू असलेला मासोळी पकडण्याचा जीवनमरणाचा खेळ अनुभवयास मिळतो आहे... छान आहे एकूण विस्तीर्ण पसर

बाभळीची फुले..!

बाभळीची फुले..! लाल मातीने माखलेल्या रस्त्यावर चालतांना चहुकडे पडलेलं पिवळसर ऊन अंगावर घेत झापझाप पावले टाकत कितीवेळ तो अंत नसलेल्या रस्त्याने अनवाणी पावलांनी चालत आहे... रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी बाभळीची झाडं एखाद्या म्हातारीसारखी मधोमध बाक आल्यासारखी कुबडी झालिये,कोणाला माहित... ऐन तारुण्यात त्यांनी पदार्पण केलं की,आयुष्यातील शेवटच्या क्षणाचे डोहाळे त्यांना लागले आहे म्हणून ऐन पाऊस पडायला अन् त्यांच्या त्या पिवळसर फुलांचा लाल मातीच्या रस्त्यावर सडा पडायला वेळ जुळून येण्याचे हे एक नवीन उदाहरण असावे... कारण आयुष्यात आता बराच बदल झाला आहे आणि कुठलातरी तो बदल जो हवाय जो अपेक्षित आहे तो होतच नाहीये.चलो कुछ ना होने से सहीं यहीं अच्छा है..!  इतकंच काय त्या कुबड्या झालेल्या बाभळीसाठी माझ्या आतून आले बस माझं काय वेगळं..? हा प्रश्न पडला की,त्याला काही नाही इतकेच उत्तर योग्य वाटते... मनाने मनाचे काल्पनिक डोहाळे पुरवून घ्यायला शिकून घ्यावं आता इतकंच काय ते... अनवाणी पायांना क्षणांचा गारवा अन् फुलांच्या पायघडीवर झालेला पायांचा हा सत्कार कमी का काय म्हणून,अजून वेगळे काय ते समाधा

World Space Week...

World Space Week... लहानपणी आपला वावर हा नेहमी दोन विश्वात असतो... एक कल्पनेतील विश्व तर दुसरे प्रत्यक्षात जगत असलेले विश्व,यातील कल्पनेतील विश्व म्हणजे जिथे कुठल्याही मर्यादा नसतात आपल्या मनाला वाटल तिथं आपण फिरून येतो. सेकंदात अवकाशात फिरून येणं असो,एखाद्या दुसऱ्या गृहावर जीवन असेल,ते कसे असेल याची कल्पना करून तेथेही वास्तव्य करून येऊ शकतो,तर कधी हडप्पा संस्कृती,जीवनशैली कशी असेल त्यांची घरे प्रत्यक्षात त्यांच्या काळात जावून बघण्याची सुद्धा कल्पना आपण करतो.एकूण हे कल्पनेतील विश्व खूप मोठ्ठं ज्याला सीमा नाही असे आहे... मग तुम्ही म्हणाल याचा फक्त लहानपणाशीच का संबंध जोडला..? मोठी व्यक्ती नाही करू शकत का ही कल्पना..? तर ती ही करू शकते पण,लहानपणी हे जग फारवेळ सोबत असते,त्याच्या प्रती अनेक प्रश्न आपल्याला आपण पाडून घेत असतो अन् त्याचेच उत्तर स्वतः आपण मिळवून घेत असतो.त्यामुळे कुठेतरी लहानपणीच हे कल्पनेतील विश्व कुठेतरी खूप मोठे भव्य असे वाटते,जितके आपण मोठे झाल्यावर या विश्वात रमत नाही.कारण हे फक्त कल्पनेपूर्ते मर्यादित असते असा आपला भाबडा समज असतो,मग कधीतरी योग्यही वाटते तर क

Industrial City...

#industrialCity. #aurangabadcity. महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये आता लवकरच पुर्णत्वास येणारा प्रकल्प म्हणजेच दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरम यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला 'ऑरिक आधुनिक वसाहत' हा प्रकल्प याची एक नवीन भर पडली आहे...   उद्योग वाढीला,उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला विविध कंपन्यांना औरंगाबाद शहरात एक मोठी स्पेस,प्लेटफाॅर्म उपलब्ध होणार आहे... बरेच नवीन प्रकल्प ऑरीकच्या माध्यमातून समोर येतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार,इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असल्यामुळे औरंगाबादचा औद्योगिक क्षेत्रातील विकास पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल. औरंगाबाद शहर औद्योगिक वसाहतींचे शहर म्हणून जो आलेख रेखाटला गेला आहे तो नियमित उंचावत राहीलेला असेल... 'ऑरिक सिटी' हा केंद्र सरकारचा हा एक