मुख्य सामग्रीवर वगळा

सांजेचा किनारा..!


सांजेचा किनारा..!

उतरत्या दुपारच्या सोबतीने उगवत्या सांजेची सोनेरी किरणे डोळ्यात साठवत किनाऱ्याने कितीवेळ चालत राहणे.समुद्रातील खारटपणा वाऱ्याच्या अधून-मधून येणाऱ्या झोताने जाणवायचा तितकाच काही क्षणांपूर्ता अंगाशी आलेला चिडचिडेपणा,विचारांची मनाशी लागलेली तंद्री विभक्त होवुन कितीवेळ त्या सागराला न्याहाळत फक्त अन् फक्त चालत राहणं...
हातात काही नाहीये आलेला क्षण अथांग पसरलेल्या किनाऱ्यावर समुद्रातल्या पाण्याने धडकत राहतो,कितीवेळ त्याला न्याहाळणे.परतीच्या पाण्यासोबत माझ्या विचारांचे पुन्हा एकदा समुद्रात निरंतर वाहून जाणे बस इतकेच...

सांज ढळून येते,एरवी मनुष्य वस्तीपासून सागर किनाऱ्यावर बसायला एकांत कुठे भेटल शोधत शोधत खूप दूरवर येऊन पोचलेलो असतो,आता मनाचीच खोटी समज घालून एकांत व वाऱ्याचे निवांत वाहणाऱ्या झुळकेचे लोट अनुभवत किनाऱ्यावर मातीत पाय रोवून बसून घेणं.
पुढे अथांग सागर आहे,एकांत आहे,वाऱ्याची झुळूक आहे आता मी एकांत शोधतोय.तो भेटल न भेटल पण सागरात कितीवेळ नजर लावून दूरवर नावड्यांचा चालू असलेला मासोळी पकडण्याचा जीवनमरणाचा खेळ अनुभवयास मिळतो आहे...

छान आहे एकूण विस्तीर्ण पसरलेला समुद्र,त्यात एकांताची लहर शोधणारा मी,मृत्यू पुढे समोर दिसत असताना जगण्यासाठी चालू असलेला संघर्ष.समुद्र सोयीनुसार सर्व काही देत असतो इतकेच काय ते,कधीतरी सुख किनाऱ्यावर अनुभवता येते अन् मृत्यु भयाण,रौद्र रूप धारण केलेल्या समुद्रात...

सांजेचे ढळून येणे,दूरवर किनाऱ्यावर दिसणारी गर्दी हळूहळू ओझरती होवू लागते घराची ओढ ती काय...
पुन्हा एकदा अंधारलेला किनारा भयाण भासू लागतो,दूरवर दिसणारी एखादी खूप मोठ्ठी जहाज व नुकतीच किनाऱ्यावर येऊन पोचलेली एक छोटीशी नाव तिला किनाऱ्यावर ओढून आणायला,योग्य जागेवर लावायला अंधारात चालू असलेला तो कामगार लोकांचा कामाचा भार हे चक्र नित्याचेच चालू असते...आपण दूरवर बसुन ते बघत बसायच,कधीतरी ऐकु येणारी लहरींची गाझ अन् मनातील विचारांची उडालेली तंद्री पुन्हा एकदा घराकडे परतायची वेळ झाली आहे याची जाणीव करून देत असते...

अंधारात समुद्रातून किनाऱ्यावर येणारी छोटी,छोटी जीव लाटे बरोबर पुन्हा समुद्र आपल्या आत त्यांना सामावून घेतो,निरंतर,शांत होवून खळखळ पुन्हा एकदा किनाऱ्याला भेटायला येण्याची तयारी करू बघतो... 
लाखो वर्ष काही बदल झाला नाहीये तो सगळे काही आपल्या आत घेत राहिला अन् माणूस काही हजारो सालात त्याच्याकडून ती सर्व हिरावत राहिला इतकंच,माणूस नेहमीच क्रूर भासावा असा आहे...

मग तो निसर्गाला असो की या निवांत संथ असलेल्या समुद्राला,खरच मानव क्रूर आहे कधीतरी परिपूर्ती होती पण माणूसच तो बौद्धिक हुशारी माणसाला दिली आहे,त्याच्या बळावर त्याचं नवीन प्रयोग करणे चालूच असते...

मनाच्या तळाशी मनाला लागलेल्या सवयी काही मिटणार्या नसतातच.कधीतरी एकाकी,एकांगी मन अधिकच एकट भासू लागले की,येणं असते आपले पुन्हा एकदा एकांतच शोधायला या अथांग किनाऱ्यावर...काही क्षणाचा एकांत देऊन आखेर तो किनाराही तुम्हाला लाटेच्या स्वरूपात अवखळ वारा अन् पाण्याची धडकी भरवणारी गाझ भेट देऊन जातो,बाकी ते व्यवहारी व्यवहार रोजचे इथेही दिसतात...

एकांत नाहीच कुठे मग किनाऱ्यावर कितीवेळ आपले एकांत शोधत चालत राहणे,त्या विस्तीर्ण अश्या किनाऱ्यावर एकदाची मनाचीच खोटी समज घालून समुद्रात विस्तीर्ण नजर फिरवत एकांत शोधत बसणे इतकेच काय ते....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड