मुख्य सामग्रीवर वगळा

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..!

आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं.

कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं.

जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं.
असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते.

आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भटकणं झालं मग; वाचन झालं. बाभळीची वने भटकणं झालं. सायंकाळी फ्लॅटवर आलो तसं पाय फटफट करायला लागले. फ्लॅट पार्टनरला घेऊन भटकायला म्हणून पुन्हा फ्रेश होऊन बाहेर पडलो. 

तो चहाच्या अन् सिगारेटच्या थोटकाच्या भलत्या तलपीचा आहे. "एक कश के साथ चाय की एक सीप" ओढताना त्याची लागलेली तंद्री बघितली की, मला सफल झालेला प्रणय अन् शेवटची काही क्षण जे सुख वाट्याला देऊन जातात, जो ऑर्गझम मिळवून देतात. तो या चुत्या मित्राच्या नजरेतून दिसून येतो.

आयुष्याकडे फार काही अपेक्षा त्याने ठेवलेल्या नाहीये. त्यामुळं तो महिन्याला कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करून मिळणाऱ्या दहा हजारात रोज असं एकदा हे सुख मिळवून,विकत घेऊन खुश असतो. तितकंच खुश जितकं नको त्या ठिकाणी, नको तिला हौस भागण्यापर्यंत कुस्करून झाल्यावर एज.आय.व्ही वाट्याला यावा. मग एखाद्या तरुणाचं तरुण पोरींना फिरविणारं पिळदार शरीर आयुष्यात एड्स येऊन सर्व शरीर खोकलं होऊन जावं.

आयुष्याला घेऊन खूप विरोधाभास आहे, आयुष्यात अश्या भनंग वस्त्या भटकताना वाट्याला आल्या की हे असं लेखनातून येऊन जातं. पण; तिथली दुःख तिथेच सिगारेटीच्या धुराला जसं हवेत बेवारशी सोडावं तसं या भनंग वस्त्याला सोडला जातो. तो या जगण्याचा नियमच आहे. जसं वापरून झाल्यावर झालेल्या हौसेतून वाट्याला आलेलं निरोध बाभळीच्या वनात बेवारशी वाटेला फेकलं जातं.

मग मेसवर रात्रीची बेवारशी आयुष्य असलेल्या आमच्यासारख्या बेवारशी पोरांची जेवणं होतात. कॅनॉट मग भरल्या पोटाच्या संगतीने ओळखीचा वाटू लागतो. भरल्या पोटांना दिसणारी स्वप्न अन् गप्पा या भरभरून असतात, मग; आयुष्यात रस्त्यानं जाणारी होंडा सिटी कधीतरी आपल्या आयुष्यात आपली होऊन येईल अशी स्वप्न बघितली जातात. 

माझ्यासारख्या थोडं अलिप्त आयुष्य जगणाऱ्या मुलांना बघून मग हे बेवारस आयुष्य जगणारी मित्र बोलून जातात की, तू नक्की घेशील होंडा सिटी. आमचं काय..? आम्ही तेव्हापण बेवारस मुसाफिर म्हणून तुझ्या होंडा सिटीतून भटकू पण आता जसं इमाने इतबारे सोबत आहोत तसे या भटकण्यासाठी तुला भाडे देऊ. मी ओंगळवाणे हसून त्यांचं हे बोलणं स्वीकारून घेतो. 

फ्लॅटवर आलो की झोपल्याजागी त्यांच्या या मिश्किल बोलण्याचा विचार करत राहतो. मग प्रश्न पडतो या सगळ्यापासून अलिप्त राहून आयुष्य जगण्यात सुख आहे..? की, त्यांच्यासारखं बेवारस, बेफिकीर होऊन जगण्यात सुख आहे..?

Written by,
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...