मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९

भर दुपार ढळून गेली, गोंडाजी अन् संतू आपलं काम उरकते घेऊन दुपारच्या जेवणाला खदानीच्या भिंती आड सावलीचा आसरा धरून बसणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपल्या शिंगरांना खदानीच्या एका अंगाला असलेल्या गवताच्या रानात चरायला म्हणून खूंटी ठोकून चरायला सोडून दिले. अन् दोघे खदानीतून रीसणाऱ्या पाण्याची कॅन घेऊन जेवायला म्हणून सावलीत बसले.

आजच्याना खदानीतील कामाचा शेवट दिवस होणार होता अन् पुढे काही दिवस आता फक्त घरी राहून वह्राटे, पाटे, उखळं, देवळातले दिवे यांचा दगडांना आकार देऊन शहराला तात्पुरती झोपडी बांधून ते विक्रा करणार होते. दोघांचे जेवणं चालू होते, आता उद्यापासून त्यांच्या कामात होणारा बदल याबद्दलही ते गप्पा मारत होते. तसं यावर्षी दगुड फोडायचा हंगाम चांगलाच गावला होता त्यांना. खदान मायना भी चांगलीच मदत त्यांना केली होती अन् बराच पैका या दगडांना आकार देऊन त्यांचा होणार होता.

आजचा दिवस शेवटचा असल्यानं कामाचा बराच उरक गोंडाजी अन् संतू यांना होता. दोघांनी बिगिबिगी भाकरी खाल्या अन् पुन्हा घन आणि छनी हातोडा घेऊन ते कामाला लागले होते. उन्हाळ्याच्या दिवसातील शेवटचे दिवस उन्हं मी मी करत होती. भर उन्हात खदानीच्या भिंतीशी साळुंकी खेळत होती अन् उंच उंच आकाशात ची.. ची... करत घिरट्या घेत होती.
चातक पक्षाप्रमाणे तीला आठ-दहा दिवस पुढं असलेल्या पाऊसाचा अंदाज बांधता येत असावा म्हणून ती ओरडत असावी असं वाटून जात होतं.

हातोड्याच्या प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या अन् त्याचा व्होलघ्याच्या आवजासारखा आवाज सर्व खदानीत दुमदुमत होता. संतू अन् गोंडाजी खेरिच दोन-चार जोड्या अजून दगुड फोडत होती, त्यांचा शेवटचा दगुड कधी फुटतो कळायला वाव नव्हता. मग एकाकीच कारखान्याला तोडीला जाणाऱ्या टोळीचा जसा पट्टा पडावा तसा पट्टा पडेल.व एकाकी खदानीतले दगड फोडायचे काम बरसदीच्या दिवसांत बंद पडल असं चक्र सुरू होतं.

एकीकडे शहराच्या गावाला डोईवर वह्राटे, पाटे विकणारी रानुबाई, सुमनबाई अन् संतूची घरची चार वाजे पोहतर आपला सारा माल विकून डोइंवर खाली चुंबळ घेऊन पावसा पाण्याचा बसस्टँड जवळ करत होती. बसस्टँड जवळ केलं अन् विकरा झालेल्या पैक्यातून लेकरांना पाच-पाच रुपयांची गोडी शेव अन् जिलेबी घेऊन त्या बसस्टँडात येऊन बसल्या. तिघींचा बराच प्रवास अन् पायपीट न होता आज सगळाच माल विकल्या गेला होता. 

तिघी बसस्टँडात असलेल्या ओट्यावर बसून गावच्या येणाऱ्या बसला बघत,घराची वाट कधी जवळ करतूया या विचारांनी बसस्टँडात घडत असलेल्या घडामोडी बघत बसल्या होत्या. आता उद्यापासून आपल्याला पहाटे मालकाची न्याहारी केली की हीच कामे असतील म्हणून त्या जरा हरखलेले चेहरे, बारीक तोंड करूनच बसून होत्या.
कारण डोईवर इतकं वजन घेऊन दिवसभर विक्रा करायचं काम सोपं नव्हतं, सांच्याला झोपडी जवळ केली की डोकं ठणका मारायचं. अंग भरून यायचं अन् गेल्या गेल्या निपचित पडून रहावे वाटायचं पण वाटलं अन् झालं तो संसार कसला. सांच्याला भाकरी, कोड्यास करणं भांडी,कुंडी करणं पार काम करता करता त्यांचा जीव रंजीस यायचा. पण; त्याला पर्याय पण काय होता आता बरसदीच्या दिवसांत तर ही आबाळ अजूनच वाढलेली अन् अजूनच त्रास ठरलेला होता.

आला दिवस कसातरी काढू म्हणून तिघी विचार करत बसची वाट बघू लागल्या होत्या.काही दहा-पाच मिनिटांच्या अंतराने बस आली अन् तिघी पटकन बसमध्ये बसून आपलं गाव जवळ करू लागल्या. दिवसभर भटकून भटकून आता अस्लाजणाऱ्या सूर्याला घेऊन त्याही अस्ताकडे जावं तसं प्रवास करत होत्या. बस एक एक गाव मागे सोडत खदाणीच्या अन् घाटाच्या पायथ्याला लागली तसं अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या संगतीने मावळत्या दिसाच्या साक्षीला तिघींनी घाटाच्या पूताक असलेल्या सोरटी सोमनाथाच्या देऊळकडे बघत बसमध्येच आपले हात जोडले अन् तिघी मनोमन काहीतरी पुटपुटत प्रार्थना करू लागल्या..!

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...