मुख्य सामग्रीवर वगळा

Industrial City...

#industrialCity.
#aurangabadcity.

महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला आहे.
त्यामध्ये आता लवकरच पुर्णत्वास येणारा प्रकल्प म्हणजेच दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरम यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला 'ऑरिक आधुनिक वसाहत' हा प्रकल्प याची एक नवीन भर पडली आहे...
 
उद्योग वाढीला,उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला विविध कंपन्यांना औरंगाबाद शहरात एक मोठी स्पेस,प्लेटफाॅर्म उपलब्ध होणार आहे...
बरेच नवीन प्रकल्प ऑरीकच्या माध्यमातून समोर येतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार,इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असल्यामुळे औरंगाबादचा औद्योगिक क्षेत्रातील विकास पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल.
औरंगाबाद शहर औद्योगिक वसाहतींचे शहर म्हणून जो आलेख रेखाटला गेला आहे तो नियमित उंचावत राहीलेला असेल...

'ऑरिक सिटी' हा केंद्र सरकारचा हा एक महात्वाकांशी प्रकल्प असून,देशातील स्मार्ट औद्योगिक वसाहतीमध्ये ऑरीक सिटी आणि संबंधित औद्योगिक समुहांचे प्रामुख्याने यामध्ये नाव घेतली जातील.
जपान सरकारच्या सहकार्याने भारतात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात विकास,अतिउच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे लक्ष आहे जे पुर्णपणे पुर्णत्वास आले आहे.

औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली 'ऑरीक' ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्माणाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे.
परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...

औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असलेल्या कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो...

औरंगाबाद शहर आणि सभोवतालच्या परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी,चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोडला जोडून असलेली एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि शेंद्रा एमआयडीसी,ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती,एमआयडीसी आहेत...

पुढील लेखमध्ये औरंगाबाद शहरातील नामांकित कंपन्या ज्यांच्यामुळे औरंगाबाद शहराला "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी"ही नवीन ओळख मिळाली त्या कंपन्यांची संक्षिप्त रूपात माहिती देण्याचा प्रयत्न असेल...

Bharat Sonwane.
MBA-(production & operation).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...