मुख्य सामग्रीवर वगळा

सांजेचा किनारा..!


सांजेचा किनारा..!

उतरत्या दुपारच्या सोबतीने उगवत्या सांजेची सोनेरी किरणे डोळ्यात साठवत किनाऱ्याने कितीवेळ चालत राहणे.समुद्रातील खारटपणा वाऱ्याच्या अधून-मधून येणाऱ्या झोताने जाणवायचा तितकाच काही क्षणांपूर्ता अंगाशी आलेला चिडचिडेपणा,विचारांची मनाशी लागलेली तंद्री विभक्त होवुन कितीवेळ त्या सागराला न्याहाळत फक्त अन् फक्त चालत राहणं...
हातात काही नाहीये आलेला क्षण अथांग पसरलेल्या किनाऱ्यावर समुद्रातल्या पाण्याने धडकत राहतो,कितीवेळ त्याला न्याहाळणे.परतीच्या पाण्यासोबत माझ्या विचारांचे पुन्हा एकदा समुद्रात निरंतर वाहून जाणे बस इतकेच...

सांज ढळून येते,एरवी मनुष्य वस्तीपासून सागर किनाऱ्यावर बसायला एकांत कुठे भेटल शोधत शोधत खूप दूरवर येऊन पोचलेलो असतो,आता मनाचीच खोटी समज घालून एकांत व वाऱ्याचे निवांत वाहणाऱ्या झुळकेचे लोट अनुभवत किनाऱ्यावर मातीत पाय रोवून बसून घेणं.
पुढे अथांग सागर आहे,एकांत आहे,वाऱ्याची झुळूक आहे आता मी एकांत शोधतोय.तो भेटल न भेटल पण सागरात कितीवेळ नजर लावून दूरवर नावड्यांचा चालू असलेला मासोळी पकडण्याचा जीवनमरणाचा खेळ अनुभवयास मिळतो आहे...

छान आहे एकूण विस्तीर्ण पसरलेला समुद्र,त्यात एकांताची लहर शोधणारा मी,मृत्यू पुढे समोर दिसत असताना जगण्यासाठी चालू असलेला संघर्ष.समुद्र सोयीनुसार सर्व काही देत असतो इतकेच काय ते,कधीतरी सुख किनाऱ्यावर अनुभवता येते अन् मृत्यु भयाण,रौद्र रूप धारण केलेल्या समुद्रात...

सांजेचे ढळून येणे,दूरवर किनाऱ्यावर दिसणारी गर्दी हळूहळू ओझरती होवू लागते घराची ओढ ती काय...
पुन्हा एकदा अंधारलेला किनारा भयाण भासू लागतो,दूरवर दिसणारी एखादी खूप मोठ्ठी जहाज व नुकतीच किनाऱ्यावर येऊन पोचलेली एक छोटीशी नाव तिला किनाऱ्यावर ओढून आणायला,योग्य जागेवर लावायला अंधारात चालू असलेला तो कामगार लोकांचा कामाचा भार हे चक्र नित्याचेच चालू असते...आपण दूरवर बसुन ते बघत बसायच,कधीतरी ऐकु येणारी लहरींची गाझ अन् मनातील विचारांची उडालेली तंद्री पुन्हा एकदा घराकडे परतायची वेळ झाली आहे याची जाणीव करून देत असते...

अंधारात समुद्रातून किनाऱ्यावर येणारी छोटी,छोटी जीव लाटे बरोबर पुन्हा समुद्र आपल्या आत त्यांना सामावून घेतो,निरंतर,शांत होवून खळखळ पुन्हा एकदा किनाऱ्याला भेटायला येण्याची तयारी करू बघतो... 
लाखो वर्ष काही बदल झाला नाहीये तो सगळे काही आपल्या आत घेत राहिला अन् माणूस काही हजारो सालात त्याच्याकडून ती सर्व हिरावत राहिला इतकंच,माणूस नेहमीच क्रूर भासावा असा आहे...

मग तो निसर्गाला असो की या निवांत संथ असलेल्या समुद्राला,खरच मानव क्रूर आहे कधीतरी परिपूर्ती होती पण माणूसच तो बौद्धिक हुशारी माणसाला दिली आहे,त्याच्या बळावर त्याचं नवीन प्रयोग करणे चालूच असते...

मनाच्या तळाशी मनाला लागलेल्या सवयी काही मिटणार्या नसतातच.कधीतरी एकाकी,एकांगी मन अधिकच एकट भासू लागले की,येणं असते आपले पुन्हा एकदा एकांतच शोधायला या अथांग किनाऱ्यावर...काही क्षणाचा एकांत देऊन आखेर तो किनाराही तुम्हाला लाटेच्या स्वरूपात अवखळ वारा अन् पाण्याची धडकी भरवणारी गाझ भेट देऊन जातो,बाकी ते व्यवहारी व्यवहार रोजचे इथेही दिसतात...

एकांत नाहीच कुठे मग किनाऱ्यावर कितीवेळ आपले एकांत शोधत चालत राहणे,त्या विस्तीर्ण अश्या किनाऱ्यावर एकदाची मनाचीच खोटी समज घालून समुद्रात विस्तीर्ण नजर फिरवत एकांत शोधत बसणे इतकेच काय ते....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...