मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६

मधूनच त्यानं सुमन बाईला भाकरी बांधायला अन् बिगीने आवरायला सांगितले अन् आपल्याला पावसाचा अंदाज बघून लवकर निघायला हवं असं म्हणून तो तिच्या भवती गरबड करू लागला होता. बरसदीचे दिवस जवळ येत होते अन् आता कामाचा उरक वाढवायला हवा म्हणून गोंडाजीसुद्धा गरबड करू लागला होता. 

तितक्यात संतूचा आवाज आला अय लेका मला बी येऊ दे रे, बरसदीच्या आदी म्या बी दगुड घेऊन येतो म्हंजी मग बरसाद सुरू झाली की आपलं टिकी टिकी टाके द्यायचं काम चालू राहील नाय का..!
नागू त्याला बघून हसू लागला अन् बोलता झाला..!
हाव रे लेका तुझ खरं हाय बघ, वजीस आवर अजून वाहतूळ आहे त्यांना आवराया, सुमनबाई न्याहारी बांधायली चौघ संगीतनं अन् सांच्याला संगतीनेच घर जवळ करा.

संतू हे बोलणं ऐकत त्यांच्या शिंगराला पाणी पाजत होता,पाणी पाजून झालं तसं त्यानं त्याच्यावर पोत्याची झूल टाकली अन् तो त्यात त्याचं दगुड फोडायच साहित्य टाकू लागला. त्याला काह ध्यान आलं एकाकी समजलं नाही त्यानं त्याची बंडी चपापली पण त्याला काही गवसत नसल्याचा उधार भाव तो चेहऱ्यावर आणून झोपडी आता गेला अन् आवजाराच्या जागी असलेल्या वळकटीत ठेवलेली छटाक किंवा पावशेराची देशीची एक चपटी त्यानं बंडीच्या आत असलेल्या चोर खिश्यात टाकली अन् तो काहीही न केल्याचं उसनं आवसान आणून त्याच्या बायकोची नजर चुकवीत शिंगरा मोहरं येऊन उभा राहीला अन् त्याच्या घरदनीला मोठ्यानं आवाज देऊ लागला.

संतू बोलू लागला,
म्या काय म्हणतो आवरतया का आजच्या दिस का दिवस इथंच मावळतीला घालायाचा इच्चार हायसा..?
त्याची बायको बोलू लागली,
नाय वं जी निघालू की आता न्याहारी बांधायली, तुम्ही वजेस एका काम करा तू पर, झोपडीच्या मागल्या अंगाला पोत्याची कॅन हायसा तितकी भरून झूलीला बांधा..!
संतू बोलू लागला,
मायला हा काय तमाश्या बा. गडी असून बायकांच्या कामाला जुंपायली तू त मला..!
दूरवरून नागू त्यांचं बोलणं ऐकत असल्याचं संतूच्या लक्षात आलं.
तसं तू गुमान जाऊन कॅन भरून घेऊन आला अन् शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीला पक्की बांधून तो निघाला. मागून डोक्यावर पदर अन् पाटी घेऊन अन् कपाळावर आडवे कुंकू लावलेली त्याची बायकोही त्याच्या मागे निघाली.

दोघेही नागूच्या घराजवळ आली अन् संतू गोंडाजीला हाळी देऊ लागला..!
अय गोंडाजी आवरलं का लेका, सुटतूया का बायकोचा पदर आजच्या दिस..,? 
अन् नागूकडे बघून तो हसायला लागला, एकाकी सगळे हसायला लागले. 

लाजतच गोंडाजी झोपडीतून बाहेर आला, रानूबाईने ठेवलेला कोऱ्या चहाची कप तो थाळणीत घेऊन आला. त्यानं सगळ्यांना चहा दिला, तितक्यात सुमनबाई डोक्यावरचा पदर सावरत पाटी घेऊन समोर आली. तिला लाजयला झालं अन् ती खाली नजर घालून संतूच्या बाई संगतीने चालायला लागली. संतू नागूची राम-श्याम झाली. गोंडाजी संगतीने संतू आपआपली शिंगरू घेऊन गावाच्या सडकीनं निघाली.

गावच्या चौफेर रानाला येड्या बाभळीचे वने असल्यानं गाव चहूकडून बंदिस्त होता. गावच्या एका अंगाला मुसलमान बांधवांचा मोहल्ला अन् एका अंगाला महार, मांग बांधवांची वस्ती होती. एका अंगाला घिसाडी लोकांची झोपडी वजा घरं बरसदीच्या सुरुवातीला तीन महिने असायची अन् मग एखादा गावचा पाटील असावा तसा गावचा घिसाडी गावची सर्व कामं बारा महिने करायचा. अश्यानं त्याची गावात वट होती, गावात पाटलांच्या मांडीला मांडी लावून तो बसायचा.

घिसाडी लोकांचा काफिला त्यांच्या गावाला गेला की मग संतू अन् नागू यांच्या झोपड्या गावच्या एका अंगाला असलेल्या बाभळीच्या वनात पडायच्या. पण गेले दोन-तीन साल त्यांची इथे त्यांचं ठान मांडून ठेवलं होतं. गावच्या मोहरे असलेल्या मोकळतीच्या रानाला तीन-चार खदानी होत्या, दगुड जीव घ्यायचा. खूप मेहनतीने आचारी जेव्हा खव्याची बर्फी करतो अन् ती जशी रवेदार होऊन छान आकारात कापली जाते तसा इथला दगुड आकाराला व्हायला फार त्रास देत नव्हता. अर्धा आधिक टाके देऊन झालं की फुटत नव्हता.
क्रमशः
नाव:भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड