मुख्य सामग्रीवर वगळा

World Space Week...


World Space Week...

लहानपणी आपला वावर हा नेहमी दोन विश्वात असतो...
एक कल्पनेतील विश्व तर दुसरे प्रत्यक्षात जगत असलेले विश्व,यातील कल्पनेतील विश्व म्हणजे जिथे कुठल्याही मर्यादा नसतात आपल्या मनाला वाटल तिथं आपण फिरून येतो.
सेकंदात अवकाशात फिरून येणं असो,एखाद्या दुसऱ्या गृहावर जीवन असेल,ते कसे असेल याची कल्पना करून तेथेही वास्तव्य करून येऊ शकतो,तर कधी हडप्पा संस्कृती,जीवनशैली कशी असेल त्यांची घरे प्रत्यक्षात त्यांच्या काळात जावून बघण्याची सुद्धा कल्पना आपण करतो.एकूण हे कल्पनेतील विश्व खूप मोठ्ठं ज्याला सीमा नाही असे आहे...

मग तुम्ही म्हणाल याचा फक्त लहानपणाशीच का संबंध जोडला..?
मोठी व्यक्ती नाही करू शकत का ही कल्पना..?
तर ती ही करू शकते पण,लहानपणी हे जग फारवेळ सोबत असते,त्याच्या प्रती अनेक प्रश्न आपल्याला आपण पाडून घेत असतो अन् त्याचेच उत्तर स्वतः आपण मिळवून घेत असतो.त्यामुळे कुठेतरी लहानपणीच हे कल्पनेतील विश्व कुठेतरी खूप मोठे भव्य असे वाटते,जितके आपण मोठे झाल्यावर या विश्वात रमत नाही.कारण हे फक्त कल्पनेपूर्ते मर्यादित असते असा आपला भाबडा समज असतो,मग कधीतरी योग्यही वाटते तर कधी अयोग्य...

योग्य का वाटते..?
लहानपणी माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर माझा कल्पनेतील विश्व यात आवडता विषय कुठला असेल तर तो...अवकाश संशोधन टीव्ही आणि वर्तमान पत्रात सहज उपलब्ध होणारे या विषयाशी निगडित लेख मी न चुकता वाचत असे,टीव्हीवर ते दूरदर्शनवरील अवकाश संशोधन या विषयावर असलेले कार्यक्रम बघत असत त्यामुळे नेहमीच एक आकर्षण निर्माण झालेले होते...

अवकाश संशोधन,गृह,अवकाशातील असंख्य तारे,रॉकेट,यान,सॅटलाईट या विषयाप्रती पडलेले असंख्य प्रश्न अन् भविष्यात अवकाशात संशोधन करण्यासाठी आपण स्वतः जाण्याचे कल्पनेतील स्वप्न,ते प्रत्यक्षात उतरते का माहित नाही पण आम्ही कल्पनेत हा सर्व प्रवास केलेला आहे...
तो आठवला की आजही आपण लहानपणी किती सीमा पार करून विचार केले याची जाणीव होते,पण या विषयी असलेली आवड आणि पडलेली असंख्य प्रश्न यांना उत्तरे कसे मिळतील यासाठी नेहमीच मी धडपड करत असे...

ज्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर,इंटरनेट उपलब्ध झाले त्यावेळी मी काय बघावे तर अवकाश संशोधन वरील असंख्य व्हिडिओज त्यावेळी सर्च केले.असे वाटले की,पूर्ण अवकाश तेथील सेकंदाला होणाऱ्या लाखो हालचाली आपण आपल्या हातात कंट्रोल केलेल्या असाव्या हा अनुभव कायम आठवणीत असलेला...

पुढे कितीवेळा ठरवून अवकाशात संशोधन करण्यासाठी माझे मन मला कल्पनेत दुसऱ्या गृहावर घेऊनही गेले,ज्या अशक्य गोष्टी आहे त्या मी शक्यही केल्या कारण यात कल्पनेची जोड कायम होती... कीत्येकवेळा वाटायचे परग्रहावरून एखादी गोणी भरून दगडे घेऊन यावे आणि त्याच्यावर संशोधन करत रहावे,पण ही कल्पना इतर कल्पनेपेक्षा जास्तीच भन्नाट होती सो तो प्रयोग टाळला आम्ही सध्यातरी...

कितीही काही असो हे हास्यास्पद वाटत असले तरी मला वाटते अवकाश संशोधन या विषयात पुढील अनेक विषयांवर संशोधन करताना अनेक कल्पना केल्या जातात.नेमका होणारा फायदा,नुकसान याचाही विचार संशोधक कल्पनेतून करत असतात अन त्यानुसार अनेक आलेख पुढे आखलेले असतात.बऱ्याच वेळेला संशोधन हे वास्तव आणि केलेली कल्पना यांना जोड देऊन केले जात असेल असेही मला वाटते,यात खरे काय खोटे काय हे सांगू शकत नाही...

कारण इतका सहजासहजी आपले काही मते या विषयावर व्यक्त करणे योग्य नाही,कारण हा विषय पूर्ण जगासाठी,अवकाश संशोधन करणाऱ्या संशोधकासाठी महत्त्वाचा आहे,असतो...

आज अवकाशात होणारे संशोधन,अनेक असलेले प्रश्न यांना नासा,इस्रो सारख्या अनेक संस्था ज्या जगभरात कार्यरत आहे त्या आपल्याला एका क्लिकवर कित्येक माहिती, प्रश्नांची उत्तरे आपल्याला उपलबध करून देत असतात...
अवघे विश्व आपण घरात एका छताखाली बसून बघु शकतो,काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानात जगाने केलेली प्रगती बघता पुढील काही काळात अवकाश संशोधनाच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना,कल्पना जगभरात आखल्या गेल्या यांना प्रत्येक्षात यश मिळेल आणि लवकरच मानव अवकाश संशोधनातही आपला दबदबा अवघ्या विश्र्वापार कायम करेल इतकेच वाटते....

आज हे इतके सर्व लिहण्याचे कारण की,गेले काही दिवस
जागतिक अंतराळ सप्ताह दरवर्षी जगभर ४ ते १० ऑक्टोबरच्या  दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week)साजरा केला जात आहे... 

Written by,
 Bharat Sonwane...

"या वर्षीचा हा सप्ताह आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या कृत्रिम उपग्रह या विषयाला समर्पित आहे.जगातल्या कोणत्याही भागातील व्यक्तीशी आपण क्षणात संपर्क साधू शकतो.वेगवेगळी माहिती अगदी एका क्लिक वर आपल्या समोर येते.नैसर्गिक आपत्ती येण्याआधीच सूचना मिळून आपल्याला सतर्क राहता येते.हि सगळी पृथ्वी भोवती फिरणाऱ्या उपग्रहांची देणगी.आकाशवाणी,दूरदर्शन, दूरध्वनी,आंतरजाल,हवामानाचा अंदाज ,संरक्षण ,अभ्यास,जीपीएस अशा विविध कारणांसाठी उपग्रहांचा उपयोग होतो.
जगभरातल्या अनेक देशातील अवकाश संशोधन संस्था,खगोलीय संस्था,हौशी मंडळे,शाळा,महाविद्यालये या विषयाला अनुसरून वेगवेगळे उपक्रम राबवतात.त्यामुळे या विषयावर लिहायचा प्रयत्न..."
Written by,
Vinay Joshi...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड