मुख्य सामग्रीवर वगळा

Industrial City...

#industrialCity.
#aurangabadcity.

महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला आहे.
त्यामध्ये आता लवकरच पुर्णत्वास येणारा प्रकल्प म्हणजेच दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरम यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला 'ऑरिक आधुनिक वसाहत' हा प्रकल्प याची एक नवीन भर पडली आहे...
 
उद्योग वाढीला,उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला विविध कंपन्यांना औरंगाबाद शहरात एक मोठी स्पेस,प्लेटफाॅर्म उपलब्ध होणार आहे...
बरेच नवीन प्रकल्प ऑरीकच्या माध्यमातून समोर येतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार,इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असल्यामुळे औरंगाबादचा औद्योगिक क्षेत्रातील विकास पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल.
औरंगाबाद शहर औद्योगिक वसाहतींचे शहर म्हणून जो आलेख रेखाटला गेला आहे तो नियमित उंचावत राहीलेला असेल...

'ऑरिक सिटी' हा केंद्र सरकारचा हा एक महात्वाकांशी प्रकल्प असून,देशातील स्मार्ट औद्योगिक वसाहतीमध्ये ऑरीक सिटी आणि संबंधित औद्योगिक समुहांचे प्रामुख्याने यामध्ये नाव घेतली जातील.
जपान सरकारच्या सहकार्याने भारतात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात विकास,अतिउच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे लक्ष आहे जे पुर्णपणे पुर्णत्वास आले आहे.

औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली 'ऑरीक' ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्माणाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे.
परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...

औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असलेल्या कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो...

औरंगाबाद शहर आणि सभोवतालच्या परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी,चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोडला जोडून असलेली एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि शेंद्रा एमआयडीसी,ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती,एमआयडीसी आहेत...

पुढील लेखमध्ये औरंगाबाद शहरातील नामांकित कंपन्या ज्यांच्यामुळे औरंगाबाद शहराला "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी"ही नवीन ओळख मिळाली त्या कंपन्यांची संक्षिप्त रूपात माहिती देण्याचा प्रयत्न असेल...

Bharat Sonwane.
MBA-(production & operation).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड